सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रिया आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरावर NCB ने छापे मारून रियाचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल यांना ताब्यात घेतले. तसेच सीबीआयने सांगितले की त्यांनी आत्महत्या किंवा हत्या अशी कोणतीही थिअरी रूल आउट केली नाही, सगळ्या गोष्टींवर तपास चालू आहे.

रिया आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरावर NCB ने छापे मारून रियाचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल यांना ताब्यात घेतले. >>> हो मगाशी दाखवलं, तपासाला वेग यायला हवा आता.

मुंबई: मुंबई आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/kangana-does-not-ha...

तर इथे लिहिणारी मंडळी- पुन्हा एकदा विनंती- जपून लिहा. विशेषतः असं काही लिहू नका ज्यामुळे महाराष्ट्रात राहायचा अधिकार गमावून बसाल त्या कंगनासारखा.

राज्यसभा सदस्य असलेल्या राऊत साहेबांनी खूपच खालच्या पातळी वर उतरून वाद घालायला सुर वात केली ! ते ही एका महिले बरोबर .
कंगना , राखी सावंत यांच्या नादी लागणे म्हणजे चिखल उडवून घेणे माहीत असताना राऊत साहेब का हाथ धुवून मागे लागले आहेत ?
सेने कडे वाद घालणाऱ्या महिलांची कमतरता आहे हे या वरून सिद्ध होते
" मुंबई मराठयांची आहे , ज्यांना मान्य नाही त्यांच्या बापाचे श्राद्ध घालू " हि असली भाषा ?
सेनेच्या महिलेला घालू द्या ना वाद !
त्या महिले बरोबर वाद घालून , अर्वाच्य भाषा वापरून राज्य सरकार चे नाव चमकणार आहे का ?

सत्तेत तर भय्ये भागीदार आहेच ना ? मग उठ सुठ मराठी कार्ड वापरून जनतेला मूर्ख बनविण्यात काय फायदा ?

आता कोणी सांगितलं पाकिस्तानात जा, तर मी म्हणणार, मी पी ओ के मध्येच राहतोय.

कंगनाला मुंबईत पी ओ के सारखं वाटतंय तरी तिला इथे का राहायचंय पण?

हा हे एक नवीनच आता ग्रहमंत्रि च म्हणत आहेत कंगना ला इथे राहण्याचा अधिकार नाही !
अरे काय चाललंय काय ?
इतका राग कंगना चा येतोय तर आदेश द्या ना महिला आघाडी ला !
का हि लोक स्वतःचे हसे करून घेत आहेत !
पुरोगामी महाराष्ट्र , जोतिबांच्या महाराष्ट्रात ही भाषा ?

खिक्क,

kangna ranaut have become muffled version of rakhi sawant or may be she always was.

कंगनाला मुंबईत पी ओ के सारखं वाटतंय तरी तिला इथे का राहायचंय पण? >>>>>>
अमीर आणि शाहरुख ला असेच प्रश्न विचारले होते का हो ?
त्यांना पण इथे सुरक्षित वाटतं नव्हते ना ?

कंगना ताईंनी शहाणेबाईंना "गिधाड" म्हंटले.
नवीन मानाकानुसार रेणुका शहाणे चे चारित्र्यहनन झाले

मुंबई पोलिसांविरुद्ध भाजपे

साध्वी ( सध्या कुठे आहेत ?)

मिसेस फडणवीस ( सध्या कुठे आहेत ?)

कंगना राणावत

लोक भैसाटले आहेत,
AI काय , कोविड पेशन्ट शोधायला अँप काय, पेटंट काय, त्याची चोरी काय...
राहून राहून, " माझी गं चंद्रि..... रोज धा शेर दूद देत होती...." चा हंबरडा आठवतो.

लोकांच्या असल्या ट्विट्स नि आणि मुलाखतींनी SSR च्या आत्महत्येचे गांभीर्य हरवले आहे

हा सर्व तमाशा करायला कंगना भारतीय जनता पक्ष कडून किती मानधन घेत असेल.
फुकट तर करणार नाही हे नक्की

नशीब ती वेडी तनुश्री नाही उगवली ट्विटर वर.
नाही तर सुशांत ची केस राहायची बाजूला आणि ह्याचाच मूर्ख पना रोज न्यूज वर दिसायचा.
कपिल शर्मा show, चला हवा येवू ध्या .
अशा कॉमेडी कार्यक्रम पेक्षा कंगना लय भारी टाईमपास करत आहे

शोविक अणी सॅमुएल ची अटक मारिउआना ( गांजा) साठी आहे. तिचा आत्महत्येशी संबंध नाही. नवस फेडण्याची घाई करू नये.

