सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नरेंद्र मोदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात नालायक पंतप्रधान आहे.
बाकी पंतप्रधान हे न्यायाची भूमिका घ्याचे,देशाच्या प्रगती चा विचार करायचे.
मोदी हा एकमेव पंतप्रधान आहे तो देशाच्या इतिहासात सर्वात जास्त खोटे बोलणारा पंत प्रधान आहे.
नवीन Submitted by Hemant 33 on 15 October, 2020 - 22:54
--

कडक"गांजा"चा डोस आज जास्त झालेला दिसतोय !

ह्या प्रकरणाच पुढे काय झालं ते सांगू शकेल का ?
रिपब्लिकच्या अर्णबच्या मूर्खपणाला आळा बसलाय का न्यायालयाने कान उपटल्यावर ?

सोनू निगम हा सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या मधुर आवाजात या गायकानं आजवर शेकडो गाणी गायली आहे. सोनूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे त्याचा एक नवा म्यूझिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. या आगामी अल्बममधील ‘ईश्वर का वो सच्चा बंदा’ या हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यात सोनूने एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, “माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करु नये अशी माझी इच्छा आहे

https://www.loksatta.com/manoranjan-news/sonu-nigam-i-dont-want-my-son-t...

माझ्या मुलाने दुबईत करियर करावे - सोनू निगम
Sad

भारतात पैसे मिळवून पोराला दुबईला पाठवणार
आणि ह्याला भारतातले अजान आवडत नव्हते म्हणे,
मग आता पोरगा दुबईत कसा रहाणार ?

अभिनेता असिफ बासराने आत्महत्या केली, तेही कंगना रानावतच्या हिमाचल प्रदेशात.
त्याच्या मृत्यूची चौकशी, असिफला न्याय वगैरे काही नाही का?

सुशांत ला न्याय मिळावा ह्या साठी घसा दुःखे पर्यंत बोंब मारणारे बिहार निवडणूक झाल्या बरोबर निपचित पडले आता त्या. सुशांत चे कोणी नाव पण घेत नाही.

हे हे ! भरत , हिमाचल प्रदेशात निवडणूक कधी आहे Wink

बिहारमध्ये सत्ता मिळाल्याने सुशांतच काम संपलं असून त्याला आता अडगळीत टाकण्यात आलेलं आहे. भुलने नहीं देंगे म्हणत हळूच मागच्या बाकावर ढकलण्यात आलंय. हे अस होणार याची कल्पना असल्याने काहीनी कांगावा करत काढता पाय घेतला इथून Lol

बिचाऱ्या सुशांतच्या मृत्यूची नोंद इतिहासात राजकीय वापरासाठी झाली अशीच होईल. त्याच्या कुटुंबातील लोकांना या प्रकरणात धडा मिळाला तरी पुरे

>>सुशांत चे कोणी नाव पण घेत नाही.<<

अन्वय नाईकचे नाव लोक किती दिवस घेतायत हे पण बघायचय!
ठाकरे सरकार जेंव्हा अन्वय प्रकरण मागच्या बाकावर ढकलेल तेंव्हापण अश्याच कॉमेंट्स येवू देत!

हिमाचल प्रदेशात भाजपचंच राज्य आहे. फक्त विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतले मृत्यू संशयास्पद असतात.

Submitted by भरत. on 17 November, 2020 - 10:18>>> + १००००

अजून त्यात विरोधी पक्षाच् सरकार असेल तर असे मृत्यू ते सरकार पाडायला , अस्थिर करायला उपयोगी पडतात ..
निवडणूक जवळपास असेल तर सीआयए , एफबीआयला लाज वाटेल अश्या conspiracy थियरीज शोधून काढल्या जातात. हद्द आहे.

काहीही असो. नेपोटीझम वर चिडलेली लोकं आमचे कॉम्रेड्स आहेत. त्यांचा इन्हेरीटेड वेल्थ ला विरोध आहे Lol

हिमाचल प्रदेशात भाजपचंच राज्य आहे. फक्त विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतले मृत्यू संशयास्पद असतात.

Submitted by भरत. on 17 November, 2020 - 10:18

डोक्यावर पडलेले लोकच अशी कॉमेंट करु शकतात. खरी गोष्ट अशी आहे की जिथले पोलिस भ्रष्ट असतात त्या राज्यातली सर्वच पोलिस तपास प्रकरणे संशयास्पद असतात,

महाराष्ट्रातले पोलिस भ्रष्ट आहेत तसे हिमाचल मधले पोलिस भ्रष्ट आहेत काय?

नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 17 November, 2020 - 15:02
--

सहमत !
आणि इथे, सुशांतचे आत्महत्या(?) प्रकरण विरोधकांनी जसे लावू धरले तसे तिथले प्रकरण का नाही लावून धरले तिथल्या विरोधकांनी ? उगा येता जाता भाजपा राज्यात असे आहे, इतर राज्यात तसे असे बरळायची सवयच लागलेय या खांग्रेसीना.

