ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा काय अन चर्चा काय कळेनासेच झाले आ हे.
बाकी, धागार्त्कर्त्याच्या भावनेशी सहमत.

चौथा कोनाडा ->>> इथे काही नतद्रष्ट लोकांनी धागा भरकटवण्याचा धंदाच सुरु केला आहे ... मुद्दाम विषयाचे गाम्भीर्य कमी करायचे आपल्या तद्दन भिकार कंमेंट्स ने त्याला कोण काय करणार. मला वाटतं त्यांच्याकडे स्वतःचे असे काही ज्ञान नसल्याने किंवा बुद्धीची तेव्हडी कुवत नसल्याने ते असे करत असावेत

पकोडेवाला ची गाडी उचलली का प्रशासनाने? >>>>> Lol अतिक्रमण फुटपाथवर न रहाता हमरस्त्यावर पण पसरले होते.
किती त्या आचरट कमेंट्स. एक तर मुद्दाम खोडसाळपणा किंवा मग आयडीने आत्महत्या करायचीच ठरवली होती

कॉटन किंग च्या मराठे साहेबांनी ए. बी. पी. माझा वर ह्या पुढे जाहिराती देणार नाही असं जाहीर केलं आहे व त्वरित अंमलात ही आणलं आहे.
मराठे साहेबांच्य ह्या कृती चा नक्कीच अभिमान वाटला.

प्रसन्न हरणखेडकर >> ++ १ आता त्यांना पीतांबरीने पण साथ दिली आहे. ते देखील त्यांची कोणतीही जाहिरात या मूर्ख चॅनेलला देणार नाहीत

Raju Parulekar giving good to the trolls:

Raju Parulekar ब्लॉग

नुकताच मी वैयक्तिक कामासाठी अमेरिकेत गेलो होतो. २९ मे रोजी अमेरिकेहून मी भारतात परतणार होतो. तिथल्या २९ मे रोजी पहाटे साधारण एक वाजता माझ्या मोबाइलवर अक्षरश: टोळधाडीसारखे अनेक फोन कॉल्स येऊ लागले. सुरुवातीला एवढे अज्ञात फोन मला का येताहेत, तेच मला काही समजेना कारण मी झोपेत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा तास बसने आणि २० तास विमानाने प्रवास करायचा होता. त्यामुळे थोडी तरी झोप घेणे मला आवश्यक होते. परंतु फोन कॉल्सचे प्रमाण प्रचंड वाढले आणि काही केल्या मला भारतातून येणारे हे फोन झोपू देईनात. शेवटी मी फोन उचलू लागलो. तर प्रचंड प्रमणात शिव्या, असंबद्ध बडबड आणि वेगवेगळ्या धमक्या मिळू लागल्या. नेमका प्रकार काय हे कळायला मला वेळ लागला, कारण पलीकडून बोलणारी माणसे सुसंस्कृत आणि सुसंबद्ध बोलत नव्हती. शेवटी दोन-तीन जणांच्या फोनवरून मल परिस्थितीची कल्पना आली, ती अशी होती की ‘एबीपी माझा’चे संपादक आणि माझे मित्र राजीव खांडेकर ह्यांनी त्यांच्या चॅनेलवर सावरकरांवर काही कार्यक्रम केला होता. त्यामुळे पित्त खवळून शूळ उठलेल्या अनेक स्वयंघोषित सावरकरभक्तांनी माझा खाजगी नंबर राजीव खांडेकरांचा नंबर म्हणून व्हॉट्सअप ग्रूपवर पसरवून टाकला होता. असा एखाद्याचा खाजगी मोबाइल नंबर समाजमाध्यमांवर पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. ते सावरकरांच्या तत्त्वज्ञानात बसते की नाही, याबाबत मी अनभिज्ञ होतो. परंतु मी दुसऱ्या दिवशी बसने विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानात बसून फोन ऑफ करेपर्यंत मी न केलेल्या आणि मला माहीतही नसलेल्या गोष्टीसाठी मला जवळपास ४५० हून अधिक फोन कॉल्स आले आणि त्यातल्या ६०-७० जणांच्या शिव्या मला खाव्या लागल्या. हा व्हर्च्युअल मॉब लिंचिंगचाच प्रकार होता. यातला प्रत्येक नंबर मी जपून ठेवला आहे. याव्यतिरिक्त व्हॉटसअप आणि मेसेजच्या माध्यमातून स्वयंघोषित सावकरभक्तांनी मला सूचना केल्या, शिव्या घातल्या ते वेगळे. शेवटी मी फेसबुक आणि ट्वीटरच्या माध्यमातून हा नंबर माझा आहे, राजीव खांडेकरांचा नाही असे आवाहन केले तरीही हा प्रकार थांबला नाही. फेसबुक आणि ट्वीटरवर मी आवाहन केल्यानंतर दोन प्रकारच्या सूचना मला भक्तांकडून आल्या. एक म्हणजे हा नंबर जर तुमचा असेल तर राजीव खांडेकरांचा नंबर तुम्ही द्यावा. सूचना क्रमांक दोन म्हणजे एवीतेवी तुम्ही मोदींविरुद्ध लिहित असता, तर पुढेमागे सावरकरांवरही लिहालच. त्यामुळे तुम्ही आधीच शिव्या खाल्ल्या तर त्यात काय गैर आहे? हा सारा भक्तठेवा मी जपून ठेवला आहे. त्याचे नावनंबरसह योग्य ते प्रदर्शन मी पुढे योग्य वेळ आल्यावर करेनच.

