'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लव्ह जेहाद नावाची काही कल्पना अस्तित्वात आहे यावर विश्वास असणा-यांनी ते सिद्ध करायचं असतं अशी माझी समजूत होती. ज्यांचा विश्वास नाही ते कशाला पुरावे शोधतील ? एक भाप्र.

>>>>>>>>

तुम्हाला तो अकबर ओवेसी माहीत आहे का हो?
गूगाळून त्याची भाषणे शोधा जरा ..

माझं काही अडत नाही. काम, व्यायाम, प्राणायाम, योगनिद्रा चालू आहे, सुदर्शन क्रिया चालू आहे. माझ्या मते लव्ह जिहाद नावाचा प्रकार नाही. संपलं. ज्यांना वाटतंय आहे त्यांनी पुरावे द्यावेत नाहीतर माझ्याकडून विषय खतम. फालतू युक्तीवादापेक्षा एक घाव दोन तुकडे करून मोकळे व्हायचं. अशाच प्रकारचे स्टेटमेण्ट्स कोर्टात पण केले असतील असंच वाटतंय..

चक्क सेन्सिबल चर्चा!

म्हात्रे,

तुमचा ब्रेनवॉश पक्का दिसतोय. थोडा स्वतःचा मेंदू वापरण्याचा प्रयत्न करा. जगात इकडे तिकडे बघा. नेटवर खर्‍यापेक्षा खोटं जास्त सापडतं.
*
हिंदुत्ववादातून मुस्लिमद्वेष मायनस केला, तर हिंदुत्ववाद्यांचं अस्तित्वच संपुष्टात येईल, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे असले बागुलबुवे उभे केले जातात.

उद्या उठून भारतातले सगळे मुसलमान हिंदू धर्म स्वीकारायला तयार झाले तर त्यांना हिंदू करून घेणार का? कारण बाबर आला त्याला ३-४०० वर्षं होऊन गेलीत, त्यानंतरचे इथेच जन्मलेत, अन इतर बहुतांशी इथलेच बाटून हिंदूचे मुसलमान झालेत.

धर्मांतरविरोधी काड्या करण्यापेक्षा, लोकांना धर्मांतरण करून हिंदू का करून घेत नाही आपण? न रहेगा बांस न बजेगी बांसरी!

काय म्हणता लोक्स? करायचा का असा प्रयत्न?

काय म्हणता लोक्स? करायचा का असा प्रयत्न?
>>>>>>
मुसलमान तयार होतील याला?

तळटीप - मला स्वताला धर्म हि संकल्पनाच पटत नाही, फक्त माणुसकी समजते. पण इतर लोक धर्म मानतात ते नाकारू शकत नाही, तसेच धर्माच्या नावावर होणारे वादविवाद-राजकारण बघवत नाही.

गण्या,
आपण अकबर ओवेसीचे नाव ऐकून विषयातून पळ काढू नका प्लीज, त्याची भाषणे ऐका, त्यातून सारे पुरावे मिळतील.

कसला पळ ? पुरावे देण्यापासून पळू नका कॉन्फिडन्स असेल तर. मी काय म्हणून वेळ घालवत बसू ? असले येडछाप ऑर्ग्युमेन्ट्स माझ्याकडे चालणार नाहीत. द्यायचे तर द्या.. माझं अडत नाही. असा प्रकारच नाही हे मी आधीच म्हटलेलं आहे.

He said,"When people are in love, whatever caste they may be, it is only about love between them. How can love be equated with jihad? If you can make atrocious comments, then be prepared to hear the same degree of comments from us as well."

इति श्री अकबरुद्दिन ओवईसी.

ऋन्मेष,

तयार करण्याचा प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे? लव्ह जिहादमधे ते नाही का हिंदूंना बाटवून मुसलमान करत?

आपण त्यांना बाटवून हिंदू करू की!

जमेल का?

ऋन्मेष
ऑर्कुटवर हिंदुत्ववाद्यांविरुद्ध लिहीणारे म्हणून तुमची ओळख होती. इथेही अनेकदा वेगवेगळ्या रुपात तुमची मतं पहायला मिळतात. मग हा चाबरेपणा का बरं ? लक्षात येणार नाही असं वाटतंय का ?

