सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राम मंदिर झाले की जरा चार ओळी पारायण करून या , म्हणजे राम सीता , लक्ष्मण , उर्मिला , शूर्पणखा , जरा कुणाकडून तरी समजावून घ्या.
>>>>>>>
ब्लॅक कॅट ,
विषय काय ? उदाहरण कसले देताय ?
प्रत्येक ठिकाणी राममंदिर विषय घुसाडलाच पाहिजे का ?
सद्विवेक बुध्दी असेल तर तिचा वापर करत जा .
तुमचा धर्म कोणताही असू द्या , पण इतर धर्माची विनाकारण टिंगल टवाळी नका करू !
हि नम्र विनंती .
शब्दाला शब्द वाढून असले विषय कधीही अचानक वणव्याचे चे रुप धारण करतात .

मी त्यांना भक्तीभावाने पठण करा , हेच बोललो ,

एक पत्नीव्रत वगैरे आहे ना ? त्यासाठी बोललो

प्रभू त्यांच्यावर सदैव कृपा करोत

ब्लॅक कॅट
ह्यांचा खूप वेळा तोल जातो आणि ते काय पोस्ट करतात हे त्यांनाच समजत नसेल.
मत व्यक्त करण्याचा अधिकार ह्याचा अर्थ हा नाही की कोणत्याही धर्माच्या श्रद्धा स्थानावर चिखलफेक करायची.
मुस्लिम धर्मा ची history बघितली तर अशी खिल्ली उडवायला अनेक उदाहरणे आहेत.
पण सर्व संयम पाळत आहेत ना .
तसा तुम्ही पण पाळा

आले अंगावर सगळे,

विवाहित पुरुषाने स्वतःच्या बायकोशी एकनिष्ठ रहावे

विवाहित पुरुषणवर बायकांनी शूर्पणखेगत मोहजाल टाकू नये

हे त्यांना रामायण वाचल्यावर समजेल , असे मी म्हटले , धर्मग्रँथाचे आदराने पठण करा, चिंतन करा हेच मी लिहिले

टवाळकी करण्याचा हेतू नाही, प्रतिसाद संपादित केला आहे

त्यांनी दिलेले जस्टीफिकेशन बेसलेस आहे .

आले अंगावर सगळे,>>>>>>
अहो येणारच , संयमी आहेत म्हणून फक्त
इथे फक्त मा बो वर अंगावर आलेत , बँगलोर चे लक्षात आहे ना ?
त्यामुळे विनाकारण कोणत्याही धर्मातील उदाहरणे
देताना किमान एकेरी नामोल्लेख तरी टाळावा

आपण सगळ्यानी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यायला पाहिजे.

हो बरोबर आहे बोकलत तुमचं, तो कोण कुठला बिहारी त्यासाठी आपले राजकुमारांना दोषारोपापासुन व राज्यापासुन दुर सारण्याच्या कटापासुन वाचवायलाच हवे.

एक राहिलच, त्या ब्लॅकंड्याच्या नादी लागु नका (रेफ. आज महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असती तर एव्हाना, कर्माचे फळ मिळाले वगैरे लिहून लिहून भक्तांड्यांची बोटे दुखली असती... इति पेज. नं २८).

ओके. मिचुअल अंडरस्टँडिंग म्हनतात हेला, चला मिळुन वाचवुया भावी राजांना.

Lol

झुबीन इराणी आणि स्मृती मल्होत्रा यांचं फार पूर्वीपासून एकमेकांवर प्रेम होतं पण पारशी घराण्यात इतरधर्मीय सून चालणार नाही या कारणाने झुबीनच्या घरच्यांनी त्याचा स्मृती सोबत विवाह होऊ दिला नाही.

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 21 August, 2020 - 15:53

>>>>

हि कहाणी तितकीच खरी आहे जितकी स्मृती बाईची डिग्री खरी आहे. वाहवा! बाकी अशा कहाण्या प्रसृत करणे हे तुम्हा लोकांकडून अपेक्षितच आहे म्हणा त्यामुळे आश्चर्य नाही वाटले.

