माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/30635 या रेसिपीने संत्रा बर्फी करून बघितली. पण खूपच कडू झाली. Sad संत्र्याच्या सालीचे सगळे पांढरे दोरे काढून टाकले होते. सालीचा पांढरा भाग पण सुरीने खरवडून काढला. काय चुकले असावे? Sad
आता त्या वडया टाकून देण्याव्यतिरीक्त काही करता येईल का?

चैत्रगंधा, आपल्याकडच्या काही संत्र्याची साल खुपच कडू निघते. केकसाठी पाकवलेली साल करताना, आधी ती भिजत घालतात. मग दोरे काढल्यावर परत धुतात, शिवाय उकळल्यावर पहिले एकदोन वेळचे पाणी फेकून देतात.
मग त्याचा कडवटपणा कमी होतो.
त्या कडू बर्फीचे काय करायचे ? अधुनमधुन कडू रस पोटात जायला पाहिजे, असे गंभीर स्वरात सांगून, लोकांना खाऊ घालायची.. Happy

चैत्रगंधा, त्या पेस्टची चव आधी पाहिली होती का? Happy

आता त्या वड्या मिक्सरमधे घालून चुरा करून घ्या, मग पुन्हा अंदाजाने दूध घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. जेवढं दूध तेवढीच साखर घालून पुन्हा एकदा फिरवा. चव घेऊन पहा. कडू लागत असेल तर खोबरं किंवा मिल्क पावडर घाला. साखर घाला. हे मिश्रण रबडीइतपत घट्ट व्हायला पाहिजे. मग पुन्हा गॅसवर ठेवून गोळा होईपर्यंत परता आणि वड्या थापा Happy

मीदेखील मायबोलीवरचं वाचून संत्राच्या सालीचं सरबत की काहीतरी केलं होतं.. तेही चांगलं अगदी लिटर दीडलीटर ! Sad तेंव्हापास्नं संत्र्याच्या सालीचं काही करत नाही.. Proud

दिनशदा... Happy
मंजूडी. धन्स. करून बघते हे.
मी चव बघितली होती. कडू वाटली होती म्हणून रेसिपीमध्ये दिल्याप्रमाणे १/२ वाटीच घेतली.

मी ही गेल्या आठवड्यात संत्राबर्फी ट्राय केली. संत्र्याची पेस्ट चांगली कडू लागत होती. तसंही गॅसवर वड्यांचं मिश्रण करायची हिंमत होत नव्हती म्हणून सायोची अजरामर मलाई बर्फी संत्र्याची पेस्ट घालून केली. पार्ल्याच्या फडके उद्योग मंदिरात मिळते तशी अफलातून चवीची संत्रा बर्फी झालीय. कंडेन्स्ड मिल्कच्या गोडपणात संत्र्याचा कडूपणा टोटल गायब, स्वाद मात्र अप्रतिम लागलाय. फक्त मी पेस्ट फारच कमी वापरली. पाववाटी. लिंबूरस वगैरे दुसरे काहीच वापरले नाही. पेस्ट कमी असल्यामुळे रंग पांढराच राहिलाय. थोडा खायचा केशरी रंग घातला तर दिसेलही परफेक्ट.
आता हे मलई बर्फीच्या बाफावरही लिहिते Happy

मंजूडी तुम्ही सांगितलं तसं वड्या मिक्सरमधून फिरवून मिल्क पावडर, साखर घातली. मिल्क पावडर भरपूर घालावी लागली पण फारच सुंदर चव आली. खूप खूप धन्स... Happy

