बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आता सारख सारख ते सिनियर -ज्युनियर एकुण कन्टाळा आलाय, हा काय राजकिय पक्ष आहे की लग्न आहे मानपानाने वागवायला ?सई आणि मेघाला किती इरिटेट होत असेल याचाच विचार करतेय.
सई आणि मेघा ची आज चरफड त्याना सतत आउटनबर होवुन लुज व्हाव लागतय या बद्दल होत होती, सईची तर जास्तच!
हर्शदा ला सई ने एक्वायच की " सिनियर असशिल घरी , इथे सगळे एकाच लेव्हल आहेत"
सगळे सारखे घर घर काय करतात आणी घरात कूनी काय काम आणी किती केल ही काय भातकुली आहे की घर-घर खेळुन दाखवायचय?

मामी >>+1
खूनी कोण आहे ते मेघा आणि पुष्करने ओळखलं आहे. पण ते गुप्तहेर नाहीत. स्मिता ने खून झाल्यावर पहिला फोटो काढला का? कारण कॅमेरा ज्या दिशेने होता तिथे फक्त मेघा दिसली.
मला सई खूप articulate वाटते. कॅमेरासामोर पण किती मुद्देसुद बोलली.

पुष्कर ला बघितल्यावर ते लग्नात आलेले आहेर व पाकीटे नीट संभाळायला एकदम प्रामाणीक टाईप चे काका वा मामा बसवतात त्याची आठवण होते. आहेर खरे तर नवरा नवरी ला आलेला असतो पण मामा मात्र तो आपल्यालाच आला आहे अशा थाटात संभाळत असतात. मग शेवटी नीट मोजदाद करून, भार हलका झाला की मामा हुश्श करतात..
हहपुवा...आवडले. मला पुष्कर म्हणजे जसे शाळेत असताना वर्गातील एक मुलगा जो एकदम टापटीप असतो, व्यवस्थित गणवेष, रोज ग्रुहपाठ केलेला, शिक्षकांची पडेल ते कामे करणारा, ऑफ पिरीयेड जसा सुरू होतो तसा एखादे पुस्तक काढून अभ्यासाला सुरूवात करणारा (पण तरीही काही पहिल्या पाचात नसणारा) आणि तसेच मुलींमध्ये लाडका (भाऊ म्हणून हे नंतर समजते, पण पुर्ण शाळेच्या काळात इतर मुले ह्याच्यावर जळत राहतात) - ह्या कॅटॅगिरीतला वाटतो. सर्वांचा लाडका असतो पण अशा मुलांचा प्रत्येकजण वापर करून घेतो.

सई खूप शांत शांत वाटली काल.
तरी ती शेवटपर्यंत मेघाच्या साईडने बोलत होती.
आऊने काही बाही समजवलं मग तिने माघार घेतली.
ऋतुजा असती तर कदाचित मेघा, सई, पुष्कर, आऊची टीम थोडी स्ट्राँग झाली असती.

मला सई खूप articulate वाटते. कॅमेरासामोर पण किती मुद्देसुद बोलली. >> अगदी अगदी. नेमके मुद्दे शोधते आणि ते पोटतिडकीनं मांडते.

अन काल मेघा अन सईचे मुद्दे एकदम बरोबर होते.. सईच्या वेळी त्या दोघांनी अन मेघाच्या वेळी या दोघांनी आपल्या मुद्द्यावर टिकुन रहायच कि.. जर ते लोक आपल्या मुद्द्यांवर टिकुन राहतात तर.. मेजॉरिटीचं काय होतं एव्ह्ढं दोन मतांनी सरकार हरलं असतं कि.. इथे बहुमताचा विचारच न्हवता. अगदि बरोबर बोलत होत्या त्या दोघी.. का नेहमी यांनीच पडतं घ्यायचं.. आऊ पण अग तिकडे जास्त मत आहेत ना.. मग असुदे कि..
स्मिता म्हणे गुप्तहेर.. मणी काळा कि निळा हे कळत नाहि... तिला सेफ केलं तेव्हा तिच्याविषयीचे मुद्दे मला बिल्कुल पटले न्हवते..

