Submitted by छज्जातील बंडीही... on 12 May, 2020 - 22:44
भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.
जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न
या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.
बाकीचे मुद्दे म्हणजे आत्मनिर्भर हे कशाच्या संदर्भात आहे आणि नेमके काय करायचे हे ही समजले नाही. पण आधी कोरोनाचे मुद्दे स्पष्ट झाले तर आभारी राहीन.
धन्यवाद
आपलाच
समोरच्या बाल्कनीतला बंब
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
1200 कोटिचे विमान
1200 कोटिचे विमान घेतल्याबद्दल मोदीजिन्चे अभिनंदन
हे विमान जमिनीवर उतरते का?
हे विमान जमिनीवर उतरते का?
विमान जमिनीवर उतरले तरी
विमान जमिनीवर उतरले तरी मोदींचे खोटे बोलणे थांबेल का ? मोदी आणि खोटे बोलणे हे समिकरणच झाले आहे.
चीनने आधी डोकलाम मधे मस्त पाणी पाजले आणि आता लडाख मधे आरामात प्रवेश केला, नेपाळ पण गुरगुरतो आहे... आपण चीन ने तयार केलेले अॅप्स स्मार्ट फोनमधून कायमचे काढण्याचा पराक्रम करुन आपली देशभक्ती सिद्ध करत आहोत.
(No subject)
विमान जमिनीवर उतरले तरी
विमान जमिनीवर उतरले तरी मोदींचे खोटे बोलणे थांबेल का ? मोदी आणि खोटे बोलणे हे समिकरणच झाले आहे.
>>"थापा" मारायचा उद्योग पुन्हा सुरु झाला आहे.
---------------
चीनने आधी डोकलाम मधे मस्त पाणी पाजले आणि आता लडाख मधे आरामात प्रवेश केला, नेपाळ पण गुरगुरतो आहे...
नवीन Submitted by उदय on 13 June, 2020 - 20:39
>>> ही देखील तुम्ही मारलेली एक "थाप" आहे तरीही, चीनने भारताला जे तथाकथित पाणी पाजले आहे त्याचा काय आनंद तुम्हाला झाला आहे, ते दिसतेच आहे पाकिस्तानपेक्षा जास्त आनंद तुम्हाला झालेला दिसतोय. देशाची आस्मिता गेली खड्ड्यात, आधी मोदी विरोध महत्वाचा. नाही का ?
>>> भारताचा एक मोठा भुभाग पाकिस्तान व चीनला दान करुन (का तर तिथे 'गवताचे एक पाते सुद्धा उगवत नव्हते') नेहरुंनी जी माती खाल्ली त्याचा परिणाम आज भारत भोगत आहे.
मग ते राफेल कशाला घेऊन ठेवले
मग ते राफेल कशाला घेऊन ठेवले आहे ? नेहरुने नस्ती दिली जमीन तर तिथे क़ाय काठीवाला बसवनार होतात ? आताचे युद्ध तसेही विमानाने पण लढतात म्हणे
नेहरू मरून गेलेत
आणि देश आताचा पगार मोदी शहाला देतो,
चीनने आधी डोकलाम मधे मस्त
चीनने आधी डोकलाम मधे मस्त पाणी पाजले आणि आता लडाख मधे आरामात प्रवेश केला, नेपाळ पण गुरगुरतो आहे... आपण चीन ने तयार केलेले अॅप्स स्मार्ट फोनमधून कायमचे काढण्याचा पराक्रम करुन आपली देशभक्ती सिद्ध करत आहोत.
Submitted by उदय on 13 June, 2020 - 20:39
---
किती खोटारडा आहे हा सदस्य, सर्रास फेक बातम्या इथे देत आहे.
चीन ने लडाखमधून माघार घेतल्याच्या डझनानी बातम्या आहेत.......................
https://www.google.com/search?sxsrf=ALeKk02SOIrCqeYCdHzacykcNv8fbvgsdg:1...
Pages