अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीयू बापरे!! सर्वसाधारणपणे हॉस्टेल्सला वगैरे असे अनुभव खूपदा आणि बर्‍याचजणांना येतात.
अनन्या, मी एक पुस्तक वाचले होते, आता नाव आठवत नाही पण हे जगभरातील अशा व्यक्तींबद्दल होते ज्यांना जवळच्या व्यक्ती किंवा एखाद्या दुर्घटनेबद्दल स्वप्नांतून संकेत मिळत असे. फायनल डेस्टीनेशन त्याविषयावरूनच घेतला आहे. अशा कित्येक व्यक्ती आहेत ज्यांना त्या गेलेल्या व्यक्तींचे आत्मे एक दोन दिवसांच्या फरकाने भास्/स्वप्नाच्या रूपात भेटावयास गेले आहेत. वर असे काही अनुभव लिहीलेत. तुमच्याकडे तो "सेन्स" आहे... त्यामुळे तुम्हाला त्या घटनांचा स्वप्नांतून संकेत मिळतो. मेडिकल सायन्स याला मानत नसले तरी मेडिकल सायन्सला अज्ञात अशा कित्येक गोष्टी घडतच असतात.
पण जवळच्या व्यक्तीबद्दल असा संकेत मिळणं किती क्लेशकारक असू शकतं याची कल्पना करू शकते.

स्वप्नांच्या बाबतीत हा माझाही किस्सा. माझा मुलगा पंधराच दिवसाचा होता आणि माझे सक्खे काका वारले. अर्थात मी जाऊ शकले नाही. पण घरातले बाकीचे सगळे गेलेच होते .
दोन तीन दिवस झाले असतील . आणि रात्री माझ्या स्वप्नात काका आले . कसे तर रीतसर बेल वाजवून. स्वप्नातल्या घरात मी एकटीचे होते. माझ्या माहेरच घर होत ते. आले आणि घाईघाईत सोफ्यावर बसले आणि लगेच घाईघाईत बोलले पण . "मला माहित आहे छोटू तुझा पंधरा दिवसाचा आहे म्हणून तू येऊ शकली नाहीस. बाकीचे सगळे येउन गेले .तूच एकटी आली नाहीस. म्हणून मीच तुला भेटायला आलोय " . स्वप्नात मला भीती वगैरे अजिबात वाटली नव्हती. आणि लगेच ते जायला पण निघाले.मी त्यांना म्हटले काका थांबा पटकन चहा टाकते. त्यांनी नाही /नको म्हणून खूप घाई घाई केली . मला जायलाच पाहिजे म्हणाले. आणि ज्या झपाट्याने ते आले त्याच झपाट्याने ते परतही गेले. रीतसर दरवाजातून. खर तर स्वप्नात काहीही घडत. पण हे माझ स्वप्न अगदी सुसंगत होत. जस वास्तव जीवनात घडेल तसच Happy

