कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !
सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.
या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )
सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना
The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.
ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos
आसमांच्या
आसमांच्या आईला तसा ही त्या महंमद रफी चा कंटाळा आला असेल म्हणून हे कारण दाखवून तिने डिव्होर्स मागितला असेल. कस्टमच्या अगेन्स्ट असणार्या सगळ्या गोष्टी पाळता का म्हणावं? आणि आसमां दुबईतल्या सारेगमत गायली होती तेव्हा डिव्होर्स का नाही मागितला? इथे भारतात आल्यावर धर्म आणि रिच्यूअल्स आठवले का त्यांना? इतक्या छोट्या गोष्टीसाठी संसार पणाला लावणं ही निव्वळ इमॅच्युरिटी आहे.
तरी बरं हा ड्रामा शुक्रवारच्या एपिसोडमध्ये काही फार वेळ टिकला नाही. नाहीतर आख्खा एपिसोड रडारडी, मिठ्यामिठी..
एकदम आठवलं... सारेगम च्या पॅरलल इंडियन आयडॉल पण लागलं होतं ब्रेक मध्ये ते पहात होतो आम्ही, माझी मैत्रिण म्हणाली सारेगम बरोबर जी एंगेजमेंट होते तशी इंडियन आयडॉल मध्ये होत नाही... का?
कशी काय होणार? आपल्याला ड्राम्याशिवाय कोणता कार्यक्रम पहायची सवय आहे का?
आस्मा गाते
आस्मा गाते हे एक कारण पुढे केलं असेल डिवोर्स करता. आईला मिळाला असेल आस्माच्या बापापेक्षा श्रीमंत अरब. तिचा तो ड्रामा फार काळ टिकलेला दिसला नाही. बरंच झालं, नाहीतर जरा रटाळच व्हायला लागलंय सारेगमप.
सायोनारा..
सायोनारा.. सा रे ग म रटाळ होते आहे ह्या वाक्याशी मी पण सहमत..
ह्या वेळी तर दोनही दिवशी मी चक्क विसरुनच गेले. मग लावले तेव्हा वैशाली चे गाणे चालु होते. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर तिच्यासकट कोणाचेही गाणे आतुन आले असे वाटलेच नाही.. वरवरचे वाटले सर्व. स्वतःसाठी गायले तरच ते गाणे चांगले होते हा मंत्र ही लोकं विसरु लागली असावीत. तो शुजात तर वाया जायला लागलाय. सारा चे बूमरो असह्य होते.
जहीर-प्रतिभाचे ऐकले नाही म्हणुन त्यांचे माहीत नाही..
आणि हो, काल मधेच २ बायका २ कुत्र्याना घेउन बसलेल्या पाहिल्या.. ???
२००५ आणि २००७ मधले पहिले ३ जे होते त्यांच्यापेक्षा ह्या वेळेस चे कमी वाटतात.
.. वैशाली कडुनच अपेक्षा आहेत.. आणि तिच्या बाजुने मत झुकते राहाणार.
दीपांजली, मी ऐकले होते की निहिरा च्या वेळची स्वानंदा पण मराठीच होती, त्या बद्दल काही माहित आहे का? ती पण चांगली वाटली होती तेव्हा.
दुबई मधे
दुबई मधे आस्मा बुरख्या सारखा ड्रेस घालून गायची म्हणून तेंव्हा काही प्रॉब्लेम नव्हता आस्मा च्या आईला:)
हो, स्वानन्दा करमरकर मराठी च होती, छान गायची खरं तर !
त्या कुत्रं वाल्या बायका याशिताच्या घरच्या होत्या:))
आणि हा काय नॉन्सेन्स , सारा ला कुत्र्यांची भिती वाटते तर कशाला सोडली तिच्या अंगावर कुत्री, उद्या साप पण सोडतील !काहीही !
ती
ती स्वानंदा यू.के हून आलेली होती.एवढंच माहितेय मला तिच्याबद्दल.
