क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामीजी, लेखात विश्लेषण खरंच चांगलं आहे. पण कांहीं गोष्टी एकतरफी मांडल्यासारख्या वाटतात. उदा. -
*Kishan and KL Rahul were slightly unlucky to find the only boundary rider on the leg side, ..* किवीजनी अभ्यासपूर्वक प्रत्येक भारतीय फलंदाजासाठी सांपळा रचला व त्यांच्या गोलंदाजांनी कमालीचं कसब दाखवत त्याची अंमलबजावणी केली, हें स्पष्ट होतं . फलंदाज unlucky म्हणणं सत्याचा विपरयास वाटतो. Indian batsmen lacked versatility to counter the strategy being used against them, that was obvious . They were forced to play their favourite shots and get 'caught out' exactly through the fielder placed at the exact position !

आज इंग्लंड पण टॉस हरले, sharja च्या खेळपट्टीवर 3 फलंदाज लवकर बाद झाले, पण नंतर जसे खेळले तसे भारताने खेळावे अशी अपेक्षा होती चाहत्यांची, मग हरले असते तरी इतके वाईट वाटले नसते

पाकिस्तान विरूद्ध भारत वाईट खेळण्यापेक्षा पाकिस्तान चांगले खेळले असं वाटलं होतं. काल, न्यूझिलंड च्या विरूद्ध भारताची टीम संपूर्णपणे निष्प्रभ झाल्यासारखी वाटली. न्यूझिलंडने प्रत्येक बॅट्समनसाठी सापळा रचला आणि भारतीय टीमकडे त्याचं प्रत्युत्तर नव्हतं असं दिसत होतं. गेल्या काही वर्षांत ही टीम प्रत्येक सेटबॅकनंतर इतक्या वेगाने बाऊन्स बॅक झालीये की असं लागोपाठ दोन मोठे पराभव पहाण्याची सवय आणि तयारीच नव्हती. जूनपासून सातत्याने बाहेर असल्यामुळे सगळे मानसिक आणि शारिरीक थकल्यासारखे वाटतायत. वर्ल्डकपनंतर आठवड्याभरात लगेच भारत वि. न्यूझिलंड सिरीज सुरू होतीय. खेळाडू बर्न-आऊट होतील असं वाटायला लागलंय.

सगळे मानसिक आणि शारिरीक थकल्यासारखे वाटतायत.
>>>>
+७८६

काल यांना ट्रोल करायला व्हॉटसपवर काही विडिओ फिरत होते. कोहली, शर्मा, पंत, अय्यर, किशन आदींनी कशी हॅलोवीन पार्टी साजरी केले याचे.
म्हणे हे लोकं देशासाठी खेळायला गेलेत की पार्ट्या करायला.
लोकांची पण काय मानसिकता असते. स्वतः आठवड्याचे पाच दिवस वर्ल्डकप बघत बघत वर्क फ्रॉम होम केल्यावर सॅटरडे संडे सुट्टीच्या दिवशी मटणावर ताव मारून सोफ्यावर तंगड्या पसरून मॅच बघत बसले असतील. आणि यांनी दोन दोन महिने घराबाहेर फॅमिलीशिवाय राहून चोवीस तास जिम आणि नेटमध्ये घामच गाळायचा अशी अपेक्षा...

They were forced to play their favourite shots and get 'caught out' exactly through the fielder placed at the exact position ! >> मान्य पण तेच फटके थोडे अजून नीट असते तर चित्र बदलले असते असा त्या लेखाचा सूर् वाटला मला. देशातल्या जाहिरतींसाठी आपल्या मॅचेस संध्याकाळी ठेवणे हा एक मुख्य घटक आहे. ईथे सर्व टॉस वर ठरणे साहजिक आहे विएशेषतः आपला स्कोर सेट करायचा रेकॉर्ड बघत बाकी सब चलता है. चांगली टीम आहे नि पुढे बाउन्स करेल अशी नक्की खात्री आहे.

*चांगली टीम आहे नि पुढे बाउन्स करेल अशी नक्की खात्री आहे.* - चांगली टीम असूनही निराशाजनक खेळली, हेंच तर खरं दु:ख आहे. पाक विरूद्ध केलेल्या खेळापेक्षाही न्यूझीलंडच्या मॅचमधे आपण अगदींच अगतिक वाटलो, ही काळजी करण्यासारखीच बाब आहे. हे अपवादात्मक असावं, ही मनोमन प्रार्थना !

