पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.loksatta.com/desh-videsh-news/why-pakistan-take-one-half-mon...

अय्यो रामा, कितीदा तोंडावर आपटले तरी मेरी मुर्गीकी एकहीच टांग अशा लोकांना जमले तर ही लिंक बघावी. लोकसत्ताची आहे बरं का. तरी बरे बीबीसी वाले परत घुसलेत इथे.

<<<<<एअर स्ट्राइकच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकारांना घटनास्थळी का जाऊ दिले नाही? एअर स्ट्राइकनंतर नवव्या दिवशी सुद्धा रॉयटर्सच्या पत्रकारांना घटनास्थळी जाण्यापासून का रोखण्यात आले ? जर नुकसानच झाले नाही मग पाकिस्तान इतके दिवस काय लपवत होता ? या प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानकडे आहेत का? एअर स्ट्राइकबद्दल संशय घेणारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे या विषयाच्या मूळाशी जाणार आहेत का? हा मूळ प्रश्न आहे.

पाकिस्तानने ज्या पत्रकारांना घटनास्थळी नेले होते त्यांना स्थानिकांशी जास्त वेळ बोलू नका असे निर्देश दिले होते. बीबीसीच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर बाजवा यांना इथे आणण्यासाठी इतका उशीर का केला ? असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी वेळ मारुन नेणारे उत्तर दिले. घटना वेगाने घडत होत्या आणि परिस्थिती तणावग्रस्त होती, त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही असे बाजवा यांनी सांगितले. पत्रकार जेव्हा स्थानिकांशी बोलत होते त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचे अत्यंत बारीक लक्ष होते असे बीबीसीच्या पत्रकारनेच म्हटले आहे.

पाकिस्तानने भले आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना बालाकोटच्या जाबा टेकडयांची सफर घडवली असेल पण त्यांच्याकडे ४३ दिवस का लागले ? या प्रश्नाचे उत्तर नाही. पत्रकारांना जो मदरसा दाखवण्यात आला तो अत्यंत दुर्गम भागात आहे. पत्रकार हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर दीड तास पायपीट करुन जाबा टेकडीवर पोहोचले. मुख्य नागरीवस्तीपासून हा भाग खूप दूर असल्यामुळे दहशतवादी प्रशिक्षणासाठी ही अत्यंत योग्य आणि मोक्याची जागा आहे. त्यामुळे तिथे जैशचा दहशतवादी तळ होता हा भारताचा दावा शंभर टक्के खरा आहे. उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करुन आपली क्षमता दाखवून दिली. दहशतवाद्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले. एअर स्ट्राइकवर संशय घेणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.>>>>>>>> या बातमीत अश्श पण म्हणलयं बरं का !

चला आता शोधक समितीच्या अध्यक्षांनी ताबडतोक कामाला लागुन ही पण लिंक व बातमी खोटी आहे हे सिद्ध करायला मेहेनत घ्यावी अशी मी त्यांना इनम्र इनंती करत आहे.

अरे बापरे ! एव्हढे सगळे लोक्स इन्दिरा कोन्ग्रेसचे बाप होते अस तुम्हाला म्हणायचय का?>> काही शंका वाटतेय का..? Biggrin

तुमच्याकडे तसेही बाप नाहीतच म्हणा.. जे कोण होते ते सगळे एकजात बुळचट...! Proud

काही शंका वाटतेय का..?

अजिबात नाही... अनेक बाप असले की कसा प्रोब्लेम होतो तो कोन्ग्रेसच्य रुपाने दिसतोच आहे. नेहेरुना त्या लिस्ट मध्ये तुम्ही जागा दिली नाही याच आश्चर्य वाटल म्हनुन विचारल ?

तुमच्याकडे तसेही बाप नाहीतच म्हणा.. जे कोण होते ते सगळे एकजात बुळचट... >>> याचा अर्थ कळला नाही. नक्की कुणाबद्धल हे आहे?

why hate nehru?

नवीन Submitted by उदय on 11 April, 2019 - 17:01
>>
चला गाडी फिरून टेसनात आलेली हाय... आमची गाडीबी आम्ही फिरून टेसनात आणतो.

नेहेरु काय आता निवडणुकीला उभे राहात नाहीत. राफूल गांधी व प्रियांका वद्रा यांच्याबद्धल लिहिण्यासारखं काही आहे काय? कर्तृत्व , कामकाज, १५ वर्षांतील विकासकामे, अमेठीतील समस्यांविषयी संसदेत विचारलेले प्रश्न वगैरे वगैरे ?

याचा अर्थ कळला नाही. नक्की कुणाबद्धल हे आहे?>> स्वा.सं.पा.भा. करुन बसलेल्या समस्त नेभळटांचे गुणगाण करणार्‍या बुळचट लोकांबद्द्ल Proud

मंडळी भयसटल्यामुळे कोणत्या धाग्यावर काय लिहावे याचे भान विस्रु लागलि आहे. हा धागा विषय बघा. नेहरुबद्दल गळा काढायला एक धागा काढायची छाती नाही ह्यांची तरि विनंती करतो, आव्हान समजा पाहिजे तर, एक नेहरु बॅशिंगसाठी धागा काढा वेगळा.

