ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> का, तुम्ही कवी गझलकार नाही आहात का? की असूनही तसं समजत नाही?

ह्या प्रतिसादाचा ह्या अत्यंत संवेदनशील धाग्याशी काहीही संबंध आहे असे मला वाटत नाही.

त्यामुळे उत्तर देण्याची गरजही वाटत नाही. Happy

हा धागा तुम्हाला लखलाभ!
>>>
जळला मेला धागा. मी तर इथं काही लिहितही नव्हतो. काही माॅनेटरी बेनिफिट सखलाभ असेल तर सांगा.

मोदी राहुल कधी कुठल्या गटगला येणार नाहीत पण आपण कधीतरी कुठल्या गटगत भेटू तेव्हा विनाकारण मी याला भलतंच बोललो होतो हा पश्चाताप मनात नको. बाकी तुमची मर्जी.>>> बोकलत, तुम्ही अमानवीय धाग्याला झपाटलेलं तेव्हा कोणता गटग झाला नव्हता का?? Biggrin

>>> मी तर इथं काही लिहितही नव्हतो.

वर काही मौल्यवान अभिप्राय आहेत तुमचे. या प्रतिसादातही भाषिक सौंदर्यवृद्धीचा उत्तम प्रयत्न केला आहेत.

येथील काही सदस्यांची मने जळलेली आहेत, साजिरा! Happy त्यांना काहीही, कोणत्याही बाजूचे काहीच, आश्वासक किंवा चांगले वाटत नाही. हे 'त्यांना' सुधारायचे असल्यास निव्वळ वाचक म्हणून राहणे उचित ठरते. या धाग्याशी माझ्या या प्रतिसादाचा काहीही संबंध नसूनही हा प्रतिसाद द्यायला उद्युक्त केल्याबद्दल आभार!

यानंतर, या धाग्यावर वाचनमात्र! Happy

>>> हे असे रोड शो आणि जल्लोष विचित्र वाटतात. ती गाडी लग्नाच्या वरातीत असल्यासारखी फुलांनी सजवली आहे. त्यावर शेजारी शेजारी अनेक असे एकाच व्यक्तीचे अनेक फोटो लावले आहेत. हे अश्लील आहे अक्षरशः
+१

काही सदस्यांची मने जळलेली आहेत, साजिरा!
>>>
तुमच्या नॅरेटिव्ह सेट करण्याच्या नॅशनल कुटिल उद्योगात मला खेचू नका. मन जळलं आहे, म्हणूनच बोंबलत इथं लिहायला आलो. काहींना आनंद झालेला असू शकतो. मने जळली असती, तर आपला आवडता नेता फुलांच्या गाडीत स्वतःचीच, सध्याच्या परिस्थितीत, तेही स्वतःच्याच २५ फोटोंसकट (नॉनबायोलॉजिकल असल्याने जिवंत प्रतिमा पुरत नसेल) मिरवणुक काढतोय, याची लाज वाटली असती, निषेध केला असता. आणि यामुळे कदाचित, खरंच मनेही जळाली असती.

या धाग्यावर वाचनमात्र
>>>
आय होप सो. कारण तुमचं हे सध्याचं बोलणं (आधीच्या अनेक वर्षांबद्दल बोलत नाही) माणुसकीला धरून नाही. नाही बोललात तर तुमच्यातल्या माणसासाठी ते उपयुक्त ठरेल.

बोकलत, तुम्ही अमानवीय धाग्याला झपाटलेलं तेव्हा कोणता गटग झाला नव्हता का?? >>> नाही पण अमानवीय धागा प्रेमी एखादा गटगत असेल तर मला पकडून चोपायचा या भीतीने मी गटगला जायचं टाळतो Wink

युद्ध ऐन भरात असताना हा लेख आला होता त्याची लिंक शेअर केली होती. परत शेअर करत आहे.
https://www.brookings.edu/articles/lessons-for-the-next-india-pakistan-war/

जर राजकारण बाजूला ठेऊन झालेल्या घटनांचे विश्लेषण आणि शस्त्रसंधीचा कार्य कारण भाव समजून घ्यायचा असेल तर हा लेख आणि हा नवीन लेख वाचून बरेच तटस्थ मत बनवता येईल.

https://www.rusi.org/explore-our-research/publications/commentary/calibr...

दोन्ही लेख अभ्यासपूर्ण आणि अकॅडेमिक दृष्टिकोनातून लिहिले आहेत. खरेच endgame सजून घ्यायचा असेल तर हे लेख मदत करतील.

