Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला एक ही धडा आठवत
मला एक ही धडा आठवत नाही.......
व्यंकु ची शिकवण नावाचा एक आठवतो
उद्या...तु शाळेत तरी जात
उद्या...तु शाळेत तरी जात होतास का- हे आधी आठव!!
मला एकही धडा / कविता आठवत
मला एकही धडा / कविता आठवत नाहीये.
ओळखलतं का सर मला आणि फटका ह्या कविता आठवल्या.
बहुतेक डायरेक्ट कॉलेज ला
बहुतेक डायरेक्ट कॉलेज ला अॅडमिशन घेतलेले
असे ही त्रास देणार्या गोष्टी
असे ही त्रास देणार्या गोष्टी लवकर विसरलेल्या बर्या ....
धुणं नाव. अनिष्काने लिहिलय बघ
धुणं नाव. अनिष्काने लिहिलय बघ वरती
ही कविता आम्ही 'एक हो गये हम
ही कविता आम्ही 'एक हो गये हम और तुम..'(हम्मा हम्मा) च्या चालीवर म्हणायचो.. <<< पराग, मीही कल्पना करून पाहिली अख्खा वर्ग कोरसमध्ये ती कविता गातोय... विशेषतः तिला माहेरी बोलवा वा वा वा रे.. धमाल येत असणार
मस्त धागा आहे मला यातले
मस्त धागा आहे
मला यातले खेळखंडोबा, वळीव आणि एवरेस्टवरचा सोडुन कुठलेच धडे आठवत नाहीत.
गौतमाची कथा सांगणारा एक धडा आठवतोय. गंगाधर गाडगीळ यांचा होता का?
अजुन अंटार्टिकाचे अनुभव सांगणारा धडा आठवतोय.
लेकीसाठी मराठी बालभारतीचे पुस्तक आणायला हवे. ती गोष्टी म्हणुनतरी वाचेल
गौतमाची कथा सांगणारा एक धडा
गौतमाची कथा सांगणारा एक धडा आठवतोय <<< बुद्धाची का? तोडणे सोपे जोडणे अवघड?
बुद्धाच्या बालपणावरही एक होता (राजकुमार सिद्धार्थ)
तो आणि त्याचा सावत्र (?) भाऊ बागेत खेळत असताना त्याचा भाऊ बाणाने एका हंसाला वेधतो. हंस कळवळतो. सिद्धार्थ लगेच हंसाजवळ जाऊन त्याला उचलून घेतो, त्याला पाणी पाजतो, त्याची काळजी घेतो वगैरे. पण मग त्या दोन भावांमध्ये भांडण सुरू होते. हंसावर हक्क कोणाचा? भाऊ म्हणतो हंसाला मी मारलाय. तेंव्हा त्याच्यावर माझा हक्क आहे. तर सिद्धार्थ म्हणतो, नाही. त्याला मी वाचवलाय म्हणून तो माझा आहे. मग निवाड्यासाठी हा खटला राजदरबारापर्यंत जातो, वगैरे वगैरे.
सुकेशिनी असा पण एक धडा होता
सुकेशिनी असा पण एक धडा होता का कधीतरी ?
चार दिसांवर उभा, ओला श्रावण
चार दिसांवर उभा, ओला श्रावण हिरवा..
न्याया पाठवा भावाला, तिला माहेरी बोलवा..
ही कविता आम्ही 'एक हो गये हम और तुम..'(हम्मा हम्मा) च्या चालीवर म्हणायचो.. फिदीफिदी @पराग मस्तच! मी पण म्हणून बघीतली..खुप मजा येत असेल कोरस मधे म्हणताना!
हो. मला होता. बुद्धांना
हो. मला होता. बुद्धांना जेवण देता यावे म्हणुन आपले केस विकणारी सुकेशिनी. शेवटी बुद्ध डोक्यावर हात ठेवतात तेव्हा तिचे केस परत मिळतात तिला.
हो, सुकेशिनी मलाही होता.
हो, सुकेशिनी मलाही होता.
पेरुची फोड , कमल नमन कर, आठवा
पेरुची फोड , कमल नमन कर, आठवा ना कोणी.
देवाचा देव लंगडा कविता , व कृ निकुंबांची माहेरा ची सय अशी काहीतरी कविता होती. कविच नाव चुकल म्हणून पानभर लिहून काढायची शिक्षा मिळाली होती आता तेच लक्षात आहे फक्त.
इंदिरा संतांची बाभूळ (बहुतेक) त्यातल धुंद सुवासिक पिवळे उटणे आठवतय. (हे झाड शोधून वास खरच येतो का हे शोधायला गेल्यामुळे आठवतय )
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ही पण ती आम्ही ऐ दिल मुझे मुझे बता दे च्या चालीवर म्हणायचो . गंमत म्हणजे ही सिनेमाचालीची कवीता पूर्ण लक्षात आहे बाकीच्या कवितांची एखादी ओळ.
मी मराठी अभ्यासाचा विषय म्हणून सातवीत शेवटचा शिकले . त्यातल यवढच आठवल .
वावे,अविनाश धर्माधिकारींची
वावे,अविनाश धर्माधिकारींची 'भिरीभिरी भ्रमंती' होती.>> हे आम्हाला इतिहास शिकवायचे शाळेत. ८३ -८४ मधे
गजानन बहुतेक एकच बोट आहे
गजानन बहुतेक एकच बोट आहे आपली...