मला गेल्या दोन्ही वेळेच्या सारेगमपमध्ये मनापासून फक्त झहिरचं गाणं आवडलं. तो दिवसेंदिवस इंप्रुव्ह होत चाललाय आणि शुजात तितकाच वाईट. काय वाट्टेल ते गायला लागलाय.
शंकरबरोबरचं वैशालीचं गाणं मला 'वा वा' करण्यासारखं ग्रेट नाही वाटलं. शुक्रवारचं गाणं ही बहुतेक फार इंप्रेसिव्ह नव्हतं(कोण होतं बरं????????)
मैत्रेयी, तुझ्या मेलचा काहीही उपयोग झालेला दिसत नाहीये. दोबोचं 'अर्ज किया है' म्हणत अचकट विचकट हावभाव चालूच आहेत असं दिसतंय.
सुनिधी, ते दोन कुत्रे याशिताचे होते. आणि तिची आई घेऊन बसली होती प्रेक्षकांत. ते तिचा परफॉर्मन्स बघायला स्टुडिओत आले होते इथवर ठिक आहे पण स्टेजवर आणायची गरज? काहीही फालतूपणा चाललेला असतो.
lol माझ्या
lol माझ्या मेल ला कसलं एन्टरटेन करताय्त ते लोक! आचरट प्रकार अन चीप पब्लिसिटीला सोकावलेत ते!!
काय वाट्टेल ते आचरट प्रकार चाललेत हल्ली!!
मला पण ते त्या साराच्या अंगावर कुत्रे (गंमत म्हणून??!!) सोडले ते इतकं इरिटेटिन्ग वाटलं!! मला असं कुणी केलं असतं तर भयंकर चीड आली असती
तू तुझ्या
अरे बापरे!!
अरे बापरे!! कुत्र्यांचे प्रकरण अनाकलनीय आहे
<<<< आणि हा
<<<< आणि हा काय नॉन्सेन्स , सारा ला कुत्र्यांची भिती वाटते तर कशाला सोडली तिच्या अंगावर कुत्री, उद्या साप पण सोडतील !काहीही !
>>>>
ए पण तो शुजात हल्लीच नाही हा, सुरुवातीपासूनच बेक्कार गातो! हो की नाही मैत्रेयी?
~~D
त्याचे फक्त एकच गाणे खूप छान झाले होते (ज्याची आठवण हिमेश/प्रीतम काढत असतो. कुठले होते ते विसरलो. कोणाकडे लिंक असेल त्या गाण्याची तर द्या प्लीज. मला पुन्हा ऐकायचे आहे ते.) पण बा़की सगळी यथातथाच.
चाफ्या, हे
चाफ्या,
हे घे शुजात च ' सावन बीतो जाये'
[video:http://www.youtube.com/watch?v=Xs9GwCXuqk8]
आणि अता जरा मना पासून बद दुवा दे बरं त्याला, जाता जात नाहीये तो:)
त्या शुजात
त्या शुजात चं गाण मला कधीच एवढ खास आवडल नाही.
या वेळेस मला झहीर, वैशाली आणी यशिता , देबो यांची गाणी आवडली.
पण ती यशिता ची कुत्री, आणी देबो ची ओंगळ अंगवि़क्षेप करत केलेली शेरोशायरी जाम डोक्यात गेली
DJ थँक्स गं
DJ थँक्स गं लिंकबद्दल. हे गाणं पण मस्तच आहे पण माझ्या डोक्यात दुसरंच होतं गाणं. थांब मी शोधून पहातो मिळतंय का ते. मला वाटतं शुजात सुरुवातीला आधीच्या राऊंडसमधे छान गायचा पण आता नियमितपणे चांगलं गात नाही.
ता.क. : हेच असणार ते गाणं. खूप शोधूनही मला दुसरं गाणं सापडलं नाही.
