"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सकाळी सात वाजता कुमार परिसर येथील आय सी आय सी आय च्या ए टी एम समोर चार जणांची रांग होती >> ते एटीएम ८ नोव्हेंबरनंतर काल पहिल्यांदा उघडलंय हेही लिहा की..

मोदी किती वेळा युटर्न घेणार आहे?
एव्हाना युटर्न बाबतीत गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड मधे नाव नोंदवले गेले असेल. अशी कामगिरी करणारा मोदी जगात पहिलाच पंतप्रधान ठरला असेल. अजुन एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली . भक्तांची छाती अभिमानाने ५६ पासून ५६० झाली का?

मनीष,
तुम्हाला ना चांगल्याची कदरच नाही.
असेल इतके दिवस बंद, पण आज उघडलंय हे पुरेसे नाही का!

(कुत्ता आदमी को काटा तो न्यूज वॅल्यू नहीं , आदमी कुत्तेको काटा तो न्यूज वॅल्यू है, च्या धर्तीवर
हल्ली एटीएम पैसे देत नाहीत याला न्यूज वॅल्यू नाही, देतात याला आहे!)

रेल्वे खाजगी करणच्या घशात घालायचा प्रयत्न जोरदार चालू आहे. पुढच्या काही वर्षात अंबानी अडानीच्या रेल्वे चालायला लागल्या तर नवल वाटणार नाही.>>>>>:अरेरे: खरय का हे?

तुम्हाला ना चांगल्याची कदरच नाही >> चांगल्याची कदर आहेच हो.. Wink काल दीड महिन्यांनी मला याच एटीएम मधून रांगेत उभं न रहाता (रात्री १२ वाजता गेल्यानं) पैसे काढता आले.. दिड महिन्यातलं पहिलं एटीएम ट्रान्झॅक्षन Happy

पण सिलेक्टिव्ह लिहिता येत नाही ना Happy शिवाय रडगाणं आम्ही नाही गायलं तर अजून कोण गाणार ? (६५ वर्षांनी चान्स मिळालाय Wink )

Earlier: RESERVE BANK OF INDIA
New normal: REVERSE BANK OF INDIA

काल भावाचा फोन आला होता

त्याने पे टी एम च्या वेब साईटवरून बी एस एन एल लँडलाईनचे बिल भरले. ऑर्डर सक्सेस असा मेसेज आल परंतू बी एस एन एल ला रीफ्लेक्ट झाले नाही. बिल ६६२/- रुपयांचे होते.

बिल बी एस एन एल ला रीफ्लेक्ट न झाल्यामुळे त्याने अस्वस्थ होऊन मला फोन केला की नक्की पैसे पे होतील की बुडाले? मी म्हटले एक दोन दिवस वाट बघ मग पुढचे ठरवू.

====

तर मुद्दा असा की केस्लेस इकॉनॉमी करत असताना ग्रामीण भागातील लोकांना केलेल्या ट्रान्जॅक्शनमधे घोळ नाही ह्याचा विश्वास देण्यासाठी नवीन योजना वगैरे सरकारने जाहीर केली आहे काय?

शिवाय काही ठिकाणच्या लोकांना ही सगळी आयुधे कशी वापरायची ह्याचेही ज्ञान नाही त्यासाठी काय उपाययोजना आहे?

मला एक जेनवीन प्रश्न पडलाय.
भाजप चंदीगड कस्काय जिंकले?

नोटबंदी फळाला आली यापलीकडे याचे काही एक्सप्लेनेशन असू शकेल काय?
कारण आता मोदींचे तथाकथित सेमी मित्र नितीश कुमार, चंद्राबाबू सुद्धा याच्या विरोधात जाऊ लागले आहेत. ते कौल बघूनच जात असणार. मग कार्पोरेशन मध्ये भाजप कस्काय जिंकतंय?

च्ंडिगड हा शहरी भाग आहे तसाच सुशिक्षीत आणि सधन आहे. नोटबंदीची झळ त्यांना लागली नसेल. नोटबंदीचा राग आला म्हणुन लोकं कॉग्रेस आणि आपला मत देण्याएअवढी मुर्ख नाहित. खर तर येणार्या पंजाब निवडणुकीसाठी भाजपा / अकाली दल यांना हा शुभसंकेत आहे. जर व्यवस्थीत नियोजन केले तर ते परत सत्तेत येवु शकतात. यु पी इलेक्शन हे भाजपाला जड जाईल नोटबंदी मुळे.