छ्या! आमचं लग्नं ऑलरेडी झालंय आणि एकहून अधिक करायची सोय नाही.
आमच्यान नाही होणार.
इथे कुणी इलिजिबल बॅचलर्/बॅचलरेस आहे का ?
Happy

@ दिनेशदा,
त्या गिरक्या घेणार्‍यांना डान्सिंग दरवेश असे म्हणतात. "Dancing Darwish" गूगलून पहा.
या प्रकाराने, त्या आर्ट ऑफ लिव्हिंगवाल्यांच्या कोऽहम सोऽहम सारखेच झिंग येऊन तंद्री लागल्याचा अनुभव येतो.
प्राचीन काळापासून असल्या फिजिकल अ‍ॅक्शन्स व हॅल्युसिनोजेनिक औषधांचा वापर 'देव'पूजेसाठी/अंगात आणण्यासाठी केला गेलेला आहे.
अंगात आणणार्‍या बायका ज्या प्रकारे मोकळे केस फिरवत डोके गरगर फिरवतात, त्याने मेंदुस मिळणार्‍या रक्तपुरवठ्यात सेंट्रीफ्युगल अ‍ॅक्शनने कमतरता येते. गळ खेळणे, १२ गाड्या ओढणे, कडकलक्ष्मी इ. अनेक स्वयंपीडनप्रथा दिसतातच की!

पण,
या सगळ्यांपैकी कशाचाही वापर 'वशीकरणासाठी' होऊच शकत नाही.

हिप्नोटाईझ करण्याचे पहिले तत्व / मूलभूत गरज = ज्याला हिप्नोटाईज करायचे, त्याची हिप्नोटाईज होण्याची इच्छा हवी. तुमच्या इच्छेविरुद्ध कुणीही तुम्हाला हिप्नोटाईज करूच शकत नाही. (हे 'शास्त्रीय' सत्य आहे)

तेव्हा साहेबा,

अशी कोणतीही औषधी वस्तू असती, तर आजपर्यंत नक्कीच नार्को टेस्ट ऐवजी वापरली गेलीच असती!

पण असे औषध नाही.

सारासारविचारबुद्धी हरवायला भाग पाडणारी जी एकमेव 'वस्तू' अस्तित्वात आहे, ती म्हणजे धर्मग्लानी!

अफूची गोळी Wink

<लोकांना धर्मांतरण करून हिंदू का करून घेत नाही काय म्हणता लोक्स? करायचा का असा प्रयत्न?>
आपण एकदम तयार इब्लिस भू यासाठी. सांगा कसं कसं करायचं?

ऋन्मेष
ऑर्कुटवर हिंदुत्ववाद्यांविरुद्ध लिहीणारे म्हणून तुमची ओळख होती.
>>>>>>
१) मला माहीत नाही मी ईतका फेमस आहे.
२) तरीही आपण इथे चुकला आहात, माझी आजवर कोणच्याही बाजूने वा कोणाच्याही विरुद्ध लिहिणारा अशी ओळख नसून मी नेहमी माझ्या आकलनशक्तीनुसार जे सत्य आहे त्याला प्रमाण ठेवून माझे मत मांडतो, समोरच्याचेही ऐकून घेतो आणि ते योग्य असल्यास त्यानुसार मतपरिवर्तन करायचीही तयारी ठेवतो. Happy

ईब्लिस,
आधी आपण म्हणालात की त्या सर्वांना हिंदू करूया जेणे करून न रहेगा बांस न बजेगी बांसरी! नंतर आपण म्हणालात की बाटवून करूया, म्हणजे जोरजबरदस्तीने आपण सर्वांनाच तर नाही करू शकणार, म्हणजे बांस-बासुरी राहणारच..... नॉट प्रॅक्टीकल !

तसेच मी स्वता तरी कुठल्याही जबरदस्तीने बाटवून वगैरे केलेल्या धर्मांतराच्या विरुद्धच आहे. मग ते कृत्य कोणत्याही धर्माच्या समर्थकांनी का करेना.

श्रीयू,
धर्मसंसदेला डायरेक्टिव्ह्ज विचारायला हवेत. मला काय रिच्युअल्स येतत नाहीत बा Sad
तुमच्या काही सजेशन्स?

अन ऋन्मेष,
जबरदस्तीने बाटवून हिंदू बनवायचं? ही विकृती कुणी सांगितली तुम्हाला?

छेछे!

