बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

केळ्याचा चेहरा नॉमिनेट झल्यावर थोबाडीत मारल्यासारखा झाला होता, आणि उगीच काही फरकच पडला नाही असे दाखवत हसत किशोरीला म्हणत होता शिवानी नेहाला गेम कळत नाही Proud
आरोहने मस्त सिक्सर मारली, तो तसाही जिंकणार नाहीये, विनरची किंमत कमी करून त्याला काहीही फरक पडणार नाहीये!
किशोरी तर फार डंब आहे, हिनाने का नॉमिनेट केलं म्हणून कुरकुर करत बसली, करणारच ना आता!
सई मेघा नेहेमी सांगायच्या आउला कि स्ट्राँग काँटेस्टंट्सना नॉमिनेट करण्या आधी ज्यांची जायची शक्यता आहे त्यांना आधी नॉमिनेट करायचं, किशोरीला नॉमिनेट करण बरोब्बर होतं.

केळकर आरोह ला दुसरा माधव बोलत होता. मला नाही वाटत आरोह नेहा आणी शिवानि चे एकून काही करेल तो हुशार आहे. त्याला शीव आणी केळकर याच्यांपैकी एकालाच nominate करायचे होते.

हो त्याने बोली लावल्यावर केळकर क्लीन बोल्ड.
यावेळी किशोरी ताई ने जायला हवं.
किशोरी ताई केळकर शीव च्या ग्रुप कडे कधी गेली. त्यांच्याशी चर्चा करुन गेम खेळत होती. आरोह म्हणाला 'जिथे वारे वाहते तिथे त्या जातात.'पटले त्याचे मला.

बिचुकले इतर वेळी स्वत: राजा समजत असतात. यावेळी काय बीबी ने च त्याना राजा केले. बिचुकले कार्यात राजा आहेत म्हणून त्याना कोणी nominate करु शकत नाही. आणी नेहा कैप्टन म्हणूण नोमीनेट करु शकणार नाही. बिचुकलेविषयी कसे पटले सदस्याना. नेहा ला ही राजा करु शकत होते बीबी.शिवानि पाहुणी होती तेंव्हा तिला ही nomination चा अधिकार दिला होताच ना.
आता पासुन पाहुणे म्हणुन ठेवूनnomination पासुन वाचवुन शेवटच्या आठवड्यात सदस्य करणार का? Uhoh
त्यांच्यावर कोणी तरी बोली लावली असती तर ती फुकट गेली असती म्हणुन राजा केले असेल.

यू ट्यूबवरचे खबरी अस का सांगत आहेत की या आठवड्यात बिचुकलेंना काढतील ,म्हणून बाकी कुणाला काढणार नाहीत.
वोटिंग लाईन्स चालू आहेत ना,मग कुणालातरी काढाव लागणारच ना,की असा काही नसत बिबॉस मध्ये.

किशोरी ताई जातील तेव्हा जातील त्यांचा त्रास नाहीये . पण त्या आधी ती माजोरडी शिवानी आणि ते येडपट बिचुकले जायला पाहिजेत . मग उरलेल्यांमध्ये जे जसे कन्टेन्ट देतील तसे तसे . ते दोघ महा बोअर करताहेत . ते मुव्ही च प्रमोशन करायला जे कलाकार आले होते त्यांना पण टास्क मध्ये सामावून घेतलं या वेळी . सिझन तीन चे संभाव्य स्पर्धक असतील कदाचित चॅनलच्या दृष्टीने . टास्क खेळून बिग बॉस मधले टास्क कसे असतात याची झलक दिली त्यांना .
त्या सिनेमात स्मिता गोंदकर पण काम करतेय . पण ती आधी गेस्ट म्हणून येऊन गेल्याने तिला बोलावलं नसेल . सगळ्यांना तशी काही ना काही काम मिळत आहेतच फक्त मेघा आणि सई सोडून Happy

काल नेहा शिवानीची सुरुवातीची जुगलबंदी आणि नॉमीनेशन टास्क बघितले..... ते संजय नार्वेकर आणि गॅंग घरात घुसल्यावर मग पुढचा सगळा एपिसोड कामे करता करता ओझरता पाहिला