..मला सई खूप articulate वाटते. कॅमेरासामोर पण किती मुद्देसुद बोलली. +१
...भार हलका झाला की मामा हुश्श करतात.. >>> Biggrin
मामी >>+1

मी काल बोललो ती शंका मेघा सईने बोलून दाखवली, की ७ विरुद्ध २ असं असल्यास २ नी आपली मते बदलायलाच हवी असं काही नाही..

टास्कमधे आस्तादला आपणंच खुनी आहोत हे लपवायला जमलंच नाही. त्या रुम मधून बाहेर पडून तरातरा बाथरुम मधे गेला, सगळे विचारतायत त्याकडे लक्ष न देता, यामुळे बर्‍याच जणांना तिकडेच शंका आली. पोट गडबड वगैरे दिलेलं कारण कोणाला फारसं पटलेलं दिसलं नाही. त्या रुम मधून शांतपणे बाहेर येऊन, बाकी सगळ्यांच्यातलाच एक म्हणून थोडा वेळ वावरला असता तर त्याच्यावरचा संशय जरा कमी झाला असता कदाचित.
स्मिता चा निळा-काळा मणी आणि कॅमेराची बटनं शोधण्यात उडलेला गोंधळ जाम मजेशीर होता !
पुष्करचा (सांकेतिक) खून करणं फार सोपं होतं.. आणि तो तसा झाला.
खारट जेवण बहुतेक हर्षदा च्या वाटेला आजच्या भागात येईल असं दिसतंय...
आस्तादच्या गर्लफ्रेंडला त्याच्या दुर्दैवाने तिघीसुद्धा नीट ओळखत असल्याने त्याचा चांगलाच पोपट झाला.
मेघाला रडवणं तसं फार अवघड नव्हतं. तिला रेशम वरुन किल्ली दिली तर चाललं असतं, पण असं करुन रेशमशी थेट पंगा घेण्याची चूक अस्तादला परवडण्यासारखी वाटली नसावी. सुशांत गुप्तहेर झाला नसता आणि सामान्य नागरिक झाला असता, तर आस्ताद साठी रडवण्याचं काम फार सोपं झालं असतं. नुसतं 'कांदा' म्हणाल्यावरही सुशांत ढसाढसा रडला असता. Wink

स्मितानं मेघाचा फोटो काढणं योग्य निर्णय होता. स्मिता एकटीच त्यांच्यात स्ट्रीटस्मार्ट आहे, बाकीचे सगळेच मेजॉरिटी आहे म्हणून दादागिरी करणारे. हखाने सैला भाषेवरून बोलणं म्हणजे मजाच आहे. सै हा मुद्दा विकेंडच्या वारमध्ये काढणार.
ऋतुजा गेल्याचं वाईट वाटल्याचं कुणीच बोललं नाही, ऋतुजाच्या बाजूने खोटं खोटं का होईना रडून सिंपथी घेता आली असती आस्ताद, पुष्कर, जुई वगैरेंना. पण, नाही. खेळ खेळायचाच नाहीये ना. सहल एंजॉय करायचीये त्यांना.

योगी९००, मेघाविषयीचं हे मत (शांत, संयमित, elegant आणि गोड) तिच्या आत्तापर्यंतच्या ओव्हरऑल वावरतून, तिच्या रिस्पॉन्सेसमधून, तिच्यावर रे टीम कडून सातत्याने केल्या गेलेल्या aggressive attacks, कंमेंट्स नंतरही तिने मेन्टेन केलेल्या टेम्पोमुळे, फ्रेंड्ससोबत असतांना जे वागते बोलते, त्यावरून झालेले आहे. फक्त एखाद दोन प्रसंगांवरून तिला जज नाही करू शकत..

हो, मात्र तिच्याही बाबतीत काही खटकणारे पॉईंट्स आहेतच, पण बाकीच्यांच्या मानाने ती खरोखरच चांगली वाटते मला (अजूनतरी). आगे आगे देखते हैं, होता हैं क्या!

नुसतं 'कांदा' म्हणाल्यावरही सुशांत ढसाढसा रडला असता. >>> हा हा!

नाहीतर दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे त्याचा गुलाबी नॅपकीन फक्त त्याच्यासमोर न्यायचा की काम फत्ते!

