पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मायबोली वरच्या तमाम नमोरुग्णांची अवस्था मे मध्ये निकाल लागल्यानंतर खरोखरच वाईट होणार आहे. आजारपण तीव्रतेने उफाळून येणार आहे. त्यात प्रामुख्याने मूळव्याध,बद्धकोष्ठ,स्किझोफ्रेनिया,गळू,हृदयविकार या आजारांचा समावेश असेल.
भारतात रहात असतील तर ठीक आहे. पण दुसऱ्या कोणत्या देशात रहात असतील तर उपचारांचे खर्च परवडणार नाहीत. त्यांनी मे नंतर आयुष्मान भारत योजनेत उपचार करून घ्यावेत हि सूचना देऊन ठेवत आहे.

हे बघा लखुजी रिसबुडजी.....
"कोट्यावधी लोक ठरणार अपात्र."

मोठा गाजावाजा करत "आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना" लाँच केली खरी; पण तिच्यापासून तुम्हाला पद्धतशीर कसं लांब ठेवता येईल याची हि पुरेपूर काळजी या नर्मदेच्या गोट्या ने घेतली आहे.
▪️तुमचा पगार 10,000 ₹ पेक्षा जास्त नको.
▪️तुमच्याकडे फ्रीज नको.
▪️2.5 एकराच्यावर बागायती जमीन नको.
▪️7.5 एकर शेतजमीन आणि सिंचन उपकरणे नको.
▪️मच्छीमार बोट नको
▪️लँडलाईन टेलिफोन नको.(नशीब स्मार्टफोन ग्राह्य आहे.)
▪️दुचाकी-तीनचाकी-चारचाकी नको.
▪️ शेतकऱ्यांकडे 50,000 ₹ हुन अधिक रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड नको.
▪️इन्कम टॅक्स-सर्व्हिस टॅक्स भरणारे नको.
▪️कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नको.
मग तुम्ही हि सेवा देणार तरी कोणाला????

इतका yz पीएम माझ्या आत्ता पर्यंतच्या आयुष्यात मी पाहिला नाही..!!
ढोपर हुंग्यानो एवढी सुद्धा अक्कल नाही तुम्हाला.
इकडं गाड्यांच्या शोरूम वाले पानभर जाहिरात लावत आहेत पेपरात 5000 ₹ भरा आणि दुचाकी घेऊन जावा.आता घरा घरात दुचाकी आहेत, फ्रीज आहेत. 7-8 हजारावर कंत्राटी काम करणारा कामगार सुद्धा सर्व्हीस टॅक्स देतो. शेतकरी कष्टकरी कर्ज काढून जमीन बागायती करतो आहे.
किसान क्रेडिट कार्ड तुम्हीच वाटलेत,
म्हणजे तुमच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांनी खितपत च पडायचं...!
त्यांचं राहणीमान सुधरावायचच नाही.

जनता जनार्दन माय बाप हो हात जोडून कळकळीची विनंती करतो...
या बाजार बुणग्यांच्या खोट्या जाहिरातीला बळी पडू नका..!

मोठा गाजावाजा करत "आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना" लाँच केली खरी; पण तिच्यापासून तुम्हाला पद्धतशीर कसं लांब ठेवता येईल याची हि पुरेपूर काळजी या नर्मदेच्या गोट्या ने घेतली आहे.

हे वरचे खरे आहे का ?

सामान्यतः आपण ज्या फॉरवर्ड च्या आधार कोकलतो त्यालाच लगेच खाली जाऊन "हे खरे आहे का ?"
असा प्रचंड बुद्धिमतेचे प्रदर्शन घडवणारा प्रश्न विचारात नाही.
मोगाखान यांना या बाबतीत पास !

हे वरचे खरे आहे का ?

तुम्ही अती बुद्धिमान असल्याने तुम्हाला प्रश्न विचारला.

पुलवाम्यासारखा अजुन एक हल्ल झाल्यास त्याचे गंभिर परिणाम पाकला भोगावे लागतील असे अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांचे वक्तव्य...

https://www.rediff.com/news/report/another-attack-on-india-will-be-extre...

अशा इशार्‍याने काय साध्य होणार आहे?

दोन देशांमधे तणाव वाढवणार्‍यांना यातुन एक प्रकारचे प्रोत्साहन (तुम्ही असे कराच...) मिळते असे मला वाटते. दोन देशात युद्ध सदृश परिस्थिती कायम राहिल्यास किंवा युद्ध झाल्यास त्याचा आंतरराष्ट्रिय शस्त्र विक्री व्यावसायावर चांगला परिणाम होतो. युद्ध झाल्यास दोन्ही देशांचे मोठे नुकसान आहेच पण त्याचा फायदा तिसर्‍याला होणार आहे.