खरं तर मी व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तीकेंद्रित लिहित नाही. मग ते मोदी असोत, गांधी असोत किंवा सावरकर; मी कालसुसंगत लिहितो. कारण प्रत्येक काळात व्यक्ती बदलत असते मग ती व्यक्ती छोटी असो किंवा मोठी, नेता असो किंवा लेखक. त्यामुळे मी कोणावरही पूर्वग्रहदूषित बोलत नाही किंवा लिहित नाही. मी कालप्रसंगानुरुप व्यक्ती आणि इतिहासावर लिहितो, बोलतो. त्यामुळे कित्येकदा एखाद्या व्यक्तीवर किंवा प्रसंगावर मी आधी केलेल्या विधानाशी विसंगतही लिहितो आणि आजही ते योग्य आहे असे मला वाटते. माझे सर्वात ताजे मत हा माझा खरा निष्कर्ष असतो.
माझ्या झालेल्या व्हर्च्युअल मॉब लिंचिंगमुळे (तेही खांडेकरांमुळे!) मी परत एकदा सावरकरांबद्दल मोदी सरकारच्या निमित्ताने लिहायचे ठरवले. माझ्या दृष्टीने सावरकरांचे इतिहासात जे स्थान आहे ते काय आहे यापेक्षा आता जो सावरकरांचा उदो उदो चालला आहे त्याबद्दल आधी थोडे समजून घेणे आवश्यक आहे. आताचे देशातील सरकार, आताचे मोदीयुग, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांचा सावरकरांशी अर्थाअर्थी काही संबंध नाही. केवळ हिंदुत्व म्हटलं म्हणजे सावरकर नव्हे. सावरकर हे विज्ञाननिष्ठ हिंदुत्त्ववादी असल्याचा त्यांचाच दावा होता. माझा स्वत:चा हिंदुत्ववाद अशा गोष्टींवर विश्वास नसला, तरी सावरकरांचाही गोमूत्र, गाड्या शेणाने सारवणे, भगवे कपडे घालून मंदिरात पूजा करणे, ढोंगी बुवाबावांना पदावर बसवणे, कोणालाही साधु-साध्वीची उपमा देणे ह्याचा तिटकारा होता. गायीला तर सावरकरांनी कधीच माता मानलं नाही. अंधश्रद्धेने जखडलेल्या भारतीय सनातन धर्माला आणि चातुर्वणाला सावरकरांनी कधीच आपलंसं मानलं नाही. सावरकरांची जेवढी उपेक्षा त्यांच्या हयातीत काँग्रेसने केली त्याहून अधिक उपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि तत्कालीन जनसंघाने केली. गोमूत्र आणि गोशेणाचे सोहळे सावरकर खपवून घेणार नाहीत, ह्याची कल्पना असल्यामुळे सावरकरांना कायमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फायदा होईल एवढेच जवळ केले, बाकी दूरच ठेवले होते. सावरकरांची जीवनविषयक मतं आणि तत्वज्ञान ह्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आताचा भाजप ह्यांचा काही संबंध नाही. ह्याची काही उदाहरणे :
सावरकरांचे मराठी भाषेवर प्रेम होते. ते मराठी भाषिक कवी आणि लेखक होते. त्यांनी मराठी भाषाशुद्धीसाठी कायमच प्रयत्न केले आणि त्यातले बरेचसे यशस्वी झाले. याउलट रा.स्व. संघ आताच्या नागपूर, महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. तेव्हा नागपूर मध्य भारतात येत असे. मातृभाषा मराठी असली, तरी संघाची परंपरा उगीचच हिंदीत बोलायची आहे, जी सावरकरांची कधीच नव्हती. किंबहुना संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जेव्हा चालू होते तेव्हा दिल्लीमध्ये संयुक्त महाराष्ट्रवादींचा, मराठीवाद्यांचा एक मोर्चा गेला होता. त्यात शाहीर अमर शेख, आचार्य अत्रे आघाडीवर होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था सावरकरांनी हिंदु महासभेच्या कार्यालयात केली होती. याउलट, गोळवलकर गुरुजींनी गुजरातकेंद्री अशा पंडित नेहरु आणि सरदार पटेल यांच्या आखणीला पाठिंबा दिला होता. सावरकर देव, धर्म मानत नसत. जेवढा संघटनेसाठी धर्माचा उपयोग होतो तेवढाच धर्म त्यांना मान्य होता. गायीला माता मानण्याला तर सावरकरांचा प्रखर विरोध होता. सावरकरांनी सुरुवातीच्या काळात रा. स्व. संघाच्या शाखा प. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब आणि इतर ठिकाणी स्थापित होण्यास खूप मदत केली. या बदल्यात रा.स्व.