आणि या वरच्या क्लिपमधे बघ आशा म्हणते ना की याची खाला म्हणते की मी गायले नाही कारण आमच्यात बायका असं बाहेर गात नाहीत म्हणून. आता आस्माच्या आईची भानगड खरीच वाटत्ये हे ऐकून.
आस्माच्या
आस्माच्या आई बद्दल ची भानगड नक्कीच खरी असेलच , पण ते सारेगमप नी अजुन मसाला लाउन कशाला दाखवायला सुरवात केलीय?
आधी तिच्या कडून कॉमेडी करून घ्यायची आणि मग ट्रजेडी , चांगला स्कूप मिळाला त्यांना !
पण त्या
पण त्या आसमांच्या तोंडाकडे पाहून ती जराही दु:खी आहे असं जाणवत नव्हतं. जितक्या ओढग्रस्तीने कॉमेडी करते, तितक्याच ओढग्रस्तीने ट्रॅजिडी... काही मनापासून आणि स्वतःची अक्कल लढवून करत नाही.
अगदी
अगदी बरोबर! सगळा ड्रामा वाटतो!
आज सा रे ग म
आज सा रे ग म प मध्ये आसमाबद्दल जे काही घडलं, ते खरच होतं का? की दिलेल्या स्क्रिप्ट्प्रमाणे......
पण खरच, जे काहि बोललं गेलं ते मनाला पटण्यासारखच होतं, पण सा रे ग म मध्ये हा सगळा ड्रामा नको वटतो.
मला पण
मला पण शुजत सोडून इतर लोक जे आस्मा बद्दल बोलले ते अगदी बरोब्बर वाटल
शुजात ऐवजी आस्मा च जायला हवी होती !!
बाकी आज वैशाली सोडून मला कोणाच गाण आणि सिलेक्शन दोन्ही नाही आवडलं !
वैशाली रॉक्स्..झक्कास गायली , या जॉनर मधेही मस्त वाटला तिचा आवाज!
आज वैशाली,
आज वैशाली, याशिता अन हो शुजात पण चांगला गायला की
पण मला आजची थीम काही समजली नाही! रॉक एन रोल मधे तू कब ये जानेगी ...? अन हवाहवाई? कस्काय म्हणे? अन मधे मधे ती ४ माकडं काय नाचून जात होती त्याची पण थीम झेपली नाही! मधेच ट्पोरी, मधेच टॉवेल्मधलारणबीर, शर्ट काढणारा गांगुली , मधेच हिजडे .. असे काय गेटप होते ??
आस्मा चा ड्रामा अन नन्तर त्या गळामिठ्या!! सगळंच अचाट अन आचरट्!!
काहीतरी
काहीतरी ड्रामा/तमाशा चालू होता एवढं कळलं पण काय? कोणाचा/कोणावरुन काही कळलं नाही. आज बघेन रेकॉर्ड करुन.
फायनली!!!
फायनली!!! दिवाळीच्या शुभमुहूर्तावर, शुजात गेला!
DJ, आस्मा शुजातपेक्षा चांगलं गाते आजकाल. सारा बॉटम थ्री मधे? 
याशिता, प्रतिभा, वैशाली आणि सारा बेस्ट!
शौमेन बेकार गायला. सोनू निगमने त्या गाण्यात काय एनर्जी टाकली आहे आणि दमदार गायले आहे. हा अगदी मिळमिळीत गात होता आणि उच्चारांमधली ती बारिकशी बंगली झाक काही लपता लपत नाही. जहीर अतिशय सुमार गायला. तरूणही तेच. देबोचे चांगले झाले. आस्माही ठीक. शुजात नो गुड.