इथे जुन्या-नव्या हितगुजवर वाचुन विरजणाशिवाय दही लावण्याचा पहीलाच प्रयत्न केलाय. कोमट दुधात(वाटीभर) १ छोटी लाल मिरची बिया काढून ठेवली होती सकाळी. मावे नाहीय म्हणुन गॅस शेगडीखाली वाटी झाकुन ठेवलेली. ते आता जरा घट्ट दिसतेय. मिरची काढुन टाकली. घट्ट आहे पण तारेसारख चिकटतय हाताला. चव, वास आंबट लागत नाहीये अजुन. बरोबर आहे का? चाखल्यावर दुधाची चव लागत नाही पण शेवटी गिळल्यावर घशाकडे तिखटपणा थोडासा जाणवतोय. लागलय का दही बरोबर?? अजुन मिरची ठेवायला हवी की ऑलरेडी जास्त वेळ ठेवली? पाणी वेगळ झालय पण बोटाला तारेसारख लागुन राहत, असच होत का कि काही चुकलय? हे 'दही' म्हणुन वापरु शकते ना? Happy प्लीज हेल्प मी...

चॉकोलेट केक केला तो मध्ये जर्रा कच्चा वाटत होता म्हणून परत मावे केले. तर आता जरा कोरडा झाला आहे. चवीला मस्त. किसून वाटीत घेऊन खाता येइल. Happy किंवा मग मध्ये पुपू वर टाकले होते तसले लाडू कसे करायचे?

हल्के पाणी शिंपडून मावेत ३० से. ठेवले तर मस्त मऊ होत आहेत केकचे तुकडे. Happy

मामी, केकचे तुकडे , फळांचे तुकडे अन चांगले व्हॅनिला आइसक्रीम घालून ट्रायफल पुडिंग बनवा मस्त पैकी.
मोठी मंडळी असतील खाणारी तर थोडे रम मधे ४-६ तास बुडवलेले काळे रेझिन्स घाला त्यात.

साक्षीमी, विरजण नीट लागलेले नाही. वापरू नये.
तार येणारे दही विचित्र तर लागतेच पण ते विरजण वापरुन लावलेले दही देखील तसेच होते. त्याचे फारतर पातळ ताक करता येते.

मिरची टाकून दही, नेहमीच्या दह्यासारखेच लागले पाहिजे. ते थोडेसे तिखट लागते पण त्या दह्याचे विरजण लावून, केलेले दही मात्र चांगले होते.

धन्यवाद दिनेशदा, त्यादिवशीच ते टाकुनच दिलं मग मी. पण काय चुकल ते कळल नाही. १ वाटी कोमटपेक्षा थोडे गरम दुध, १ मिडीयम लाल मिरची बी काढुन उघडुन ठेवली होती. या प्रमाणात साधारण कितीवेळात विरजण लागुन दही व्हायला हवे??

दूध, थोडे थंड व्हायला हवे होते. (म्हणजे कोमटपेक्षा जरा कमी) सकाळी लावले तर पाच सहा तासात दही जमले पाहिजे. आणि रात्री लावले तर सकाळपर्यंत.
घरात जर सकाळी उन्हाची तिरिप असेल तर तिथे ठेवायची वाटी. बाकी प्रमाण बरोबर आहे.

२१ डिसेंबर पासून इथे कोणाचच काही चुकलेलं दिसत नाही Happy
मी काल मेदू वडे केले पण ते फार घट्ट झाले. कशामुळे असेल? उडदाची डाळ ५-६ तास भिजवली मग वाटून लगेच तळले. त्यात मूग डाळ घालयला हवी होती का?

डाळ वाटतांना पाणी कमी घातलं गेलं असणार बहुतेक. आणि पीठ वाटल्यावर हातानेच एकाच दिशेने फेटून घ्यायचं जरा.

आहा....बरोबर. पातळ होईल म्हणून मी घाबरून खूपच कमी पाणी घातलं होतं ... शाब्बास स्वाती. तुला बक्षीस म्हणून ४ वडेच दिले असते पण दडस आहेत म्हणून राहुदे..सांबार मात्र मस्त झालं Happy

मी मेदूवडे फारसे कधी करायला गेले नाहीये कारण खूऽप पाणी घातल्याशिवाय डाळ वाटली जायची नाही माझ्या मिक्सरमध्ये आणि तळणाचा आळस. पण मी ऐकल्याप्रमाणे मेदूवड्यांना कमीतकमी पाणी घालून डाळ वाटणे आणि मग ते बॅटर हलके होईपर्यंत खूप फेसणे ह्या दोन टिप्स नेहेमी असतात.