संघाने हिंदु महासभेची यूथ विंग (युवकसेना) म्हणून काम करावे अशी सावरकरांची अपेक्षा होती, जी रा.स्व.संघाने धुडकावून लावली. सावरकरांनी सर्वात प्रथम द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला, ज्याला मोकळेपणाने मान्यता देण्यास भाजप आणि संघ घाबरतो तर सावरकर संघाचे आणि भाजपचे कधी झाले? आज भारतामध्ये किंबहुना संपूर्ण हिंदी पट्ट्यामध्ये हिंदू, हिंदीच्या नावाखाली जातीयवादाने थैमान माजवले आहे. उच्चवर्णीय हिंदू कनिष्ठ वर्गातील जातींचे दमन करून त्यांचे आरक्षण, त्यांचे हक्क आणि त्यांचे जगणे ह्यावर टाच आणू पाहत आहेत. हे सावरकरांना अजिबात मान्य नव्हते. सावरकरांनी हिंदू धर्मातील जातीयवादाला ‘त्यांच्या पद्धतीने कृतीशील विरोध’ केला, ज्याची सुरुवात त्यांनी काळाराम मंदिरापासून केली. ह्याच्याशी संघाचा आणि भाजपचा काही संबंध नाही. किंबहुना ३ मार्च १९४३ साली सावरकरांनी एस. एल. मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की हिंदु महासभेच्या लोकांशी रा.स्व.संघाच्या लोकांचे एवढे तीव्र मतभेद असतील, तर हिंदु महासभेने स्वत:ची युवासेना स्थापन करावी आणि पुढे त्याप्रमाणे हिंदु महासभेने स्वत:ची ‘रामसेना’ स्थापन केली.
उत्तरायुष्यात सावरकरांनी एकाकीपणे एका बाजूला काँग्रेसशी आणि दुसऱ्या बाजूला रा.स्व.संघ आणि जनसंघाशी सातत्याने संघर्ष केला. तो वैचारिक आणि मानसिक पातळीवरही होता. याउलट रा.स्व.संघाने बंदीचे आलेले बालंट काँग्रेसने उठवल्यानंतर सावरकरांना दूर ठेवून काँग्रेसच्या कलाने जात राहणे पसंत केले. आजच्या भाजप पक्षाप्रमाणेच हा संधीसाधूपणा तेव्हाही रा.स्व. संघ आणि जनसंघात होता. याउलट सावरकर हे आपल्या विज्ञाननिष्ठ हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसहीत फार एकीकीपणे जगले आणि एकाकीपणे गेले. त्यांच्या हयातीत त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांच्यावर काँग्रेसपेक्षा अधिक अन्याय त्यांचे सहोदर असलेल्या रा.स्व.संघ आणि जनसंघानेच केला. रत्नागिरीला राहायला आल्यावर सावरकर गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला थेट विरोध करत होते. गांधीहत्येनंतर काँग्रेस सरकार सावरकर व रा.स्व.संघ ह्यांच्या विरोधात जाणे साहजिकच होते. कारण ते एकमेकांचे प्रकट राजकीय विरोधक होते. परंतु त्या काळात रा.स्व.संघ, गोळवलकर गुरुजी आणि जनसंघाने सावरकरांबाबत संधीसाधू, कपटी आणि कृतघ्नपणाची भूमिका बजावलेली आहे, जी रेष आजही भाजप चालवत आहे. ती रेषा कोणती, तर सावरकर म्हणजे सावरकरांचे विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान बाजूला ठेवून सावरकरांच्या नावाचा उदो उदो करून संख्यात्मक हिंदू गोळा करायचे, त्यांना भक्त बनवायचे, त्यांना विज्ञानविरोधक बनवायचे म्हणजेच त्यांच्या नकळत त्यांना सावरकरविरोधी वागायला लावायचे आणि हाच सावरकरवाद आहे अशी बेमालूम बतावणी समाजात निर्माण करायची आणि त्या बदल्यात सत्तेचे लोणी मटकवायचे.
खरे तर सावरकरांच्या हयातीत आणि मृत्यूनंतर स्वत:ला सावरकरवादी म्हणवणारे लोक खरे सावरकरवादी नव्हते. सावरकरवादी फक्त सावरकर होते, इतके ते एकाकी होते. सावरकर असे एकाकी का झाले, ह्याची चिकित्सा करताना त्यांच्या गुणांबरोबरच त्यांच्या दोषांचीही चिकित्सा करायला लागेल. पण स्वत:ला सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी सावरकरांच्या व्यक्तित्वाविषयी अशी चिकित्सा होऊ दिली नाही. मुळात अशी चिकित्सा होऊ न देणे हेच सावरकरविरोधी आहे. परंतु स्वत:चे पितळ उघडे पडेल, या भितीने स्वत:ला सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी शारीरिक हिंसेचा वापर करत अशी चिकित्सा करू पाहणाऱ्यांना कायमच गप्प बसवले आहे. प्र.