>>>> सामान्यतः आपण ज्या फॉरवर्ड च्या आधार कोकलतो त्यालाच लगेच खाली जाऊन "हे खरे आहे का ?"
असा प्रचंड बुद्धिमतेचे प्रदर्शन घडवणारा प्रश्न विचारत नाही.

Rofl

हे जे आत्मघातकी हल्ले किंवा इस्लाम न मानणाऱ्यांवर हल्ले होतात ती कृत्ये शरियत मध्ये 'हराम' मानलेली असावीत असं खालील लिंक वाचून वाटलं. ही एका काश्मिरीच्या timeline वर शेअर केलेली मिळाली मिळाली. (Fb वर एका ग्रूपवर बरेच काश्मिरी आहेत). खूप मोठं असल्याने पूर्ण वाचले नाही, पण जेवढं वाचलं त्यावरून अश्या प्रकारच्या हल्ल्यांना जिहाद म्हणून मान्यता नसावी. हे जर खरे असेल तर जिहादच्या नावाखाली हल्ल्यांस प्रवृत्त करणारे इस्लामच्या नावावर पिढ्या बरबाद करत आहेत.

https://www.facebook.com/222737991070768/posts/2275310085813538/

पाकचे F-16 पाडल्याची बातमी खरी नाही आहे असे अमेरिकन्स म्हणत आहेत. सर्व F-16 विमानांची गणती झालेली आहे, आणि ते सर्व सुरक्षित आहेत. मग आपण काय पाडले आहे?

https://www.rediff.com/news/report/us-count-of-paks-f-16s-contradicts-in...

आपण काय पाडले हे आपल्या सैन्यप्रमुखांनी सांगितले. आपल्या भागात पडलेल्या क्षेपणास्त्राचे तुकडे दाखवले.
आता त्यांच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा?

की तेही मोदींचे ऐकून बोलतात? ___/\____

<< की तेही मोदींचे ऐकून बोलतात? >>
------ मोदी आणि टिम खोटे बोलण्याच्या बाबत पटाईत आहे. या आधी CBI, ED चा विरोधकांना नेस्तनाबुत करण्यासाठी व्यावस्थित वापर केला गेला आहे. मग सर्जिकल स्ट्राईक I (Sept. २०१६) पहिल्यांदाच झाला आहे, केला आहे असे लष्करी प्रवक्त्याला जाहिर करायला भाग पाडले. हे असे जाहिर होणे पहिल्यांदाच घडले होते. त्या मागचा हेतू असा होता, "या आधीची सरकारे संरक्षण दलाच्या पाठिशी नव्हती, पण आता राजकीय बळ पाठिशी आहे आणि सरकार 'कणखर' आहे".

नुसते जाहिर करणे आणि जनतेला माहिती देणे असा शुद्ध हेतू असता तरी संशय आला नसता. पण जाहिरात, मोठी जाहिरात.... जाहिरातीचा अतिरेक (overhype) एव्हढा झाला का हा स्ट्राईक ज्या लेफ्टनंट जनरल च्या मार्गदर्शना खाली झाला त्याने निवृत्त झाल्यावर नापसंती व्यक्त केली.
अतिरेक्यांचे लाँचिंग पॅड सिमेपासुन अगदी १.५ कि मी एव्हढ्या जवळ आहेत हे जगाला पहिल्यांदाच समजले.

विरोध करणार्‍यांनी काही शंका उपस्थित केल्या तर त्यांना पाकचे हस्तक हिणवायचे, विरोधक लष्कराबद्दलच शंका घेत आहेत असे जनतेच्या मनावर बिंबवायचे. म्हणजे प्रश्न सरकारला, शंका सरकारच्या हेतूं बद्दल पण.... राजकीय विरोधकांना नामोहरम करायला तो ब्लेम लष्करा कडे वळवायला ह्या सरकारने मागे पुढे पाहिले नाही.

मग पुलवामा घडले, पुढे ते विसरण्यासाठी बालकोट जेणे करुन लोकांनी पुलवामाची चर्चा करु नये. ३०० किलो स्फोटके आलीच कशी? बालकोट (सर्जिकल स्ट्राईक II) नंतरची वक्तव्ये, दावे तर करमणूक करतात. ३०० अतिरेकी ठार, ३०० मोबाईलस बंद... अपरिमीत हानी, घर मे घुसके मारा... मृतांची मोजदाद अजुनही (मार्च २०१ ९) सुरु आहे'... प्रत्यक्षात भूकंपा नंतरची छायाचित्रे फोटोशॉप झालेली आहेत. आपण हल्ला केला आहे, त्यांचे नुकसान केले आहे, झाले आहे असे मानायचे.

हजार हजार किलो ची स्फोटके टाकल्यावरही जमिनीवर कुठल्याही हालचालींची नोंद नाही, जखमींना / मृतांना दवाखन्यात नेण्यासाठी धडपड नाही... सर्व काही शांत शांत.

