Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41
गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तूतिमी संपणार की काय? आजच्या
तूतिमी संपणार की काय? आजच्या एपिसोड्च्या शेवटी शुभ्रा एकदम ५-६ वर्षांची झालेली दाखवली, मंजिरी पुन्हा एकदा बावळट वेषात आणि मुधोळकर शुभ्राला गाणं म्हणताना दाखवलाय. आता मालिका संपवणारेत म्हणावं की नव्या दळणाची सुरूवात म्हणावी? आता एकदाच त्यांनी शुभ्रा सत्यजितला 'बाबा, प्लीज' म्हणतेय असं दाखवावं म्हण्जे प्रेक्षक सुखाने डोळे मिटायला मोकळे! फिदीफिदी
मंजिरी पुन्हा एकदा बावळट
मंजिरी पुन्हा एकदा बावळट वेषात>>>> +११११११ काय ति साडि होति.डोळे दिपले.आधिच्या चांगल्या म्हनायला पाहिजे.ति मुलगि मोठि झाल्याचा आणि हिचा चोईस बदल्ण्याचा काय सम्बंध.आगदि नको तितकि काकु बाई.
कुठेतरि वाटत होत, आता मालिका लीप घेणार.
प्रिया बाबतच्या शक्यता : दादा नै तर तो सुहास तिचा अचानक हल्याचे शिकार होउन व्हील चेर वर असतिल आणि हि बया त्याचा सगळा कंट्रोल घेतलि असेल. कपाळाला विंचु, दोनि दंडांवर साप व पाठिला खेकडा असे चमकणारे टॅटूज. आपल्या पोरा/पोरि ला मुधोळ्कर चा विरुद्ध तयार करत असेलच.
काय वाट लावलि आहे.आपलि बायको सोडुन बाकि सगळ्यांचा बायकांशि साळधाळ वागतो.
आणि त्याच ब्रीद वाक्य 'आयुश्यान मला एकच गोष्ट शिकवलि आहे'.पण ति एकच गोष्ट मात्र प्रत्येका समोर सांगतान वेग वेगळि असते.
नवी शुभ्रा गोड आहे..
नवी शुभ्रा गोड आहे..
हो मस्त दिसते. काल अभिनय पण
हो मस्त दिसते. काल अभिनय पण केला चक्क. खरच छान वाटली. लहान मुलान्कडुन कामे करुन घेणे सोपे नसते. परवाच्या एपिसोडमध्ये मन्जिरीची गाडी धक्का लागला म्हणून सत्याच्या ड्रायव्हरने पन्क्चर केली. त्याची अॅक्टिन्ग पण भन्नाट होती. मन्जिरीकडे तो दात ओठ खाऊन बघत होता. टिप्पीकल डरायवर वाटला. सत्याची पण कमाल आहे, आधी डरायवरला म्हणाला की परत जाऊन त्या बाईची माफी माग. नन्तर बदलला.
सिरीयल मध्ये बहुतेक पुढील बदल होतील. प्रिया बाय अचानक कधी पण उगवुन मुलीचा ताबा मागतील नाहीतर सत्याला ब्लॅकमेल करतील
दादा सन्यास घेऊन ताम्बडे बाबान्कडे जाईल. नाहीतर त्याचाच फोटो लटकेल भिन्तीवर, आणी सन्ख्ये पूजा करेल.
गोपिका नवीन अॅड कर काहीतरी. प्रिया बेबचा पत्ता नाय कुठ.
हुश्श! झाल्या बाई एकदाच्या पारावरल्या गप्पा हाणुन. उम्मीद है इधर कोई आके थयथयाट नही करेगा.:फिदी:
मंजिरी सारखीच गाडी ठोकत असते
मंजिरी सारखीच गाडी ठोकत असते कोणानाकोणाला. एकदा स्वप्निल, काल सत्यजितच्या गाडीला, एकदा शुभ्रा गाडीत असताना पण धडकली होती ना एका माणसाला?
सत्यजित आणि फॅमिली फक्त आर्या
सत्यजित आणि फॅमिली फक्त आर्या आर्या करण्यात गुंग असतात.. त्या बिचार्या नेत्राच्या मुलाविषयी कोणी चकार शब्दही काढत नाही.. प्रत्येकवेळी परक्या व्यक्तींना घरात आणुन त्यांना डोक्यावर बसवायची खोडच आहे सगळ्यांना.
हो ना. नेत्राच्या मुलासंबंधी
हो ना. नेत्राच्या मुलासंबंधी काय? आणि प्रिया कुठे गेली.? तो तिचा नवरा? बर्याच दिवसांनी बघितल्यामुळे मधला बराच संदर्भ लागला नाही
प्रत्येकवेळी परक्या
प्रत्येकवेळी परक्या व्यक्तींना घरात आणुन त्यांना डोक्यावर बसवायची खोडच आहे सगळ्यांना.