मामी,
Honesttlly Insane channel फॉलो कर YouTube वर.
स्मिता काय गंमत करतेय, डंब वागणे स्ट्रॅटजी आहे का तिची Proud आधी डंब वागून मग आलिया भट्ट सारखं सगळ्यांच्या पुढे जायच?
मणी काळा का निळा, कॅमेरा खेळण्यातला कि खरा , काय दाबल कि फोटु येणार मधेच अडकून बसलेली Biggrin
सई अतिशय मस्तं मुद्देसूद बोलते बिग बॉसशी आणि वीकेन्डच्या डावात म.मांशी सुध्दा , फार हुषार आणि क्लिअर आहे ती.
या रेशमच्या डंबबायका आणि MCP पुरुषांनी भरलेल्या टिमला बरोबर हुषार मुलींचा राग येतो Proud
मर्डर मिस्टरी टास्क मधे स्मिताने भुषणला किस करायचे टास्क = मर्डर का दिलय बिग बॉस्स्ने ?
आधी लफड्यांना एन्करेजम्नेट मग म.मा रागावतात हा अ‍ॅडल्ट शो नाssssही म्हणून !
त्या आरती सोलंकीचा इंटरव्ह्यु पहा, ती म्हणे या भुषणला स्मिता गोन्दकर हवी असते सारखी, मानलेला भाऊ प्रकाराला काही अर्थ नाही Proud
मला वाटतय ज्या प्रकारे ऋतुजा गेलीये, तिला परत आणायचा नक्की विचार असणार बिग बॉसचा , अजुन कोणी नवीन बाई नको आता प्लिज.. आणायच तर पोरगा आणा एखादा चिकना नॉन मराठी !

कालच्या एपिसोडमधून अधोरेखित झालेल्या गोष्टी:
*पुष्कर हा अत्यंत लेचापेचा आणि कोणीही सहज मॅन्युपलेट करु शकेल असा माणूस आहे.... टास्क करतो जिद्दीने पण त्याबदल्यात "हक से लेंगे' जमत नाही त्याला.... आपली बाजू लावून नाही धरता येत त्याला!

*मेघाचे सगळे पॉइंटस बरोबर होते पण तिला चिडण्याचा काहीएक अधिकार नव्हता कारण ज्या काही अपेक्षा ती तिच्या मित्रांकडून करत होती त्याच अपेक्षा तिला सईच्या बाबतीत पूर्ण करता आल्या नव्हत्या.... अर्थात ते तिला कळून चुकले होते पण त्याचा काही उपयोग नव्हता

*आऊ: आग लावण्यापेक्षा (नको तिथे) विझवण्याचेच काम जास्त करतायत.... काल सईला मागे खेचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता..... अश्याने बाहेर पडतील त्या लवकरच!

*सुशांत: हा अतिशय चालूपणा करत होता..... स्वताची मते बिनधास्त पंचायतीची मते म्हणून खपवत होता... पक्का संधीसाधू राजकारणी!

आक्कासाहेब: हिचे नक्की न घर का न घाट का होणारेय.... रेशम तिला पक्की ओळखून असावी आणि आपल्या ग्रूपमध्ये आपल्यापेक्षा वरचढ तिला कुणी सहन होणार नाहीये..... आणि सई,मै च्या ग्रूपचे लीडर होण्याचा हुकमी चान्स सई आणि मेघाला दुखवून ती गमावून बसली आहे!

सई: काल ती मेघासाठी इतकी खंबीर उभी राहिलेली बघून मस्त वाटले..... जरा अजून धीर दाखवायला पाहिजेल होता तिने (ऋतुजा असती तर नक्की फरक पडला असता)
कॅमेऱ्यात बघून तिने मांडलेले मुद्दे सुद्धा योग्यच होते
आता तिने रुसवा जरा जास्तच ताणून धरलाय पण मेघाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समेट घडून येईल आज!

तो सुशान्त जर नेता असेल, तर.. नो वंडर आपला समाज असा आहे !
अस्ताद बाकी गेम मधे अतिशय फुसका असला तरी वक्तृत्त्व आणि बिग बॉसच्या पत्रकांच वाचन करणारा म्हणून त्याची कायमची नेमणूक करून टाका !

Honesttlly Insane channel फॉलो कर YouTube वर. >>> अच्छा, बघते.