इथले हॉस्टेलमधले किस्से वाचून मलाही मैत्रिणीच्या बरोबर घडलेला एक प्रसंग आठवला, जो अमानवीय नसेल पण अतर्क्य नक्कीच वाटतो आम्हाला. काही वर्षांपूर्वी आम्ही दोघी पुण्यात एक फ्लॅट भाड्याने घेऊन रहात होतो. मी गावी गेल्यामुळे ती चार्-पाच दिवसांपासून त्या फ्लॅटमध्ये एकटीच रहात होती .
तिला पुर्वीपासूनच मनगटी घडयाळ झोपतानाहि घालायची सवय होती.चौथ्या किंवा शेवटच्या रात्री साधारण दिड्-दोन वाजता तिला असे स्वप्न पडले कि त्यावेळी तिला कोणीतरी उठवले आणि मग तिचा डावा हात पकडून बेडवरून खेचून घेतले आणि ओढत दरवाजाकडे नेऊ लागले. तिने सुटण्यासाठी तिच्या पकडलेल्या हाताला जोराचा हिसका दिला आणि हात सोडवून घेतला. त्यावेळी ते जे होतं ते गायब झालं पण हिसक्याने तिच्या हातातले घडयाळ लांब जाऊन पडले.
मग ती दचकून जागी झाली पण लगेच परत तिला झोप लागली.
सकाळी उठून ती ऑफिससाठी आवरयला लागली पण रात्रीचे हे स्वप्न / भास ती पूर्णपणे विसरली होती, कामाला येणार्‍या बाईहि घर आवरत होत्या. एकदम तिच्या लक्षात आले कि तिचे घडयाळ तिच्या हातात नव्हते शिवाय कुठेहि ठेवलेलेहि दिसत नव्हते. तिच्याबरोबर त्या बाईंनीहि शोधाशोध केली पण कुठेच मिळाले नाही. त्या दोघींनाहि खूप आश्चर्य वाटत होते कि घडयाळ असे कसे गायब झाले आणि कुठेच का सापडत नाही. ऑफिसला जाण्याची वेळ झाल्यामुळे मैत्रिण घडयाळ न घेताच ऑफिसला गेली. ते कुठे गेले असावे हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. संध्याकाळी ती जेव्हा परत फ्लॅट्वर आली तेव्हा तिला एक्दम रात्रीच्या त्या स्वप्नाची आणि त्यात हाताला बसलेल्या झटक्यामुळे घडयाळ पडल्याची आठवण झाली. ते घडयाळ स्वप्नात त्या खोलीतल्या लांबच्या लाकडी कपाटाजवळ पडल्याचे तिला आठवले.
तेव्हा तिच्या मनात सहज आले कि आपण कपाटाखाली बघावे, तिने वाकून त्या कपाटाखाली बघितले तर घडयाळ खरच तिथे होते. मी परत आल्यावर तिने मला हे सगळे सविस्तर सांगितले. आम्हाला दोघींनाही खूप आश्चर्य वाटत होते कि घडयाळ त्या कपाटाखाली कसे गेले असेल कारण तिने पाहिलेले तर स्वप्न होते.

स्वप्नावरुन आठवले.

जाण्याआधी माझे वडील बरेच महिने आजारी होते. त्यांना हार्टट्रबल होता. गावी जायची त्यांची तीव्र इच्छा होती पण त्याचवेळी 'मला तिथे काही झाले तर डॉक्टर मिळणार नाही' ह्या भितीने त्यांनी जायचे टाळले. पहाटे ४.३५ ला हॉस्पिटलातच ते गेले. तिकडे गावी माझ्या मावशीला जी माझी काकी पण आहे, तिला पहाटेच स्वप्न पडले की माझे वडील शुभ्र कपडे घालुन घरात येताहेत. तिला दचकुन जाग आली. गावच्या घरी तेव्हा फोन नव्हता. दहा घरे सोडुन माझ्या मामाचे घर होते तिथे फोन होता. ती सहा वाजेपर्यंत तशीच थांबुन राहिली आणि सहा वाजता मामाच्या घरी जाऊन मुंबईला फोन लावायला लावला. तोवर मी आईला घेऊन घरी आलेले, हॉस्पिटलाचे सोपस्कार आटपुन वडलांना आणायला वेळ होता. मी गावी फोन करायच्या आधीच तिथुन फोन आला मावशीचा भावजी कसे आहेत विचारायला
Sad Sad

साधना माझा स्वतःचा अनुभव अगदी बराचसा असाच आहे. २००९ मध्ये मी अमेरिकेत होतो आणि इकडे भारतात माझी लाडकी आज्जी (माई) वृद्धापकाळाने खूप आजारी होती. माझी बायको त्यावेळी ७-८ महिन्यांची प्रेग्नंट होती त्यामुळे मला हि भारतात जाता आल नाही. ३ फेब २००९ च्या रात्री मला स्वप्न पडल कि माझ्या पुण्याच्या घरी वाईट घडलय...आज्जी गेलीय आणि आईने मला phone केलाय. मी घाबरून जागा झालो, उठून बसलो २ वाजले होते आणि दुसर्या सेकंदाला माझा cellphone वाजला. आईने रडत रडत आज्जी गेल्याच सांगितलं. मला काही सुचेना मी फक्त हमसून हमसून रडत राहिलो. ह्याला माझा six sense म्हणायचं का माझ्या आजीला शेवटच्या क्षणि माझी आठवण झाली असेल अस म्हणायचं !
जाता जाता सान्गावस वाटत कि 'माई' म्हणजे माझ्या लाडक्या आजीची आठवण म्हणून माझ्या मुलीच नाव आणि spelling आम्ही दोघांनी 'Mai'(माई) या शब्दावरून ठेवलंय.

