मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>There it goes....again... and again...and forevere <<
डोंट टेक देम सिरीयसली, उद्या म्हणतील गुजरात माॅडेलनुसार देशात दारुबंदी घोषीत करा, Happy

++++निवडणूक निकालाच्या धामधुमीत एक बातमी फारशी चर्चेत आली नाही ती म्हणजे गुजरात मधील अक्षरधाम अतिरेकी हल्ल्यातील सहा आरोपींना सुप्रीम कोर्टाने निर्दोष सोडले ही. त्या पैकी चौघांना फाशी झाली होती आणी हाय कोर्टाने कायम केली होती. त्या सहापैकी एकाने तर अपीलही केले नव्हते. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना राज्य सरकार वर ( गृहमंत्री मोदी होते) ताशेरेही ओढले आहेत. शिवाय त्या सहा आरोपींना ताबडतोब जेल मधून सोडण्याचे आदेशही दिले आहेत. या बातमीचा आणखी एक अर्थ म्हणजे अक्षरधाम वर हल्ला करणारे खरे अतिरेकी अजूनही मोकळेच आहेत. अक्षरधाम हल्याचा तपास करणारे बरेच उच्च्पदस्थ अधिकारी इशरत, सोहरबुद्देन किंवा सादिक जमाल चकमक प्रकरणात तुरुंगात आहेत +++++++++

जर आरोपींना स्पेशल कोर्टाने फाशी दिली होती आणि हाय कोर्टाने कायम ठेवली होती, ज्या वेळी ही केस सुप्रीम कोर्टात होती त्यावेळी तपास करणारे अधिकारीच जेल मध्ये असतील तर ते आरोपी सुटले तर आश्चर्य वाटायच कारणच नाही. जेंव्हा एखाद्या आरोपीने अपिलच केल नव्हत म्हणजे त्याला माहीतच होत की तो सु टणार नाही, पण नशिब जोरदार निघाल त्याच.

अक्षरधाम वर हल्ला झाला ह्याच दुखःच नाही. कसल्या कातडीचे लोक हे ?

लिहीतांना माहीती आहे का किती लोकांना मारलय ह्या हल्यात ?

३० लोकांना !! ते ही दोन अतिरेक्यांनी !!

अक्षरधाम मध्येच का ??

कारण मुसलमान मंदिरात येत नाहीत ना ! मग मरणारे सर्वच हिंदु असणार !!

बहुचर्चित गुजरात मॉडेल आता देशभर लागू करण्यात येणार असेल तर गुजरात मधली निदान एक गोष्ट देशभर होऊ नये असे मला वाटते ते म्हणजे मुस्लिमांचे Institutionalized Ghettoization. >>>>>There it goes....again... and again...and forevere >>> अंजली फॉर एव्हर अ‍ॅन्ड एवर.

कुळकर्णी सिरियसली तुम्ही अहमदाबाद / वडोदरा / इ शहरात काही दिवस घालवा. तुम्हाला गरज आहे. मी राहिलो आहे आणि पुढच्या आठवड्यातही गुजराथ मध्ये तुमच्या मित्रासोबत (अडाणी) राहणार आहे. या इकडे, मी अहमदाबादेमधील मुस्लिम एरिया तुम्हाला फिरवून आणतो आणि पुण्यातले. मग घेटो कुठे आहे ते रॅशनली ठरवा !

राहिली पॉलिसी चेंजची बात तर आजची आणखी एक बातमी.

Dismantling a legacy of UPA rule, Prime Minister Narendra Modi abolished all the 30 GoMs and EGoMs on Saturday and told ministries and departments to take decisions on pending matters.

Announcing the decision to scrap nine empowered groups of ministers and 21 groups of ministers, the PMO said this would expedite the process of decision-making and "usher in greater accountability in the system".

The ministries and departments will now process the issues pending before EGoMs and GoMs and take appropriate decisions at the level of ministries and departments itself, said the statement.

मुस्लिमांचे Institutionalized Ghettoization<<<

कृपया कोणी ह्या शब्दप्रयोगाचा अर्थ मराठीत सांगेल का?

अंजली,

>> There it goes....again... and again...and forevere

तुम्हाला १००% अनुमोदन. काय व्हावं ते लिहित नाहीयेत. काय नको ते मात्र आवर्जून लिहितात! Lol

गुजराती मुस्लिमांनी मोदींना केलेलं भरघोस मतदान यांना दिसत नाही. आणि बाता कसल्या, तर म्हणे मुस्लिमांच्या Institutionalized Ghettoization च्या! वा, काय मुक्ताफळ आहे! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

गुजराती मुस्लिमांनी मोदीना केलेल्या भरघोस मतदानाच्या टक्केवारीचे आकडे बघायला कुठे मिळतील ??

