कालचा दिवसच 'विराट' होता
काल कुठलीही ईडा-पीडा भारतीय संघाला छळणार नव्हती, कुठल्याही अतृप्त आत्म्याची बाधा होणार नव्हती, कुणाचे शिव्या-शाप भोवणार नव्हते कारण कालचा दिवसच भारतीय संघासाठी 'विराट' होता.
काल कुठलीही ईडा-पीडा भारतीय संघाला छळणार नव्हती, कुठल्याही अतृप्त आत्म्याची बाधा होणार नव्हती, कुणाचे शिव्या-शाप भोवणार नव्हते कारण कालचा दिवसच भारतीय संघासाठी 'विराट' होता.
आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया
ऋषीमुनीशी साधर्म्य दाखवणारे ऋन्मेष असे माझे नाव आहे, पण आहे पक्का मी नास्तिक.
हि झाली प्रस्तावना. आता किस्सा झेला !
गर्लफ्रेंडची वाट बघत पार्कातल्या गुर्हाळात बसलो होतो. जवळच मध्यमवयीन गृहस्थांचा एक कट्टा भरला होता. विषय चालू होता क्रिकेटचा. पण संदर्भ वेगळा. जवळच्याच एका शिवमंदीराच्या आवारात ट्वेंटी-२० आशिया चषकातील भारत-पाक सामन्याचे थेट प्रक्षेपण एका पडद्यावर दाखवले गेले होते. तसेच त्यानंतर रविवारचा भारत-बांग्लादेश सामनाही रंगला होता. यावर त्या लोकांचा कडाडून आक्षेप होता, त्यामुळे वातावरण थोडे तापले होते.
"क्रिकेटचे सामने ही काय मंदीरात दाखवायची गोष्ट आहे का?"