काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी काल हेच वाटल एपिसोड बघताना.. एरव्ही खट्याळपणा किंवा गंमत म्हणुन ठीक आहे, पण काल जेव्हा तिला मनापासुन शिवला काहीतरी सांगायच होत तेव्हातरी तिने त्याला समजणार्‍या भाषेत सांगायला हव होत. >>>> हो ना, प्रेमात झोकून कसे द्यावे हे गौरीने मितू कडून शिकावे. जेव्हा मितू शिवच्या प्रेमात होती, तेव्हा ती मात्र शिवशी हिन्दीतच बोलत होती. त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती हि मुलगी. आणि मोजोला तिचे प्रेम म्हणे आकर्षण वाटते. आकर्षणात कोणी कोणासाठी इतक करत नाही.

हो. त्याच प्रेमात तिला आपल्या ग्रेट पर्सनॅलिटीपुढे सामान्य पर्सनॅलिटीच्या शिवला इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स आलाय असंही वाटत होतं.

मंडळी , इतका विचार करू नका. इतका विचार तर मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक,लेखक इत्यादीही करत नाहीत.

शुभांगी गोखलेंनी नक्की काय म्हणून या मालिकेतली भूमिका आणि तो चष्मा या दोन गोष्टी स्वीकारल्या असा प्रश्न मला पडलाय.

आणि मोजोला तिचे प्रेम म्हणे आकर्षण वाटते. >>> मला तर शिवचे प्रेम म्हणजे आकर्षण वाटते.
मला अजूनही कळत नाहीये की तो तिच्या प्रेमात का पडलाय ???
नियमित मालिका बघणार्यानी मला एकतरी प्रसंग सांगावा ज्यात गौरी , कोणी तिच्या प्रेमात पडावं अशी वागलीय Sad .

स्वस्ति +१०००००००००००००००००००००००

सिरीयल सुरु झाल्यापासुन गौरी च्या चेहेर्‍यावरची एकही रेष हललेली नाहीये, रेष हलत नसल्याने माशीला पण बसता येत नसेल ती घसरुन जाईल.

आता म्हातारपणा मध्ये तिच्या चेहेर्‍यावर ज्या सुरुकुत्या येतील त्या हलतील कदाचीत.:खोखो:

राहून राहून वाटतंय गौरीची निवड चुकलीय, दुसरी एखादी जरा उंच आणि चांगला अभिनय असणारी हवी होती, हि काय एकसुरीच वागते.

त्यामुळे एकंदरीत ह्यांचा लव track बोअर होण्याची चिन्ह जास्त.

झी ला सगळ्या सिरियलच्या हिरॉईनी अशा बेकार च का मिळतात? Uhoh
हिरो सगळे छान काम करतात.
तो आदे घ्या, दाढी बाळ घ्या, नंदिबैलाचा तो नवरा (नांदा सौख्यभरे वाला) घ्या आता इथे शिव.
नट्या एकजात बोरिंग Sad

अगदी अगदी दक्षि, प आ मु ची हिर्वीन चांगलं काम करते पण एकंदरीत सिरीयल धन्य आहे, हिरो अतिधन्य आहे म्हणून मी बघत नाही.

अगदी अगदी स्वस्ति.. मलाही हा प्रश्न सुरवाती पासून च पडलाय. शिवाय ला काय म्हणून ती गौरी आवडलीय कुणास ठाऊक ?

>>>>काल नचीकेत वडलांना पैसे देत असताना मला फारच धाकधुक वाटत होती की पसरणीचा घाट मध्येच येऊन पैसे हिसकावुन घेतो की काय.अ ओ, आता काय करायचंफिदीफिदी >>>+ ११ मलाही तशीच भिती वाटत होती.<<<<<<

++++१११११११११

आई गं, मलाही हिच भिती; सारखं दरवाजा उघडून सून येइल आणि नचि काय करतोस असे खकसून पैसे घेइल..

हो. त्याच प्रेमात तिला आपल्या ग्रेट पर्सनॅलिटीपुढे सामान्य पर्सनॅलिटीच्या शिवला इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स आलाय असंही वाटत होतं.>>> कुणाला ?मितूला? मितूची पर्सनॅलिटी ग्रेट ? शिव आणि सामान्य पर्सनॅलिटीचा?:अओ:

आपल्या सर्वाना नमस्कार,

ह्याच सिरीयल मध्ये केलेले काही गोष्टीचे निरीक्षण म्हणजे.