या रेशमच्या डंबबायका आणि MCP पुरुषांनी भरलेल्या टिमला बरोबर हुषार मुलींचा राग येतो

>>> खरंच. एकूणात घरातले समस्त पुरुष अतिशय इम्मॅच्युअर आहेत आणि संकुचित विचारसरणीचे आहेत. (पुष्की अपवाद. ) असे भित्रट, इन्सेक्युअर पुरुषच मग बायका जास्त बोलतात, मोठ्यानं बोलतात, त्यांना सगळं कळतं, त्यांना सगळं माहित आहे या मुद्द्यांवरून त्यांच्यावर टीका करायला लागतात. या बायका किती हुशार आहेत, योग्य मुद्दे लक्षात घेतात, इथे येण्याआधी व्यवस्थित अभ्यास करून आल्या आहेत, टीकेला उलट उत्तर देऊ शकतात, आपल्या मतावर ठाम राहतात, आपापली नेमून दिलेली कामं आणि कार्य व्यवस्थित पार पाडतात हे पॉझिटिव पॉइंटस त्यांच्या लक्षात येत नाहीत.

अस्ताद बाकीच्या लोकांपेक्षा चांगलं मराठी बोलतो पण वर राज यांनी म्हटलंय तसं मलाही तो काही उच्चार चुकीचे करतो असं वाटतं. शिवाय शब्दाशब्दावर भर देत बोलतो. काही एक काळानं त्याचं बोलणं कंटाळवाणं वाटतं. बाबा रे नाटक नाही सुरूए, बोल चल पटापट असं म्हणावसं वाटायला लागतं.

कालच्या नॉमिनेशन मध्ये कोणीही असा मुद्दा का काढला नाही की जर एकमत होत नसेल तर दोन्ही उमेदवार नॉमिनेट झालेत असं ठरवायचं? की तसं करायला बिग बॉसनं परवानगी दिली नसेल?

राजेश मुलाखतीत बोलताना म्हणाला मेघा fake वागते... सकाळी song लागल की लगेच नाचायला लागते...normally अस कोणी करत नाही... अरे मग त्यात वाईट काय आहे... उलट आपण कॅमेऱ्यासमोर आहोत याचं तिला नेहमी भान तरी असत... नाहीतर resham मला कोणी काही म्हणा मी बेशरम राहणार असा negative attitude... मूर्ख वाटते 1 no. ची

अस्ताद बाकी गेम मधे अतिशय फुसका असला तरी वक्तृत्त्व आणि बिग बॉसच्या पत्रकांच वाचन करणारा म्हणून त्याची कायमची नेमणूक करून टाका !> > Lol बरोबर!! श्रवणीय बोलतो!! शाळेतल्या वक्तृत्व, नाट्यवाचन स्पर्धांची आठवण करून देतो!

हा मला मधूनच प्रामाणिक, तत्त्वांशी एकनिष्ठ राहणारा, गूड टू बी around, मधूनच अत्यंत partial, आपल्या लाडक्या लोकांनी काही केलं तर त्याकडे कानाडोळा करणारा आणि इतरांवर मात्र ओरडणारा, उगाच खेकसणारा, घर मोठे पोकळ वासा, असा एकंदरीत अनप्रेडीक्टेबल माणूस वाटतो Biggrin

फक्त एक गोष्ट तो प्रेडीक्टेबल करतो, ती म्हणजे, गेम, जिंकणं वगैरे सगळं एका बाजूला, (गेम मध्ये मुळात त्याला काहीही इंटरेस्ट दिसत नाहीये) समोरच्याची तब्येत महत्त्वाची, त्यांना मदत करायला आधी पुढे धावतो, मग ते आपल्या की वेगळ्या टीमचे, हे बघत नाही. या एकाच बाबतीत खूप केअरिंग आहे. Happy (त्याच्या फर्स्ट gf च्या बाबतीत झालेल्या घटनेमुळे खूप सेन्सिटिव्ह झाला असावा, कदाचित) त्याला गेमसाठी पातळी सोडणं आवडत नाही आणि ही गोष्ट तो सातत्याने अधोरेखित करत असतो.

कालचा भाग अजून पहायचाय..