१.कॉर्पोरेशन एरियात सुखी कार्डघासू लोक राहतात.
२.कॉर्पोरेटर्सचा पर फुली रेट सर्वात जास्त असतो, खासदारकीला तुलनेने नगण्य असतो. पैसे कुणापाशी आहेत, यावर झोपडपट्ट्या मतदान करतात.

मै धारक का इतना खुन चुसने का वचन देता हूं कि वो कन्फुज हो जायेगा हम रिजर्व बँक वाले है या ब्लड बँक वाले..

आपला मत देण्याएअवढी मुर्ख नाहित. >> काय सांगता. म्हणजे दिल्ली वाले बिहार वाले मुर्ख आहे..
छान ..

भाजप्ये समजतात काय स्वत:ला?? स्वतःला मत मिळाले की जनता हुशार आणि नाही दिले तर जनता मुर्ख?

हा अहंकार कमी करा. अन्यथा २००४ साली जशी हालत झाली होती तशी होण्यास वेळ लागणार नाही. वाजपेयी त्यानंतर रिटायर्ड होऊन जे घरी बसले ते पुन्हा राजकारणात आले नाही. तसे मोदीचे होईल Wink

हा अहंकार कमी करा. अन्यथा २००४ साली जशी हालत झाली होती तशी होण्यास वेळ लागणार नाही. वाजपेयी त्यानंतर रिटायर्ड होऊन जे घरी बसले ते पुन्हा राजकारणात आले नाही. तसे मोदीचे होईल >> to whom you are telling this. I am not AAP/BJP spokesperson.

हम काँग्रेसवाले भारतीय जनता को इतना खुन चुसने का वचन देता हूं कि वो कन्फुज हो जाये की हम
काँग्रेस वाले है या कोई ड्राकुला .......

ड्राकुला जन्म २००४ -- मृत्यु २०१४

मिलिंद जाधव फार झोंबले का? शांत व्हा. आदळआपट करू नका. बेफिंना सल्ला दिला होता. बघा बराच परिणाम झाला आहे. तुम्ही पण तोच घ्या Wink

राहुल पर बीजेपी का पलटवार- गंंगा समान पवित्र पीएम पर बेबुनियाद आरोप

जोक ऑफ द डे..

मोदी सरकारने स्वतःच जाहीर केले आहे की "गंगा नदी प्रचंड प्रदुषित आहे". Biggrin

पाटील,

तूम्हाला कुणी उत्तर दिलेले दिसत नाही. असे अ‍ॅप वापरायचे शिक्षण देणे आणि नंतरही ते वापरायला जमणे कठीणच आहे. मला वाटते ग्रामीण भागात असे व्यवहार करुन देण्याचा, एक नवा व्यवसाय सुरु करायला हरकत नाही ( ज्याना हे वापरणे जमते त्यानी ) अर्धा एक टक्का जास्तीचे कमिशन !

दिनेश आपले आभार.

लोकांना कदाचित माझे प्रश्न खोचक किंवा उपरोधिक वाटत असावेत पण मी ते ३००० लोकसंख्या असलेल्या माझ्या गावात्ल्या लोकांना डोळ्यासमोर आणून लिहिलेले आहेत.

रविवारी उंडवडीचे लोक माझ्याकडे आले होते. गैरसोय आहे पण लोकांमधे राग नाही हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं. अजूनही लोकांमधे राग नाही ही गोष्ट खरी आहे.लोकांमधे जो मेसेज गेलेला आहे तो काँग्रेसवालुयांच्या आकलनात बसत नाही.

लोकांपर्यंत मेसेज ज्या जोरशोरसे पोचवला गेलाय त्याचे कौतुक आहे.
त्याची सत्यासत्यता कशाला तपासायला जावे? जे आहे ते आहे.

मोदीजी इंदिराजींना फॉलो करतात असं दिसून आलंय. इंदिराजींच्या सोबत जे नाहीत ते परकीय हात अशी एक व्याख्या त्या काळी होती. परकीय हात सरकार अस्थिर करायचा, कतकारस्थान करायचा. त्याला देशातले काही लोक सामील असायचे. या प्रचरामुळे विरोधकांना चडफडत बसावे लागायचे.

मोदीजींनी तोच कित्ता गिरवला आहे. विशेष म्हणजे आज २०१६ साली पण ते लागू पडतं. भारतीय जनतेचा विजय असो.

Pages