मलातरी या सगळ्याचे उत्तर डाउन झालेले टीम मोराल हेच वाटतेय!!
कोहली आणि शास्त्री टीम लीड करण्याच्या मनस्थितीच नव्हते आणि मग जशी निर्नायकी सेना निष्प्रभ ठरते तसे भारतीय संघाचे झाले असावे!

कोहली आणि शास्त्री टीम लीड करण्याच्या मनस्थितीच नव्हते
>>>>

अंतर्गत वाद आहेत. अर्थात पुरावे नाहीयेत आपल्याकडे.

*अंतर्गत वाद आहेत. अर्थात पुरावे नाहीयेत आपल्याकडे.* -
कांहीं तरी बिनसलंय, कदाचित तें फार गंभीरही असावं, असं जाणवतंय हें मात्र खरं ! हरण्याबद्दल दु:ख असलं तरी तक्रार नाहीं, कुणाला दोषही नाहीं. पण इतकी चांगली टीम अशा प्रकारे लागोपाठ दोन सामने गमावते, म्हणून हळहळ व शंका वाटते.
असो, क्रिकेट तर चालू रहाणारच व आपण तें पहातही रहाणारच !!

खरे म्हणजे हा संघ मनसिक आणि शारिरीक दृष्ट्या प्रचंद दमलेला आहे गेले वर्षभर बायोबबल खाली खेळतोय. पैसे आणि संघातील स्थान ह्याचे प्रचंड दडपण खेळाडूंच्या मनावर असावे कोहली, शर्मा, बुमराह वगळता प्रत्येकाला आपले स्थान ह्या स्पर्धेत / सामन्यात आहे पुढच्या वेळी असेल की नाही ह्याची खात्री नाही त्यामुळे सगळेच दडपणाखाली. पंड्याविषयी मी आधीच म्हटले होते पंड्या उपयोगी नाही. उलट ह्या स्पर्स्धे साठी पूर्ण नवा संघ उरविला असता तर प्रस्थापितांना विश्रांती मिळाली असती. नविन विना दडपण खेळले असते. कारण हरले तरी अननुभवी संघ असल्यानी झाला तर फायदाच झाला असता. अजुनही पुढील ३ सामन्यांसाठी कोहली, शर्मा, पंत, पंड्या ह्यांना विश्रांती द्यावी. अश्विनला संधी द्यावी. श्रेयस, सुकुया, आणि भुवी ह्यांना स्थान द्यावे. राखीव मध्ये एखादा गोलंदाज पहावा घेऊन

काही बोलावसच वाटत नाही. पण असो. चांगली टीम नेहमी जिंकतेच अस नाही.
टॉस हरणे, दमणे याबरोबरच विराट म्हणाला तसे द्विधा मनस्थिती कारणीभूत. माझ्या मते शारिरीक दमणुकीपेक्षा आयपीएल मुळे मानसिक रित्या आपली मंडळी दमली होती. आत्मविश्वासाचा अभाव, जिंकायलाच पाहिजे ह्याचे दडपण.
धोनी ऐवजी एखादा मानसतज्ञ असता तर बर झाल असत.
टी-२० साठी आपण वय < ३० चा नियम लावायला पाहिजे. येवढ टॅलेंट असताना ज्यांना खेळून न खेळून काही फरक पडत नाही त्यांना कशाला घ्यायचे.

या वर्ल्डकपनंतर कोहली २०-२० कप्तानी सोडणार होताच. पण सुरुवातीलाच बाहेर पडल्याने आता त्याची वन डे कप्तानी सुद्धा जाणार असे वाटतेय. कोहलीचा गेम होतोय.

एकतर त्याला टीम बिलकुल त्याच्या हिशोबाने दिली नाहीये. सारे मुंबई ईंडियन्स भरले आहेत. भले मग ते पांड्यासारखे अनफिट असो वा सुर्यासारखे आऊट ऑफ फॉर्म. त्याचा लाडका युझी चहलला न घेणे तर अविश्वसनीय होते. तिथेही मुंबई ईंडियन्सचा चहर घेतो, आधीच त्याच्याशी पटत नसलेला आणि या फॉर्मेटमध्ये साधारण भासणारा आश्विन घेतो, चक्रवर्तीला मिस्ट्री म्हणून घेताना एक जडेजा असताना अक्षरलाही ऑलराऊंडर म्हणून घेतो पण युझी चहलची जागा बनवत नाही. एखादा प्रश्नचिन्ह असलेला भुवी घेतो पण ताज्या दमाच्या सिराजचा बहुधा आरसीबीचा असल्याने साधा विचारही होत नाही. आणि एवढही काय कमी म्हणून ज्याला कप्तानीवरून बाजूला सारून तो स्वत: कप्तान झाला त्या धोनीला मेंटर म्हणून आणून याच्या डोक्यावर बसवतात.
खुद्द रोहीत शर्मा आणि कोहलीमधील शीतयुद्धाच्या बातम्यांच्या तर आता उघड चर्चा होत आहेत.

