ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< त्याला सत्तेची साथ असली, तरी सत्याची नाही. >>

------ छानच विचार आहेत परुळेकरांचे. कारण नसतांना त्यांना किती त्रास दिला गेला...

मने दुखावली गेल्याबद्द्ल फक्त दिलगिरी! Rofl

Submitted by अमितव on 21 June, 2019 - 01:43 >>>

फक्त दिलगिरी व्यक्त केली असे वाटून त्यात एव्हढं गडाबडा लोळण्यासारखे काय आहे? त्या निवेदनातील शेवटचा कठीण शब्द वाचता आला नाही की कळला नाही?

Submitted by उदय on 21 June, 2019 - 02:08 >>>

23 मे नंतरच्या दोन आठवड्यांत सगळे राजकीय माबोकर तुमचे मौलिक विचार वाचण्याच्या प्रतीक्षेत होते. असो, उशिराने का होईना आता तुमचे लोकसभा निवडणूक विश्लेषण पामरांना वाचायला मिळाले तर कृपा होईल.

निवेदनातील शेवटचा कठीण शब्द वाचता आला नाही की कळला नाही? ---- ते नवीन सीलॅबसवाले आहेत त्यामुळे जरा विस्कटुन सांगू -- कशअमअसवअ

सावरकरानी माफीनामा लिहिला म्हणून येथे अनेकानी त्यान्च्यावर येथे केलेली टीका मी वाचली त्यावरून अनेकाना सावरकरान्च्या कार्याचे आकलन झालेले नाही असे वाटले. काही दिवसापूर्वी मी श्री नितिन जोगळेकर यानी त्या सम्बन्धात दिलेले समर्थन वाचले. ते येथे थोडी काटछाट करुन देत आहे त्यावरून त्यानी माफीपत्रे का लिहिली ते कळेल. शिवाजीराजानी आपली आग्र्याहून सुटका करून घेण्याचे कारण म्हणजे त्याना ठाऊक होते की तुरुंगात बसून मराठी राज्य नेत्याविना पुढे जाणार नसल्यामुळे कोणत्याही मार्गाने आधी सुटका करून घेणे जरुरीचे होते म्हणून महाराजांनी शक्कल लढवून आपली मुक्तता करून घेतली.
सावरकरांनी ३०-ऑगस्ट-१९११, १४-नोव्हेंबर-१९१३, १९१७ आणि ३०-मार्च-१९२० असे चार वेळा माफीनामे सादर केले होते. अर्थात तुरुंगातून सुटका झाल्यावर ते स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी त्यांच्या प्रयत्नांचे तंत्र बदलले आणि आपले कार्य चालूच ठेवले. सावरकरांच्या काळात जरी लोकनियुक्त नसले तरीही सरकार होते त्यामुळे सावरकरांना पुन्हा तुरुंगात डांबणे ब्रिटिशांना अगदी सहज शक्य होते - त्यामुळे आपले अस्तित्व टिकवून कार्य सुरु ठेवायचे असेल तर आधी कोणत्याही प्रकारे सुटका करून घेणे आवश्यक होते.
जर तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी आपले प्रयत्न सोडून दिले असते किंवा सरकारला सहकार्य केले असते तर मात्र ते माफीनामे म्हणजे शरणागती म्हणता आले असते. मात्र त्यांनी त्यांचे कार्य चालूच ठेवल्यामुळे त्यास शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमीकावा म्हणणे हे जास्त योग्य होईल. एबीपी माझाला हे समजले नसेल कारण पूर्वग्रहदूषित व्यक्तींना हे समजणे कठीण आहे आणि समजले तरी मान्य करता येणे नक्कीच कठीण आहे.

काँग्रेसने त्यांचे नाव विसरले अशी बोंब कशी मारणार ?

नवीन Submitted by BLACKCAT on 25 June, 2019 - 17:01

भाजप शासन नाव देणार. काँग्रेस त्यांचे नाव विसरली आहेच.