हे सर्व उपाय करुनही कणखर पणा सिद्ध झाला नाही... मग आता काय राहिले आहे ? अरे हो.... ते सॅटेलाईटस नष्ट करायचे तंत्र अजुन आपण 'सिद्ध ' केलेले नाही. आधीच्या सरकारांनी परवानगीच दिलेली नव्हती.... काल पर्यंत CBI, ED चा पक्षिय स्वार्थासाठी वापर केला आज आपण एक पायरी पुढे जात DRDO/ ISRO... यांना पण मोकळे सोडले नाही.

<<आपल्या भागात पडलेल्या क्षेपणास्त्राचे तुकडे दाखवले. >>
------ दोन मुद्दे आहेत.
(अ) F16 पाडले
विमान नष्ट केले या दाव्यासाठी त्यांचे एक विमान कमी व्हायला हवे किंवा आपण विमानाचे काही मुख्य भाग दाखवायला हवेत.

(ब) त्यांनी F16 चा भारता विरुद्ध वापर केला.
क्षेपणास्त्राच्या तुकड्यां वरुन आणि अशी क्षमता केवळ F16तच असेल तर... F16 चा भारता विरुद्ध वापर केला असे म्हणता येते. पाक तसे राजरोस पणे करु शकत नाही, मर्यादा आहेत आणि पण करणारच नाही असेही नाही. अमेरिका नाही तर आम्ही चीनकडे जाणार असे ते दर काही काळानंतर म्हणतात.

https://m.hindustantimes.com/india-news/not-aware-pentagon-on-pak-f-16-c...
आपण विमानं मोजली बिजली नाहीयेत असं अमेरिकन स्टेट डिपार्टमेन्ट म्हणतंय. त्यांनी २०१८ जानेवारीपासूनच पाकिस्तानला सिक्युरिटी assistance देणं बंद करून टाकलंय. आणि अमेरिकेची आताची भूमिका भारताशी सुसंगत आहे.
भारतीय एअरफोर्सवर ज्यांचा विश्वास नाही त्यांना कोण काय समजावणार!

मला एकच वाटत चीन मसूद प्रेमा प्रेमापोटी मसूद चा बचाव करत नाही तर स्वहित जपण्यासाठी करतोय
आणि आता अमेरिका सुधा तेच करतेय .
आपण भारतीय म्हणून स्वहित (देशाचे ) जपण्या साठी आपल्या च सरकारच समर्थन केले पहीज्र

उदय, तुमची भलीमोठी पोस्ट वाचून इतकेच कळले की तुम्ही भारतीय सेनेवरही विश्वास ठेवत नाही. असो.

सरकारच्या हलगर्जीमुळे हकनाक ४५ जवानांचे जीव गेले, अजूनही हल्ले चालूच आहे , तरीही सरकारचे समर्थन करायचे? का बरं रा...ज्जा?

तुम्ही भारतीय सेनेवरही विश्वास ठेवत नाही. >> विरोधक लष्कराबद्दलच शंका घेत आहेत असे जनतेच्या मनावर बिंबवायचे.

बघा, हा घ्या पुरावा, उदयच्या पोस्टमधील मुद्द्याचा. Lol

<< उदय, तुमची भलीमोठी पोस्ट वाचून इतकेच कळले की तुम्ही भारतीय सेनेवरही विश्वास ठेवत नाही. असो. >>
---- साधना ताई... माझा भारताच्या सेनेवर पुर्ण विश्वास आहे.

पण मोदी- शहा- योगी यांच्यापैकी कुणाच्याही वक्तव्यावर अजिबात विश्वास नाही... कारण ते सतत खोटे बोलतात, नेहेमीच गुंडाळतात.

विमान नष्ट केले या दाव्यासाठी त्यांचे एक विमान कमी व्हायला हवे किंवा आपण विमानाचे काही मुख्य भाग दाखवायला हवेत.
उदय ह्यांना मोदी द्वेष आहे हे समजू शकतो पण भारतीय लष्करावर पण संशय म्हणजे चापलुसी कोचिंगचे मालक आहे असे दिसतंय ..
ह्यांना कदाचित पत्रकार परिषद समजली नाही किंव्हा काय ते समजून घ्या ..
ह्या अश्या लोकांना नकीच पुढच्या वेळेस विमानाला बांधून घेऊन गेले पाहिजे

विमान भारताच्या हद्दीत पडले असा कोणी दावा केलाय का कि तुकडे दखवायला , भारताने हि सांगितले आहे कि आम्ही रडार वर बघितला कि फ १६ विमान होते आणि दुसरा कि त्यांनी रेडिओ मेसेज पकडला आहे शत्रूचा ..पण ह्या असा वाटतंय कि भारतचे लष्कर खोटा बोलतय ..तुम्ही जाऊन खात्री करून ह्या मग ..आमचा आमच्या देशाच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे ..

Pages