के. अत्र्यांपासून ते विद्याधर पुंडलिकांपर्यंत अशी अनेक उदाहरणे देता येतील. विद्याधर पुंडलिक हे मराठी साहित्यातील मोठे नाव. त्यांनी ‘सती’ नावाची एक कथा लिहिली, ती सावरकरांच्या व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेली आहे, अशी बोलवा होती ज्यामुळे सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी विद्याधर पुंडलिकांच्या चेहऱ्याला काळं फासलं, शिवाय ह्या कथेपायी अनेकदा कोर्टाचे खेटे त्यांना घालावे लागले ते वेगळेच. आश्चर्य म्हणजे पुंडलिक हे स्वत: व्यक्तिगत आयुष्यात कट्टर सावरकरप्रेमी होते, पण त्यांनी सावरकरवाद्यांसमोर माघार घेतली नाही. त्यांची ती कथा आजही उपलब्ध आहे, त्यांच्या ‘देवचाफ़ा’ या कथासंग्रहात. अशा सावरकरवाद्यांचे आता अंधभक्तांमध्ये रुपांतर होऊन त्यावर मठ्ठपणाची पुटे चढली आहेत. त्यामुळे हा नंबर खांडेकरांचा आहे की परुळेकरांचा आहे ह्याची खात्रीही न करता आपली गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवणे आणि काल्पनिक सत्तेचा माज दाखवणे हे स्वाभाविकच आहे.
वर उल्लेखिलेल्या विद्याधर पुंडलिंकांच्या ‘सती’ या कथेतील महापुरुषाची पत्नी राधाबाई तिच्या मुलीला म्हणजे विभाला म्हणते, “विभे पूर्वीच्या काळी एखादी बाई सती जात असेल तर मोठमोठ्याने नगारे-ढोल वाजवले जायचे, जेणेकरून तिच्या किंकाळ्या कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून, तुझ्या वडिलांच्या कीर्तीचे नगारे-ढोल आशेच आहेत ग, अग, इतके मोठे, इतके मोठे कि माझ्या किंकाळ्या माझे हुंदके कोणाला ऐकू गेले नाही आणि जाणारही नाहीत.”
या कथेतील राधाबाईंसारखी गत आताच्या भारतातील बुद्धिवादी आणि चिकित्सक माणसांची अंधभक्त आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यासमोर झाली आहे. त्यांच्या किंकाळ्या कुणालाही ऐकू जात नाहीत आणि जाणारही नाही, याची व्यवस्था अंधभक्त आणि स्वत:ला सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी केली आहे.
या सावरकर प्रकरणात अखेरचा एक प्रश्न बाकी राहतो. तो म्हणजे मी सावरकरांना वीर मानतो की नाही? जेवढी वर्षं सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात आणि रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत घालवली तेवढी किंवा त्याहून अधिक शिक्षा भोगणारी व्यक्तीच सावरकरांनी त्या काळात ब्रिटिशांकडे जी ‘मर्सी पिटीशन्स’ दाखल केली त्याचे विश्लेषण करू शकते. सावरकरांनी आपल्या ‘मर्सी पिटिशन्स’द्वारे कुणाचाही विश्वासघात केलेला नव्हता. मात्र त्यांच्या उदात्ततेचे जे वलय त्यांच्या भोवती होते, त्या वलयाची आभा ‘मर्सी पिटिशन्स’मुळे कमी झाली, ह्यात शंका नाही! अन्यथा पारतंत्र्यात सावरकरांच्या त्यागाचा उल्लेख भगतसिंगांच्या तोडीचा मानला जायचा. अर्थात, सावरकरांनी ते का केले, ह्याचे उत्तर सावरकरांव्यतिरिक्त कुणीही देऊ शकत नाही. पण आज स्वातंत्र्यात सर्व सुखे उपभोगून केवळ लेखनाचे स्वातंत्र लाभले म्हणून सावरकरांची प्रतिमा मलीन करण्याचा मला तरी अधिकार नाही, असे मी मानतो. कारण त्यांच्या बुटात पाय घालून अंदमानात मी काय केले असते याचे कोणतेही उत्तर माझ्यापाशीही नाही.
आज अंधभक्त स्वतला सावरकरवादी म्हणवून जे काही करत आहेत, ते नि:संशय खलनायकी कृत्य आहे. त्याला सत्तेची साथ असली, तरी सत्याची नाही. जर सावरकर किंवा कुणीही महापुरुष समजून घ्यायचा असेल, तर त्याची कठोर चिकित्सा व्हायलाच हवी!
२०१६ च्या नोटबंदीनंतर या देशात आजतागायत कठोर चिकित्सा बंद झालेली आहे. ती परत सुरू झाली, की मी सावरकरांवरील माझं पूर्ण लेखन सर्व चिकित्सेनिशी प्रसिद्ध करेन.