मुळ राष्ट्रीय काँग्रेस शी असा आताच्या काँग्रेस चा काही संबंध नाही .
मुळ पक्षात बंड करून इडिराजी नी स्वतःचा काँग्रेस i हा पक्ष काढला .
तो हा आत्ताच काँग्रेस पक्ष हे फुकटच श्रेय घेत आहेत.
येवू नको तर कोणती गाडी पकडू आशि आपल्यात म्हण आहे ना त्या प्रकारे

राष्ट्रीय कॉंग्रेस मधील ज्या नेत्यांनी स्वतंत्र संग्रामात भाग घेतला त्यातील किती जणांची मुले , नातवंड आताच्या कॉंग्रेस पक्षात आहेत .
आता जे नेते आहेत कॉंग्रेस मध्ये ते सर्व उपरे आहेत .काही ठराविक सोडून .
ज्या गांधीच nav घेवून पोट भरता त्यांचे वारस सुधा कॉंग्रेस मध्ये नाहीत .

म्हणजे आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधुन जी फौज भाजप मधे आली ती मूळ काँग्रेस लोकं आहेत तर..!! Wink

काय दिवस आलेत बघा.. भाजपेयिंना मूळ भाजपेयी उमेदवार मिळेनासे झालेत.. काळाचा महिमा दुसरं काय..!! Proud

1952 च्या पहिल्या निवडणुकीचे poster bbc न्यूज़ वर बगीतल तेव्हा कॉंग्रेस च निवडणूक चिन्ह बैलजोडी होते .
आणि poster वर हिंदी आणि उर्दू भाषेचा वापर केला होता delhi मध्ये .

आगांतूक भटक्या कुत्र्यांना ज्या समारंभात कुठलेही स्थान वा आमंत्रणही नसते; तिथे घुसून वा घावत जाऊन वेडाचार करणे म्हणजे बोवाळणे होय. कुत्र्यांची नेमकी तशी अवस्था गावातल्या समारंभाच्या दरम्यान असते. अलिकडल्या पुरोगामी राजकारणात नगण्य वा निकामी होऊन गेलेल्या अनेकांना तशी स्थिती आलेली आहे. मग ते वेगवेगळे मुखवटे लावून किंवा पत्रके घोषणा देऊन आपल्या दिशेने लक्ष वेधुन घेण्याची जी केविलवाणी धडपड करतात. तेव्हा ते आजीचे शब्द आठवतात. कालपरवा स्वत:ला कला्वंत म्हणवून घेणार्‍या सहाशे मंडळींनी बोवाळण्याचा उद्योग साजरा केला. लोकांनी मोदींना किंवा भाजपाला मते देऊ नयेत, किंवा पुन्हा सत्तेत आणू नये असे आवाहन करणारे पत्रक त्यांनी काढलेले आहे. मुळात त्या यादीतली अनेक नावे बघितली तर प्रथमच कळते, की तेही कलावंत आहेत. अन्यथा त्यांना कशासाठी कलावत म्हणायचे, असा प्रश्नच पडेल. कुठल्याही सरकारी योजनेतील लाभ उठवण्य़ासाठी जशी बोगस लाभार्थींची यादी बनवली जाते, तशाच ह्या सह्या आणि त्यातले आवाहन आहे. यापैकी कोणालाही मैदानात उतरून मोदी वा भाजपाला मत देऊ नका, असे सांगण्याचा लोकशाहीत पुर्ण अधिकार आहे. पण कशासाठी त्या पक्षाला वा नेत्याला मत देऊ नये, त्याचाही खुलासा करता आला पाहिजे. तुम्हाला तुमचे मत देण्याचा अधिकार आहे, तसाच सामान्य मतदाराला आपले मोदीविषयक वा भाजपाविषयी मत बनवून मत देण्याचा अधिकार आहे. त्यात हे दिडशहाणे पत्रक काढून हस्तक्षेप करीत नाहीत काय? ज्या मतदाराने अमूक नेता वा पक्षाला आपले मत देऊ नये असे तुम्हाला वाटते, त्याचा तुम्ही समाधानकारक खुलासा व कारणही दिले पाहिजे. पण ह्या लोकांच्या एकूण गमजा बघितल्या तर त्यांना कला अथवा कुठल्याही विचारसरणीशी कर्तव्य नसून, मोदी वा संघाच्या द्वेषापोटीच त्यांचा हा बोवाळ चाललेला आहे. त्यात सुद्धा नवे काहीच नाही.
-भाऊ तोरसेकर

अनुपम खेरने अख्ख पिक्चर काढला , तेंव्हा हा भाऊ का भौ भौ करत नव्हता ?

सिने कलाकारही नागरिक आहेत , ते बोलून मत व्यक्त करतील नैतर छापून,

इतरांनी भौ भौ का करावे ?