Ghettoization ...............घट्ट आयझेडायशन असम काही तरि.

दुकान Lol

गूजरातात दारुबन्दी नाही. आम्ही पन्धरा दिवस अहमदाबादेत काढले आहेत. तिथे आमच्या मित्राना हवे ते ब्र. मिळत होते.

गुजरातेतल्या मायबोलिकरान्नी प्रामानिकपने सान्गावे.

सडेतोड,

>> गुजराती मुस्लिमांनी मोदीना केलेल्या भरघोस मतदानाच्या टक्केवारीचे आकडे बघायला कुठे मिळतील ??

लोकसभा निवडणुकीत गुजरातेत काँग्रेसला २६ पैकी ० जागा मिळाल्याची आकडेवारी सांगते की मुस्लिमांनीही मोदींना भरभरून मतदान केलं आहे. अन्यथा करजणसारखी एखादी तरी मुस्लिमबहुल जागा काँग्रेसला मिळायला हवी होती.

हे आजचंच नाही तर अनेक वर्षे चालत आलेलं आहे. ही सव्वा वर्षापूर्वीची बातमी बघा (इंग्रजी दुवा) :
http://news.oneindia.in/2013/02/12/modi-sweep-muslim-majority-town-elect...

आ.न.,
-गा.पै.

गामा,
बंदूक हातात घेऊन मतदानाच्या दिवशी गावच्या गाव 'बसवणे' ही कन्सेप्ट ठाऊक आहे का तुम्हाला?

इब्लिस.

Ghettoization म्हणजे काय ते माहीत आहे का तुम्हाला? माहीत असले तर मला सांगाल का?

राजू ठाकरे, गामा, अंजली, वगैरे - लिव्ह इट.

काय आहे ना, की निवडणूकांचे निकाल लागल्यावर मयेकर, इब्लिस, लगो, इत्यादींना जो जोर का झटका लागला आहे त्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे 'आधीच _ _ _ त्यात (पराभवाचे) मद्य प्याला" अशी अवस्था झाली असल्यास नवल नाही. यांना परत एकदा कुणीतरी निकाल सांगा Proud

गंमत म्हणजे भाजपचे २००४ आणि २००९ मधे झालेले पराभव यांची गोष्ट सांगताना त्यातली मतांची टक्केवारी लोक विसरतात. तसेच भाजपला एकेकाळी २ जागा मिळाल्या फक्त याची बढाई सांगताना काँग्रेस पक्षाचे वय त्याचा आकार आणि भाजपचे काँग्रेसच्या तूलनेत नवखा पक्ष असणे हे सोयिस्कररित्या विसरतात. लोकांनी भाजपला यंदा प्रचंड बहुमताने विजयी केले आहे ही गोष्ट या लोकांना कळत असली तरी वळत नाही, आणि ती वळणार देखील नाही.

भाजपने फक्त किरकोळ विक्री क्षेत्रात एफ डी आयला विरोध केला होता, बाकी कशाला नाही, हे स्पष्ट असूनही "आधी विरोध केला आता तेच करतायत" अशी गरळ ओकत आहेत. अरुण जेटलींनी काहीच दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रिटेलमधे एफ ई आय नाही आणणार हे स्पष्ट केलेलेही त्यांना दिसत/कळत नाही. आणि कळले तरी वळत नाही.

इथे या मंडळींनी ओकलेली गरळ वाचून लोक मतदान करत नाहीत हे या निवडणूकीने दाखवून दिलेले आहे. आणि नेमके हेच यांना झेपलेले नाही. म्हणूनच म्हणतो, मोदी सरकार जी चांगली कामे करत आहेत ती इथे मांडा. यांना उत्तर देण्यात वेळ आणि शक्ती फुकट घालवू नका. त्यातून केवळ यांचे वैय्यक्तिक प्रतिसाद आणि बकवासच वाचायला मिळेल. त्यापेक्षा त्यांना त्यांच्या स्वप्नरंजनात रममाण राहू द्या. आणि आपण चांगली कामे मांडायचे काम करूया.