-राजू परुळेकर
१३.०६.२०१९

खरं तर मी व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तीकेंद्रित लिहित नाही. मग ते मोदी असोत, गांधी असोत किंवा सावरकर; मी कालसुसंगत लिहितो. कारण प्रत्येक काळात व्यक्ती बदलत असते मग ती व्यक्ती छोटी असो किंवा मोठी, नेता असो किंवा लेखक. त्यामुळे मी कोणावरही पूर्वग्रहदूषित बोलत नाही किंवा लिहित नाही. मी कालप्रसंगानुरुप व्यक्ती आणि इतिहासावर लिहितो, बोलतो. त्यामुळे कित्येकदा एखाद्या व्यक्तीवर किंवा प्रसंगावर मी आधी केलेल्या विधानाशी विसंगतही लिहितो आणि आजही ते योग्य आहे असे मला वाटते. माझे सर्वात ताजे मत हा माझा खरा निष्कर्ष असतो.
<<

हा दावा राजू परुळेकर करतो, यापेक्षा दुसरा विनोद नाही.
आयुष्यभर कॉंग्रेसच्या पखाल्या वाहणारा माणुस आज स्वत:ला न्युट्रल म्हणतोय !

>>> हा दावा राजू परुळेकर करतो, यापेक्षा दुसरा विनोद नाही.
आयुष्यभर कॉंग्रेसच्या पखाल्या वाहणारा माणुस आज स्वत:ला न्युट्रल म्हणतोय ! >>>

पूर्ण सहमत!

यापुढे 'ABP माझा' वर कॉटनकिंग, पितांबरी products, सुहाना मसाले, अमृत मलम यांच्या जाहिराती दिसणार नाहीत!

हा दावा राजू परुळेकर करतो, यापेक्षा दुसरा विनोद नाही.
आयुष्यभर कॉंग्रेसच्या पखाल्या वाहणारा माणुस आज स्वत:ला न्युट्रल म्हणतोय ! >>> ++ १

राजूने लिहिलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद न करता आल्याने होणारी जळजळ अमृत मलम थांबवु शकेल का??

Submitted by चिवट on 15 June, 2019 - 20:29 >>>

अमृत मलम कशाला फुकट घालवता राव? ठेवा तुमच्यासाठीच. काँगिंनी एव्हढ्यात संपवली असतील असं मला वाटलेलं. असो, राजू हा एक निरुपद्रवी माणूस आहे. त्याच बोलणं कशाला मनाला लावून घ्यायचं? त्यात तो स्वतःच म्हणतोय की त्याची मतं वारंवार बदलत असतात, आणि त्या त्या वेळची त्याची मतेच त्याच्या मते खरी असतात. कदाचित प्रतिवाद करताकरता समोरच्याचीच मते तो अचानक स्वतःची म्हणून बोलायला लागेल Lol

So don't take him seriously.