परवा तर एक बातमी वाचली की धोनीने हार्दिक पांड्या द फिनिशरवर विश्वास दाखवल्याने त्याची जागा टिकली असे बीसीसीआयने म्हटले आहे. हसून हसून मुरकुंडी वळली जर खरेच असे बीसीसीआयतर्फे कोणी म्हटले असेल तर...

एक मात्र नक्की आहे,
बीसीसीआय कोहलीला दाखवतेय की ईथे बाप आम्ही आहोत!
द्रविड कोच झाल्यास एक निर्णायक घाव त्याच्या मस्तकावर पडणार आहे.

बटलर तूफान खेळलाय.
>>> बटलर 100 करून देखील इंग्लंड 160.
आपला कोहली 50 केले तर आपण 150+ केले होते...
कोहली ने शतक मारले तर आपण टोटल 300 करू..

हे जे काही वर्णन केल जातय तर मी कोहलीच्या जागी असतो तर खेळायला नकार दिला असता. मी तस केल असत तर नक्कीच कोहलीने तस केल असत. पण ते त्याने केल नाही. याचाच अर्थ असा की अस काही घडल नाही. उगाच कोहलीला धुतल्या तांदुळासारखा म्हणून पावन करण्यात काही अर्थ नाही
संघ निवडीपासून ते वेळेच्या आयोजनापर्यंत आणि सामन्याच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष कृतीपर्यंत सगळ्यांच एकत्रीत पणे चुकत गेल.
हिंडसाईट नेहमी ६/६ असते. पण फक्त पैशाकडे पाहून आयोजन करत राहिले तर आता कुठलाही कप विसरा असे सांगायला कुठल्या ज्योतीषाची आवश्यकता नाही.
वर्ल्ड कप खेळायचा तर प्रत्येक बारीक बारीक गोष्ट सुद्धा वर्ल्ड कप जिंकण्यासाठीच झाली पाहिजे. मग त्यात पैसे, मान, सिनियारिटी सगळे गौण.

*पण फक्त पैशाकडे पाहून आयोजन करत राहिले तर आता कुठलाही कप विसरा असे सांगायला कुठल्या ज्योतीषाची आवश्यकता नाही.* +1

आपला कोहली 50 केले तर आपण 150+ केले होते...
कोहली ने शतक मारले तर आपण टोटल 300 करू..
>>>>

पण आपल्याला ४० ओवर खेळायला देतील का Happy

हे जे काही वर्णन केल जातय तर मी कोहलीच्या जागी असतो तर खेळायला नकार दिला असता
>>>>>

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
सॉरी टू से, पण आपण जिथून बघतोय तिथून सेल्फ रिस्पेक्ट वगैरे भारी शब्द आपल्याला सुचतात. पण जे नमते घेतात, कॉम्प्रोमाईज करतात ते देखील आपल्या जागी योग्यच असतात. कारण कप्तानी तर जातच आहे. आडमुठेपणा केला तर पैसा, ब्राण्ड वॅल्यू सारेच जाईल. फार मोठी किंमत चुकवावी लागू शकते. आज कोहली टॉपच्या पोजिशनला आहे. तिथून दणकून खाली आदळायची कल्पनाही त्याला त्रासदायक वाटत असेल.

जरी चाहत्यांनी एखाद्या खेळाडूला खेळापेक्षा मोठे केले तरी बीसीसीआय त्याला आपल्यापेक्षा कधीच मोठे होऊ देणार नाही

मी क्रिकेट बघायचं सोडून दिलं. या धाग्यावर ही बहुतेक माझी शेवटची पोस्ट. फिक्सिंग आयपीएल क्रिकेटमध्ये डोळ्याला चांगलं वाटेल तेच दाखवतात आणि मग जागतिक क्रिकेटमध्ये अपयश आलं की मनावर होणार आघात जबरदस्त असतो. रामराम क्रिकेट.