आशु, तुम्ही वर सांगितलेली फडतरे ची गोष्ट अफलातून आहे. हि घटना ९५-९६ ला घडली का ? कारण मला पेपरमध्ये वाचलेलं आठवत आहे कि बालपणीच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी एका ग्रुपने हरिश्चंद्रगडावर त्यांच्या शाळेतल्या मित्रांचा स्नेहमेळावा भरवला होता. त्यावेळी एक मित्र कुंडात बुडाला म्हणून दुसर्याने त्याला वाचवण्यासाठी आत उडी मारली होती. दुर्दैवाने दोघेही बुडून गेले आणि दुसर्या दिवशी एकमेकांना घट्ट धरलेल्या अवस्थेत त्यांच्या bodies मिळाल्या होत्या. आजही हि घटना आठवली कि अंगावर काटा येतो

साधारण २००७ ची घटना असेल .....

त्यावेळी मी बारामती मधून कामानिमित्त शिरूर ला गेलो होतो... सोबत ऑफिसमधले ४-५ जन होते .... रात्री उशिरा जेवण केल्यवर (बरोबर १२ वाजता ) मी जेव्हा गाडीत बसायला लागलो ...तेव्हा फक्त १ सेकंद असा विचार आला कि ...आता या गाडीला अपघात होणार आहे...... पण तरीही कुणाला काही न बोलता (चेष्टा होईल म्हणून) गाडीत बसलो .... प्रवास सुरु झाला.... हळूहळू सगळे झोपी गेले.... मी पण... साधारण बऱ्हाणपूर जवळ (बारामती जवळ) असताना अचानक Drivar ला डुलकी लागली आणि गाडी रस्त्यावरून खाली उतरली ...तशीच जाऊन ती एका गोठ्याला जाऊन थडकली ..... त्या गोठ्याचा पुढच्या बाजूला ४-५ लोक झोपलेले होते ....नशीब कि कुणाला जास्त लागले नाही ... आणि आम्ही वाचलो....

अजून एक प्रसंग ....मी पुण्याला असतानाचा .....

मला पहाटे एक स्वप्न पडले कि मी ज्या रोड वरून ऑफिसला जातो त्या रोडवर फुटलेल्या काचा पडल्या आहेत.. आणि थोड पुढे गेल्यवर एक PMT दिसली ,....त्याची तोडफोड झालेली होती आणि काचा फुटल्या होत्या..... या स्वप्नातून जाग आली ... आणि मी नेहमीप्रमाणे ऑफिसला निघालो ...स्वप्नाच डोक्यात काही नव्हत... पण नेमक्या त्याच जागी काचा दिसल्या ...मला वाटल हा योगायोग असेल... पण थोड पुढे गेल्यवर एक PMT दिसली ,....त्याची तोडफोड झालेली होती... आता मात्र डोक बधिर झाल.. तिथे एके ठिकाणी चौकशी केली तेव्हा कळल कि PMT ने एका शाळेतल्या मुलाला चिरडल्यामुळे लोकांनी त्याची तोडफोड केलीय .....

याला सिस्थ सेन्स म्हणायचं की अजून काय ते बघा .....

रणथंबोर तुमचा पहिला अनुभव कदाचित भीती मुळे असावा. प्रवासात भीती वाटण साहजिक आहे. दुसरा अनुभव मात्र पटला. वर मी लिहिलेल्या माझ्या अनुभावासार्खाच आहे. असे अनुभव येतात ह्याच कारण मी कुठेतरी वाचाल होत कि अंतर्मन किंवा सुक्ष्म body हि कार्यरत असतेच फक्त आपल्याला read करता येत नाही. कधी अगदी शेवटच्या क्षणि जाणवत तर बराच वेळा समजत देखील नाही

अमित M. ..
>>असे अनुभव येतात ह्याच कारण मी कुठेतरी वाचाल होत कि अंतर्मन किंवा सुक्ष्म body हि कार्यरत असतेच फक्त आपल्याला read करता येत नाही. कधी अगदी शेवटच्या क्षणि जाणवत तर बराच वेळा समजत देखील नाही>>

पण पुढे होणारी घटना आधीच कशी कळते.... तेहि आपला त्याचाशी काही संबध नसताना....

काही वर्षापूर्वी मला अस वाटत होत कि एक अशी हिंदी फिल्म येणार आहे ज्याच पोस्टर जुन्या style ने असेल...म्हणजे साधारण १९७०-८० च्या अमिताभ च्या फिल्म्स सारख ....

