क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय करणार..?
लोकंच वैयक्तिक कामगिरीची आकडेवारी सादर करत बसतात, जुम्माचुम्मा गातात.
मग नाईलाजाने खेळाडूंवर दबाव येतो.

जडेजा फायटर आहे.
तो आहे तोपर्यंत आशा कायम आहे

- पहिल्या डावात जडेजा गेल्यावर सुंदर नी 11 धावा काढायला वाया घालवलेले चेंडू (ज्यानी इंग्लंड ला दिवसा अखेर जेमतेम एक ओव्हर खेळवता आलं)
- दुसऱ्या डावात खिरापत म्हणून वाटलेल्या 25 बाईज
- अन् दुसऱ्या डावात बॅटिंग मधे पंत, सुंदर वगैरेंनी केलेली खराब कामगिरी

जर हरलो तर याचा गंभीरपणे विचार व्हावा

अन् जर जिंकलो तर जडेजा, सिराज अन् बुमरा ला बायोपिक काढायला इतरांनी फंडिंग करावं...

कसोटी क्रिकेटचा खरा रोमान्स आत्ताच्या सत्रात अनुभवता आला !! जडेजा, बुमरा व सिराज - सलाम , धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा !!!!!

धमाल चालू आहे सामना.
जिंकायला हवा मजा येईल.
आणि असे जवळ येऊन हरलो तर नेहमीप्रमाणे ब्लेम गेम सुरू होतील... जे नकोसे वाटतात. म्हणूनही जिंकायला हवे.

जडेजाला मात्र मानला. त्यावर विश्वास कायम असायचाच. खरा फायटर खेळाडू आहे तो.

पहिल्या सामन्यात जिथे तिथे टॉप ऑर्डर फलंदाजांचे कौतुक आणि तळाच्या फलंदाजाना झोडपणे चालू होते.
आता उलटे चालू आहे.
भारतीय क्रिकेटप्रेमी फार उतावीळ असतात Happy

जिंकलो आम्ही.

अतिशय दुर्दैवी पद्धतीने लास्ट विकेट गेली...
मन बसले.. मूड ऑफ झाला च्यायला

आता एक दिवस अज्ञातवासात जातो सगळीकडून.
ब्लेम गेम सुरू होतील जिथे तिथे.
जे डोक्याला वीट आणतात

Win Some Loose Some!

*अतिशय दुर्दैवी पद्धतीने लास्ट विकेट गेली...* - +१ !
हरणं जिंकणं सोडा, पण इतकी सुंदर झुंज अशा तऱ्हेने संपायला नको होती !! Sad

इंग्लंड पहिला डाव २७१-७ इथून ३८७-१० = १०६ धावा.
भारत पहिला डाव ३७६-७ इथून ३८७-१० = १० धावा.

मॅच हातातून गेली ती इथे.

आज शेपूट वळवळलं. पण अखेर पराभव झाला.

ब्लेम गेम सुरू होतील जिथे तिथे.
जे डोक्याला वीट आणतात
>>
हो ना
आणि त्यात यावेळी आपल्या लाडक्याला शिव्या पडायचे चांसेस आहेत

पिच फ्लॅट नसले तरी एव्हढेही खराब नव्हते कि १९२ चेस करता येऊ नयेत ह्याची खंत वाटत राहील. जुने दिवस आठवले परत. Sad

दोन्ही teams चांगल्या खेळल्या, २२ धावा म्हणजे जास्त नाहीत. पुढच्या कसोटीत जिंकू आपण.

त्यात यावेळी आपल्या लाडक्याला शिव्या पडायचे चांसेस आहेत
>>>>>

म्हणजे पंत?
जो पहिल्या डावात इतके मस्त खेळला पण वर म्हटले तसे धावबाद झाला.
आणि दुसऱ्या डावात हाताला दुखापत झाल्याने कंफर्टेबल वाटत नव्हताच आणि एका चांगल्या बॉल वर बाद झाला त्याला तुम्ही शिव्या देणार? सिरीयसली??

शुभेच्छा आणि शुभरात्री!

रात्रीचे चांदणे +786
आपण जिंकलेली कसोटी आपण फार मोठ्या फरकाने आणि सहज जिंकलो.
हरलो ते मात्र थोडक्यात आणि जिंकायची संधी गमावल्याने हरलो. जर त्या संधी गमावल्या नसत्या तर सहज स्कोअर लाईन 2-1 किंवा 3-0 देखील असती.
पुढे जाऊन जेव्हा कोणी फक्त सिरीजचा निकाल बघेल तेव्हा त्याला या गोष्टी दिसणार नाहीत. त्यामुळे आता पुढच्या दोन सामन्यात भारताला पुन्हा याची पुनरावृत्ती न करता दोन्ही सामने जिंकून मालिका कशी जिंकता येईल हे बघायला हवे.

“ पिच फ्लॅट नसले तरी एव्हढेही खराब नव्हते कि १९२ चेस करता येऊ नयेत ह्याची खंत वाटत राहील.” - खरंय. १९२ चेस व्हायला हवे होते. टॉप/मिडल ऑर्डर मधे कुणीतरी (जडेजा बरोबर अजून एक) खेळायला हवं होतं. सिराजची विकेट चुटपुट लावून गेली.