भारताला हरवून शानदार जल्लोष करताना पाकिस्तानचा कॅप्टन बाबर म्हणाला, ‘एक क्युट बंदा था. पीछे खड़े रहकर मैच बदल देता था।’-धोनी. Happy

कोहली पुन्हा टॉस हरला...
अफगाणशी.. टेंशन आहे
आज रोहीत राहुलने पॉवरप्ले चोपायला हवे
कारण मुजीब नाहीये आणि राशीद पॉवरप्लेमध्ये येत नाही

"कोहलीचा गेम होतोय." - हा धागा आणि तो आयपीएल चा धागा - दोन्हीकडच्या तुझ्या पोस्ट्स वाचल्या की एक गोष्ट लक्षात येते - तुला फॅक्ट्सपेक्षा कन्स्पिरसी थियरीजमधे जास्त इंटरेस्ट आहे. असो बापडा.. तुला ज्यातून आनंद मिळतो ते तू कर.

आज भारताची आश्वासक सुरूवात. दोघंही ओपनर्स चं फूटवर्क जर टेंटेटीव्ह वाटतंय पण इंटेंट ला पूर्ण मार्कं आहेत आत्तापर्यंत तरी.

भारतीय टीमची असस्था पोलिसांसारखी झाले. मोठया अंडरवर्ल्ड गुंडांना पकडता नाही येत आणि गल्लीतल्या पोरांना चोप देताहेत.

ह्या विश्वचषक स्पर्धेत भारताची टीम आज प्रथमच ओळखीची टीम वाटते आहे ! हायसं वाटलं !!

आमच्या दहावीच्या वर्गात एक मुलगा होता सगळे त्याला टोलवायचे. जो तो उठसूट टपल्या मारून जायचा. त्याला खूपच लाजल्यासारखं व्हायचं. मग एकदा तो किती शूर आहे हे दाखवण्यासाठी पहिलीच्या वर्गात गेला आणि एका पोराला मारलं.

जर टॉप ८-९ संघ घेत प्रत्येक संघ प्रत्येकाशी एकेकदा खेळला असता आणि त्यातून चार निवडले असते तर कमबॅक करायला चान्स राहतो. ईथे आपल्या ग्रूपमध्ये तर स्कॉटलंड नामिबिया सोडल्यास चारच संघ होते. दोन सामने हरताच कमबॅकचा चान्सच संपला.
२००७ चा वर्ल्डकप चार ग्रूपच्या बेक्कार फॉर्मेटमुळे भारत पाकिस्तान बाहेर पडून घाण झालेला..

संघ निवडीपासून ते वेळेच्या आयोजनापर्यंत आणि सामन्याच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष कृतीपर्यंत सगळ्यांच एकत्रीत पणे चुकत गेल.
हिंडसाईट नेहमी ६/६ असते. पण फक्त पैशाकडे पाहून आयोजन करत राहिले तर आता कुठलाही कप विसरा असे सांगायला कुठल्या ज्योतीषाची आवश्यकता नाही. >> +2 . झालेल्या चूकीतून शिकतील अशी अपेक्षा ठेवूया. शेवटी भारत लवकर बाहेर पडला तर त्याचा परीणाम पैशांवर पण होणार आहेच: Wink

"कोहलीचा गेम होतोय." - हा धागा आणि तो आयपीएल चा धागा - दोन्हीकडच्या तुझ्या पोस्ट्स वाचल्या की एक गोष्ट लक्षात येते - तुला फॅक्ट्सपेक्षा कन्स्पिरसी थियरीजमधे जास्त इंटरेस्ट आहे. असो बापडा.. तुला ज्यातून आनंद मिळतो ते तू कर. >> +१. सिरीयसली . विकृत आनंद एव्हढेच म्हणून मी सरकतो.

मी क्रिकेट बघायचं सोडून दिलं. या धाग्यावर ही बहुतेक माझी शेवटची पोस्ट. >> एकदा तरी बोलल्यासारखे कर की मनुष्या. नुसतेच आपले अगं अगं म्हशी सुरू असते Lol

द्रविड - द वॉल कोच होतोय! चांगला निर्णय वाटतोय आता तरी. त्याने एन सी ए आणि अंडर १९ मध्ये भारी काम केलंय!

Pages