Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
मुंबई सेंट्रल अहमदाबाद वंदे
मुंबई सेंट्रल अहमदाबाद वंदे भारत एसी चेअर कार तिकीट १२२० Executive chair car 2315 अंतर ५२१ किमी वेळ ६ तास
शताब्दी १४००/२१०५ व्हिस्टाडोम २२५५ अनुभूती २४०५ वेळ ६ तास २० मिनिटे
वंदे भारत दिवसाला दोन दिसताहेत
दुसरी ५:३० मिनिटे घेते १३८५ /२५०५
तेजस ६:३५ मिनिटे घेते १६७० /२३६०
(No subject)
खरातचे कॉल डेटा रेकॉर्ड्स
खरातचे कॉल डेटा रेकॉर्ड्स अंजली दामानियांना कसे मिळाले? कोणी दिले?
----
हे सगळं कोणत्या पक्षाबद्दल असेल?
— पक्षाच्या अधिकृत खात्यावर फक्त 2 लाख कसे शिल्लक राहिले?
— हेलिकॉप्टरचे बिल 18 कोटी कसं काय झालं?
— एका महिला नेत्याने हॉटेलमधील 'स्पा'चे बिल पक्षाच्या अकाउंटवर कसं काय टाकलं?
— निवडणुकीत वयक्तिक गाडीचं पेट्रोलही पक्षाच्या पैशाने कसं भरलं?
सगळा हिशोब विचारला गेलाय असं कळलं.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा शुक्रवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला
१.अंजली दामानिया या हल्लीच्या
१.अंजली दामानिया या हल्लीच्या शकुंतला देवी आहेत. त्यांना सगळ्या बित्तंबातम्या समजतात.
२. खरातचे प्रकरण वीस वर्षे चालेल असं वाटतंय.
३. कामे रेंगाळली का यासाठी एक कारण मिळाले. बिलं थकली.
राज्यातील सत्तासमीकरणे
राज्यातील सत्तासमीकरणे बदलल्यानंतर जुन्या प्रकल्पांच्या पुनरावलोकनाचे सत्र सुरू झाले असून, त्याचा मोठा फटका खुद्द एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील योजनांना बसला आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील १४ तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रकल्प रद्द करून न थांबता, या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला सुमारे ९१ कोटी रुपयांचा निधी व्याजासह सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आहे. रद्द करण्यात आलेल्या १४ प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांना शिंदे स्वतः मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली होती, तर उर्वरित ३ प्रकल्प माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. काही प्रकल्पांचे प्रस्ताव विहित नमुन्यात नसल्याचे आणि काहींचे सुधारित आराखडे दोन वर्षे उलटूनही सादर न झाल्याचे तांत्रिक कारण विभागाकडून देण्यात आले आहे.
मस्त बातमीhttps://www
मस्त बातमी
https://www.loksatta.com/nashik/nashik-ring-road-kumbh-mela-land-acquisi...
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक वळण रस्ता अर्थात रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भू संपादन प्रक्रियेतील मोजणीला शनिवारी वेगळे वळण लागले. मातोरी, मुंगसरा भागात काही शेतकऱ्यांनी विरोध केला. तेव्हा पोलिसांनी घरात शिरून महिला व पुरूषांना मारहाण केल्याची तक्रार होत आहे.
संबंधितांना त्यांच्या घरातून फरफटत बाहेर काढण्यात आले. या संदर्भातील चित्रफिती प्रसारित झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
तशीही शेती नुकसानीतच चालते. शेतकर्यांनी जमिनीच्या मोबदल्यात मिळतील ते पैसे घेऊन अंबादानीच्या कंपन्यांत गुंतवावे आणि श्रीमंत व्हावे.
Pages