एकूण असिफ मुनीर आपल्या अंतर्गत राजकारणात पकड बसविणे या उद्देश्यात सफल झालेले आहेत. जनमानसात आपली बाजू मांडण्यात भारत कमी पडला तरी जे उच्च पातळीवर निर्णय घेणारे आहेत त्यांना आपली क्षमता आणि उद्दिष्ट दोन्ही व्यवस्थिपणे समजले आहे.

बाकी conspiracy थेअरी तर अनेक आहेत आणि राहणार . एक अशीही आहे कि पाकिस्तान कडे जी अण्वस्त्रे आहेत ती अमेरिकेचीच आहेत आणि ही संभावना अगदीच अशक्य कोटीतली वाटत नाही.

आपल्याला सर्वात मोठे आव्हान यापुढे असणार आहे कि जेव्हा पुढचा हल्ला होईल, पाक सैन्याच्या आशीर्वादाने किंवा नकळत, पण आपल्याला यापुढे त्यावर प्रत्युत्तरात्मक प्रतिसाद काय द्यायचा हे सर्ववत मोठे आव्हान असणार आहे.

बाकी विकू यांची टिप्पणी जास्ती वैफल्यातून आलेली वाटते. काही लोक असतीलही असे प्रदर्शन करणारे, मग ज्या हिरीरीने सगळेच मुस्लिम आतंकवादी नसतात याचा पुरस्कार केला जातो, मग तोच न्याय बहुसंख्य भाजप समर्थकांना का लावू नये? मोदी समर्थक असो वा विरोधक, पण कुणालाही निरपराध लोकांच्या हत्येमुळे आनंद झाला असेल असे बोलणे हा त्यांचा अपमानच आहे. याचाच व्यत्यास असा की मोदी समर्थकांना या घटनेचा जेवढा आनंद भाजप या घटनेचा फायदा मिळवेल म्हणून झाले , तेवढेच दुःख विकू यांना झाले कि भाजप या घटनेचा फायदा मिळवेल म्हणून. दोघांनाही निरपराध नागरिक मेले याचे काहीही सोयर सुतक नाही. दोघेही एकाच माळेचे मणी, फक्त विरुद्ध बाजूला. विकू हे दुसऱ्यांना सिद्ध करू शकतात का कि त्यांना खरे दुःख कशाचे आहे? मग उगाच दुसऱयांवर अनावश्यक टिप्पणी कशाला?

पहलगाम येथे २६ निरपराध नागरिकांना मारणारे अतिरेकी अजूनही का सापडत नाही? ते अजूनही मोकाट कसे?

मुख्य उद्दिष्ट साध्य झाले नसतांना, डोनॉल्ड ट्रम्पच्या दडपणामुळे ऑपरेशन सिंदूर आवरावे लागले. हे कुठले दडपण होते?

माझी नाराजी किंवा दु:ख हे या घटनेचा भाजपा फायदा घेइल (हे आडवळणाने का होईना मान्य केल्याबद्दल धन्यवाद) या आसूयेतून आलेले नाही. मुळात अशा घटनेचा एखाद्या पक्षाने फायदा करून घेणे हेच चूक आहे, मग तो कोणताही असो. निरपराध नागरीक मेले याचे मला सोयर सुतक नाही हेही खोटे आहे, अशा घटनेच्या मुळाशी कोण आहेत ते शोधून त्यांना शिक्षा करणे व जे काही intelligence failure झाले असेल त्यावर उपाय करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असे मी मानतो.

असो. आता या वादात नेहरू / पटेल यांची एन्ट्री झालेली आहे !

भाजप अशा घटनेचा फायदा मिळवेल यात काही चूक नाही, असं वाटणं हेच कसलं तरी लक्षण आहे.