>>हे स्टॅम्प काँग्रेसने काढले होते ना?<<

बघा म्हणजे कॉंग्रेसला पण जे कळते ते इथल्या नाठाळ आयड्यांना वळू नये म्हणजे हद्द झाली ना!

काँग्रेस त्यांना विसरली नाही, त्यांचे धडे , कविता वगैरे शालेय पुस्तकात असतात , आम्ही काँग्रेसची शालेय पुस्तके वाचूनच शिकलो

BLACKCAT >> परंतु योग्य तो मान पण दिला नाही ... उदाहरणा दाखल आपल्या नेहरूंनी त्यांच्या भगूरच्या घरावर जप्तीची नोटीस पाठवली होती ... केवळ एक तिकीट छापले म्हणजे झाले का?

कधी पाठवली होती ? ते घर सरकार जमाच आहे , मग नेहरूंची नोटीस कुठून आली ?

आणि लहान गावातल्या घरावर डायरेकत पंतप्रधान जप्तीची नोटीस लावतो?

<< सावरकरानी माफीनामा लिहिला म्हणून येथे अनेकानी त्यान्च्यावर येथे केलेली टीका मी वाचली त्यावरून अनेकाना सावरकरान्च्या कार्याचे आकलन झालेले नाही असे वाटले. काही दिवसापूर्वी मी श्री नितिन जोगळेकर यानी त्या सम्बन्धात दिलेले समर्थन वाचले. ते येथे थोडी काटछाट करुन देत आहे त्यावरून त्यानी माफीपत्रे का लिहिली ते कळेल. शिवाजीराजानी आपली आग्र्याहून सुटका करून घेण्याचे कारण म्हणजे त्याना ठाऊक होते की तुरुंगात बसून मराठी राज्य नेत्याविना पुढे जाणार नसल्यामुळे कोणत्याही मार्गाने आधी सुटका करून घेणे जरुरीचे होते म्हणून महाराजांनी शक्कल लढवून आपली मुक्तता करून घेतली. >>

--------- दोन्ही वेळसचा काळ आणि परिस्थिती अगदीच भिन्न आहे. अशी बरोबरी / तुलना करणे शिवाजी महाराज यांच्यावर घोर अन्याय करण्यासारखे आहे.

शिवाजी महाराज यांनी अंधकारातुन... अक्षरश: शुन्यातून मराठी साम्राज्याचे विश्व निर्माण केले होते, त्याला जन्म दिला होता, आणि मोठे केले होते. लाखो कोटी लोकांना केवळ त्यांच्या नावाने स्फुर्ती मिळते.
खुप उदाहरणे देता येतिल.... (१) शाहिस्तेखानाच्या लाख सैन्य असलेल्या तळावर अगदी तुटपुंज्या मावळ्यांच्या सोबतीने हल्ला केला त्यावेळी हल्ल्याचे नेतृत्व स्वत: केले, स्वत : भाग/ पुढाकार घेतला होता. (२) अगडबंब अफजलखानाला भेटायला स्वत: सामोरे गेले... (३) सर्वात मोठा जुगार आग्रा येथे जाण्याचा ते खेळले... (सोबत संभाजीराज्यांना नेणे म्हणजे त्यांच्या धाडसाची कल्पनाही करवत नाही - संभाजीराजे भविष्यातले नेतृत्व होते आणि म्हणुन धोका अजुनच जास्त होता) (४) कोंडाणा सोडवण्यासाठी स्वत: पुढाकाराने जाणार होते... पण तानाजींनी मोहिमेवर जाण्याचा हट्ट धरला. (५) पन्हाळ्याचा कडेकोट वेढ्यातुन सहिसलामत बाहेर पडले... पुढे प्रसिद्ध पावनखिंडेच्या लढाईत बाजी प्रभूंनी जिवाची बाजी लावली... पण विशाळगडावर चढण्यासाठी लढाईला सामोरे जावेच लागले.... शेकडो लढाया खेळले, साल्हेर - मुल्हेर तर मोकळ्या मैदानात. प्रत्येक आणि प्रत्येक लढाईत स्वत: पुढे राहुन नेतृत्व केले. दर दिवशी आपला जिव स्वराज्यासाठी धोक्यात घातला होता. आणि प्रत्येक वेळी ते यशस्वी झाले. सैन्याचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा विश्वास आणि आदर संपादन केला. सर्व काही मराठी साम्राज्यासाठी केले होते. त्यांच्या कार्यास शतश: प्रणाम.