माझे आजचे रँकींग असे:
१. याशिता
२. प्रतिभा
३. वैशाली
४. देबोजोत
५. सारा
६. शौमेन
७. तरूण
८. आस्मा
९. जहीर
झहिर फालतू
झहिर फालतू गायला हे अगदी सहमत तुझ्याशी. त्याला बहुतेक पुढच्या वेळी बॉटम ३ मध्ये येण्याचे डोहाळे लागले असावेत.देबो,वैशालीही चांगले गायले. शुजात, तरूण सुमार. प्रतिभा सुपरहिट आणि हिस्टरीच्या मधे. याशिता आणि सारा सुपरहिट. आस्मावर नो कमेंट्स. बायदवे., पहिल्यांदाच मला तो ड्रामा आवडला म्हणण्यापेक्षाही पटला. जास्तकरुन याशिताचे 'तिच्यापेक्षा मितिका आणि नैना रहायला हव्या होत्या/किंवा डिझर्व्ह करतात 'ह्या कमेंट्स.
हिमेशचं सारखं पब्लिककडे भीक मागणं सहन होत नाही मला. उगाच नाही तो लोअर लेवलच्या लोकांचा हिरो आहे.
हो ना,
हो ना, मितिकाबद्दल मला अजूनही फार हळहळ वाटते! ही रॉक एन रोल राउंड मस्त गयली असती ती!!
सारापण बिचारी अनलकी दिसतेय, कायम बॉटम मधे असते!
चाफ्या, काय
चाफ्या,
काय रे शुजात पेक्षा आस्मा बरी गाते?? नाही रे, अता गेला बिचारा शुजात, गेलेल्या बद्दल इतकं वाईट बोलु नये:)
पुढच्यावे
पुढच्यावेळी तरुणकुमार जाणार ... !
संगीतचक्र याशिताकडेच राहणार. !!
बाकी (गाणे सोडुन बाकी ड्रामेबाजी दाखवणारी) झी टिव्ही रॉक्स् !!!
सर्वांना शुभ दीपावली !!!
हो, मलाही
हो, मलाही वाटतय कि तरुण जाईल !
ही
ही ड्रामेबाजी गेल्या वर्षीपासून जोषात सुरु झालीय. २००५ च्या चॅलेंजमध्ये एवढी नाटकं नसायची कुणाचीच, ना मेंटॉर्स ना कंटेस्टंट्स.
आस्माला इतका वेळ टिकवून ठेवण्यामागे झीचा काय उद्देश असावा ह्याचा अंदा़ज मला अजून येत नाहीये.
सारेगमच्य
सारेगमच्या बाबतीत तरी नक्की म्हणावंसं वाटतं की "गेले ते दिन गेले"
सोनू निगम करायचा तेव्हाचा दर्जा कुठे गेला?
आस्मा टॉप
आस्मा टॉप करणार पुढच्या आठवड्यात व्होटिंग मधे !!:))
सायो,
या सगळ्या ड्राम्याला २००५ ने च सुरवात झाली कि, भरपूर ड्रामा असायचा !!
स्पर्धकांच वॉक आउट, इस्माईल च वॉक आउट, हिमेश- इस्माईल भांडण, विनित- देबो वाद, देबो आणि आसाम ची व्होट्स, प्रेक्षकांचा दंग्यात सहभाग' ये आसाम कि व्हॉइस नही है, इंडिया कि व्हॉइस है', देबो ची बायको आणि तिची विनित च्या आई वडिलांशी भांडणं, निहिरा गेल्यावर इस्माईल च नाटक आणि हिमेश चा दंगा, एक मेकांच्या घराण्यातल्या स्पर्धकांना नाव्म ठेवणं, यात हिमेश न देबो ला आणि इस्माईल न विनित ला नावं ठेवणं सर्वात जास्त..ऊठ सूठ सगळ्या स्प्रधकांची चुम्मी घेणे काय.. काहीही चालायचं , इन फॅक्ट २००५ सर्वात ड्रामेबाज सिझन होता :))!!
डीजे,
डीजे, मायबोलीच्या दिवाळी अंकात तू सारेगमपाच्या ऐका तपाचा आढावा घ्यायला हवा होतास.
ह्म्म,
ह्म्म, एवढा ड्रामा होता सारेगम २००५ मध्ये? मला आठवतही नाहीये नीटसं!!!
Pages