आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई इंडियन्स आपल्या टिव्हीवर येण्याआधी , बाजारातून येवून तुम्हाला सगळी घरची कामं संध्याकाळच्या आंत उरकून घ्यायची आहेत, समजलं !!20191230_121542_0_2.jpg

पॉवरप्ले मध्ये ९४
RR ची बॉलिंग अगदीच क्लूलेस.... आर्चर पूर्णपणे ऑफ कलर!!

आणि रियान परागची अनाकलनीय कॅप्टन्सी.... तुषार आणि फारुखीची एकेक ओव्हर शिल्लक असताना आर्चरला काय दिली १८ वी ओव्हर?

Yes, कप्तानी मॅटर
राजस्थानचा सुपडा साफ..
ईशान सुद्धा असा खेळू लागला तर हैदराबाद बॅटिंग अजून स्ट्रॉंग झाली..
टॉस जिंकून कशाला त्यांना पहिल्या फलंदाजी दिली.
स्वतः पहिली फलंदाजी घेतली असती तर 200-220 मारून चेसचे प्रेशर टाकता आले असते.

चला जाऊ द्या..
इव्हनिंग ब्लॉकबस्टरच्या तयारीला लागू या Happy

नो पांड्या.. नो बुमराह.. टॉस लॉस.. सामना चेन्नईत.. मुंबईचा पहिला सामना हरण्याचा इतिहास डोक्यात असणार..
एकंदरीत चेन्नई जिंकेल असे वाटत आहे.
पण उलट व्हावे अशी इच्छा आहे.
कारण रोहित आणि धोनी दोघे आवडीचे असले तरी भारतीय कर्णधार मुंबईत असल्याने सॉफ्ट कॉर्नर तिथे आहे.

रोहीत शर्माचे आयपीएलमध्ये फलंदाजी सिरीअसली न घेणे यंदाही कंटिन्यू राहणार वाटते..

२०१२ साली पहिला सामना जिंकलेले मुंबई इंडियन्स.
गेले १२ वर्षे सलग हरले आहेत..

नीता अंबानी आणि आकाश अंबानी हे दोघेच येतात मॅच बघायला आणि सोफा तीन सीटर आणतात. ती मधली सिट माझ्यासाठी असते पण मी जाणं टाळतो.

नूर अहमद ४ विकेट
चेन्नईने त्याला यासाठीच १० करोड मोजून घेतले.

कॉमेंट्री करणाऱ्यांना धोनीचे कौतुक करायला काय वेगळा बोनस मिळतो का कल्पना नाही. कॅमेरा तर चार तास त्याच्यावरच असतो. शेवटी तर मुद्दाम विकेट फेकून त्याला फलंदाजीला आणले की काय असे वाटले. सगळा टीआरपी खेळ आहे.

मुंबई संघ सलग १३ वर्षे पहिला सामना हरला हे पण जरा विचित्रच वाटते. ते सुद्धा या काळात पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तगडा संघ असून हे घडले त्यामुळे जास्त अविश्वसनीय वाटते.

पण संघ चांगला वाटत आहे. पांड्या आणि बुमराह परत आले की संतुलन साधले जाईल. शर्माने फलंदाजी करून आराम करायचा हे सुद्धा आवडले.

विघ्नेश केरळमधील रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा जो कुठल्या तरी क्लबसाठी खेळायचा त्याला शोधून आणला याबाबत मुंबईचे नेहमीसारखेच कौतुक वाटले. चेन्नईबाहेर काय करतो हे बघण्यास उत्सुक.

कॉमेंट्री करणाऱ्यांना धोनीचे कौतुक करायला काय वेगळा बोनस मिळतो का कल्पना नाही. कॅमेरा तर चार तास त्याच्यावरच असतो. शेवटी तर मुद्दाम विकेट फेकून त्याला फलंदाजीला आणले की काय असे वाटले. सगळा टीआरपी खेळ आहे.

मुंबई संघ सलग १३ वर्षे पहिला सामना हरला हे पण जरा विचित्रच वाटते. ते सुद्धा या काळात पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तगडा संघ असून हे घडले त्यामुळे जास्त अविश्वसनीय वाटते.

पण संघ चांगला वाटत आहे. पांड्या आणि बुमराह परत आले की संतुलन साधले जाईल. शर्माने फलंदाजी करून आराम करायचा हे सुद्धा आवडले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 March, 2025 - 23:00