प्रतिवाद नाही ना!

नवीन Submitted by चिवट on 18 June, 2019 - 10:14 >>>

पुन्हा तेच म्हणेन.. कुणीही काहीही लिहीतो. सगळ्यान्चा प्रतिवाद करण्यात उर्जा घालवण्याची गरज वाटत नाही. विशेषकरुन ज्याची मते वारन्वार बदलतात त्याच्याशी...

राजूने लिहिलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद न करता आल्याने होणारी जळजळ अमृत मलम थांबवु शकेल का??

Submitted by चिवट on 15 June, 2019 - 20:29

नक्की काय मुद्दे मान्डलेत? गोल गोल लिहून सावरकर भाजप चे नव्हते अस ओढून ताणून सिद्ध करयची केविलवाणी धडपड आहे फक्त.

गोल गोल लिहून सावरकर भाजप चे नव्हते अस ओढून ताणून सिद्ध करयची केविलवाणी धडपड आहे फक्त. ~

भाजपची सावरकरांबद्दलची सध्याची भूमिका संदिग्धच आहे. एबीपी प्रकरणातही भाजपने काहीच अधिकृत भूमिका घेतलेली ऐकिवात नाही. सावरकरांचं मराठी प्रेम आणि फडणवीसांचा मराठी द्वेष हा विरोधाभास तर अगदीच समोर दिसतोय.

राजू परुळेकर हा "कमी तिथे आम्ही" या कॅटेगोरीतला स्तंभलेखक आहे. मागे राज, उद्धव ठाकरे इ. वर काहि सनसनाटी लिहुन चर्चेत रहाण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पण या वरच्या लेखाबाबत मी त्याच्याशी काहि अंशी सहमत आहे. (एक गोष्ट लक्षात घ्या, या वरच्या लेखात त्याने सावरकरांना कुठेहि बोल लावलेले नाहित.) बीजेपी/संघ या दोघांकडुन सावरकरांच्या नांवाचा जेंव्हा फायदा होईल तेंव्हाच वापर केला गेलाय. दुसरीकडे मोदि/बीजेपी विरोधक "दुष्मन का दोस्त वो आपुनका भी दुष्मन" या न्यायाने सावरकरांविषयी काहिहि माहिती नसताना, ती जाणुन घेण्याची इच्छा/कुवत नसताना, अर्धवट माहितीवरुन त्यांच्या नांवावर ताशेरे ओढण्याची चढाओढ लावत आहेत. एबीपी माझाचा कार्य्क्रम आणि इथल्या धाग्यांवर नेहेमीच्या अयशस्वी कलाकारांच्या प्रतिसादांवरुन हेच दृष्टिसमोर येतंय...

एबीपी माझा तर्फे एक माझा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो त्यात आता फडणदोनशून्य उपस्थित राहणार आहेत असं वाचलं.
एकूणात भाजपला सावरकरांच्या अपमानाची फार काही ऍलर्जी वगैरे नसावी, विशेषतः फडणदोनशून्य साहेबाना.

आता हे कसं योग्यच आहे वगैरे पोस्ट येऊ देत.

नवीन Submitted by सनव on 19 June, 2019 - 17:07>>>

अजिबात योग्य नाही. पण हे तुम्ही कुठे "वाचल"?

सनव >> हे अजिबात योग्य नाही ... परंतु अशी बातमी तुम्ही कुठे वाचलीत ते तरी सांगा किंवा लिंक तरी द्या. कि उगीच धुराळा उडवण्याच्या उद्देशाने टाकलेलं आहे ?

आणि बातमी असली तरी त्यात गैर काय आहे. उलट ह्या अनुषंगाने अश्या प्रसंगी त्यांच्याच स्टेजवर जावून त्यांच्या आक्षेपार्ह विधानावर खड़े बोल सुनावणे आणि तो सन्मान तिकडे जावून निषेधार्थ नाकारणे हे शक्य होईल आणि मु म साहेब ते नक्कीच करतील

चला आली एकदाची अक्कल ABP Maza ला.
आता त्या प्रसन्न जोशी व नम्रता वागळेला कधी हाकलतात चॅनेलवरुन ते पाहायचे !

Pages