== पाल्हाळ अ‍ॅलर्ट
मुळात गांजावर बंदी असणे हेच हास्यास्पद आहे. १९८५ पर्यंत भारतात गांजा वर इतके निर्बंध नव्हते. अमेरिकेने वार ऑन ड्रग च्या नवाखाली गांजा वर बंदी आणली. गांजाचे सेवन मुख्यत्वे कृष्णवर्णीय लोक करत असत. त्या निमित्ताने अनेक कृष्णवर्णीय लोकांना तुरुंगात डांबायची संधी मिळाली. ( एखादा पदार्थ मुख्यत्वे समाजातला वंचित घटक सेवन करत असेल तर त्यावर बंदी आणून वंचितांना तुरुंगात डांबणे, कुठेतरी अंधुकसे वाचल्यासारखे वाटते.... ) तंबाखू किंवा अल्कोहोल पेक्षा गांजा फार जास्त घातक नाही. शिवाय भांगेवर बंदी नाही पण गांजावर आहे. भारताने १९८५ मध्ये अमेरिकेच्या दबावामुळे कायदा केला. इतक्या वर्षानंतर आज अमेरिकेला उपरती झाली व बर्‍याच राज्यात तो लीगल व आमच्या राज्यात डी फॅक्टो लीगल आहे. पण जोराने बांग देण्याच्या म्हणीप्रमाणे भारतात अजूनही गांजावर बंदी आहे. ओरिसाच्या तथागत सत्पथी या अतिशय चांगल्या खासदाराने ही चूक दुरुस्त करायचा प्रयत्न सुरु केला आहे.
https://theprint.in/opinion/let-rhea-chakraborty-smoke-weed-in-peace-leg...
== पाल्हाळ समाप्त

जो पदार्थ हॅल्यूसिनेशन्स आणतो, नर्व्ह डॅमेज होतं,व्यसन लागतं आणि सोडवायला वैद्यकीय मदत लागते असा कोणताही पदार्थ बॅन व्हायला हवा ना? (औपरोधीक किंवा वाद म्हणून नाही, खरंच विचारतेय.गांजा कोकेन हेरॉईन किंवा lsd पेक्षा सुपिरियर आहे का?त्याच्याने हार्ट आणि अवयवांवर दुष्परिणाम होत नाहीत का?)
गांजा आणि भंग टेक्निकली एकाच झाडापासून बनत असतील तर दोन्हीवर सारख्या लेव्हल ची बंदी हवी.

अन्य एका संस्थळावरती पुढील मुद्दा वाचनात आलेला होता - दारु म्हणा, भांग/गांजा, एल एस डी म्हणा, सरकारने किती हस्तक्षेप करावा? बाऊंडरी लाइन , लक्ष्मणरेखा कोणती? प्रौढ जे व्यसनाधीन होतात त्यांना त्याचे दुष्परीणाम माहीत नसतात असे काही आहे का? तर नाही. मग या लोकांना वाचवण्याकरता सरकारने तमाम पब्लिकच्या जीवनात किती हस्तक्षेप करावा आणि का करावा?

गांजा आणि भंग टेक्निकली एकाच झाडापासून बनत असतील तर दोन्हीवर सारख्या लेव्हल ची बंदी हवी. .........
मग अनारशावर लावायला खसखस मिळणार नाही. Wink

मी आता काही लिहिणार नाहीये. मुंबईत जाण्यावर बंदी यायला नकोय मला >> लिहा ओ तुम्ही. तुमच्यावर कोणी बंदी घालत नाहीत.

तरी बरं दिल्लीतल्या त्या कपिल मिश्रा सारख्या विचारसरणीचे आणि घोषणा देणारे महाराष्ट्रात कोणी नाही.

ना ड्रग चा धंदा बंद होणार.
ना ड्रग चा मुख्य सूत्रधार ह्यांच्या हातात लागणार.
एकदम खालच्या साखळी तील दोन तीन पकडू शकतील एवढीच ताकत आहे भारतीय तपास यंत्रणेत.
ना सुशांत सिंग ची केस solve होणार.
काही घडणार नाही.
फक्त बोंबाबोंब चालेल 2 महिने नंतर सर्व शांत.

अनारश्यावर खसखस:
तत्व म्हणजे तत्व.त्यात बसत नसेल तर यावेळी आईला 33 इडल्या द्यायला सांगू जावयाला Happy

Pages