वस्तुस्थिती अशी आहे कि स्मृती बाई मोडेलिंग करत होती तेंव्हा झुबीन ह्या उद्योगपतीला भेटली आणि त्याचा संसार मोडून त्याच्याशी लग्न केले. ते दोघे आधी एकमेकांना ओळख होते पण त्यांचे आधी प्रेम होते आणि त्याला घरच्यांचा विरोध होता हि तद्दन भाकडकथा आहे.
उलट स्मृतीबाई स्वत:च सांगते:

"I married Zubin because I needed him. I was consulting him, talking to him and meeting him every day. So we said why not marry and be best friends as well as a married couple. Both my parents and his agreed to our marriage and blessed us"

औरंगाबाद : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आक्षेपार्ह शब्दात कमेंट करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शशिकांत गुलाब जाधव असं आरोपीचं नाव आहे. त्याने सोनाक्षीसह बॉलिवूडच्या इतर कलाकारांबाबतही वादग्रस्त कमेंट केली होती.

https://www.tv9marathi.com/entertainment/police-arrested-youth-for-makin...

मोठ्या लोकांचे विचार फार पुढारलेले असतात .
सुशांत आत्महत्या केस मध्ये पण रिया अंकिता हे दोन कोन आहेत .
कबीर बेदीची बायको प्रोतिमा बेदी च्या ' अत्यंत जवळच्या ' मित्रा मध्ये 83 काँग्रेस चा एक केंद्रीय मंत्री , त्याच काळातील महाराष्ट्र काँग्रेस चा वजनदार नेता, महाराष्ट्रातीलच एक यशस्वी वकील , आणि कर्नाटक चा मुख्यमंत्री हे असल्याचे उल्लेख टाइम पास या पुस्तकात आहेत .
पुस्तक तिच्या मुलीने लिहिले आहे .

धाग्याचे विषयांतर होतच आहे तर भावी पंतप्रधान पप्पू शेठ चे आत्ता पर्यंत उरकून जायला हवे होते , देशाला नेतृत्व नाही देऊ शकत तर किमान गेल्या ६० वर्षात कमवलेल्या जहागिरी ला वारस ची गरज आहे ना ?
का जे काही आहे ते डीव्हायडेड बाय टू वाड्रा आणि माय नो ( इटली) ? Happy

वाद ग्रस्त कमेंट वर खरंच कारवाई करायची झाली तर समाज मध्यम वापरणारे 90 टक्के लोक जैल मध्ये टाकावी लागतील.
ह्या गोऱ्या लोकांनी भारता सारख्या काळ्या लोकांना you tube,fb, instgram,he सर्व फुकटात का दिले आहे ,आणि काय असेल त्यांचा उद्देश .
एका कमेंट ला 100 रुपये चार्ज लावला तर मला नाही वाटत कोण कमेंट करण्याच्या लफड्यात पडेल.

ब्लॅक कॅट सगळेच धागे खालच्या पातळीवर न्यायला सुर वात मात्र तुम्ही छान करता !
पण जरा सांभाळून Happy

सुशांत सिंग हा अमली पदार्थ आणि दारू च्या आहारी गेला होता.
आठवड्ाभरात दोन तीन वेळा त्याच्या घरी दारू ची पाटी असायची असे त्याचा कूक निरज नी सांगितले आहे.
बाई ,बाटली चा नाद होता म्हणजे मानसिक स्थिती काय असेल.

सुशान्त च्या कुटुंबाचे वकील कंगनाबद्दल काय बरं बोलले? ते इतर अनेकांनाही लागू होईल. पण त्यांची नावे घेणे त्यांना कदाचित परवडणार नाही.

सुशान्त च्या कुटुंबाचे वकील कंगनाबद्दल काय बरं बोलले? ते इतर अनेकांनाही लागू होईल. >>>

मला वाटले इतरांना प्रश्न विचारताय....

मी हिंदी न्यूज चॅनेल बघण पूर्वीच बंद केले आहे . त्यांचे ते ओरडून न्यूज सांगणे , स्क्रीन वर खाली आणि वरच्या पट्ट्यात न्यूज स्क्रोल करणे , डाव्या आणि उजव्या पट्ट्यात जाहिराती , उरलेल्या ४५% मधील चौकण कुठे तरी कोपऱ्यात बसून तो निवेदक ओरडत असतो .
घरातील लोकांनी कधी लावले तरच श्रवण करणे चालू असते .
सगळ्यात फालतू चॅनल असेल तर रिपब्लिक , reporting करताना खूप खालची लेव्हल गाठतात .
सुशांत सिंग तपासातील शुल्लक शुल्लक गोष्टी लाइव्ह दाखवत मोठ्या मोठ्या ने ओरडून सांगतात . त्या पेक्षा झी टिव्ही मधील सुधीर चौधरी चा डी एन ए हा कार्यक्रम वास्तवाशी निगडित असतो . एक तसा मध्ये दिवसभराच्या घटना चे विश्लेषण शांतपणे करत असतो .

