राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारण 'सीमाने घरासाठी-कुटुंबासाठी कित्ती केलंय'.... (असे आधि सगळेजण बोलत होते)

मार्कंड कोण? नटाचे नाव?

स्वप्ना..तुझी कवीता म्हणजे १०० एपिसोडान्चे सार आहे गं. मस्त.

त्या मार्कंड्चं जर बाहेर प्रकरण आहे तर ही सीमावहिनी इतकी का तोर्‍यात राहतेय? की त्याचं प्रकरण कोणालाच माहित नाही?<< त्याचं प्रकरण कोणालाच माहित नसत. २/३ एपीसोड आधीच त्याने घारुआण्णांना सांगीतल

<त्या मार्कंड्चं जर बाहेर प्रकरण आहे तर ही सीमावहिनी इतकी का तोर्‍यात राहतेय<>

नवर्‍याचं बाहेर प्रकरण आहे तर बायकोने तोर्‍यात का राहू नये ते कळले नाही. नवर्‍याने प्रकरण केले यात बायकोचाच दोष असतो असं म्हणायचंय का?

केदार दाखवतात तेव्हा ते काय बॅकग्राऊंड संगीत वाजते.....'कटकट..........कटकट'.....कि मला काहितरी चूकिचे ऐकू येते. >>>>>>>>>> बॅकग्राऊंड संगीतच आहे ते....मलाही खूप ऊशिरा कळाले ते.......

तिला राधाच्या 'अटी'बद्दल माहित नाही....ते कळले तर तिचा आत्मविश्वास बराच वाढेल.

>> कसली अट? बरेच दिवस मिसलंय..

कसली अट? बरेच दिवस मिसलंय..>>>>> अग, राधाने घातली होती अट सौरभला.....लग्नानंतरही तो सेटल होईपर्यंत दूर राहणार ते दोघे.....आधी आम्ही केली होती चर्चा..पण वाहता बाफ असल्याने बहुदा ते पुसले गेले असावे....

कालच्या एपिसोडमध्ये सौरभला राधाकडे पहाताना बघून कोळणीच्या टोपलीकडे बघणारा बोका आठवला. अगदी 'रुप तेरा मस्ताना' च्या बॉर्डरवर आले होते दोघे. बाहेर हिन्दी सिनेमाच्या परंपरेला जागून पाउस आहेच. कसली अट आणि कसलं काय? सर आली धावून, घरटं गेलं वाहून तशी अट वाहून जाणार.

घरात कंदिल ठेवलेला बघून हसू आलं. मी तरी शहरात कोणाच्याही घरात आत्तापर्यंत कंदिल पाहिलेला नाही बुवा.

नवर्‍याचं बाहेर प्रकरण आहे तर बायकोने तोर्‍यात का राहू नये ते कळले नाही. नवर्‍याने प्रकरण केले यात बायकोचाच दोष असतो असं म्हणायचंय का?
>>>

मला वाटलचं होतं कोणी तरी असे म्हणणार. मला असे काही म्हणायचे नाही आहे. उगाच वेगळा अर्थ काढू नका. Happy
मला असे म्हणायचे आहे की हिला हिचे प्रॉब्लेम्स नाही का सोल्व करायचे, दुसर्‍यांवर, त्यांची आयुष्य मार्गी लागावी म्हणून एवढी हुकुमत गाजवत बसलीये!

रंजूच्या मुलीचे बारसे झाले? नाहीतर म्हटले तु ति मी मधल्या मंजिरीच्या मुलीबरोबर केले असते तर सीमावहीनी मंजिरीला भेटली असती आणि जरा तीला उपदेशाचे डोस तरी दिले असते अशी मुळूमुळू राहू नको म्हणून Happy

माधवी, त्या सीमा वहिनीचे पात्रं फार हट्टी, विक्षिप्त, विचित्र दाखवलेय. ही बया मकरंदला ती आवडलेली नसतांना केवळ तिला तो आवडलाय म्हणून त्याच्याशी लग्न करते. तो तिच्यासोबत संसार करणार नाही, हे सांगतो तरीही. त्याच्या आईला ही आवडलेली असते म्हणून हा बळजबरी तिच्याशी लग्न करतो. तिकडे साऊथ आफ्रिकेत लिव्ह-इन नात्यात राहतोय आणि सीमाला ते सांगतो, तरीही ही आपली वेडी आशा ठेवून जगतेय, की हा एक दिवस तिचा स्वीकार करेलच. Uhoh

पियु परी, तिने लग्न सेफ साईड म्हणून केलंय.. नाहीतर राधाशी लग्न करण्यासाठी बरेच वीर टपून बसलेयत ना! Proud आणि अशी अट नाही ठेवली तर आळशी सौरभ करियर वगैरे करेल का?

सौरभच्या कॉम्पुटर क्लास चा पहील्यादिवशी त्याचे तयार व्हायचे किती नाटकं दाखवलीत. लग्नं केलाय ना मग आता जरा रेस्पॉन्सीबल वागायला नको? आळशी तरी किती असावा माणसाने? फस्ट ग्रेडर ही इतका वेळ लावत नसेल.

सानी
असे आहे का! हे मला माहित नव्हते. धन्यवाद Happy
आणि मला वाटले केसरचा पार्ट संपला. पण आता तिला आणून अजून गोंधळ मग गैरसमज असा दाखवण्याचा दिग्दर्शकाचा विचार दिसतो.

सीमावहिनीला 'सीमावहिनी' न म्हणता 'सीमादादा' म्हणायला हवं इतकी दादागिरी करते. कालच्या एपिसोडमधे केदारने असली अ‍ॅक्टींग केली की टीव्हीतून आत हात घालून त्याला कानपटता आलं नाही ह्याचं अतोनात दु:ख झालं. Angry

काय ते सौरभचे नखरे. राधाने सुखाचा जीव काट्यावर घातलाय. काय ते सारखं सोन्या, राजा, पिल्लू. हा घोडा पिल्लू? ऐकावं ते नवलच.

आता मानसच्या बायकोने घटस्फोटाची नोटीस दिली आहे. थोडक्यात सौरभने राधावर संशय घ्यायला आता केदार, गौतमच्या जोडीला मानस पण आहे.

मला का कोण जाणे पण त्या सौरभचा चेहरा माकडाच्या पिल्लासारखा वाटतो.>>>>>>मलाही तो गोरिला सारखा वाटतो.....

सौरभ डोक्यात जातो. राधाच्या dialogs चा लोचा आहे. सीमावैनी आधीचं सगळं चांगलं credit संअप्वून टाकणार दिसतंय. आणि याच नाही पण एकूणच सिरियल्स मधे घरातले सगळे लोक सगळी कामं धामं सोडून घरातल्या minor issues वर रोज चर्चा करत बसतात का?
पण तो डॉ. मानस cute आहे. Blush

Pages