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून डाव्या विचारसरणीचा अड्डा अशी ओळख बनलेल्या दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे धडे दिले जाणार आहेत. विद्यापीठात सावरकर अध्यसन केंद्र निर्माण केले जात असून या केंद्रामार्फत सावरकरांचे हिंदुत्व, राजकीय, सामाजिक भूमिका, विज्ञानवाद, गांधीविरोध यासह अनेक मुद्द्यांवर अभ्यास करता येईल. याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठात मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या अध्यसन केंद्राला डाव्या संघटना विरोध करण्याची शक्यता असून त्यावरून डावे व हिंदुत्ववाद्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

आणि poster वर हिंदी आणि उर्दू भाषेचा वापर केला होता delhi मध्ये .

उर्दू ही देशाची अधिकृत भाषा आहे,

तुम्ही संस्कृतमध्ये लिहा, माहिश्मती साम्राज्यमं नमस्ते नमस्ते

डाव्यांनी अजिबात विरोध करू नये. सगळ्या विचारांचा अभ्यास करायची मुभा असली पाहिजे. अफझल गुरूची श्रद्धांजली सभा ठेवू शकतात तर सावरकर यांच्या विचाराचे अभ्यास केंद्र नक्कीच असले पाहिजे. निवडक सावरकर हिंदुत्वाद्यांच्या सोयीपुर्ते सावरकर नको. लोकांकडून सामाजिक कार्यासाठी देणगी स्वरुपात मिळालेल्या रकमा ओळखीच्यांना व्याजाने देऊन पठाणी व्याज कमावणारे सावरकर पण अभ्यासले पाहिजे..

आणखी एक नाट्यछटाकार लोकसत्ता फडकावीत आल्या आहेत. यांनाही इतरांचे संवाद आपण च ठरवून त्यावर तडतडबाजी करायची सवय आहे.
त्यांच्यासाठी पुन्हा एकदा
१. वायुदलाने केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल इथे कोणीही शंका घेतलेली नाही.
२. मारल्या गेलेल्या लोकांच्या आकड्यांबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यावर वायुदल प्रमुखांनीच असे आकडे सांगता येत नाहीत, असं म्हटलंय.
३. हल्ल्याबद्दल आंतरराष्ट्रीय माध्यमात जे लिहून येत होतं, ते पाकिस्तानच्या बाजूचं का होतं? भारत सरकारचं मीडिया मॅनेजमेंट का कमी पडलं?
आता निर्मला सीतारामन यां नी विचारलेले प्रश्न आंतरराष्टीय मीडियात का आले नाहीत?

भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या हद्दीत शिरून लक्ष्यावर हल्ला करायला समर्थ आहे, हे सांगायला मोदी आणि सीतारमन यांची ग रज नाही. मोदी तर उलटच म्हणालेत. प्रश्न आहे त्याबद्दलच्या गाजावाजाबद्दल. देशांतर्गत विरोधकांना त्यावरून लक्ष्य करताना, आंतरराष्ट्रीय माध्यमांत काय चित्र आहे (पुलवामा हल्ल्यानंतर सगळेच भारताच्या बाजूने होते, तसं बालाकोटनंतर होतं का?) याची फिकीर नव्हती. कारण हे सगळं मुळात देशातल्या मतदारांना दाखवण्यासाठीच केलं होतं. त्यावर प्रश्न विचारणार्‍यांना देशद्रोही, पाकप्रेमी ठरवायचं हाच बेत होता.

भाजपचे प्रधान प्रचारक पुलवामा हल्ल्यातल्या बळींच्या नावे मतं मागताहेत. तसं ते करणार हे लिहिल्यावर अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या हो त्या की सैनिकांचे जीव इतके स्वस्त आहेत का? अभिनंदन प्रकरणीच्या मोदींच्या वक्यव्यातून तेच सिद्ध झालंय की पक्षीय राजकारणापुढे यांना सैनिकांच्या जिवा ची पर्वा नाही.

उनके ६०० हमारे ९००!! बुडबुड्या , भौ ला इचारा आता काय म्हन्नं??

उर्दू ही देशाची अधिकृत भाषा आहे,

एकदा उर्दू भाषिक लोकांना स्वतंत्र देश दिल्यावर .उर्दू ही भारताची अधिकृत भाषा कशी असू शकते .आणि 1952, मध्ये तशी मागणी सुधा उर्दू भाषिक लोकांनी केली नसणार
हा सर्व काँग्रेस चा खट्याळ पना आहे .

माजे उत्तरात कोठेच कोणा विषयी द्वेष नाही तुम्ही काही ही शोध लावू नका
माजे उत्तर व्यवहारिक आहे .आणि ते योग्य आहे

राजेश तुम्हाला अभ्यासाचे वावडे आहे. फक्त द्वेष आणि निर्बुद्धपणा भरलाय तुम्च्या डोक्यात. आपल्याच देशाचा इतिहास भूगोल संस्कृतीचा शष्प पत्ता नै ह्या माणसाला. ह्यांच्या गावातली कचरा गाडी घंटा वाजवत येत असेल तेव्हा हे नक्कीच लपून बसत असतील. म्हणून वाचलेत आजवर..

Pages