>> अगदी अगदी
नेत्रा चा मुलगा आहे ना
नेत्रा चा मुलगा आहे ना 'युवराज'.साहजिकच ति नेत्रा त्या आर्या चा तिरस्कार करते पण जाणुन बुजून वाइट नहि वागत.पण मुलाने तिचा बरोबर खेळलेल नाहि आवडत तिला.
बावळ्ट मंजिति.अहो सल्वार कमीज मध्ये तरि राहायच ना. एकच नविनपणा आहे.आधि माति खायचि(म्हनजे गाढि धडकवायचि) मग डोक्याला हात, तो हात हि, तिला ९० डिग्री कोनात असा पुढे आलेला असतो, म्हणजे येता जाता त्या कोपर्याचा हि धक्का.... सारख आपला त्या जुन्या आठवणि उगाळत बसणे व मुंबइत पाउस पाडणे.आता ह्या वर्षि तर मॉनसून हि, हिला अपला गुरु करुन, कान मंत्र घेइल मगच बरसायला सुरुवात करेल.
दादा चि नव वधु आलि आहे. 'मिशेस...काय विशेष'.आम्हि तांबडे बाबा>चि पूजा करत आहोत आणि तुम्हि आत काय आराम करत होतात.....भनाट होत ते
ते माकड्तोंड्या असेल अमेरिकेत.....ओबामा तर वाटच बघत होता ना, ये बाबा, हे घे तुझि सिटिजन्शिप.अरे कधिचा वाट बघ्तोय्,सत्यजीत मुधोळ्करा>चा जेल मधुन फोन होता,आमचा सुहास चि काळजि घ्या....
मला इथे एकच जाणवत
'गाडि चालु असताना फोन वर बोलण, मंत्रालयात आपल्या हि ओळखि आहेत कि, पोलिसा>ना आपल्या तालावर नाचवलेल दाखवण (मग चिमा असो किवा दादा) - पैश्याचा आणि नावाचा जोरावर आपण कसे हि वागु शकतो हा चुकिचा संदेश लोकांपर्यंत जातो आहे. अक्सिडेंट च नाटक केल तेव्हा ' रत्नागिरि चा डॉक्टर शि बोलुन सेटिंग केइ आहे' हे एक संभाषण होत. मग याचा असा अर्थ होतो का कि भारतातला डॉक्टर वर्ग काहि हि फालतु नाटकात सहभागि होतात किवा सगळे कायदे धाब्यावर टांगले आहेत???
देशाचि घटना,कायदा,नियम हे सगळे बनवण्यात ज्या दिग्गजानि आपलि बुद्धि वापरलि,वेळ खर्च केला, अमलात आणताना त्याना कित्ति धाक्धुक झालि असेल.त्या सगळ्याचि ह्या चिमा ने अक्शरशः चिंध्या उडव्ल्या आहेत.
'गाडि चालु असताना फोन वर
'गाडि चालु असताना फोन वर बोलण, मंत्रालयात आपल्या हि ओळखि आहेत कि, पोलिसा>ना आपल्या तालावर नाचवलेल दाखवण (मग चिमा असो किवा दादा) - पैश्याचा आणि नावाचा जोरावर आपण कसे हि वागु शकतो हा चुकिचा संदेश लोकांपर्यंत जातो आहे. अक्सिडेंट च नाटक केल तेव्हा ' रत्नागिरि चा डॉक्टर शि बोलुन सेटिंग केइ आहे' हे एक संभाषण होत. मग याचा असा अर्थ होतो का कि भारतातला डॉक्टर वर्ग काहि हि फालतु नाटकात सहभागि होतात किवा सगळे कायदे धाब्यावर टांगले आहेत???
देशाचि घटना,कायदा,नियम हे सगळे बनवण्यात ज्या दिग्गजानि आपलि बुद्धि वापरलि,वेळ खर्च केला, अमलात आणताना त्याना कित्ति धाक्धुक झालि असेल.त्या सगळ्याचि ह्या चिमा ने अक्शरशः चिंध्या उडव्ल्या आहेत.>>>>>> अनुमोदन
सत्यजित ने अनघा सोबत लग्न
सत्यजित ने अनघा सोबत लग्न केले का?
नाय, तो मन्जिरीसोबत एकनिष्ठ
नाय, तो मन्जिरीसोबत एकनिष्ठ हाय अजूनही. पण कालच्या भागात बरीच गम्मतजम्मत झाली.:फिदी:
दादा सत्याला घरी बोलवुन त्याची आपल्या नवीन बायकोशी ओळख करुन देतो. नन्तर त्या दोघात बरीच बोलाचाली होते. एकमेकाला दुषणे देऊन सत्या घरी जायला निघाल्यावर हॉलच्या बाहेर दादाची बायको सत्याला अडवुन विनन्ती करते की तिला त्याने दादाच्या तावडीतुन सोडवावे. पहिल्या बायकोला तुम्हीच मदत केली होती, आता मला ही करा असे विनवते. पण या वेळी सत्या ताक फुन्कुन पिणार असतो. तो तिला नाही म्हणतो.