बरोबर वटवृक्ष. सतत तेच तेच उगाळत बसलेल्या लोकांकडे चॅनेल्सकडे दुर्लक्ष करावं.

सुशांतसिंगच्या केससंदर्भात मी युट्युबवर कॅपिटल टिव्ही आणि प्रतिपक्ष (भाऊ तोरसेकर) ऐकते हल्ली. भाऊ तर अतिशयच संयमानं आणि सुयोग्य समतोल साधून बोलतात.

भाउंचे ब्लॉग मला जास्त आवडायचे व्हिडिओज पेक्षा.... आटोपशीर असायचे!
व्हिडिओमध्ये जरा पाल्हाळ लावतात.... त्यात ते अमुक एक शीर्षक का दिले, शब्दांच्या गमतीजमती इत्यादीवरच बराच वेळ घालवतात!
पण तरीही संयमित शैली आणि सुयोग्य समतोल याच्या बाबतीत सहमत!

■हा व्हिडिओ जरूर ऐका... त्यात सुशांतसिंह राजपूत आत्म हत्या की घातपात व त्यावर सुरू असलेले गचाळ राजकारण यावर ख्यातनाम डॉक्टर संग्राम पाटील(Doctor Sangram Patil)यांनी अचूक विश्लेषण केले आहे.
■पोस्ट मार्टेम करणाऱ्या डॉक्टरांनीं(एका नव्हे तर त्यांच्या टीमने) सुशांतसिंग ने आत्महत्या केली असा ठाम निष्कर्ष काढला आहे
■तसेच सुशांत ने गुगल वर पेनलेस म्हणजे त्रास न देता आत्महत्या कशी करावी हे आत्महत्ये अगोदर 3-4 दिवस सर्च केले आहे.
■तसेच सुशांत च्या मानसिक रोगावर उपचार करणारी बोरकर ह्या डॉक्टरांनाही हा चाललेला सर्व गैरप्रचार बघून पुढे येऊन सुशांत वर दोन गंभीर मानसिक रोगांसाठी उपचार चाललेले असे सांगितले आहे.
व्हीडिओ पूर्ण ऐकावाच
https://www.facebook.com/100006493929918/posts/3155465224679911/
..
■सुशांत च्या ट्रेनर ने सुद्धा सांगितलं आहे की सुशांत १-२ महिने termin नावाचं उत्तेजक इंजेक्शन घेत होता..
■त्या वापरामुळे एनेक जण डिप्रेशन आणि रेज चे शिकार झाले आहेत..
■अक्षरशः लोकांनी खून आणि आत्महत्या सुद्धा केल्या आहेत .

https://lokmat.news18.com/entertainment/sushant-singh-rajput-gym-trainer...

**
**

नक्कीच असं हि होवू शकते !
कदाचित दिशा , जिया , परवीन , यांच्या आत्महत्या पण याच फॅक्टर मुळे झाल्या असतील .
टाका केस क्लोज करून !

पोस्ट मार्टेम करणाऱ्या डॉक्टरांनीं(एका नव्हे तर त्यांच्या टीमने) सुशांतसिंग ने आत्महत्या केली असा ठाम निष्कर्ष काढला आहे>>असं असेल तर नीरज आणि सिद्धार्थ यांच्या statement मध्ये फरक का आला असावा बरे? इतकेच काय अर्णब गोस्वामीने घेतलेला सिद्धार्थ पिठाणीचा interview बघितला तर लहान मुलगा पण सांगेल की दाल मे जरूर कुछ काला है....
सुशांतच्या ट्रेनर ने सुद्धा सांगितलं आहे की सुशांत १-२ महिने termin नावाचं उत्तेजक इंजेक्शन घेत होता.>>घेत होता की त्याला दिलं जात होतं हेच तर शोधायचं आहे...

Pages