1) शिव हा हिंदी भाषिक असल्यामुळे त्याला अनेकदा न समजन्यासाठी का दरवेळी मराठी बोलली जाते? का त्याला यावी म्हनोनी सगळ्यांचा आग्रह आहे. का ह्यांना कोणालाच हिंदी येत नाही.

2) मराठी माणसं वाईट आहेत असा दाखवण्यात येणारा प्रयत्न.

3) मंग्याच्या आईकडे नेहमीच काहि न काहि संपलेल असत. मागायला तर अशी जाते. जशे ते बिल्डिंगी मधे नसुन चालीत राहयला असावी. जाताना दार का आपटते हे काय आजुन समजल नाही.

4) एवढा आधुनिक युगात यांच्या घरात अजुन टिव्ही नसुन बाबा आजमच्या जमान्याचा रेडिओ आहे. विश्वासच बसत नाही.

5) घरात सगळी कमवते असताना. ह्या नचिकेत ला नोकरी का लागत नाही. नक्कि शिक्षण किती त्याच जे नोकरी लागत नाही.

6) नचिकेत कडे पैसे नाहीत तर तो ओस्ट्रेलियाला कसा गेला असता. चालत की उडत.

7) शिवने सावंतला काहीच दिवसात हिंदी शिकवली. घरात बायको शिक्षिका असताना का नाही शिकता आले.

8) विक्की शेंडी लावुन गेला मान्य पण त्याचा लुटमलाटीची भरपाई काय म्हनुन सावंत करत आहेत.

9) शिवला सावंत सारखं लवकर मराठी का शिकता येत नाही. पर्यायी शिकवणारी लोकं व साधनं ही फार आहेत.

10) गौरीची आई इतकी शांत आणि समजुतदार दाखवली आहे. अशी बाई कोणी शोधुन दाखवावी. योग दुर्लभच आहे म्हणा.

स्वस्ति +१०००००००००००००००००००००००

काल दरवाजात गवरीने थोडा पॉझिटीव्ह रीस्पॉन्स दिला. आणि तो वेणू मुद्दाम चुकीचं सांगतो का? गवरी दिवसेंदिवस अभिनयात फिकीच पडत चाललिये. तिला भावासोबत लुटुपुटुचं भांडण देखिल रंगवता आलं नाही.

पण गवरीने शिव ला मुळात कुल्फी खायला बोलावलंच नाही.! .. का..?
पसरणीच्या घाटाची आईही बहुदा तिला ह्यांच्यात मिक्स व्हायला सांगत आहे...!!
ती अजूनही येऊन पैसे हिसकाऊन घेऊ शकते आज! अजूनही चांस गेलेला नाही!
नचिकेतचंच मला हल्ली आवडतं आहे!

पण गवरीने शिव ला मुळात कुल्फी खायला बोलावलंच नाही.! .. का.>>>>>>>>>

नंतर फोन करते ती त्याला पण वेणू उचलतो

आता असा सिक्वेन्स दाखवायची गरज काय .. माहिती नाही..

शिव नुसता म्हणतो...की "अब तडप तडप के हमरे पास जब तक नही आती, हम भी उसे अपना चेहरा नही दिखायेंगे.. अब तक उन्होने हमारा प्यार देखा, अब हमारी अक्कड भी देख लेना.."
आणि लगेच नेक्स्ट सीन मधे जिन्यातून वर येतांना यांच्या कडे डोकावतो!
काय गरज...? जायचंच नाही अजिबात!!

आणि लगेच नेक्स्ट सीन मधे जिन्यातून वर येतांना यांच्या कडे डोकावतो!
काय गरज...? जायचंच नाही अजिबात!!>>> हो ना, पण मोजो त्याला आत ये बोलला, तेव्हा त्याला जावेच लागले आत. पण मला एक कळले नाही, शिव जेव्हा आत येऊ बघतो, तेव्हा हि गौरी त्याला बघून दार का बन्द करते? त्याला आत का नाही येऊ देत? Angry

शिव सांगतो की पाच मिनिटांत येतो वेणूला घेऊन. तेव्हा गौरी दार बंद करते. फ्लॅट संस्कृती यु क्नो.

गौरी डबे घेऊन आलेली असते व बेल वाजवत असते. शिव तिची वाटच बघत असतो. पण वेणू शिवला सांगतो की गौरीसमोर भाव खा. आत जा. अम्माशी फोनवर बोलतोयस म्हणून.