यावरूनच सिद्ध होते कि आयपीएल चे सर्व सामने फिक्स्ड / स्क्रिप्टेड असतात

रहाणे मस्त खेळला परवा..... एकदम फिअरलेस.... मज्जा आली!!
हेझलवूडने टाकलेली लास्ट ओव्हर कमाल होती.... बंगलोरने मस्त कंट्रोल केली कोलकत्ताची इनिंग.... काल राजस्थानकडून ट्रेव्हीषेक आउट झाल्यावर अश्या कंट्रोल ची अपेक्षा होती पण नवख्या परागला ते अज्जीबात जमले नाही.
किती माती खावी याला काही प्रमाण? दुपारच्या मॅचमध्ये हैद्राबादच्या पीचवर इतक्या तगड्या बॅटींग लाईनअप समोर टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचे लॉजिक फक्त आरआरचा द ग्रेट थिंकटॅंक च लावू शकते
संदीप शर्मा जर तुमचा टॉपचा बॉलर आहे तर समोरच्या टीमचे शतक झळकले तरी तुम्ही त्याला बॉलिंगला आणत नाही? टीव्हीवर बघणाऱ्या आमच्यासारख्या सर्वासामान्य प्रेक्षकांना जिथे दिसतेय की आर्चरचा कॉन्फिडन्स पार मायनसमध्ये गेलाय तिथे त्या परागला कळू नये की याच्यापेक्षा फारुखी बरा... गेला बाजार त्या नितीश राणा कडून अजून एखादी ओव्हर टाकून घेतली असती तरी वीसेक रन्सचा फरक पडला असता.
दस्तूरखुद्द परागला टाकता आली असती एखादी ओव्हर!!
फिल्डिंगबद्दल तर बोलायलाच नको.... दुबे, तिक्षणा, आर्चर, जयस्वाल सगळ्यांनी अगदी नव्वदच्या भारताच्या टीमची आठवण करून दिली
बॅटींगमध्ये जयस्वालने अजून थोडा संयम दाखवण्याची गरज आहे.... नितीश राणा कालच्या त्याच्या खेळीवरून अगदीच आउट ऑफ फॉर्म वाटत होता!!
बाकी ज्यांच्यावर रिटेन्शननंतर सगळ्यात जास्त टीका झाली ते ज्यूरेल आणि हेंटमायरच काल सगळ्यात चांगले खेळले..... ज्यूरेल तर एकदमच भन्नाट!!
२४०-५० पर्यंत हैद्राबादला रोखले असतें तर क्लोज गेम झाली असती.

Archer was the difference between two teams

संजू लवकरात लवकर कॅप्टन म्हणून परत यावा..... आणि गाडी रुळावरन पुरती घसरण्याआधी आवश्यक ते बदल करून in form संघ खेळवावा.

दुसऱ्या मॅचमध्ये सगळेच खुप कॅज्युअल कॅज्युअल वाटत होते..... धोंनीला ग्राउंडमध्ये आणायसाठी जडेजा मुद्दामहुन रनआउट झाला असे मलाही वाटले!!

बाकी त्या विघ्नेश पुथुरची बॉलिंग आणि अटीट्यूड आवडला!!

आज राहुल विरुद्ध गोयंका आहे. इंस्टा व्हिडिओ बघितला काय? गोएंकाने खुन्नस दिली राहुलला. राहुलने पण त्याला बॅट दाखवून पाहिले तुझ्या टीमला मैदानात चोपणार आणि नंतर तुला बाहेर चोपणार असा इशारा केलाय. गोयंकाला १०४ ताप भरलाय.

लखनऊची बॉलिंग अटॅक बघा..

प्रिन्स यादव
दिग्वेश राठी
शहाबाज अहमद
शार्दुल ठाकूर
रवी बिश्नोई
एम सिद्धार्थ

इम्पॅक्ट प्लेअर वापरून सुद्धा ... कोण बॉलर आहेत की नाही की दुखापतग्रस्त आहेत

आशुतोष!!! कमाल खेळला. त्याआधी दिल्लीच्या बॉलर्सचं कौतुक — २४०-२५० होऊ शकणारं टारगेट २१२ त रोखलं. नंतर, आशुतोष, स्टब्ज, विप्रज ने ते टारगेट चेस केलं. मस्त झाली मॅच.

पहिल्या दोन मॅचेस बघून वाइताग आला होता. फ्लॅट पिचेस असण्याची पण एक हद्द असते. मुंबई चेन्नई मुळे परत बॅलॅन्स आला असे वाटले.

दिल्लीची मॅच मात्र खल्लास झाली. कसला स्वॅग आहे आशुतोषमधे. काय क्लीन पॉवरफूल फीयरलेस हिट्स होते. विप्रज पण कमालीचा शांतपणॅ खेळला. चुम्माने शेवटी मिस केले ते पार नडले. फेफ फॅन क्ल्ब उघडायचा का ? Wink

मुंबई संघ बदलला आणि त्याचे संतुलन गेल्यावर त्याचा सर्वात मोठा फटका त्यांच्या गोलंदाजीलाच बसला यात दुमत नसेल तर विषय तिथेच संपलाय. >> दुमत शब्दाबद्दल आहे सर. टीम बदलणे ह्याला मॅनेजेमेंटची मस्ती म्हणत नाही सर. पांड्या- रोहित बद्दल मस्ती म्हणायचे होते तुला हे सरळ सरळ उघड आहे. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवणे कशाला. तूला जवळजवळ प्रत्येकाने अनावश्यक आकडेवारी टाकू नको असे सांगूनही तू ती टाकत राहतोस त्याला मस्ती म्हणतात हो लोक.

कोण काय लपवत आहे.
पांड्या रोहित मस्ती गेल्या वर्षी केली ती नडली. संघात दुफळी माजली. सरळच बोलत आहे.
पण त्या आधी रोहीत कप्तान असताना सुद्धा रडतखडत प्ले ऑफ पोचले ती मॅनेजमेंटची मस्ती म्हणजे चुकीची संघ निवड या अर्थानेच म्हटले.
यावेळी पांड्या आणि बुमराह परत आले आणि या संघातील दोन वर्ल्डकप जिंकलेल्या खेळाडूंनी मागच्या वर्षी जे झाले ते विसरून एकी दाखवली तर हा संघ चॅम्पियन होऊ शकतो असा आहे.

तुम्ही त्या जोफ्रा आर्चर वेळचा लिलाव पाहिलेला का
पैसे वाचवून ठेवलेले त्याला घ्यायला.
आणि नंतर त्याने मस्त रायता फैलावला.

Pages