<< सावरकरांनी ३०-ऑगस्ट-१९११, १४-नोव्हेंबर-१९१३, १९१७ आणि ३०-मार्च-१९२० असे चार वेळा माफीनामे सादर केले होते. >>
------ त्यांनी सात वेळा माफी मागितली आहे... म्हणुन काय फरक पडतो? पण त्यांच्या माफीची आग्रा- शिवाजी अशी तुलना हास्यास्पद वाटते आणि इतिहासाशी प्रतारणा करण्यासारखे आहे.

<< अर्थात तुरुंगातून सुटका झाल्यावर ते स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी त्यांच्या प्रयत्नांचे तंत्र बदलले आणि आपले कार्य चालूच ठेवले. सावरकरांच्या काळात जरी लोकनियुक्त नसले तरीही सरकार होते त्यामुळे सावरकरांना पुन्हा तुरुंगात डांबणे ब्रिटिशांना अगदी सहज शक्य होते - त्यामुळे आपले अस्तित्व टिकवून कार्य सुरु ठेवायचे असेल तर आधी कोणत्याही प्रकारे सुटका करून घेणे आवश्यक होते.
जर तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी आपले प्रयत्न सोडून दिले असते किंवा सरकारला सहकार्य केले असते तर मात्र ते माफीनामे म्हणजे शरणागती म्हणता आले असते. मात्र त्यांनी त्यांचे कार्य चालूच ठेवल्यामुळे त्यास शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमीकावा म्हणणे हे जास्त योग्य होईल. एबीपी माझाला हे समजले नसेल कारण पूर्वग्रहदूषित व्यक्तींना हे समजणे कठीण आहे आणि समजले तरी मान्य करता येणे नक्कीच कठीण आहे. >>
-------- त्यांनी समाजोपयोगी कामे केलीत. काव्य नाटके रचली आणि समाजसेवा केली... त्यांच्या या कार्याबद्दल आदर आहे.

लिगच्या द्विराष्ट्र कल्पनेला त्यांनी पाठिंबाच दिला होता.... कर्झन वायलीच्या हत्येसाठी मदनलाल धिंग्रा यांना प्रोत्साहन दिले. आणि सर्वात क्लेशकारक म्हणजे महात्मा गांधी यांच्या हत्येमधे त्यांचा पुर्ण सहभाग होता. ते हत्येच्या कटातले एक आरोपी होते. येथे शस्त्र स्वत: नाही पण नथुराम गोडसे याला चालवायला उत्तेजित केले. हत्येच्या आधी सर्व आरोपींनी सावरकर सदनावर भेट घेतली होती (आधी पण भेटी होतच होत्या). "गांधी यांची शंभरी भरली..." "यशस्वी होऊन या " असा आशिर्वाद दिला होता.

गांधी हत्येमधे ते पुर्णपणे फसले होते. पुराव्या अभावी सुटले किंवा सबळ पुरावा पुढे आला नाही. त्याला अनेक कारणे असतील. वल्लभभाई पटेल यांना सावरकरांच्या कटातल्या सहभागाबद्दल खात्रीच होती.
"It was a fanatical wing of the Hindu Mahasabha directly under Savarkar that [hatched] the conspiracy and saw it through.” हे पटेलांनी नेहरु यांना लिहीलेल्या पत्रात आहे. सर्व माहिती / पत्रे उपलब्द आहे.
https://www.thehindu.com/profile/author/A-G-Noorani/

सरदार पटेलांची पत्रे (१० खंड) सहज उपलब्द आहेत.
https://ia801406.us.archive.org/11/items/sardar_patels_correspondence_vo...
pdf मधे पान क्र. ५६ चे पान आहे, ३९ क्र. पत्र.