मग वेणू दार उघडतो व गौरीला सांगतो की शिवने तिला असे सांगायला सांगितले आहे की तो त्याच्या अम्माशी फोनवर बोलतोय. फोन समोर सेंटर टेबलवरच पडलेला असतो. त्यामु़ळे रागाने गौरी कुल्फीचे आमंत्रण एकट्या वेणुला देते.

काय होणार् ?:फिदी: पसरणीचा घाट पसरत चाललाय, सौ. सावंत दिवसेंदिवस गरीब व बापुडवाण्या होत चाल्ल्यात.

पसरणीचा घाट कपाट उघडुन काहीतरी उद्योग करत असतो, तेवढ्यात त्यातुन पैशांचे बंडल खाली पडते. तेव्हा दिवसेंदिवस अधीक अधाशी, असमाधानी, हावरट होत चाललेला घाट ते पैसे घेऊ बघतो. नचीकेतने ते पैसे घेऊ नको सांगीतल्यावर आणखीन भडकुन नको नको ते शब्द वापरतो. ( निशाला मी निशा अज्जीबात म्हणणार नाही, तिला पसरणीचा घाट हेच नाव सुटेबल आहे)

मग नचीकेत आई वडिलांना सांगतो की ते पैसे गौरीचे आहेत. ( त्या आधी पसरणीने नचीकेतला तिची माफी माग असे सांगीतलेले असते, तो नाही म्हणल्यावर ती घर सोडुन जाण्याची धमकी देते आणी पर्स घेऊन तरातरा पळते. ) सावंतांना वाईट वाटते कारण गौरीने कर्ज काढल्याचे त्यांना कळते.

सुरुवातीला शिव डबेडुबे आपटुन वेणुला उठवतो, आणी ऑफिसला निघुन जातो.

पसरणीच्या घाटाला, त्या मंग्यांच्या आईला वेळीच आवरले नाही आणि गवरीच्या जागी दुसरी कोणी नायिका घेतली नाही तर या मालिकेचा टीआरपी झी मराठीच्या इतर मालिकांप्रमाणे लवकरच रसातळाला जाणार हे नक्की! जुयुरेगा मध्ये प्राजक्ता माळी सुरुवातीला हिच्यापेक्षा खुप चांगला अभिनय करत होती. या महामाठ मुलीला चेहऱ्यावर एकही हावभाव योग्य रीतीने दाखवता येत नाही. एकटा बिच्चारा शिव आणखी किती दिवस मालिका सांभाळणार?

पसरणीच्या घाटाला, त्या मंग्यांच्या आईला वेळीच आवरले नाही आणि गवरीच्या जागी दुसरी कोणी नायिका घेतली नाही तर या मालिकेचा टीआरपी झी मराठीच्या इतर मालिकांप्रमाणे लवकरच रसातळाला जाणार हे नक्की! जुयुरेगा मध्ये प्राजक्ता माळी सुरुवातीला हिच्यापेक्षा खुप चांगला अभिनय करत होती. या महामाठ मुलीला चेहऱ्यावर एकही हावभाव योग्य रीतीने दाखवता येत नाही. एकटा बिच्चारा शिव आणखी किती दिवस मालिका सांभाळणार?>>>>+१ Lol

अगं सारीका, प्रेक्षक इतक्यात बंड करतील असे वाटत नाही. होसुमीयाघ मध्ये वाट पाहुन अंत झाल्यावर लोक वैतागले. ही सिरीयल आत्ताच सुरु झाल्याने काही फरक पडेल असे वाटत नाही. काय आहे की लोकांना अभिनयापेक्षा गवरी च्या दिसण्यात रस असेल आणी तसेही मोजो, शुगो आणी शुजो ( आजी- बहुतेक शुभांगी जोशी नाव आहे यांचे) चा अभिनय आणी शिव यामुळे प्रेक्षक गवरीला सहन करत असावेत.:फिदी:

हो....मला पण महामठ्ठ गवरी असह्य होत चालली आहे. आणि पसरणी च्या साड्यांचा चॉईस कुणाचा आहे? अती भिकार आहे.
आणि गवरी ला त्याच त्या सेम ड्रेस मधे का दाखवतात...? कधी जीन्स वगैरे घालतच नाही ती?
प्राजक्ता माळी खरंच खूप छान काम करायची. नंतर नंतर तर ती खूपच सुधारली..पण सुरुवातीलाही एकदम फ्रेश हसायची, दिसायची...

Pages