अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Timepass

पावसाची बेगमी करायला हड़ळी रजेवर आणि शेतात भाजावळी साठी भूतं सुट्टीवर>>>>> सुट्टीवर नाय ओ, सासुरवाडीला गेली असतील धोंड्यासाठी ( अधिक महिना ). Biggrin

.

खरे खोटे माझ्या साबांनाच माहीत. पण त्यांनी त्यांच्या लहानपणाचा किस्सा मला व जावेला एके दिवशी सांगीतला. त्या वेळेस त्या ३ ते ४ वर्षाच्या होत्या. त्यांचे आजोबा एका संस्थानिकांकडे नोकरीस होते. काही कामानिमीत्त ते बाहेरगावी गेले, त्यावेळेस त्यांचे गाव म्हणजे खेडेच असल्याने रेल्वे वगैरे नव्हती, आजही नाही कारण गाव फाट्यावर आहे. जवळचे शहर म्हणजे नासिक. तर आजोबा सायकलवर दुसर्‍या गावी गेले, त्यावेळेस काही लोक सोबतीला होती. पण येतांना रात्र झाली, ते एकटेच होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी, अंधार मी म्हणतोय. कोणी सोबत नाही, अशा वेळेस ते सायकल दामटत येत होते. त्यांना मागुन कोणीतरी आवाज दिला म्हणून ते थांबले तर मागुन एक बुटका माणुस पळत येत होता, काहीतरी विचारायला. त्यांना वाटले की हा सायकल वर बसायला ( मागे ) विचारतोय. पण त्यांना मध्येच शंका आली, कारण तो रस्ता पूर्ण निर्मनुष्य होता मग, मागुन का होईना हा बुटका कसा आणी कुठुन उगवला. म्हणून त्यांनी सायकल जोरात दामटली, तर हा बुटका त्या सायकलच्या वेगाने त्यांच्या बरोबरीने पळू लागला. आणी तो हळू हळु उंच होत गेला.

आजोबा साधारण ६-२ च्या उंचीचे होते तर हा माणुस त्यांना ५ फुटापेक्षा कमी वाटला होता. हे भूत तर नाही ना या विचाराने त्यांनी सायकल आहे त्या वेगाच्या दुप्पट जीव खाऊन चालवली, आणी कसेबसे घरी येऊन पोहोचले आणी अंगणातच बेशुद्ध झाले. पुढे ८ दिवस ते तापात होते.

ते भूताखेतांना घाबरत नसत पण त्या रात्री कोणी सोबत नाही, किर्र अंधार या विचाराने घाबरले असतील. सांबाच्या घरी ( माहेरी ) एकत्र कुटुंब होते. ही गोष्ट त्यांना त्यांच्या आईंनी ( माझ्या आजेसासु) साबांना सांगीतली.

असाच एक किस्सा माझ्या काकांसोबत झाला होता तो मी आधी टाकला होता ... त्यांची रिक्षा (ते स्वतः चालवत होते) एका माणसाच्या आरपार गेली होती आणि नंतर त्यांनी मागे पहिले तर तो माणूस तसाच उभा होता रस्त्यात ... त्यांचे मित्र पण हादरले होते हे पाहून ... नाशिक मधील औरंगाबाद रोड वरील घटना आहे हि २०-२२ वर्षांपूर्वीची

रश्म्या, सेम हाच किस्सा माझे बाबा त्यांच्यासोबत घडला म्हणून सांगतात.. फक्त त्यांच्या किस्स्यात बुटक्या माणसाऐवजी म्हातारी बाई आहे आणि ती म्हणे बाबांच्या शेजारुन सायकलच्या दुप्पट वेगाने पळत गेली Proud

बाबांचा किस्सा सातार्यात घडलाय... आम्ही हसतो बाबांना फार Proud

काही दिवसां पूर्वी घरात मला पैंजणांचा आवाज ऐकू येत असे. रात्री स्पष्ट यायचा. तो ही सारखा नाही. मग बंद झाला आपोआप.
नंतर राखेचा चालू होतं तेव्हां पुन्हा ऐकू येऊ लागला. जरा भीती वाटली.

एकदा रात्रीची तहान लागली. पाणी प्यायला किचन मधे जाणार तर पैंजणांचा आवाज.
जाम टरकली माझी. पाणी प्यायचा बेत रहीत केला.

काही वर्षांपूर्वी घरात स्पार्किंगचा त्रास असल्याने इलेक्ट्रिशियनला बोलावले होते. तो चेक करत असताना आवाज आला.
दोन तीनदा असे झाले.

इलेक्ट्रिशियनने काम थांबवून आवाजाचा अंदाज घेतला. रात्री इतका स्पष्ट नसला तरी येतच होता.

मग किचनकडे मान वळवून म्हणाला

" फॅनचे बेअरींग्ज गेलेत. बदलून घ्या "

Pages