एकूणात घरातले समस्त पुरुष अतिशय इम्मॅच्युअर आहेत आणि संकुचित विचारसरणीचे आहेत. (पुष्की अपवाद. ) असे भित्रट, इन्सेक्युअर पुरुषच मग बायका जास्त बोलतात, मोठ्यानं बोलतात, त्यांना सगळं कळतं, त्यांना सगळं माहित आहे या मुद्द्यांवरून त्यांच्यावर टीका करायला लागतात >>> +१००
सुशांत अगदी असाच आहे. ममा त्याला म्हणत होते की फुलाम्च्या टास्क मधे तुमचीच टीम बलवान होती आणि तिच जिंकणार हे सहज कळत होते. तर ओरडा ओरडी का करत होतात? समोरच्या टीम मेम्बर्ना पकडूनच का ठेवत होतात.
तर हा अगाऊ बोलून गेला, त्या तिघीच असल्या ( मे सै रु ) तरी कधी कधी त्या सगळ्यांना भारी पडतात. म्हणुन यांच्याकडे एव्हढी ताकद असूनही घाबरून ते सगळ्यांना धरूनच ठेवत होते.
आणि गंमत म्हण्जे हे सगळे आडदांड तिथे उभे असूनही खरेच रुतुजाने शेवटी मुसंडी मारून त्यांच्या अर्ध्याच्या वर बागेचा धुव्वा उडवला होता. रुतुजा परत यायला पाहिजे खरेच

मेघा आणि पुष्कर ला अंदाज आला पण आस्ताद खुनी असेल याचा. त्या डंब स्मिता आणि बेअक्कल सुशांत ला मात्र काहीही अंदाज लागत नाहीये असे दिसतेय. आस्ताद च्या वागण्यावरून त्याच्यावर संशय येईल आशी स्थिती नक्कीच आहे. त्याने ग फ्रेन्ड चे जे कारण सांगितले ते अतिशयच फालतू होते.

आस्ताद मेघाला इनसिक्युअर्ड म्हणतो पण कालच्या टास्कमध्ये कळले की तो स्वतः किती इनसिक्युअर्ड आहे. त्याला त्याच्या कंपुतल्या कुणालाही रडवणे सहज शक्य होते, सुशांत तर गुलाबी नॅपकिन घेऊनच बसलेला असतो रडायच्या तयारीत. जुई, रेशम हे देखिल सहज शक्य अश्या कॅटॅगरीतीले लोक होते पण केवळ खुन झालेल्या लोकांना नॉमिनेशन्साठी ग्राह्य धरले जाइळ म्हणून आणी मग आपण रेहखा या ग्रुपमधून जाऊ यासाठी त्याने मेघाला रडवायचा घाट घातला. ती बाई अतीप्रचंड खमकी. ती कसली रडतेय! गंडला. रेच्या गूड बुकात राहण्यासाठी काहीहे करतात हे बारके लोक्स. मोठ्या ग्रुपमध्ये असलो की नॉमिनेट होणार नाही असा यांचा होरा असतो. जुई, स्मिता, सुशांत, भूषण आणी आस्ताद. स्वतःचं कसलंच व्यक्तिमत्व नाही, स्ट्रॅटेजी नाही. रे व हखा कसलंही कलाक्षेत्रातलं भरीव कर्तृत्व वगैरे नसताना कशा काय यांना मुठीत ठेवताहेत , काय कळत नाही.

आपण सगळ्यानी ठरवुन दर आठवड्याला मतं नोंदवुया..म्हणजे किती लोक नॉमिनेट आहेत कोण कोण नॉमिनेट आहेत या वरुन ठरवुन मतं देउया.. मेजॉरिटीना रे ग्रुप आवडतं नाही..
या आठवड्यात तर कदाचित वोटिंग बंद असेल , कारण रुतुजा गेली आहे.. पुढिल आठवड्यापासुन ट्राय करु.
चॅनेल ठरवत असेल .. मॅन्युप्युलेट करत असेल्ही.. पण आपला एक ट्राय

मेघा आणि सई दोघिंचीही चिडचिड साहजिक वाटली. सिनियर गँग ही फेअर खेळत नाहिये. नाहितर रेशमपेक्षा मेघा कितीतरी उजवी आहे नक्कीच. मला ती आवडत नाही तरिही.
रेशम, हर्षदा या दोघींना थोरलेपणाचा खूपच माज आहे. बाकी सई पुष्कर मेघा छान खेळतायत. निव्वळ फेव्हरिटिझम मुळे रेशम नॉमिनेट होता होता राहिली आहे. घरात सेफ झाली तरी बाहेर ती डेन्जर झोन मध्ये आहे हे नक्की.

