आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरोखर वाईट वाटतय की ह्या लोकांना मोदीजी विषयी किती द्वेष आहे ते,

दोन दिवसात भारतीय नोटची बनावट आवृत्ती आली म्हणुन आनंद साजरा करणारे
विसरत आहेत की ही नोट मोदी यांची नसुन ती भारत सरकारची आहे.

नोट मोदी यांची नसुन ती भारत सरकारची आहे. >> खिक्क्

म्हणजे नोटा कॅन्सल केल्या तर क्रेडीट मोदींना आणि बनावट आल्या तर त्या सरकारच्या

खिक्क् खिक्क् खिक्क् !!

बनावट नोटा कोणीतरी बनवल्या आहेत ह्याच्या रुमर्सवर आनंद साजरे करणारे !!

बरे व्हा !!

पाचशे, हजाराच्या जुन्या नोटा बदलण्यावरून देशभरात निर्माण झालेला अभूतपूर्व गोंधळ लक्षात घेता केंद्र सरकारने शुक्रवारी जनतेला मुदतवाढीचा दिलासा दिला.

त्यामुळे पाणी, वीज, गॅस बिले, विविध करांचा भरणा, पेट्रोल पंपांवरील इंधनखरेदी, सरकारी रुग्णालयांची बिले, मेडिकल दुकानांतील औषधखरेदी, रेल्वे-विमान-सरकारी बससेवेची तिकिटे, कोर्ट फी, मेट्रोची तिकिटे, दूध केंद्रांवरील खरेदी, स्मशानभूमी-दफनभूमीमधील शुल्क, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठीचे शुल्क भरण्यासाठी आता जुन्या नोटांचा वापर १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत करता येणार आहे.>>

मटा बातमी!

युरो , सरासरी काढण्या साठी तुम्ही हे गणित करू शकता,
पण १०००/ ५०० नोटांचे डीसट्रीब्यूशन uneven असेल ना?

दोन तास उभा राहून १०००० काढले एकदाचे. २००० च्या ४ आणि १०० च्या २० नोटा मिळाल्या.
जुन्या नोटा जास्त नाहीत, आरामात बदलून घेता येतील.

चिनूक्स | 12 November, 2016 - 09:31
http://m.thehindu.com/news/national/demonetisation-of-rupee-notes-no-tim...

This is interesting. Should we expect more fakes in a month or two?
>>>

रिज़र्व बैंकच्या संकेतस्थळावर नव्या चालनाची माहिती दिलेली आहे.

https://www.rbi.org.in/scripts/images/₹500.jpg
https://www.rbi.org.in/scripts/images/RS2000.jpg

सिम्बा तुम्ही म्हणता डीस्ट्रिब्युशन अनियमीत असेल म्हणजे हे चलन कोणाकडे जास्त साठवलेले असेल? इतक्या प्रमाणात ते साठवण्याची एवढी गरज काय आणि कोणाची असेल?

बर्‍याच लोकांचे असे म्हणणे होते की ३० डीसेंबर किंवा काही कालावधी पर्यंत जुन्या नोटा चलनात ठेवायला हव्या होत्या. त्यामुळे गैरसोय कमी झाली असती.

समजा या नोटा अमुक एक दिवसा पासुन रद्द आहेत असे सांगितले असते तर याचा जास्त फ़ायदा कोणी करुन घेतला असता. थोडक्यात नोटा रद्द होणार म्हटल्यावर त्या घेणं थांबवलच असत आणि आहेत त्या बदलण्याची आयती संधी मिळाली असती.

युरो
काला पैसा होता हे कुणीच नाकारत आहे, कार्यच लोकांकडे खूप खूप खूप कालापैसा होता हे सत्य आहे.
थोड्या वेगळ्या पद्धतीने नक्कीच हाताळता आले आसते.
१) जनधन ची फेक खाती वीड आउट करणे
२) ६ महिने आधीच १ लाख/ ५० हजार च्या कॅश व्यवहारासाठी PAN अनिवार्य करणे.(इलेक्ट्रोनिक्स, दागिने, वाहने काहीही)
३) AMT मधून ५०- १००-५००-१००० येतील याची व्यवस्था करणे.
४) systemमध्ये १००/ ५० च्या नोटा systematically वाढवणे
५) या गोष्टी नीट सेटल झाल्या कि स्टेप बाय स्टेप नोट री call करणे (जेव्हा २००५ आधीच्या नोटा recall झाल्या तेव्हा इतका केओस झाला नव्हता)
६) जसे मी मागे म्हंटले होते, at लिस्ट काही तास आधी पासून १०० रुपये देणे चालू करणे.