आपण त्यांना आपल्या हिंदू धर्माची महती पटवून देवू. इतका प्राचीन, उदात्त, सुंदर धर्म जगात दुसरा नाही. खरं तर इतर सगळ्या फक्त उपासनापद्धती आहेत. धर्म एकच. हिंदू!

हे एकदा उमजले, की त्यांचे डोळे खाडखाड उघडतील अन ते स्वतःहून सगळ्या मशीदींतून शिवलिंगे प्रस्थापित करतील.

हो की नाही?

लव्ह जिहादमधे ते नाही का हिंदूंना बाटवून मुसलमान करत?
आपण त्यांना बाटवून हिंदू करू की!
^^^^^^^^^^^^^^^^
अन ऋन्मेष,
जबरदस्तीने बाटवून हिंदू बनवायचं? ही विकृती कुणी सांगितली तुम्हाला?
छेछे!
आपण त्यांना आपल्या हिंदू धर्माची महती पटवून देवू. इतका प्राचीन, उदात्त, सुंदर धर्म जगात दुसरा नाही. खरं तर इतर सगळ्या फक्त उपासनापद्धती आहेत. धर्म एकच. हिंदू!
^^^^^^^^^^^^^^^^

ईब्लिस नक्की एक काय ते ठरवा, आधीच माझे मराठी कच्चे, मला पहिल्या पोस्टचा अर्थ काय तो लागला तो जबरदस्ती किंवा फसवणूक असाच.

ब्रिटनमध्ये गेल्या दोन तीन वर्षात ठिकाणी Child Sexual Exploration च्या घटना उघडकीस आल्या आहेत आणि यात मुख्यत: मिड्लंडमध्ये - रोचडेल नंतर ऑक्सफर्ड व नुकतेच रोदरहम मध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी पुरुष आणि ग्यांग्स यात सामील होत्या. ब्रिटीश गोऱ्या मुली यांचे सहज शिकार बनतात यामागे बरीच सामाजिक कारणे आहेत - पाकिस्तानी पुरुषांचे आकर्षण हा काही मुद्दा नहिये. बहुतेक शाळकरी मुली विस्कळीत कुटुंबातून आलेल्या, सिगारेट, ड्रग्स आणि दारूच्या व्यसनाधीन असलेल्या अशा होत्या. एका दारूच्या बाटलीसाठी यातील कोणाही बरोबर जात असत. यात बरीच सखोल चौकशी झाली आहे. समोर येणारे वास्तव भयानक आहे. अगदी पद्धतशीरपणे आधी एका बॉयफ्रेंड शी संबंध आणि त्यातून पुढे त्यान्चे लैंगिक शोषण अशी साखळी आहे. पाकिस्तानी पुरुष गोऱ्या मुलींना कस्पटासमान लेखून त्यांचे शोषण केल्याच्या संघटीत घटना खऱ्या आहेत. स्त्रिया - मुली त्याही दुसऱ्या समाजाच्या ह्या उपभोग्य आणि दासीसमान हा टोळीकाळचा समज आणि स्वभाव बदललेला नाही हे खरे आहे. मिद्लंड आणि एकूणच ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या घेट्टोज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या याचे उग्र स्वरूप हे आहे.

इथल्या शासनाने दखल घेतली आहेच आणि वेगवेगळ्या पातळीवर कामही सुरु आहे. ऑक्सफर्डकान्डातल्या तेरा जणांना शिक्षा झाल्या. जिथे जिथे या घटना घडल्या तिथल्या पोलिस आणि child protection (Local Authority Children Services-ज्यांच्याकडे मुलांच्या संरक्षणाची कायदेशीर जबाबदारी आहे ) मधील उच्च अधिकारी बडतर्फ केले गेले. सामाजिक पातळीवर प्रयत्न चालू आहेत.

दक्षिण आशियायी समाजाच्या आणि विशेषता: आधीच्या पिढीच्या समस्या फार वेगळ्या आहेत. आणि या कांडात जे झाले ते अति भयानक आहे पण त्याचबरोबर इथल्या दक्षिण आशियायी समाजात एकूणच स्त्रिया आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे. गेल्या दहा बारा वर्षात आर्थिक migration वाढले आहे आणि इथे येणाऱ्या immigrants मध्ये शिक्षित आणि नोकरदार लोकांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांशी तरुण असलेला हा वर्ग आणि या आधी वसलेला आता ५०-६० त असलेला, दुसऱ्या महायुद्धानंतर कामगार म्हणून आलेली आधीची पिढी यात कमालीचे अंतर आहे. कौटुंबिक हिंसा, forced marriages आणि वाढता धार्मिक कट्टरपणा ही सर्वच समाजात - श्रीलंकन, भारतीय ( पंजाबी, गुजराती, दक्षिणात्य ), पाकिस्तानी आणि बांगलादेशी समाजात दिसतो. इस्लामिक मुलतत्ववादाला एक जागतिक परिमाण आहे आणि त्याचे प्रतिबिंब इथल्या कट्टर मुसलीम समाजात दिसतेच.