इन्ना, हो, ती बाभूळ आठवतेय -
इन्ना, हो, ती बाभूळ आठवतेय - लवलव हिरवी गार पालवी, काट्यांची वर मोहक जाळी..... (पण ती आम्हाला आठवीनंतर कधीतरी होती)... पण ती शांता शेळक्यांची होती ना? का दोन्ही वेगळ्या कविता आहेत?
शिवाय राजास जी महाली ला आम्हीही तीच चाल लावायचो
त्याशिवाय अन्योक्ती होत्या वेगवेगळ्या
इन्ना तरी तुला खूपच आठवतंय
इन्ना तरी तुला खूपच आठवतंय की.
प्रत्येकाने आपापले दहावीचे
प्रत्येकाने आपापले दहावीचे वर्ष लिहा रे
इंदिरा संतांची बाभूळ (बहुतेक)
इंदिरा संतांची बाभूळ (बहुतेक) त्यातल धुंद सुवासिक पिवळे उटणे आठवतय. <<< हो आठवली! मस्त होती ती कविता.:)
वेलांटीची इवली इवली... अशाही काही ओळी होत्या, बाभळीच्या शेंगांचं वर्णन करणार्या. आणि मी आणि बहीण त्या वेलांट्या बघायला एकदा दूरवर असलेल्या बाभळीच्या झाडाकडे गेलो होतो खरेच.
इन्ना आणि वरदा.... आपण दोघी
इन्ना आणि वरदा....
आपण दोघी "बाभळी" या कवितेबद्दल बहुतेक बोलत आहात का ? इंदिरा संतांची ही एक प्रसिद्ध कविता. बी.ए. ला असलेला माझा रूममेट (त्याचा मराठी विषय होता स्पेशलला) मोठ्या आवाजात हीच कविता म्हणत असे.
http://www.balbharati.in/book
http://www.balbharati.in/books.htm
http://www.balbharati.in/OldBooks.htm
छान किती दिसते फुलपाखरू
छान किती दिसते फुलपाखरू ,
ह्या वेलींवर फुला फुलांवर
रम्य..
ही पण आठवली.
हैला बरच आठवतय की.
सिबीएस्सी वाले आहेत का कोणी. मला इंग्लीश आणि हिंदीतले पण बरेच धडे आठवतायत.
खुब लडी मर्दानी वो तो झासी वाली रानी थी. प्रेमचंद यांच्या कथा. सरोजिनी नायडूं ची पॅलन्क्विन कविता. आणि ब्युटिफूल बिस्ट नावाची कविता.
टागोरांच्या 'लेट माय कंट्री अवेक' आणि कॅन यु नॉट हेअर हिज सायलेंट स्टेप्स. (ह्या बहुधा अवांतर अभ्यासलेल्या होत्या )
वरदा, असेल ग. आता मला पान्भर कवयत्रीच नाव लिहायची शिक्षा नको देउस
प्रत्येकाने आपापले दहावीचे
प्रत्येकाने आपापले दहावीचे वर्ष लिहा रे
(टिप : पास झालेले :हहगलो:)
अपुनने तो लिखा है
अपुनने तो लिखा है
टिप : पास झालेले >>>>>>> आणि
टिप : पास झालेले >>>>>>> आणि मार्च की ऑक्टोंबर ते ही सांगा
घाटातली वाट कविता आठवतेय का?
घाटातली वाट कविता आठवतेय का?
आणि एकदा एक कळी खूप खूप रुसली
पानांचा घुंघट ओढून बसली.
वरदा, काल मीही ह्या साईट्स
वरदा, काल मीही ह्या साईट्स धुंडाळायला गेले होते पण एकतर लिंक्स उघडत नव्हत्या आणि आमच्या आठवी-नववी-दहावीची तर दिसलीच नाहीत ( कुमारभारती वेगळे असावे.) त्यामुळे नाद सोडला.
गंगाधर गाडगीळ ह्यांचा क्रिकेट बघायला जातात तो एक धडा होता. शेवटी घरी बसून मॅच बघितलेली बरी असा त्यांना साक्षात्कार होतो
शांता शेळक्यांची 'पैठणी' कविता होती, कुसुमाग्रजांची 'कणा' आणि 'कोलंबसाचे गर्वगीत' होत्या. बालकवींची 'पारवा','जलदाली मज दिसली सायंकाळी' ही एक अत्यंत नादमय कविता होती. एक फटका होता तो कुणाचा होता ?
बर्याचदा पुस्तकातले पहिले एक- दोन धडे शिवकालीन, पेशवेकालीन भाषेत असायचे आणि ते तुलनेने छोटेही असायचे.
कवितांना कुणी 'ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है' ही चाल लावायचं नाही का ?
एक फटका होता तो कुणाचा होता
एक फटका होता तो कुणाचा होता ?
>> अनंत फंदी
'संसारामधि ऐस आपुल्या उगाच भटकत फिरू नको' हाच ना ?
कवितांना कुणी 'ए दिल मुझे बता
कवितांना कुणी 'ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है' ही चाल लावायचं नाही का ? <<<
अगो, हो तर. या चालीत आम्ही 'गे माय भू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला, हे सूर्य चंद्र तारे' ही कविता म्हणायचो.
तुम्ही कोणती म्हणत होतात?
Pages