विहन्ग त्याला भेटल्यावर तो बाकी सारे सान्गतोच, पण एक भारी डॉयलॉग मारतो. झू बन्द असले तरी माकड माकडचाळे करायचे थाम्बवणार आहे का?:हहगलो:
मला भयन्कर हसू आले त्याच्या या डॉयलॉगने.:फिदी:
ही सिरीयल आता शेपटाप्रमाणे वाढणार आहे. बहुतेक आर्या आणी शुभ्रा या दोघीन्ची लग्ने होईस्तोपर्यन्त चालेल. चार दिवस सासुसारखी.
आर्या आणी शुभ्रा याना॑
आर्या आणी शुभ्रा याना॑ दोघी॑ना १ च मुलगा आवडणार आणी मग आपण आहे पहायला सत्याच्या भरोश्यावर....
मंजिरी "बाबा" म्हणताना शेवटी
मंजिरी "बाबा" म्हणताना शेवटी तोंडातुन विचित्र पद्धतीने हवा सोडते. नेहमीच.. कसंसच होतं
सफरचंद........मला तर मंजिरी
सफरचंद....:)....मला तर मंजिरी काहीही बोलली तरी कसंतरी होतं....:(
मंजिरीपेक्षा शुभ्राची
मंजिरीपेक्षा शुभ्राची अॅक्टिंग चांगली आहे
महिलादिनाच्या निमित्ताने,
महिलादिनाच्या निमित्ताने, बायकांचे फक्त बिनडोक , बालीश , कारस्थानी अतिरंजित चित्रण करणार्या अशा सर्व मालिकांचा निषेध !!
ही महापकाऊ मालिका मार्च
ही महापकाऊ मालिका मार्च महिनाअखेरपर्यंत संपविल्यास मायबोलीकर मायबोलीवर हत्तीवरून साखर वाटतील.
माझ्या मुलीला परिक्शेमध्ये
माझ्या मुलीला परिक्शेमध्ये प्रश्न आला होता.... १ किलो दगड आणी १ किलो कापुस ह्यात heavy कोण?
नशीब तिने सत्याजीत्चा interview बघितला होता अदल्यादिवसि. लगेच उत्तर लिहिले.
आर्या आणी शुभ्रा याना॑
आर्या आणी शुभ्रा याना॑ दोघी॑ना १ च मुलगा आवडणार आणी मग आपण आहे पहायला सत्याच्या भरोश्यावर....>>> बहुतेक विहंगचा मुलगा असेल
सत्यजीत हिरो आहे ना........मग
सत्यजीत हिरो आहे ना........मग आता त्यादोघी माझे बाबा ...हे माझे बाबा म्हणून भांडणार
सत्यजीतला काहितरी रोग होऊ घातलाय...सारखं डोकं धरून बसतोय सद्ध्या.
सत्यजीतला काहीतरी रोग होऊ
सत्यजीतला काहीतरी रोग होऊ घातलाय, सारखं डोकं धरून बसतो....>>>> ब्रेन ट्युमर झाला असणार नक्की....मग लिटरली 'तीन' दिशांनी 'तीन' बायका धावत येतील स्लो मोशनमध्ये ....म्हंजे बघा मंजिरी मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने पळत सुटेल, प्रियाही कुठूनतरी उगवेल, अनघाबाय कोल्हापुरातूनच तिथल्या तिथे पळत पळ्त येईल....अर्थात स्लो मोशनीत असल्याने तिघी एकाच वेळेला हॉस्पिटलात पोहोच्तील....आणि सत्यावरून एकमेकींच्या झिन्ज्या उपटून भांडतील....ते पाहून सत्या कोमात जाईल.... रोजची तिघींची भांडणे पाहून सत्याची आज्जीबाय तिघींचं सत्याशीच लग्नं लावून देईल....मग सगळे तो ़कोमातून बाहेर यायची वाट पाहात राहतील....आणि तू.ति.मी एन्डलेस लूप मध्ये जाईल....सर्वं पोरे मोठी होतील....वर नियतीनंच लिहून ठेवल्यामुळे शुभ्रा आणि आर्या एकाच मुलाच्या म्हंजे विहंगच्या मुलाच्या प्रेमात पडतील....त्यामुळे सर्व बायकांना नव्याने भांडायला, झिन्ज्या उपटायला मिळेल....