मोदी भक्तांना तसं वाटेल असं वाटणं याला भाजप आणि मोदींचा पूर्वेतिहासच कारण आहे.
मोदींनी पुलवामात बळी पडलेल्या जवानांच्या नावे मते मागितली. आताही तेच करत आहेत.
हिमांशी नरवाल , विक्रम मिस्री आणि त्यांच्या मुलीला टारगेट करणारे हेच भक्तगण आहेत.
विकुंच्या विधानावर लांबलचक प्रतिसाद लिहिणार्‍यांपैकी किती जणांनी हिमांशी नरवाल, विक्रम मिस्री , सोफिया कुरेशी दहशतवाद्यांची बहीण यावर लिहिलं? माझेमन यांचा प्रतिसाद तेवढा आठवतोय.
या तिघांना टारगेट केल्याबद्दल भाजपची प्रतिक्रिया आहे?
सोफिया कुरेशीच्या कुटुंबाला मोदींच्या रॅलीत हजर रहा, असं सरकारी आवतण आलं. म्हणजे तिचा ही वापर करून घेतला.
तिच्या कुटुंबीयांनी मोदींवर पुष्पवृष्टी केली.
पण त्या मंत्र्यावर काही कारवाई झाली?
अशा लोकांसाठी स्वपक्षाच्या फायद्यापेक्षा माणुसकी मोठी आहे, याची खात्री कशी द्यावी?

<<<अशा घटनेच्या मुळाशी कोण आहेत ते शोधून त्यांना शिक्षा करणे व जे काही intelligence failure झाले असेल त्यावर उपाय करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असे मी मानतो>>>>

----- +1

मोदी सरकार घर-घरपहुंचाएगी सिंदूर, 9 जून से चलेगा अभियान >> Uhoh सिरियसली ?

>>> मोदी सरकार घर-घरपहुंचाएगी सिंदूर, 9 जून से चलेगा अभियान
अवघड आहे. प्रेताच्या टाळूवरच्या लोण्याबद्दलचा वाक्प्रचार ऐकला होतं - हे त्याहून वेगळं वाटत नाही.

त्या अतिरेक्यांना शिक्षा झालीच पाहिजे याबद्दल दुमत नाही.
पण डिफेन्स अनॅलिस्ट कम्युनिटीमध्ये असाही एक मतप्रवाह आहे की Cost of terrorism is negligible for Pakistan as terrorists are expendable for them when people are eager to martyr themselves. At the same time, tracking, engaging and neutralizing terrorists is costly for us in terms trained soldiers, equipment & innocent victims. So the thought process is to make terrorism extremely costly for Pakistan.
ऑपरेशन सिंदूर हा या प्रयत्नाचा भाग वाटतो/असावा.

पण माझेमन, तसं असेल तरी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं असं म्हणता येईल का? लोन सिक्युअर केलंच ना पाकिस्तानने?

या ट्वीटला रिप्लाय देणारे बहुसंख्य, सामान्य , जनता आहेत की विरोधी पक्षांचे कार्यकर्ते आहेत?
हँडल न्युज चॅनलचं आहे. एखाद्या पक्षाचं वा नेत्याचं नाही.
https://x.com/news24tvchannel/status/1927658041786180046

लोन सिक्युअर केलंच ना पाकिस्तानने?
>>>>
पाकिस्तानचे लोन रोखणे हे फक्त भारतावर अवलंबून नव्हते. पण ११ एअरबेस उद्ध्वस्त होणे आणि सिंधू पाणी वाटप करार अजूनही स्थगित असणे ही किंमत पाकिस्तानला चांगलीच लक्षात राहील. नाहीतर तेहरानमध्ये जाऊन आपण भारताशी काऊंटर टेररिझम, पाणी वाटप करार यावर बोलायला तयार आहोत हे शाहबाझ शरीफना सांगावे लागले नसते.
IMF च्या लोनमुळे कदाचित इक्विपमेंट खरेदी करता येईलही पण उद्ध्वस्त झालेली कमांड सेंटर्स पूर्ववत करण्यासाठी वेळ लागेलच. मृत पायलट्स आणि एअरमन हा तर इरिप्लेसेबल लॉस आहे.

ह्म्म, मी तुमच्याइतकी ऑप्टिमिस्टिक नाही या बाबतीत. सीझ फायर अ‍ॅक्सेप्ट केल्यावरही हल्ले करणारा देश आहे तो - 'बोलायला तयार' हे किती विश्वसनीय समजायचं?

बोलायला तयार आणि बोलून काही फायदा होईल यावर माझाही विश्वास नाही. पण त्यांनी कबूल केलं किंवा नाही तरी एका terrorist attack ची ११ air base एवढी किंमत फार काळ देऊ शकणार नाहीत ते.

चार दिवसांपूर्वी मी गांधीनगर ला होते. अक्षरशः दर पन्नास फुटावर operation sindoor चे पोस्टर्स लागले होते. विचारलं तेव्हा कळलं मोदींची रॅली त्या रस्त्याने जायची होती.
रोज fm वर दोन चार मुलाखती असतात operation sindoor वर.
किती milking....!!!!

Pages