भारतात चाललेली लव जिहाद ही मात्र निव्वळ राजकीय खेळी आहे. ग्रामीण किंवा शहरी भागात आपापल्या जात पंचायती आणि समुदाय यांची अगदी घट्ट पकड अजूनही लग्न आणि नातेसंबंधांवर आहे. त्यामुळे मुलगी किंवा बाई कुटुंब आणि त्या पलीकडे त्या त्या समुदायाची property असेच समजले जाते. ज्यांनी कुणी या जाती -पातीच्या कुंपणापलीकडे जावून आपापले लग्न किंवा नात्याचे निर्णय घेतले त्यांना थोड्या फार प्रमाणावर समाजाचा रोष स्वीकारावाच लागतो, त्यांच्या कुटुंबीयांनातर अनेक काळ अनेक प्रकारचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष छळ सोसावे लागतात. जाती पाती - सर्व धर्मात आहेत आणि अगदी हिरीरीने आपापल्या समाजातल्या मुलींच्या फक्त असल्या रक्षणाची स्वबंधीलकी असणारी जबाबदारी निभावतात. त्यामुळे लव जिहाद जर एवढ्या प्रमाणवर होत असता तर आतापर्यत खेडोपाडी आणि वस्ती वस्तीत रणधुमाळी माजली असती.

प्रश्न लव जिहाद चा नाही तर स्त्रिया आणि मुलींच्या स्वातंत्र्य मुख्यत: निर्णय स्वातंत्र्याचा आहे. प्रश्न मुळातच पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रियांना समुदायाची संपत्ती मानण्याचा आहे. स्त्री, मुलगी म्हणून ती स्वतः तिचे निर्णय घेऊ शकते, किंवा तसे करण्यासाठी तिने सक्षम व्हावे - ही मान्यता गेल्या ३०-३५ वर्षात मुख्यत: मध्यमवर्गीय, शिक्षित समाजात दिसून येत असली तरी अजूनही स्वतंत्रपणे आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य ही आपल्या धर्म आणि समुदायाच्या कक्षेतच दिसून येते. आणि जे कोणी या पलीकडे जाउन आपले जोडीदार निवडतात तिथेही नवऱ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक रितीरिवाजांचा प्रभाव दैनदिन जीवनात स्त्रियांना स्वीकारावा लागतो - मुलांची नावे, त्यांना दिले जाणारे धार्मिक, सांस्कृतिक शिक्षण बहुदा बापाच्या घरचेच असतात…

ज्या कोणी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्ने केली आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबांच्या तडजोडी चांगल्या प्रकारे कळतील -- अजूनही आपल्याकडे लग्न व्यक्तीशी नाही तर कुटुंबाशी आणि समुदायाशी होते. लव -जिहादच्या नावाखाली जे चाललेले आहे ती नवीन राजकीय खेळी आहे. हा प्रश्न जर खरेच एवढा मोठा असेल तर त्याची रीतसर चौकशी व्हावी व बिगर इच्छेविरुद्ध minor मुलींचे जर शोषण होत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.

आणि ज्या कोणाला आपल्या देशातील मुलींच्या रक्षणाची, भवितव्याची काळजी असेल त्यांनी इथल्या खऱ्या प्रश्नांवर तोडगा काढावा. उदा. हरवणाऱ्या, बेपत्ता होणाऱ्या मुलीनमधील निम्म्याच्यावर मुली वेश्याव्यवसायात विकल्या जातात.
http://scroll.in/article/half-the-67000-children-who-went-missing-in-ind...