स्टारवर मॅच बघत होतो. हिंदी कॉमेंटेटर्स किती (आणि किती बाष्कळ) बोलतात. टेस्ट मॅच चं गांभिर्यच वाटत नाही त्यांचं बोलणं ऐकून.

हिंदी कॉमेंटेटर्स किती (आणि किती बाष्कळ) बोलतात. टेस्ट मॅच चं गांभिर्यच वाटत नाही त्यांचं बोलणं ऐकून.
>>>

Lol
हो.. मी आयपीएल ट्वेंटी मध्ये हिंदी कॉमेन्ट्री लावतो. पण टेस्टमध्ये आता बिलकुल नाही. क्रिकेट सोडून सगळ्या फालतू गप्पा असतात Lol
मुळात त्यांना कोणीतरी हे सांगायला हवे की एखाद्या बॉलवर किंवा ओव्हरमध्ये काही विशेष घडत नसेल तर शांत राहिले तरी चालते.. पण मुळात ते क्रिकेटबद्दल बोलतच नसल्याने शांत होतच नाहीत. सिद्धू असला की विचारायलाच नको..
कदाचित कुठेतरी कोणालातरी किंवा बरेच जणांना हे आवडत असेल त्यामुळे यांचे दुकान चालत असेल... पण कसोटीला तरी आवरायला हवे यांना.

१९२ मानाने पीच तितका खराब नव्हता म्हणताना आपल्या गोलंदाजांनी सुद्धा त्यांना त्या धावसंख्येवर बाद केले याबाबत त्यांचे कौतुक करायला हवे.

स्पेशली सुंदरचे कौतुक जे त्याने रूट, स्मिथ आणि स्टोक्ससह दणादण चार विकेट काढल्या.

कालपर्यंत आपल्याला हा संघ वीस विकेट घेऊ न शकणारा वाटत होता पण मागच्या सामन्यात बुमराहच्या अनुपस्थितीत आपण त्यांना गुंडाळले होते आणि या सामन्यात गोलंदाजानीच आपल्याला संधी निर्माण करून दिली होती पण फलंदाजांनी यंदा निराश केले.

Déjà vu!
एजबस्टन २०१८ भारत वि इंग्लंड. कालचा सामना त्याची पुनरावृत्ती होती.
England 287 & 180
India 274 & 162
इंग्लंडचा ३१ धावांनी विजय.
विशेष म्हणजे त्या सामन्यात देखील के एल राहुल आणि स्टोक्स दोघेही खेळले होते.
सविस्तर स्कोरकार्ड
https://howstat.com/cricket/Statistics/Matches/MatchScorecard.asp?MatchC...

घरात इतर कोणाचा अभ्यास, ऑन लाईन काम इ. सुरू असतं म्हणून मी हल्ली कॉमेन्ट्री न ऐकता सामने बघतो ( टिव्हीचा आवाज बंद ठेवून ); अगदींच कांहीं वेगळं घडलं, तरच कॉमेन्ट्री लावतो. मला विशेष कांहीं चुकल्यासारखं वाटत नाही व सामना अधिक लक्षपूर्वक पहाता येतो व आनंद घेता येतो !
*....किंवा ओव्हरमध्ये काही विशेष घडत नसेल तर शांत राहिले तरी चालते.. * - पूर्वी बीबीसी रेडिओवर सामना संपल्यावर एक अतिशय ज्येष्ठ व लोकप्रिय क्रिकेट तज्ञ 15 मिनिट दिवसाच्या खेळाचं विश्लेषणात्मक रसग्रहण करत असत व ते ऐकायला लोक आसुसलेले असत. एकदा दिवसाचा खेळ अतिशय रटाळ व अर्थशून्य झाला असताना, त्या महान तज्ञांनी दिवसाच्या सुरवातीचा ब शेवटचा स्कोअर वाचून दाखवला व " That's all for the day. Good night ! " म्हणून 15 मिनिटांच्या कॉमेंट्स 2 मिनिटात संपवल्या ! खेळाचं किती बोलकं व नेमकं रसग्रहण !!
( मला प्रयत्न करूनही आत्ता त्या तज्ञांच व हा किस्सा वाचला त्या पुस्तकाचं नांव आठवतं नाहीय. क्षमस्व )

काल सामना बघताना मजा आली. इकडे स्काय न्यूज कॉमेंट्री छान असते. Arthratan, Broad, Nasir हुसेन, शास्त्री.
आपले एक सिनियर खूप recist आहेत असे मला वाटते.

बोकलत तुम्ही क्रिकेट टेस्ट पास होण्यासाठी म्हणून असे बोलता. मनापासून नाही. कबूल करा. Happy

विक्रमसिंह
हो. मी पण Sky Sport च बघतो. पण तिथे पण आपले दोघे जण आहेतच की.

जयस्वालला दोन्ही वेळा आर्चरचा वेग झेपला नाही. करुण बद्दल काय बोलणार. कमनशिबी. 6 पैकी 4 वेळा तरी सेट होऊन बाद झाला. आता काढले तर कायमस्वरूपी बाहेर.

T20 मुळे सरांची बॉलिंग गंडलीय.

Pages