विहन्गला मुलगी झाली तर्? आणी
विहन्गला मुलगी झाली तर्?:खोखो: आणी काय हे, आर्या आणी शुभ्रा दोघी सात वर्षाच्या आहेत. अजून विहन्गच्या मुलाचा पत्त्या नाय. आणी तरी तुम्ही त्याचे त्या दोघीन्शी लग्न लावताय? अग बायानो, मायबोली वरचा समस्त पुरुष वर्ग धावुन येईल विरोधाला.:फिदी: म्हणतील, मुलगा एवढा लहान नवरीपेक्षा?:खोखो:
चालणार नाही हो तिकडच्या स्वारीला. इश्श! काय बै तरी बोलतात एकेक जणी.:फिदी::दिवा:
विहंगचा मुलगा आहे. पाचगनी ला
विहंगचा मुलगा आहे. पाचगनी ला असतो. दादा होळकर ला घाबरुन हासटेलात ठेवलाय .
अरेच्च्या ! सिरीयल एवढी पुढे
अरेच्च्या ! सिरीयल एवढी पुढे गेली होय. मी बरेच् भाग कन्टाळा आल्याने पाहिलेच नाहीत, त्यामुळे विहन्गला मुलगा असल्याचे माहीतच नव्हते. धन्यवाद पलक.:स्मित:
मुलगा लहान नवरीपेक्षा >>>>
मुलगा लहान नवरीपेक्षा >>>> झी-मराठीत हे काही नवीन नाही हो. अहो, तुम्ही राधा ही बावरी ( यक्स....) पाहिली नाही काय, त्यात हिरो (खर्या अर्थाने झीरो, उडाणटप्पू व अपूर्ण शिक्षण झालेला) हिरवीणीपेक्षा (प्रथितयश [?!#%^*] गायनॅकॉलॉजिस्ट) ५-६ वर्षांनी लहान होता, तरी लग्नं होऊन एक पोर ही झालेहो त्यांस, आहात कुठे ?
आणि तसं पहायला गेलं तर सचिन तेंडुलकरही त्याच्या बायकोपेक्षा ५-६ वर्षांनी लहान आहे.
मला वाटते माबोकारांनी हत्ती
मला वाटते माबोकारांनी हत्ती वरून पेढे वाटायला हरकत नाही.
सिरिअल संपली एकदाची !
पण शेवट काय झाला ?!
विहंग ला मुलगा आहे ना
विहंग ला मुलगा आहे ना 'आराध्य' अस त्याच नाव आहे...
ति अनघा तर कधि कधि डोक्यात जाते.बावलत
आता ह्याला कसलासा विरळ पद्दतिचा आजार असणार....मग सगळ्याना ते खुप उशीरा समजणार.मग इत्के वर्ष सडत पडलेल अनघाच वैद्द्य शास्त्र खाडकन जाग होणार आणि मग आजवर कुणि हि वाचु न शक्लेल्या ह्या आजारातु अनघा त्याला खेचुन आणुन आख्या जगाला अचम्बित करणार.....
बाकि, मुल भारि काम करतात.
त्या म>जिरिचि मात्र भारि काकु बाइ झालि आहे.अस आज कल कुणिच राहत नाहि, मंजिरि नाहि पण म्रुणाल दुसानिस ला तरि अक्कल असायला नको का....काय तिच ते ध्यान.तिचि काकु जास्त छान आनि तरणि दिसते
संपली का हि सिरियल??? अजुन
संपली का हि सिरियल??? अजुन दिसतात की वेल्हाळ वेल्हाळ सत्यजीत बाबा आणि ज्यु अकु मंजीरीआई. (अकु अलका कुबल)
आता ह्याला कसलासा विरळ
आता ह्याला कसलासा विरळ पद्दतिचा आजार असणार....मग सगळ्याना ते खुप उशीरा समजणार.मग इत्के वर्ष सडत पडलेल अनघाच वैद्द्य शास्त्र खाडकन जाग होणार आणि मग आजवर कुणि हि वाचु न शक्लेल्या ह्या आजारातु अनघा त्याला खेचुन आणुन आख्या जगाला अचम्बित करणार..>>>>> त्या उपचारा दरम्यान तिला आणि सत्याला एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव होणार.. सत्या बरा झाल्यावर दोघे लग्न करायच ठरवणार अगदी साग्रसंगीत(विथ मेहंदी, हल्दी, सप्तपदी अॅण्ड ऑल) आणि साडेसहाव्या फेर्याला मंजिरी शुभ्राला घेउन तिथे "थांबा" म्हणुन हजर... मंजिरी अहो पण च्या पुढे काही बोलणार नाही शेवटी वैतागुन शुभ्रा म्हणणार कसही असल तरी ते आदर्श वडील आहेत(दुसर्या लग्नासाठी ७ वर्ष थांबले ना म्हणुन) अस म्हणुन तिथुन निघुन जाणार आणि मंजिरी तिच्यामागे शुभ्रा शुभ्रा थांब शुभ्रा करत पळत जाणार..
Pages