>>निव्वळ फेव्हरिटिझम मुळे रेशम नॉमिनेट होता होता राहिली आहे. घरात सेफ झाली तरी बाहेर ती डेन्जर झोन मध्ये आहे हे नक्की.
@दक्षिणा,
+१. मला वाट्ते नेमके ईथेच मेघा कं ची स्ट्रॅटेजी चुकते आहे. फक्त आपल्या गृप मधिल लोकांना सेफ करून पुढे जाता येणार नाहीये कारण अजूनही असे बरेच टास्क असतील ज्यात बहूमताने निर्णय घ्यावे लागतील.. अर्थातच ४ विरुध्द ७ हे समीकरण मेघा गृप च्या फेवर मध्ये नाही. ऊलट कालच्या नॉमिनेशन प्रक्रीयेमधून मेघा ला हे कळायला हवे की आपल्या स्वभावाबद्दल व आपण दुसर्‍यांना इरीटेट करतो, त्यांना मूर्ख समजतो, स्वतःला काँट्राडिक्ट करतो या अशा गोष्टींंमूळे ईतर सदस्यांनी तीला नॉमिनेट केले आहे. खुद्द आस्ताद ने हे मान्य केले की मेघा बाकी सर्वच बाबतीत सरस आहे. पण शेवटी ती मेघा असल्याने या गोष्टीचा तीने परसनल ईश्यू केला आहे. Happy

असो. थोडक्यात, she is not able to see the point.. that for her to keep safe, she will have to reach across the other team members and influence their thinking to suit her game. 'Influencing' here will mean cosing up to few people, getting in their emotional good books. etc... this however requires giving up lot of ego and attitude. If she can do it, then there is no stopping her.
Megha's problem is her single point reliance on Sai, who is so slef obsessed and childish that she can't make up any strategy other than use Pushkar or Megha. The more Megha keeps cribbing about her nomination she will lose more members and their votes for her. She has made it 'personal' war...शेवटी पंचायती चा निर्णय मान्य करून ज्या गोष्टींसाठी मला नॉमिनेट केले आहे त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करीन असे तीने नुसते म्हटले तरी दुसर्‍या टीम ची हवा जाईल.. पण मेघा हे करणार नाही हे त्यांना पुरते ठाऊक आहे. so its all mind games..
मेघाला सगळं कळतच म्हणा, पण हे कळत नाहीये की नॉमिनेट झालीच तरी ती सेफ होईल.. Wink असो. बहुतेक मेगा, सई यांना कुठेतरी भिती वाटते आणि insecurity आहे की राजेश ला गेल्या वेळी ईतक्या वाईट्ट पध्दतीने बाहेर काढल्यामूळे आता यावेळी बहुतेक आपल्या गृप पैकी कुणाचा तरी नं लागणार...

पुष्कर टास्क चांगला खेळतो पण low EQ..सई च्या बालिश एमोशनल ब्लॅकमेलिंग आणि मेघा च्या डॉमिनंस मध्ये तो स्वतचा फोकस कुठेतरी हरवून बसलाय.. त्यालाही हे कळायला हवे की the act of maintaining fine balance between the two camps will not last long... as he will have to chosse one over other as time progresses.. अजून तब्बल ५० + दिवस बाकी आहेत.
जी लोक्स फक्त स्वताच्या गृप च्या जीवावर राहतील ती लवकरच बाहेर पडतील... जी लोकं स्वतःचा गेंम खेळतील त्यांचे चांसेस अधिक आहेत.

त्यातही वाईल्ड कार्ड मार्फत नवीन सदस्य येत राहणार... अशा वेळी नंबर गेम हा फार काळ स्वताच्या बाजूने नेहेमीच टीकून राहील याची शाश्वती शून्य आहे.

मला तर वाटते भूषण आणि स्मिता मुद्दामून अंडर प्ले करत आहेत... कारण त्यांना नॉमिनेट करण्याची 'खाज' कुणालाच नसते विशेष.

असो. बघुयात या आठवड्यात काय होते.. टास्क तरी चांगला दिला आहे फॉर अ चेंज.

मेघा नॉमीनेशन्स मध्ये येणार आहेत आणि वाचत जाईल वीक बाय वीक, तसतसा तिचा कॉन्फिडन्स वाढत जात जाईल.
रे आणि हखा ला भांडायला कोणी तरी तोंडफट बाई पाहिजे.

Pages