आरोह चांगला समजावत होता शिवानीला की सगळ्यांसमोर भांडू नका म्हणून..... केळ्याने बरोब्बर शिवानीने केलेल्या आरोपाचा फायदा घेउन आरोहला "दुसरा माधव" म्हणून घेतले

नेहा, शिवानी, वीणा, शिव ने कमी बोली लावली/वाढवली नाही कारण त्यांना विजेतेपदाची आशा असेल
आरोहला ती आशा नसल्यामुळे त्याने एकदम सिक्सर मारला.... केळ्याला काही स्कोपच ठेवला नाही चरफडण्याशिवाय!

किशोरीने आणि हीना ने मधल्या स्टेप्स गाळून डायरेक्ट १ आणि ३ लाखाची बोली लावून काय मिळवले कुणास ठाउक!

किशोरी एका क्षणाला "मी कधीच या गेममध्ये उद्याचा विचार केला नाही" वगैरे म्हणून पुढच्या क्षणाला वीणाला "मला नॉमीनेट करु नकोस" म्हणून गळ घालताना दिसली!

आजपण तोच पाहुण्यांचा धुडगूस पुढे चालणार असे दिसते!

किशोरी ताई केळकर शीव च्या ग्रुप कडे कधी गेली. त्यांच्याशी चर्चा करुन गेम खेळत होती. आरोह म्हणाला 'जिथे वारे वाहते तिथे त्या जातात.'पटले त्याचे मला>>>>>>.. किशोरीताई सध्या दोन दगडावर पाय ठेवून चालताहेत. केळकर आणि शिवानी या दोघांना त्या असं भासवतात की त्या त्याच्या सोबत आहेत. प्रेक्षकांना सांगतात की त्या इंडीव्हीज्युअल खेळताहेत . मागे एकदा मांजरेकरांनी विचारलेलं की तुमचे मित्र कोण तर किशोरी ताई म्हणाल्या की शिवानी आणि केळकर . त्यांना माहित आहे की ,दोन्ही ग्रुपचे मुखिया शिवानी आणि केळकर आहेत . त्या अजूनही त्या दोघांच्या मागूनच खेळताहेत.

स्वताच्या डोक्याने खेळत नाहीत सतत दुसरयावर अवलंबून असतात. आणि मला nominate करू नको अशी गयावया करत बसतात.

काल आरोह ने भारी गेम केला केळ्याचा! किशोरीचे मला खरंच कळले नाही, शिव ने आरोह वरच बोली लावली होती मग तिनेही आरोह वरच का लावली ? जर ते तसे दोघांचे ठरले असेल तरी इतके पैसे कशाला लावले? वर इतरांना खेळ कळला नाही असे केळकर म्हणाला तेव्हा हो ना, हो ना करत होती. वीणाने तिला फटकारले लिटरली तरी तिला विनंत्या करत होती मला नॉमिनेट नको करू म्हणून. बरं त्यात काहीच सॉलिड अर्ग्युमेन्ट पण नव्हते काही.

नाहि म्हणताना नेहा अन विणा च आता बरं जमतं... शिवानी खरंतर नेहावर जळतेय.. भावच नाहि द्यायचा नेहाने तिला बिल्कुल.. खरच दुखावली माधव वरुन बोलताना ती.. माधवला जर तिच्याबद्दल तसं वाटलं असतं तर त्याने तिला सेफ केलं नसत.
बोली लावताना नेहाने बरोबर कमी लावली.. सगळ्यामधुन आता फक्त १५.२५ राहिले.. जिंकणारा इतकेच जिंकणार?

आरोह चालू आहे.. एकदम ५ लाखाची बोली लावली ..त्याला माहिती आहे तो जिंकणार नाही म्हणून बक्षिसाची रक्कम कमी केली...
केळ्याला\ दुसर्यांना अजून आरोहचा हेतू कळलंच नाही..

सगळ्यामधुन आता फक्त १५.२५ राहिले.. जिंकणारा इतकेच जिंकणार? >>> हो. पण नंतर असा एक टास्क घेतात, तो जिंकला की ते पैसे वाढतात आणि पंचवीस लाख करतात. मागच्यावर्षी केलेलं असं.