इथल्या विरोधी पक्षाने सुशांत प्रकरणी कसे आणि कशासाठी लावून धरले होते ते देश बघतोय.
लावून धरलेले कुठवर आले?

महाराष्ट्र पोलीस भ्रष्ट आणि हिमाचल चे प्रदेश चे पोलिस कर्तव्य दक्ष.
ह्या शतकातील सर्वोत्तम जोक.
सातारा आणि कोल्हापूर मिळवले तरी हिमाचल प्रदेश पेक्षा मोठा प्रदेश होईल.
देशातील सर्वात मोठं मोठ्या गुन्ह्याचे उकलिकरण मुंबई पोलिस नी केले आहे..
देशातील 1 नंबर चे बदमाश,गुंड मुंबई महाराष्ट्रात आहेत.
आणि त्यांना त्यांची जागा जेल मध्ये आहे हे मुंबई पोलिस नी दाखवली आहे.

देशातील 1 नंबर चे बदमाश,गुंड मुंबई महाराष्ट्रात आहेत.
नवीन Submitted by Hemant 33 on 17 November, 2020 - 16:10
--

सहमत !
आणि आज तर ते सत्तेत देखील आहेत.

आता जे सत्तेत आहेत ते छाती वर वार करणारे आहेत.
बाबरी आम्ही पाडली असे सांगणारे आहेत.
शेपूट घालून आमचा बाबरी पाडण्यात सहभाग नाही असे सांगणारे नाहीत.
गोड बोलून पाठीवर वार करणारे नाहीत.
दिलदार शत्रू परवडला पण ghatki मित्र नको.

दिलदार शत्रू परवडला पण ghatki मित्र नको.
नवीन Submitted by Hemant 33 on 17 November, 2020 - 16:19
--

शिवसेने सारख्या "घातकी" मित्रावर भाजपाने निवडणुकी आधी विश्वास ठेवला, हीच मोठी चूक होती.

आणि "जर शिवसैनिकानी बाबरी तोडली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो" असे बाळासाहेबांचे वाक्य होते, अर्थात तुमच्या सारख्यांना ते कळेल याची अपेक्षाच नाही.

>>>इथल्या विरोधी पक्षाने सुशांत प्रकरणी कसे आणि कशासाठी लावून धरले होते ते देश बघतोय.
लावून धरलेले कुठवर आले?

दणदणीत अनुमोदन. साला भर टीव्हीवर एखाद्या व्यक्तीच्या अब्रूचे फेकफेकी करून धिंडवडे काढत होते आणि लोकं सोशल मीडियावरून काहीबाही बघून त्यात भर घालत होते. शेम ! आणि ती व्यक्ती राजकारणी नव्हती, ना तिरस्कार करण्याचे काही कारण होते. तरीही सगळे मागे धावले. भाजपने अगदी तिरस्करणीय प्रकार केला आहे.

वर महा पोलिसांवर आरोप केलाय. पुरावा असेलच. तयार ठेवा.

Submitted by भरत. on 17 November, 2020 - 16:04

मी तर फक्त पुनरुच्चार केलाय. मूळतः पोलिस भ्रष्ट असल्याचा आणि हप्ते घेत असल्याचा आरोप तर सरकारपक्षातील माननीय नेतेमहोदयांनीच केला आहे. हा घ्या त्यांच्या वक्तव्याचा लाडक्या वर्तमानपत्रात आलेला पुरावा -

https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-bhaskar-jadhav-on-liq...

लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडलं? पोलीसही हप्ते घेतातच ना असं वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे. पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारुविक्री केल्याने कारवाई केली असून त्यांची पाठराखण करताना भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलं. गुहागरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी हे वक्तव्य केलं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भास्कर जाधव यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन संताप व्यक्त करताना म्हटलं की, “पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का?”.

इतकं वाचल्यावर बोटखिळी बसली नसल्यास या अनुषंगाने पुढील प्रतिसाद अपेक्षित आहे.

भास्कर जाधव यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन संताप व्यक्त करताना म्हटलं की, “पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का?”.

हा तर एक प्रश्न आहे.

व्याकरणचे शिकरण

आज बिपिन बुवांची बॅटिंग जोरात चालली आहे !
त्यांच्या शाब्दिक फटाक्यांनी विरोधी खेळाडू जायबंदी झालेले दिसत आहेत .
Happy

हा तर एक प्रश्न आहे.

व्याकरणचे शिकरण>>>> शिकरण कसले? उलट तोंड दाबुन बुक्क्यांचा मार आहे. हो म्हणावे तरी मार आणी नाही म्हणावे तर अंतर्मनाचा मार. मय इधर जाऊं या उधर जाऊं ?

Pages