मी ओव्हरनाइट भिजवते ( ८ तास तरी) आणि स्वाती म्हणतेय ते थोडं पाणी घालणे बरोबर आहे.
दही वडे असतील तर वडे कोमट झाल्यावर आधी काही तास ताकात बुडवून ठेवायचे मग बाहेर काढून दह्यात मिक्स करायचे ( आय मीन वड्यावर दही ओतायचं.)
खूपच कडक झाले असतील वडे तर राजकचोरी मधे कुस्करायला वापर.

कमी भिजली आहे डाळ , शुम्पी. थंडीत ती आंबुस झाली नसावी. त्यामुळ पीठ फसफसल्यासारखे दिसत असणार नाही. निदान ७/८ तास तरी भिजायला पाहिजे डाळ यादिवसात.

ताकात भिजवून दही वडे कर.

गं सीमा, हे मी शुम्पीला नम्रपणे सांगत होते तर डाफरली माझ्यावर...की छेछेछेछेछेछे काहीपण ...मेदूचं पीठ कुठे भिजवतात. मी पाककलानिपुण नसल्यानं बर म्हणून वड्याचा तुकडा मोडला. Happy

चिवा, मी अजूनही माझ्या मताला चिकटून आहे. मेदूवड्याचं पीठ फसफसेपर्यंत आंबवत नाहीत. नाहीतर वडे खूप तेल पितात. डाळ सकाळी ९ ला भिजवली आणी ४:३० ला वाटली.
अगो, माझा ब्लेंडर लईच पावरबाज आहे (बहुदा त्याला लॉन मोअर ची मोटर लावली असावी), त्यामुळे सर्व काही मस्त बारिक होतं पण मला खरच असं वाटतं की किंचित पाणी जास्त घालायला हवं होतं, ते फार पातळ होईल ह्या भीतीने खूपच कमी पाणी घातलं.

खरं तर मी वडे पीठ फर्मेंट करून आप्पेपात्रातच करते नेहेमी पण ह्या वेळी तेवढा वेळ हाताशी नव्हता...
|इति वडे पुराण संपूर्णम|

शुम्पी , डिजे म्हणते तस पीठ नाही ग आंबवायच. डाळ नीट भीजली गेली असेल तर ग्राईंड केल्यावर पीठ आपोआप फेसाळ/फसफसल्यासारखे दिसते. Happy
इति मेदुवडे सल्ला पुराण समाप्त.

ऑ... मला वाटलेलं की थोडाच वेळ भिजवून तळलेस.. सकाळी भिजवलस म्हणजे लईच वेळ की गं.. बहुधा मूग डाळच मग...
सांबार मस्त झालं होतं.. Happy

अनसॉल्टेड बटरचं तूप कढवलं. त्याला तुपाचा वास आल्यावर गॅस बंद केला. पातेलं बाजूला काढून ठेवलं. पण तरी तूप काळंढुस्सं झालय... फेकावच लागेल का ते.. वास पण तुपाचा नाही येते. जळकीश येतोय.

तूप कढवताना गॅस कधी बंद करायचा याची काही टीप आहे का..

तुपाचा वास येत होता तेव्हा तूप ट्रान्परंट नव्हतं झालं, थोडे बुडबुडे होते म्हणून मला वाटलं व्हायचय अजून. Sad

वास पण तुपाचा नाही येते. जळकीश येतोय.>> Happy
अगं एकदा बटर मेल्ट झाले कि medium वर ठेवायचा आणि पिवळसर रंग आला कि साधारण १५ मिनिटाने बंद करायचा.
लिंक दिली आहे.पोळ्यांना लावू शकतेस वास नसेल येत तर ! नाहीतर दिवे लाव Happy वातींचे.
http://www.youtube.com/watch?v=Gx3Yln6Qoz0

Pages