निशस्त्र माणसाची हत्या करणे चुकच आहे. पण येथे ते कार्य नथुरामा करवी करवुन घेतले. स्वत: नाही केले (त्यांनी केले असते तर चालले असते का असा प्रश्न विचारु नका... कुठल्याही काळा निशस्त्र व्यक्तीची हत्या निंदनीय आहे) ... तर दुसर्‍याला सांगीतले. कटात सर्वांनीच अडकायला हवे असे नाही आणि कटाचा भाग म्हणुन सर्व जबाबदारी नथुरामाने स्वत: च्या शिरावर घेतली होती. गुरुचे नाव पुढे आणले नाही.

गांधी हत्या (जानेवारी १९४८)... कर्झन वायली (लंडन १९०९ )... जॅकसन (नाशिक १९१०).... अर्नेस्ट हॉटसन हत्येचा अयशस्वी प्रयत्न (१९३१).... प्रत्येक हत्येच्या वेळी इतरांना पुढे करण्यात आले होते आणि स्वत: मागे राहिले.

हुशार होते, वकृत्व छान होते... पण प्रत्येक जोखमीच्या वेळी इतरांना पुढे करत स्वत: मागे रहाणारी व्यक्ती... ?

उडी खरी तसा माफिनामाही खराच होता की
Submitted by चिवट on 9 July, 2019 - 16:04

हो, खराच होता. आम्ही कुठे म्हटलं खोटा होता म्हणून??? फक्त त्यामागची कारणमीमांसा समजून घ्या.
जर सावरकरांनी माफीनामा देऊन सुटका करवून घेऊन उर्वरित आयुष्य कुटुंबीयांसोबत मजेत घालवले असते किंवा ते परदेशात जाऊन 'ऐशारामात' जगले असते तर माफिनाम्यावरून हलकल्लोळ माजवणे योग्य ठरले असते, नाही का?

ऐशो आरामात जगले असते तरी चालले असते, बाजीराव , संस्थानिक सगळे तसेच करत होते, त्यांना कुणी काही म्हटले नाही

ऐशो आरामात जगले असते तरी चालले असते, बाजीराव , संस्थानिक सगळे तसेच करत होते, >>>>>> प्लीज ! आपला मुद्दा पटवताना सावरकारांच्या देशभक्तीचा विसर पडू देऊ नका.

मी तसे कुठे म्हटले? सावरकर देशभक्त व समाजसुधारक होतेच , नन्तर त्यांना महाराष्ट्रात किमान आमदार तरी करायला हवे होते, इतिहास , शिक्षण वगैरे खाती त्यांना द्यायला हवी होती,
ते महाराष्ट्रापुरते अटल बिहारी तरी झाले असते व त्यांचा स्वातंत्रयोत्तर काळ जनतेच्या प्रगतीत गेला असता, ते देशव्यापी राजकारणीही झाले असते.

बाकी गांधीहत्या, आरोप, जेल , तसे तर अट्टल गुन्हेगारही आमदार होतात, आणि सावरकर तर दोषमुक्त सुटले होते

>>> ऐशो आरामात जगले असते तरी चालले असते, बाजीराव , संस्थानिक सगळे तसेच करत होते, त्यांना कुणी काही म्हटले नाही >>>

त्यांचं आडनाव गांधी/नेहरू असतं तर ते सुद्धा ऐशो आरामात जगले असते आणि त्यांचं कौतुक होऊन बरेच पुरस्कार मिळाले असते.

ज्या देशात गांधी सारख्या जगन्मान्य नेत्याचीही चेष्टा होते तेथे बाकीच्याची काय कथा.जाउ द्या म्हणुन सोडुन दयायचे.

Pages