होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल ड्रेस आणि जत्रेत मिळणारे कानातले बघवत नाहीयेत>> Rofl Rofl

मोजून तीन ड्रेस त्यातही दोन ड्रेस वर एकच common ओढणी गोखले गृहोउद्योग मालकाच्या बायकोची अशी परिस्थिती ?? Sad Sad ... गृहोउद्योग डबघाईस आलाय का ?? Uhoh

आज पन कैच नै बोलली जानी, नमनालाच घडाभर तेल ओतलंय अजुन पुढचे दोन एपीसोड पण नैच बोलणार असेच दिसतेय एकंदरीत

अरे देवा! Uhoh
श्री बाळाला भेटल्यावर या मंदबुद्धी बयेला फ्लॅशबॅकमध्ये भलतच काय काय आठवायला लागल्यावर वाटलच होत, ही मुखदुर्बळ काय बोलायची नाय.
हा भाग पण फुकट. Angry

त्यामुळे पुढे बघायला मी थांबलीच नाय टीव्हीसमोर.

ho ga

कालच्या भागाची उत्कंठा उगाचच वाढवुन ठेवली होती.. जाहीरातीचा मारा करुन... आता सोमवारी तरी घोड गंगेत न्हाउ दे म्हणजे मिळवली

D.Po

जान्हवीला काल शून्य मार्कं. बालिश हावभाव. खरंतर कालचा सीन अतिशय भावुक आणि हळवा करायला दिग्दर्शकाला फुल चान्स होता. तिथे आज्जीला उभे करण्याची कल्पना आपण प्रत्यक्षातही करू शकत नाही. आजींनी बाहेर थांबून जरा वेळाने यायला हवं होतं. ते तर असोच, पण चार महिन्यांनी भेटल्यावर नवर्याला अरे म्हणायचं का अहो हे पण विसरायला होतं? त्यापेक्षा नर्मदा बाईंनी पंचवीस वर्षांनी दिसलेल्या नवर्याला किती पटकन ओळख दिली Proud कालच्या भागाचे स्क्रिप्टही सातवीच्या मुलाने लिहील्यासारखे. अजिचबात आवडला नाही भाग. सोन्यासारखी संधी हुकवली. याबाबतीत एकता कपूरला मानलं पाहिजे. क्यूंकी, कहानी घर घर की मधले असे कलाटणी देणारे भाग कसे खणखणीत वाजवून घेतले. मिहीरचा मृत्यू, त्याचं तुलसीच्या लग्नात परत येणं हे सीन्स अंमळ लांबले असले तरी ज्या प्रकारे मालिकेला वळण देणारे होते त्यानुसार न्याय्य होते. एकताची आपण सारेच खिल्ली उडवतो पण ज्या उथळपणे कालचा भाग दाखवला त्यापुढे ती बरी म्हणावीशी वाटते. काल जानूच्या जागी मी तुलसी ला मिस केलं.

अभिनय?
काल तिने अभिनय केला?... बापरे.
मी आजवर इतका बालिश भाग पाहिला नाहि. अरे तु आई होणार आहेत तर तश्या maturity ने वाग न. कसली भयाण अभिनय Happy करत होति. specially जेव्हा भावाला अन वडिलांना सांगत होते ते खुप विचित्र होत.
माझा नवरा बोलला पण आपली ५ वर्षाची लेक पण असे लाड करत नाही Lol

त्या "कार्टी काळजात घुसली" मध्ये काय करेल देव जाणो.

एवढा पाणचटपणा दाखवण्यापेक्षा रडू अनावर झाल्याने किंवा अती हळवी झाल्याने जान्हवी काहीच बोलू शकत नाही हे दाखवलं असतं तरी चाललं असतं. अभिनंदनाऐवजी सॉरी वगैरे प्रकार ण तुकडीच्या दर्जाचे झालेत आता. मधुगंधाने निराशा केेली.

Pages