किशोरीचे मला खरंच कळले नाही, शिव ने आरोह वरच बोली लावली होती मग तिनेही आरोह वरच का लावली ? >>>>>>>>>> कारण बाकीच्या शिवानीवर बोली लाऊन तिच्याशी पंगा घेण्याची तिची हिंमत नाही .शिव वर बोलीआधीच लागली होती केळकर ने मागच्या आठवड्यात तिला सेफ केल्याने तिने त्याच्यावर बोली लावली नाही . वीणा आणि हीना वर लावली असती तर नन्तर त्या दोघींनी तिच्यावर लावली असती.
म्हणून त्यातला त्यात soft टार्गेट आरोह ला निवडलं.
तशीहि ती कधी स्वताच्या डोक्याने खेळत नाही. केळकर णे सांगितलं असेल .

किशोरीताईला वोटींग कितीही असूदे, ती जायचा चान्स जास्त वाटतो. कॅप्टन होऊ दिलं नाही bb ने यावरून अंदाज.

आरोह चालू आहे.. एकदम ५ लाखाची बोली लावली ..त्याला माहिती आहे तो जिंकणार नाही म्हणून बक्षिसाची रक्कम कमी केली...>>चालू कसला? आसुरी आनंद म्हणतात याला.. मी नाही जिंकणार म्हणुन बक्षिसाची रक्कम सर्रास कमी करणार..

बिचकुलेने आधीच भगवा शर्ट घातलेला त्यात राजा बनून आसनावर बसलेला. आश्रमाचा ( ढोन्गी) बाबा , महाराज वाटत होता.

सन्जय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री उगाचच चढवत होते बिचकुलेला. गाण्यान्ची सिडी काढा काय, अल्बम काढा काय. विरासतच्या ओरिजनल गाण्याची त्याने वाट लावली होती.

विणा शिवचा सिन आवडला. ( पापण्यान्वर शिव काढला तो सीन)

शिवानीच विणा- हिनाशी पॅचअप कधी झाल? Uhoh एकमेकान्ना टाळया देत होत्या चक्क!

पुष्करने छान वाचला टास्क. बिबॉच पत्र वाचनीय आणि एन्टरटेनिन्ग कस वाचाव ते अभिजित आणि नेहाने त्याच्याकडून शिकाव.

नेहा निळया ड्रेसमध्ये छान दिसत होती. सकाळपासून उदास होती , मृण्मयी गोडबोले आल्यानन्तर खुश झाली. मृण्मयी तिची बेस्ट फ्रेण्ड असावी.

कालच्या टास्कनिमित्ताने नेहा- शिवानीच पॅचअप होत की काय अस वाटायला लागलय आता.

अन्जू बिनधास्त लिही. Happy

येरेयेरे पैसा मध्ये प्रसाद ओक आहे. आज तो येईल अस वाटतय.

>>चालू कसला? आसुरी आनंद म्हणतात याला.. मी नाही जिंकणार म्हणुन बक्षिसाची रक्कम सर्रास कमी करणार..<<
बरोबर. विध्वंसक वृत्ती म्हणा हवं तर. किशोरी ताईंची बोली तर मुर्खपणाचा कळस. एखादी वस्तु दहा रुपयांना मिळत असेल तर या तीच वस्तु घासाघिस करुन वीस रुपये देउन विकत घेत असतील. Lol

हिना ला बहुतेक ती रक्कम विजेत्याच्या बक्षिसातुन वजा होणार आहे, याच आकलन झालं नसेल. Proud

आरोह जाईल या आठवड्यात...

आज पाहुणे काहितरी टास्क देणार आहेत त्यात अभिजित बिचुकले किशोरी ताई ची मुलगी बनणार आहे. किशोरी ताई त्यांच्या 2वेण्या घालणार आहेत. ते मुलीच्या वेशात मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है गाण्यावर डांस करणार आहे. प्रोमो बघितला.