बेफि,
घेट्टो हा शब्द विशिष्ट समाजाच्या (बहुदा बहिष्कृत) घट्ट वस्तीला उद्देशून वापरला जातो. अमेरिकेत काळ्या लोकांचे 'घेट्टो' असतात. युरोप, रशियात पूर्वी ज्यू लोकांना असे रहाण्यास भाग पाडले जात असे. आपल्या देशात गावकुसाबाहेरच्या वस्त्यांचा इतिहास आहे.
तर,
एकाद्या समाजघटकाला, त्याच्या त्वचेच्या रंगावर, जातीवर वा धर्मावर आधारित मानसिकतेने, एका विशिष्ट भागात रहायला भाग पाडणे, या प्रक्रियेस उद्देशून घेट्टो-आयझेशन हा शब्द वापरला गेला आहे. (जसे, सोडियम क्लोराईडचे पाण्यात टाकल्याने "आयोन-आयझेशन" होते, -आयझेशन या प्रत्ययाच्या वापराचे उदाहरण म्हणून हा दाखला दिला असे.)
गुजरात नामक राज्यात, एक भडक डोक्याचे हिंदुत्ववादी प्रविण तोगडिया म्हणून असतात. हे भाजपाचे वा संघाचे अधिकृत सदस्य नव्हेत असा रेशमी प्रचार, अथवा 'स्टँड' आहेच. पण, या महोदयांनी धर्माच्या आधारावर, या देशात कोणत्या माणसांनी कुठे घर घ्यावे, यावर खासगी नियंत्रण आणायचे ठरवले आहे असे दिसते. उदा. जर एकाद्या बोहर्‍याने अमुक मोहोल्ल्यात घर घेतले तर हे लोक त्याच्या घरासमोर जाऊन निदर्शने करणार व त्याला घर खाली करण्यास भाग पाडणार.
अर्थात, मुसलमानांनी अमुक वस्तीत, लिमिटमधे रहावे. जास्त फडफड करू नये हा संदेश.
मुंबईतच अनेक सोसायट्यांत फ्ल्याट घ्यावयाचा असेल तर नॉनव्हेज खाणार्‍या घाटी लोकाले अलाऊड नसते, असे काहीतरी होते कधीकाळी असे ऐकून आहे.

तात्पर्य,
आपण कोणता मुद्दा खोडतो आहोत, यापेक्षा, काय मुद्द्याबद्दल बोलतो आहोत, याचा विचार, आपली सुशिक्षित बुद्धी वापरून करावा, ही विनंती.
मुंबईत पॉश वस्तीत रहायची मराठी घाटींची लायकी नाही, असे सिद्ध करणे, यालादेखिल 'घेट्टोआयझेशन'च म्हणतात.

आता माझे अमेरिकनव भारतीय मित्र मैत्रिणी 'स्ट्रॉमॅन' आर्ग्युमेंट इत्यादी बोलत इथे येतील, त्यांचे स्वागत, व अभिनंदन.

बाकी, अर्थ समझला नसल्यास अधिक डिट्टेलवार सम़अवून सांगायची जबाबदारी माझी Happy

विचारवंत | 1 June, 2014 - 12:56 नवीन
सो लोक्स, यापुढे इग्नोर मारत चला.
<<
लोक तुम्हाला फारा वर्षांपासून इग्नोर मारित आहेत, काळजी नसावी. जोशी, जास्त उडू नका, अन् हो, मला मेल करत जाऊ नका. नवी मेल आलिये तुमची.
व्यक्तिगत वॉर्निंग देतो. : केंद्र सरकारात मोदी आले असले, तरी सायबर क्राईम सेलमधील माझ्या लोकल ओळखी जास्त आहेत Wink

Rofl

नातेवाइकांना दूरच ठेवा: मोदी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

'पर्सनल असिस्टंट' किंवा 'पर्सनल स्टाफ' नेमताना मंत्र्यांनी त्यांच्या नातेवाइकांची किंवा जवळच्या व्यक्तींची वर्णी लावू नये, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी हा आदेश बजावून 'गुजरात मॉडेल' राबविण्यास प्रारंभ केला आहे. स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याची चर्चा आहे.

स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याची चर्चा आहे.

>>> ही चर्चा कोण आणि कुठे करीत आहे बरे?

मराठी वाचता येत असल्यास वरील लिंकवर क्लिक करावे. यापुढे इयत्ता तिसरी ड सारख्या प्रश्नांना उत्तरे देण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी. कृपया. धन्यवाद.

Proud

३ री ड

Rofl Rofl

:G:-G:खोखो: :G:-G:खोखो:

बंदूक हातात घेऊन मतदानाच्या दिवशी गावच्या गाव 'बसवणे' ही कन्सेप्ट ठाऊक आहे का तुम्हाला?

ही तर तिच कन्सेप्ट ज्या मुळे आता पर्यंत काँग्रेस विजयी होत होती ??

आता ते दिवस गेले, विसरा आता !!

:G:-G:खोखो: :G:-G:खोखो:

थ्री डी

Pages