आंतरारष्ट्रीय पातळीवर मुलींच्या Human Trafficking मध्ये दरवर्षी भारतातून पुरवठा होणाऱ्या मुलींची संख्या वाढतच आहे- आणि याला समजून घ्यायला, नियंत्रण घालायला ना तर आपल्याकडे कायदे, ना यंत्रणा न जनमानस!

http://zeenews.india.com/news/top-stories/videos/zee-exclusive-survey-lo...
स्त्रियांकडे पहाण्याची दॄष्टी अशाप्रकारची असावी याचा हे बघून उबग आला.
शबाना,
तुम्ही म्हणताय ते खरे आहे.मागे याहूवर वाचले होते/फोटो पाहिले होते .अशा कोव़ळ्या मुलींना गोलवा आणण्यासाठी स्टिरॉईड्स देतात.ही त्यांचीच बातमी होती.मुलींचे चेहरे अ‍ॅब्नॉर्मल गुबगुबीत दिसत होते.

फक्त एक पुस्तक वाचा.

लव्ह जिहाद
लेखिका: डॉक्टर सुनिला सोवनी.
प्रकाशक: भारतीय विचार साधना
बुकगंगा.कॉम वर उपलब्ध आहे.

बाकी चालूद्या.

जोशी,
पुस्तकं वाचून ज्ञान मिळालं असतं, तर तुम्ही पुरोगामी टोळक्यात सामिल होऊन निधर्मांध झाला असता आतापर्यंत.
खरं ज्ञान फक्त बौद्धिकांतून मिळतं हे शिक्रेट तुम्हाला ठावं न्हाई का? Wink

आभार इब्लिस... आपली इच्छा नसेल तर संमोहन आपल्यावर होत नाही, हे नक्कीच. पण नकार देण्याचा ठामपणा खुप कमीजणांकडे असतो, हे पण खरे ना ?
शबाना, अनेक बाबींकडे एक समाज म्हणून आपण दुर्लक्षच करत आलोय. लाज वाटते असे कबूल करायचीच लाज वाटते.

ॠन्मेष,
मोल्सवर्थ डिक्श्नरीनुसारः

बाट (p. 571) [ bāṭa ] m (बट्टा) Pollution; unfitness for social intercourse (through disregard of the distinction between pure and impure, or as explained under the verb बाटणें). v पड, अस. 2 Stain, slur, sully, blemish, occasion for blame (in persons or things). v ठेव, पड, अस.

बाटणे या शब्दाचा प्रचलित अर्थ धर्मांतरित होणे.

यात जबरदस्ती करणे असा अर्थ कुठेही ध्वनित होत नसतो. तेव्हा तुमचे कन्फ्यूजन दूर झाले असावे असे समजतो Happy

through disregard of the distinction between pure and impure, or as explained under the verb बाटणें

प्युअर ईम्प्युअर हे शब्द काय दर्शवतात ?

लव जिहाद हे हिंदूत्ववाद्यानी उठवलेले भूत आहे.

हिंदु धर्मात दुसर्‍या धर्माची व्यक्ती व संकर संततीला स्थान नसते.

अगदी पुराणकाळापासुन हे चालू आहे.
१. भीम व हिडिंबेचा पुत्र. घतोत्कच हा राक्षस मानला गेला , क्षत्रिय नव्हे.
२. बाजीराव मस्तानेचा पुत्र समशेरबहाद्दर हा मुस्लमान मानला गेला. ब्राहण नव्हे.

लव जिहादाला ही हिंदुंची कमजोरी कारणीभूत आहे. हिंदुनी अशा स्त्रीया व संतती याना आपल्या धर्मात व संपत्तीत हिस्सा दिला तर हा प्रश्न मोठा होणार नाही.

पण गंमत अशी आहे की हिंदुना युद्दात मरायला मात्र ही संतती चालते बरं का.
घटोत्कच महाभारतात मेला.
समशेर बहाद्दूर पानिपतावर मेला.

आता हिंदुतवाद्याना लव जिहादातील मुलीच व संततीचा पुळका का आला ?
संघात माणसे कमी पडु लागली म्हणुन का काय ? Proud

लव्ह जिहादची मोडस ऑपरेण्डी आणि त्यापासून मुलींना सुरक्षित ठेवण्याचे उपाय

नमुन्यादाखल : Give the girl gomutra (Urine of a cow of Bharatiya breed) to drink; also sprinkle some gomutra on her. Subsequently, chant the Name of the girl’s Family Deity for half-an-hour by placing your palm on her head.

the girl should be asked to bathe with a bucketful of water in which a fistful of rock-salt has been dissolved.

Pages