आणि मग मी त्या फिल्म च पोस्टर बघितलं,,,.... तुम्ही पण बघितलं असेल..... रावडी राठोड ....

कधी कधी नाही डोक चालत बुवा :O

खर आहे बर्याच गोष्टी अतर्क्य आहेत. पूर्वी सकाळमध्ये 'अज्ञाताच विज्ञान' नावाने एक अफलातून सदर असायचं. त्यात third power , sixth sense वर बरेच लेख असायचे. तुम्ही रावडी राठोड च्या पोस्टर बद्दल बॉलल्त आणि मला अजून एक प्रसंग आठवला. माझा स्वानंद नावाचा एक मित्र आहे. अगदी नास्तिक नाही पण फार देव देव न करणारा. हि गोष्ट २००६ मधली आहे. माझा खूप विश्वास आहे म्हून मी त्याला दर सोमवारी ओमकारेश्वर मंदिरात जायचा आग्रह करायचो. पण तो कधी आला नाही कारण त्याचा फार विश्वास नव्हता. मित्राची आई cancer ने आजारी होती. पुढे ती सिरिअस झाली. अशाच एका रात्री माझा मित्र आपल्या आईच्या सेवेला होता. सगळ्यांनाच जागरण झाल होत पण आईला आराम मिळावा म्हणून माझा मित्र आईच डोक मांडीवर घेऊन बसला होता. थोडा वेळाने ग्लानी आल्यासारख झाल आणि मित्राला घरातच समोरच्या कोपर्यात शंकराची उभी मूर्ती दिसली. हातात त्रिशूळ, कमरेला व्याघ्रचर्म आणि अंगाला भस्म. मित्राने आईला जाग करून त्या दिशेला नमस्कार करायला सांगितल.
नंतर काही दिवसांनी शेवटी मित्र आयुष्यात पहिल्यांदाच ओमकारेश्वर मंदिरात गेला आणि प्रदक्षिणा मारताना त्याची नजर तिथल्या शंकराच्या फोटो कडे गेली आणि तो थक्क होऊन पाहू लागला. बराच वेळ तो त्या चित्राकडे बघत बसला. कारण आई आजारी असताना त्यज्यचज्याचा भास झाला होता तेच चित्र त्याच्यासमोर होत.

तुझे अनुभव भयानक आहेत गं, जरी तुला त्यात फारसे काही वाटले नाही तरी.

आपल्याबरोबर कोणीतरी घरात राहतंय आणि तो कधीही आपल्याला पाहु शकतो, विशेषतः बेडरुममध्येही ही कल्पना अतिशय भयंकर आहे. घरात प्रायवसीच नाही गं. कपडे बदलायचे म्हटले तरी टेंशन. कुठल्या कोप-यात बसुन बघतोय बाबा देव जाणे Happy

मी नाही राहु शकणार अशा घरात. आज त्याचा काही त्रास नाहीय पण उद्या त्याचे मन बदलले तर?

मी नाही राहु शकणार अशा घरात. आज त्याचा काही त्रास नाहीय पण उद्या त्याचे मन बदलले तर?
>>
मला हॅण्टेड सिनेमा आठवला Uhoh

ड्रिमे, तू हे सगळं वाचू नकोस गं! उगाच तुझ्या मनात भिती बसायची Happy
तूला जोपर्यंत हरकत नाहीये तोपर्यंत आत्ता आहेस तशीच रहा Happy

एवढ्या पागेस मधून इथल्या आपल्या आधी टाकलेल्या कॉम्मेंत कश्या शोधायच्या ? कारण काही किस्से आठवत आहेत पण ते आधी टाकलेत कि नाही ते आठवत नाहीये

साधना, मी विचार नाही करत फार याचा Happy तसंही आपल्या अवतीभवती जिवंत भोचक भूतं का कमी असतात जी संबंध आणि गरज नसताना प्रत्येक खासगी गोष्टीत नाकं खुपसतात? त्यांना टाळायला जमतंय तर ही तर अज्ञात, अदृष्य शक्ती किंवा भास म्हणूया हवं तर आहे जिने आजपर्यंत काहीच वाईट नाही केलं. (या मार्चला अडीच वर्षं झाली! Happy ) तसंही जगा आणि जगू द्या तत्वावर जगते मी... त्रास झाला तर सोडण्याचा पर्याय आहेच की... पण मागे मानसी ने लिहील्याप्रमाणे सोडता येत नसेल घर तर मात्र विचार करावा लागेल Happy