सर्व सरकारी आस्थापनात १०००/५०० च्या नोटा स्वीकारू असे आधीच जाहीर करणे
आणी त्या आस्थापनात पुरेश्या इतर नोटा पोहोचतील याची काळजी घेणे.
७) system मध्ये थोड्या काळासाठी सिस्टम मध्ये कमी किमतीच्या नोटा वाढतील, पण त्या साठ करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी असल्याने काही दिवसांनी परत बँकेकडे येतीलच.

हे सगळे उपाय खूप नाइव्ह वाटतील. मला अर्थशास्त्राची पार्श्वभूमी नाही, यु क्नो थे थिंग्स बेटर

पण मला खात्री आहे, जर हे ओप्रेशन निट प्लान केले असते तर सामान्य जनतेसाठी गोष्टी जरा सुखकर झल्या असत्या.

.

सगळ्यांचा पोस्ट वाचल्या खूप माहीती मिळाली पण अजून ही वाटत यात सर्वात जास्त नुकसान/त्रास इमानदार पण जो टॅक्स च्या भितीने किंवा सगळेच करतात मग मी का करू चोरू नये ह्या प्रवृत्ती मुळे म्हणा असे मध्यमवर्ग छोटे व्यापारी , दलाल , कमीशन एजंट ईतायादी कारण जे मोठे मासे आहेत त्यांना काहीच फरक पडणार नाही पैसा जाळला काय की सरकारने पकडला काय कारण ते अधीच गब्बर असल्याने व दुर तक पोच असल्याने ते यातुन सहीसलामत सुटतील ही. ....

सगळ्यांचा पोस्ट वाचल्या खूप माहीती मिळाली पण अजून ही वाटत यात सर्वात जास्त नुकसान/त्रास इमानदार पण जो टॅक्स च्या भितीने किंवा सगळेच करतात मग मी का करू चोरू नये ह्या प्रवृत्ती मुळे म्हणा असे मध्यमवर्ग छोटे व्यापारी , दलाल , कमीशन एजंट ईतायादी कारण जे मोठे मासे आहेत त्यांना काहीच फरक पडणार नाही पैसा जाळला काय की सरकारने पकडला काय कारण ते अधीच गब्बर असल्याने व दुर तक पोच असल्याने ते यातुन सहीसलामत सुटतील ही. ....

सगळ्यांचा पोस्ट वाचल्या खूप माहीती मिळाली पण अजून ही वाटत यात सर्वात जास्त नुकसान/त्रास इमानदार पण जो टॅक्स च्या भितीने किंवा सगळेच करतात मग मी का करू चोरू नये ह्या प्रवृत्ती मुळे म्हणा असे मध्यमवर्ग छोटे व्यापारी , दलाल , कमीशन एजंट ईतायादी कारण जे मोठे मासे आहेत त्यांना काहीच फरक पडणार नाही पैसा जाळला काय की सरकारने पकडला काय कारण ते अधीच गब्बर असल्याने व दुर तक पोच असल्याने ते यातुन सहीसलामत सुटतील ही. ....

>>म्हणजे मोठे उत्पन्न असलेल्याचा पैसा मध्यम उत्पन्नवाल्याने आपल्या विद्यार्थी मुलासाठी पाठवणे आणि पैसा बाहेर पोचल्यावर त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे.<<

हे करणं सोप्प असेल पण ते पचवणं कठिण आहे. आजच्या बिग डेटा, ॲनलटिक्स, न्युरल नेटवर्कच्या जमान्यात अशाप्रकारचे गुन्हे लपुन राहु शकत नाहि...

मस्त भाषण!

Notice how he said १२५ crore deshvasis? He doesnt talk about castes, religions, languages- that message of unity makes his opponents afraid more than anything else. He can end their 'divide and rule' strategy and make them irrelevant.

