दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना. खूपच वाईट वाटले त्या मुलासाठी.
त्याला सांगणारं, समजावणार कुणीच नसेल का?
असे कसे लोक भावनाशून्य झाले आहेत?

नसरापुरला घडलेली वाईट घटना ज्या मुलिच्या बाबतीत घडली ती माझ्या घराच्या जवळपास रहाते. तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी आणला तेव्हा नागरिकांनी ४-५ तास नवले ब्रिज (मुंबई - बेंगलोर हायवे) जॅम केला होता. आरोपिला शासन करून न्याय दिल्याशिवाय तिचे अंत्यसंस्कार करणार नाही म्हणून. पण काय झालं काय आश्वासन दिलं गेलं समजलं नाही, रात्री उशिरा सगळं पार पड्लं.

दक्षिणा,

हे लिहिण्यासाठी हा धागा नाही याची व्यवस्थित कल्पना आहे. तरीही हेही दिसत असल्याने की यावर एखादा स्वतंत्र धागा निघालेला नाही, प्रशासकांची व वाचकांची माफी मागून येथे लिहीत आहे.

■ सर्वप्रथम म्हणजे विकृतपणाची कोणतीही जात नसते. माध्यमांवर तो गुन्हेगार विशिष्ट समाजाचा आहे असे लिहून जो जातीय गदारोळ चालला आहे तीसुद्धा एक प्रकारची विकृतीच आहे.

■ भावनांची तीव्रता लक्षात घेऊनसुद्धा (हे म्हणवत नाहीये, पण एकूण गर्दी - ज्यात रुग्णवाहिकाही असू शकतात- पाहून म्हणत आहे की) हायवे रोखून धरणे चूक आहे. (यात उगीच मला असंवेदनशील ठरवण्याचा प्रयत्न होऊ शकेल)

■ मुलीच्या वडिलांनी असे म्हणणे की नेत्यांनी आरोपीला फाशी झाल्याशिवाय आमच्या उंबऱ्यात पाऊल टाकू नये हे अगदी योग्य आहे.

■ भडकलेल्या जमावावर लाठीचार्ज करणेही चूक आहे. इतक्या गोष्टी चूक आहेत त्यात हे आणखी एक!

■ आरोपीला 'फार तर फाशी' यापलीकडे काही होणार नाही किंवा कदाचित एन्काऊंटर! हे दुर्दैवी आहे (व या संदर्भात माझा एक धागा आहे).

■ महत्वाचे म्हणजे, आपण सगळे जे गळे काढत आहोत ते दोन दिवसांत हे विसरून जातील.

आपला समाज संपूर्णपणे अनियंत्रित समाज आहे आणि कायद्यांची अंमलबजावणी न होणे / कायद्याची भीतीच न वाटणे हे अतीव लोकशाहीचे लक्षण आहे.

मी हे सगळे येथे लिहिले ते तिथेही लिहू शकलो असतो, पण तू येथे लिहिलेस म्हणून येथे लिहिले.

आता मीच शहाणपणा करून मीच विनंती करत आहे की या विषयावर कृपया येथे लिहू नयेत.

चू भू द्या घ्या

Pages