रिये, Happy अगं हाँटेड वेगळा होता गं बायो Happy त्यातल्या जिवंत दुष्ट प्रवृत्तीची मेल्यानंतर आपल्या त्या प्रवृत्तीने वासना आणि सत्ता गाजवण्याची धडपड दाखवली आहे Happy

शक्यता नाकारता येत नाही, पण ते चित्रपटातंच ठीक आहे!! Happy

आणि मी जिवंत वळवळणारी मोठ्ठी पाल मारू शकते तर न दिसणार्‍या भूताला कशी घाबरेन बरं??? Proud

भोचक रिया Wink भारी लक्ष बै तुझ Proud

मञी, तू टाक नं तुझे किस्से कशाला आठवत बसतेस? आम्ही परत वाचू.

वरती सुजाने सांगितलेला अनुभव मला माझ्या मुलाच्या जन्माच्यावेळी पण आला आहे Sad

>>कारण काही किस्से आठवत आहेत पण ते आधी टाकलेत कि नाही ते आठवत नाहीये

परत टाका की. तुम्हाला परत टाईप करण्यात काही प्रॉब्लेम नसेल तर आम्ही आहोतच वाचायला. Happy

वरती सुजाने सांगितलेला अनुभव मला माझ्या मुलाच्या जन्माच्यावेळी पण आला आहे >> सर्वसाधारणपणे सर्वच लहान मुले अशी छताकडे बघून खिदळत असतात. याचे शास्त्रीय कारण तर ठाऊक नाहीये पण एका आजींनी सांगितलेलं त्या बाळाचे पूर्वज त्याला आशीर्वाद द्यायला येतात ते खेळवतात बाळाला.

माझे आजोबा गेले तेव्हाचा किस्सा बाबा सांगतात.
माझे आजोबा बार्शीच्या शाळेचे मुख्याध्यापक होते. जी़जीसर म्हणजे अगदी लोकप्रिय व आदरणिय व्यक्तीमत्व होते. आजोबांना कॅन्सर झाला होता व मुंबईत हॉस्पिटलमध्ये होते. ज्या सुमारास त्यांचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले तेव्हा बाबांनी बार्शीला आत्याला फोन करून सांगितले तर तेव्हा कळले की त्याच सुमारास तिकडे बार्शीमध्ये शाळेत सगळ्यांना भास झाला होता जीजीसर वर्गात आले म्हणून.

आमच्या परिचयात दोन वेगळ्या परीवातल्या वेगळ्या माणसांना वेगळ्या काळात आलेला सारखाच अनुभव … ह्याला काय म्हणता येईल कुणाला सांगता येतं का बघा

१२ एक वर्षा आधीची घटना असेल दादाचा मित्र त्याचे वडील गावात राहणारे फारसे शिक्षित वगैरे नव्हते साधासा माणूस अचानक आजारी पडले म्हणून त्यांना एका हॉस्पिटल मध्ये भर्ती केले. तब्बेत फार सिरिअस झाली कोमा मध्ये जाऊन परत आले पण परत आल्यापासून ते फार विचित्र वागायला लागले होते….ट्विंकल ट्विंकल सारखी आणि अनेक इंग्रजी कविता-गाणी गाऊ लागले, ABCD किंवा maths table जोरात म्हणू लागले. हि व्यक्ती गावात राहणारी आयुष्यात ABCD सुद्धा कधी न ऐकलेले असे सराईत पणे इंग्रजी कविता, कहाण्या म्हणत होते…्‌ए पाहून सगळेच नातेवाईक आणि हॉस्पिटल स्टाफ अवाक होते. पण हे सर्व अतिशय आश्चर्य कारक घडत होतं …नंतर कळलं होतं कि काका कोम मध्ये होते त्याच काळात एका स्कूल बस चा अपघात झाला होता आणि त्यातल्या सगळ्याच लहान मुलांना (म्हणजे जखमी आणि मृत) त्याच हॉस्पिटल मध्ये आणले होते…… त्यानंतर काही दिवसांनी काका बरे झाले आणि पुढे दहा वर्ष जगले.