आजचा दिवस छान गेला. आज सोलापूर रस्त्याला यवतच्या पुढे काम होतं. कालचे चार हजार मिळालेले आणि न नरलेल्या पाचशेच्या नोटा घेऊन फिरत होते. गॅस संपला म्हणून पेट्रोल भरायला गेले तर जुन्या पाचशेच्या नोटा चालल्या. सुखद धक्का. मग टाकी फुल्ल केली. पाचशेच्या सहा नोटा खपल्या. वरचे १३० आनंदाने खर्च केले. येताना रस्त्यात सोफ्यावर टाकण्यासाठी पट्ट्या मिळाल्या. त्या ही स्वस्तात. पाचशेची नोट चालली आणि शंभर परत आले.
येताना सीएनजी पंप दिसला. गॅस भरला पण प्रेशर नसल्याने सहाच किलो बसला. २६८ अशी काहीतरी अमाउंट झाली. पुन्हा पाचशेची नोट खपली. यिप्पी !!! आणि वर दक्षिणा म्हणून शंभरच्या दोन नोटा मिळाल्या. वरचे ३२रु त्याने दिले नाहीत. ते समजून उमजून दान म्हणून सोडून दिलं. खूपच श्रीमंत असल्यासारखं वाटायला लागलं.

येताना पुरसुंगीला होलसेल डेपो मधे गेले. अर्ध्या किंमतीत (ऑनलाईन पेक्षाही स्वस्त ) रेडीमेड ड्रेस मिळाले. विशेष म्हणजे कार्ड चालतं इथे. पैसे तसेच शाबूत राहीले. अजून काय पाहीजे ?? बळंच मोह आवरला नाहीतर ...

(अमित)शहामृगागत (डोकी वाळूत नक्कीच नाहीत कुठे घातलीत कुणास ठाऊक.) जनरल जाता-जाता सीएनजी पंप 'दिसला' अन मग ६च किलो भरले, पण मी ५०० ची नोट देऊन पंप वाल्याने चक्क २५० समथिंग परत दिले.

यिपी बरका!

अन हे सगळं केव्हा? जेव्हा महान नेत्यानी (नमो नमो) त्या कागदांना "नॉट" लीगल टेंडर डिक्लेअर केलेय.

पंपवाले काळ्याचे पांढरे करण्यात गुंतलेत. १-दीड करोडच्या रोजच्या सीसी अकाऊंटवाल्याने यांना अडीचशे परत दिले? नो कॅन बिलिव. "शहा"म्रुग, टेक द हेड औट प्लीज. नॉट हॅपनिंग. लै पंपवाल्यांच्यात रोजची उठबस आहे.

सीएनजी पंपावर पूर्वीच भ यं क र लायनी असतात, हे इयत्ता तिसरी ढ च्या मुलांनाही ठाऊकेय.

पण काये नं
जौद्या.
तिक्डे नै का ट्रंपजींना बॅश करत होते, तसे इथे मोदीजींना ब्याश करणारे नतद्रष्ट, गद्दार, (बाकीची व्हॉट्सॅपीय गरळ इतकी कर्णसुखद आहे नं.. अगदी यिप्पी Wink ) लोक भरलेत सगळे.

जर मोदींनी ८ तारखेला ५००-१०००ची नोट "नॉट लीगल टेंडर" डिक्लेअर केली. सरकारने त्या कागदावर छापलेले, रिझर्व बँकेच्या गवर्नरचे "प्रॉमिस" मागे घेतले - "I Promise to pay" तर, त्यानंतर हे सगळे "राष्ट्रभक्त" मी ५००ची नोट कशी इझीली खपवली, अन त्यामुळे कशी गरीबाची सोय झाली अश्या स्टाईलच्या पोस्टी टाकताहेत, हे माझ्या आकलनापलिकडचे आहे.

लाज नाही वाटत का तुमच्याकडचे पैसे रस्त्यावर खपवायचा प्रयत्न करताना? कींवा दवाखान्यात येऊन माझ्या गळ्यात मारताना? व्हाईट आहेत नं तुमचे? तुमच्या बँक अकाउंटांना पटकी लागलीय का? हद्द असते यार निर्लज्जपणाची!

जाऊन सोलापूर रस्त्यावरच्या सीएनजी पंपावर चौकशी करून या. दुसरीच गाडी माझी होती. लोणी काळभोर च्या अलिकडे आहे तो पंप. आणि फुरसुंगी कात्रज रस्त्यावरच्या सीएनजी पंपावर तर बिल्कुल गर्दी नव्हती.

कदाचित मी चांगली असल्याने मला चांगले अनुभव येत असतील. इतरांचं माहीत नाही बाई !
काहींना अनुभवच घाण येतात म्हणून ते तसे .........असो.

Pages