आरोह जाईल या आठवड्यात... >>> नाही वाटत, खरं का खोटं माहिती नाही पण ज्यांनी मागच्या आठवड्यात वीणा पहिल्या नं वर आणि शेवटी आरोह असं सांगितलं होतं, तिथेच ह्या आठवड्यात आरोह आधी तिसऱ्या आणि आता दुसऱ्या नं वर आहे voting मध्ये असं दाखवतायेत. केळ्या लास्ट आहे. शिव आरोह किशोरी केळ्या असं दाखवतायेत.

ह्या सोर्सेस वर विश्वास ठेवायचा का नाही माहिती नाही. विश्वास ठेवायचा असेल तर मागच्या विक मध्ये वीणा नं वन होती आणि आरोह शेवटी.

आरोह जायला नकोय तो चांगला गेम खेळतोय .
मला नाही वाटत हे सोर्स बरोबर सांगत असतिल. बरेच लोक सोशल मीडिया वर न येता ही शान्तपणे वोटस करत असतिल. त्यांचे वोटस कसे काउंट करणार.
यावेळी किशोरी ताई जातिल.
किंवा केळकर त्याला बिलकूल सपोर्ट दिसत नाहिये. पण बीबीत तो किशोरी ताई पेक्षा जास्त कंटेंट देतोय.

शेवटी मेकर्सना पण ताकद असेल ना. आरोह त्याला दिलेलं काम योग्य प्रकारे पार पाडतोय आणि voting ही चांगलं आहे. शिवानी नेहाची सगळी votes त्याला आहेत असं म्हणतात. त्यामुळे तो तर जायला नकोच.

केळ्या विरोधात वातावरण आहे नक्की पण त्याला मेकर्स काढतील असं वाटत नाही.

Lol

अजून कोणालाच केलं नाहीये voting पण मला जे हवे आहेत त्या दोघांना मिळतायेत votes भरपूर बहुतेक. शिव एक नं आणि आरोह दोन नं वर आहे बहुतेक, वर उल्लेख केलेल्या सोर्सेसवरून सांगतेय.

माझ्या मते कालच्या खेळात शिव आणि किशोरी वगळता इतरांनी चांगले बीडींग केले.
आरोह इतका उशीरा आला आहे की तो विनर होऊच शकणार नाही हे शिवला कळायला हरकत नव्हती. त्यानी शिवानीचं नाव घ्यायला हवं होतं.
किशोरी ताईंची बोली तर मुर्खपणाचा कळस. >>>+१११
आरोहची पाच लाखाची केळ्याची बोली मलातरी पर्फेक्ट वाटली. आरोह बाहेरुन पाहून आलाय की केळ्याला फारसा सपोर्ट नाहीये. तेव्हा नॉमीनेट झाला तर बाहेर हमखास जाऊ शकतो. तो जाण्यानी त्याच्या मैत्रीणींच्या ( नेहा, शिवानी ) मार्गातला काटा पण दूर होऊ शकतो.
हीनाने नक्की काय विचार केला गेस नाही करता येत, पण तिचं किशोरीचं सिलेक्शन आवडलं.
नेहा, शिवानी, शिव आणि वीणा हे स्वतःला संभाव्य विनर समजत असावेत, त्या अनुशंगानी त्यांनी लोअर बीडींग करुन बक्षीसाची रक्कम वाचवली हेही योग्यच वाटलं.
या आठवड्यात केळ्या बाहेर गेलेला आवडेल आणि पुढच्या आठवड्यात किशोरी.

कुणी जावो अगर न जावो पण सगळ्यात पहिले त्या बिचुकल्यांना काढा.त्यांना बघवत नाही स्क्रिनवर.

अमुपरी केलं voting शिव आणि आरोहला. शिवला अकरा आणि आरोहला तीन दिली. खूप वेळ जातो voting मध्ये त्यामुळे बास एवढीच दिली, शेवटी फायनलला पूर्ण votes वापरणार, तेव्हा वेळ काढेन. शिव आरोहच्या पुढे हवाच म्हणून त्याला जास्त दिली.

थैंक्स अन्जू. Biggrin
भाडीपा ह्या मराठी यूट्यूब चन्नेल वर मराठी बिग्ग बॉस चा छोटा वेडीओ बनवला आहे त्यांचे actors घेउन. त्यात शिवानि चे नाव भवानी ठेवलय. बिचुकले च वाटचुकले . Happy

Pages