होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे मला काय झेपले नाही. श्री बाळाचा पुतळा कशासाठी...तो काय पुतळ्यापेक्षा कमी अभिनय करतो का काय...त्यालाच पुतळा म्हणून उभा करायचा ना..तेवढे कष्ट तरी वाचले असते

आता गाणे म्हणायची वेळ आलीये.... भोंडल्याला म्हणतात ना ते

श्री, कांता, कमलाकांता अस्से कस्से झालं?
अस्सं कस्सं वेड माझ्या कपाळी आले?

वेडी चा नवरा बस्ला होता ऑफीसात
तीकडून आली वेडी तीने हळूच पाहीले
घाबरले घाबरले म्हणून तीने ग्लासच फोडले

Happy Happy

IPL २४ ला संपत आहे, आता सगळ्या मालिकांमध्ये track सरळ होतील, इतके दिवस उगाच पिळत होते.

इतक बोर करताहेत ना. सगळी मजाच निघून गेलेय. इतक ताणलाय इतक ताणलाय Happy
झाल सांगितलं. जरा धूम धडाक्यात फटाके लावा बर . हुश्श सुटलो Happy

अरे कोणी ती श्रीच्या मागे बसलेली मुलगी नोटीस केली का?

एपिसोड किती रटाळ चाललाय याचे प्रतिक होती ती. Lol सुरुवातीपासून शेवटपर्यंत चेहर्यावर काहिही एक्स्प्रेशन्स नाहीत.

माझं लक्ष तर प्रत्येकवेळी श्री दाखवला की फक्त तिच्याकडेच जात होतं.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत चेहर्यावर काहिही एक्स्प्रेशन्स नाहीत. >>>> सेम !! Proud

किती तो पिळ मारला रे ... आवरा आता !

या मालिकेच्या प्रेक्षकांना एक प्रश्न. प्लीज प्लीज सांगा - मी मुलाचं नाव घटोत्कच ठेवणार नाही असं जानी का म्हणते?
झालं असं की दुसरी मालिका बघायच्या आधी या मालिकेचा हा इतकाच भाग नजरेस पडला आणि Sad अशी रिअ‍ॅक्शन झाली. पण उत्सुकता! त्यामुळे इथे विचारते आहे.

रमड, श्री तिला चिडवत असतो की मुलगा झाला तर ते नाव ठेवायचं. घट म्हणजे डोकं आणि उत्कच म्हणजे केस उडालेला (म्हणजे नसलेलाच, म्हणजे टकलू) असंही तो सांगतो म्हणून मुद्दाम तिला चिडवायला घटोत्कच नाव ठेवू म्हणतो. (हे सगळं तेव्हा घडलेलं असतं जेव्हा ते दोघं मधली त्रासाची प्रकरणं घडायच्या आधी बाळाचा विचार करत असतात.)

देवा रे हे लोक इतक्या पर्सनल गोष्टी इतक्या जाहीरपणे कसे काय बोलू शकतात...आणि नंतर लाडात काय येतात...समोर ५० जण बसलेले आहेत...
अगदीच आवरा रे

भयानक भाग. तो आश्रमच काय मिळाला संवाद साधायला? हरवलेला संवाद.... म्हणे.

दिग्दर्शक काय मुद्दाम्हून असे संवाद देतोय का ह्यांना म्हणायला? लोकांना ज्ञानामृत पाजायाला.

काय तत्वज्ञान, मग काय ते रडणं....

फेबू वर लोकं इतक महान प्रतिक्रिया देताहेत त्यांच्या व्यक्तिगत निर्णयाला टारगेट करून.
पीपल आर् पॅथेटीक!

तेजश्री खूपच ओरडूम संवाद म्हणते. ते ही एकाच सूरात हाय पीच मध्ये. भावना कुठलीही असो; आनंद असो, दु:ख असो.
तो श्री तरी परवडला.

ही न्यूज सांगायला काय समारंभ वगैरे केला होता का? कोण होती बाकीची लोकं? एखाद्या स्टेज शो सारखं काय होतं,? >>>हो प्लिज . कोणीतरी टोर्च मारा .