दुसऱ्या घटनेत आत्ता दोन वर्षाआधी एका कझिन च्या लग्नात तिच्या मैत्रिणीशी भेट झाली ती फार उदास होती. लग्न बाहेर गावी होते आणि तिला लवकर जायचंय असं ती सांगत होती कारण विचारल्यावर तिने सांगितले कि तिची आई आजारी आणि दवाखान्यात भर्ती आहे आणि तिची काहीतरी विचित्र अशी अवस्था आहे. विचित्र म्हणजे काय ? या माझ्या प्रश्नावर तिचे उत्तर असे होते ….
तिच्या आईच्या डोक्यात ताप गेल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत हॉस्पिटल ला आणण्यात आले…. आणि शुद्धीवर आल्या पासून त्या कुठल्याश्या मराठी कविता अगदी सुरात गात आहेत. कवितेशी आमच्या आईचा काडीचाही संबंध आजपर्यंत नव्हता आणि ती गाते सुद्धा हा आमच्यासाठी प्रचंड मोठा धक्काच आहे.
आई गात असलेल्या कवितांचा गुगल वरून शोध लावला असता त्या अगदी १९३० वगैरे सालातल्या जुन्या कावियीत्रींच्या कविता असल्याचे कळले….
पण इतक्या जुन्या कवितेचे एकही पुस्तक घरी नसतांना मुळात आई कधीही गात नसतांना आणि कवितेचीही आवड नसतांना आई या जुन्या काळातले कविता त्याही एक दोन नाही तर सलग कितीतरी मुखपाठ गाते आहे, हा सर्वांसाठी धक्का होता. हे सांगून ती निघून गेली …

माझ मन च लागेना हि दुसरी घटना होती सेम मी ऐकत होते…. दोन्ही गोष्टी सारख्याच पण अतर्क्य …. काही दिवसा आधी परत ती भेटली होती, आई बद्दल विचारले तेव्हा आई अगदी ठणठनीत बरी असल्याचे आणि आत्ता तिला त्या काळातले काहीही आठवत नाही असे तिने सांगितले….
.

आता मी जे दोन अनुभव सांगणार आहे ...ते तुमच्यातले किमान ९०% लोकांना असतील...

१) मला एक स्वप्न पडल ... मी माज्या मुलीसोबत बागेत खेळत आहे... काही वेळानंतर तिथे घंटा वाजवल्यचा आवाज यायला लागला .... २ मिनिट झाले तरी तो बंद नाही झाला .... वैतागून इकडे तिकडे बघितले .....तर ...........तेवढ्यात जाग आली ... आणि कळल कि स्वप्नात ज्यावेळी घंटा वाजत होती त्याचवेळी इकडे (खरा खुरा) गजर वाजत होता.... आता मला एक काळात नाही स्वप्न आणि सत्य ह्या दोन्हीतील या वेगळ्या गोष्टी लिंक कशा की होतात ....

२) आपण नेहमी प्रमाणे काम करत असताना ...किवा घरी बसलो असताना ....अचानक आपल्याला अस वाटत कि हे जे आता चाललंय हे सगळ आधीच घडून गेलाय ... अगदी तो प्रसंग चालू असताना असाच वाटत राहत... आणि काही सेकंदानंतर ती फिलिंग संपते ... ( हा अनुभव ज्यांना आलाय त्यांना जास्त नीट समजेल मला काय म्हणायचं )

हो मला आलेत हे दोन्ही अनुभव. तो गजरचा तर रोजच येतो फक्त दरवेळी वेगळीवेगळी स्वप्ने असतात.

आपण नेहमी प्रमाणे काम करत असताना ...किवा घरी बसलो असताना ....अचानक आपल्याला अस वाटत कि हे जे आता चाललंय हे सगळ आधीच घडून गेलाय ... अगदी तो प्रसंग चालू असताना असाच वाटत राहत... >>>> +१०००००

सगळ्यांचे अनुभव खूप मस्त आहेत आणि ड्रीम गर्ल तू खरच ग्रेट आहेस मला तर वाचूनच असे वाटायला लागले कि माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे आणि माझ्याकडे बघतेय Lol
रणथंबोर तुम्ही म्हणताय तसा अनुभव मी बरेच वेळा घेतलाय म्हणजे एखादी गोष्ट घडत असताना असे वाटते हे असेच मागे कधी बघितले आहे

Pages