पण मला कालच्या भागातले लक्ष्मीकाका उर्फ कान्ता याचे सान्गणे आवडले. मनाला भिडले. तो कुठेही अ‍ॅक्टिन्ग करतोय असे जाणवले नाही. आणी खरच असे घडु शकते की ज्याला आपण वेळ देत नाही ती व्यक्ती दूर गेल्यावर जाणवते की आपण सन्वाद साधायला हवा होता. काल त्याने हेच सान्गीतले.

बाकी जानी म्हणजे जानीच आहे. फारच होकसाबोकशी रडत होती.

अरे कोणी ती श्रीच्या मागे बसलेली मुलगी नोटीस केली का?

एपिसोड किती रटाळ चाललाय याचे प्रतिक होती ती.>>>>>>>>>>>> Lol हो मी केली नोटीस. मधेच कंटाळुन भुवया पण उडवल्या तिनं.

जानी म्हणजे जानीच आहे. फारच होकसाबोकशी रडत होती>>> अगदी अगदी....श्री बाळ आणि जानू बाळ एवढे रडले एवढे रडले की ते नर्मदा योग सेंटर वाहून जायचे बाकी होते Proud

बाकी काल जान्हवी छान दिसत होती ...आणि अभिनयही तसा बरा केला नेहमीपेक्षा...

नर्मदा योगा सेन्टरमध्ये समारंभ का म्हणुन? त्या बाकीच्या लोकांना का म्हणून शिक्षा हे सगळ ऐकण्या-बघण्याची? त्यापेक्षा देसाइवाडीत करायचा ना समारंभ. तिथल्या लोकांना तसाही दुसर्‍याच्या आयुष्यात भारीच इन्टरेस्ट असतो. आणि श्रीच्या मागे बसलेल्या मुलीच्या जागी माईंना बसवलं असतं तर माई रड रड रडल्या असत्या आणि मेघनानेही उसासेभरले कटाक्ष आदेकडे टाकुन भर घातली असती.

कांताच काय तो आधिचा माणूस त्याच्या मुलीबद्दल बोलला ते पण चांगलच होतं. फक्त ते जान्हवीच ऑडिओ विज्युअल आणि त्यावर इतरांचे हुंदकेभरीत उसासे, मख्ख चेहरे, ओढुन ताणुन आणलेले चेहर्‍यावरचे रडके भाव हे सहन करण्याच्या पलिकडे होत.

कालचा भाग म्हणजे
श्री मी प्रेग्नंट आहे
श्री माझ्या पोटात तुझा वंश वाढतोय
श्री आपल्याला बाळ होणार आहे
श्री तू बाबा होणार आहेस
श्री मी मला प्राणांपेक्षाही प्रिय माणूस आनंदी राहावं म्हणुन हे सगळे गैरसमज वाढवत होते Wink
असोच अशीच एका अर्थाची अनेक वाक्य काल पारायणाला बसल्यासारखी चालू होती.
बाकी काका, आईआज्जी आणि शशिकला बाई नेहमीप्रमाणे रॉक्स. काल शशिकला बाईने अपेक्षित असलेली कोलांटीउडी मारली जी की सामान्यतः अपेक्षित असते. नाहीतर अति चांगली आणि अती वाईट दाखवायच्या नादात सर्वसाधारण माणूसच दाखवायचा राहुन जातो त्यांचा.

लक्ष्मीकांत ने सांगितले ते खूप छान सांगितले आहे. हा कांताचा भाग सोडला तर कालचा भाग बकवास होता...

"तुझा अंश माझ्या पोटात वाढतो आहे" हे अती होतेय.... मधुगंधा ला कळत नाहीये का पुढे काय लिहावं ते?

या सिरीयलपेक्षा "क्यूंकी सास भी कभी बहू थी" कितीतर्री पटीने चांगली होती.

महत्वाची गोष्ट असेल / भांडे फोडायचे असेल तेव्हा तो भाग खणखणीतपणे दाखवला होता एकता कपूर ने...

अशी मठ्ठ रडारड नव्हती कधीच....आणि हो, जान्हवी श्री यांच्याइतके मख्ख बावळट कोणीच नव्हते त्या सिरीयल मध्ये...

Pages