होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाणघोड्याच्या अपमानाबद्दल समस्त पाणघोड्यांतर्फे फुररर्रSSSSSSSSSSSSSS दिशी निषेध.
----------------------------------------------------------------------------------------------------------
होणार सून मी या घरची या मालिकेवरील मायबोली डॉट कॉम या साईटवरील चर्चेत एका प्रतिसादकाने जान्हवी नामक पात्राची पाणघोड्याशी तुलना केल्याबद्दल जागतिक पाणघोडा संघतनेतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे.

पाणघोडी डी दूरान्वयेही जान्हवी इतकी बावळट आणि बापुडवाणी दिसत नाही. त्याचप्रमाणे आम्हांला असले विस्मृतीचे झटकेही येत नाहीत. आम्हांला कितीही वर्षांनी आपला पाणघोडा कोणत्याही डबक्यात डुंबत असला तरी बरोबर ओळखता येतो.

आमच्याकडे होणार सून आणि रेगा या दोन सिरीयलना काहीही बोललेले साबांना चालत नाही. परवा मी म्हटलं की जान्हवीची स्मृती गेलेय ते किती unrealistic दाखवलंय सगळं तर म्हणाल्या की छे छे unrealistic काही नाहीये त्यात. असं real life मध्ये पण होतं. तो Michael schumacher नाही का तुमचा कोमातून जागा झालाय..तसंच आहे ते!

मालिका सध्या फारच बिकट वळणावर.
जान्हवी आता श्रीची फक्त एक मैत्रीण आहे. रोज बस थांब्यावर भेटून श्री जान्हवीला परत त्याच्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. (स्वतःची गाडी असताना श्री बस थांब्यावर का येतो, हा प्रश्न अजून जान्हवीला कसा पडला नाही, असा प्रश्न मला पडला होता तेव्हा. ) श्रीच्या घरात रोज एकजण जान्हवीच्या विरहात झुरून-झुरून कपाळाला आट्या पाडून उदासपणे बसून राहतो, आणि बाकी उरलेल्यांपैकी काही जण त्याची समजूत घालत बसतात. सगळ्या सासवांनी जान्हवीची एकेकदा भेट घेऊन फुटेज खाल्ल. (आणि एपिसोड सुद्धा खाल्ले ! ) घराच्या बायका श्रीने जान्हवीला सगळ स्पष्ट सांगून घरी घेऊन यावं, असा सल्ला देत त्यांना बुद्धी असल्याचं दाखवून देतात. पण आज्जीबाई मात्र सगळी कडे आडकाठी लावतातच.

इकडे जान्हवीला तिच्या विस्मरणाबद्दल थोडीशी जाणीव होत आहे. तिच्या मैत्रिणीशी बोलताना ती तसा उल्लेखही करते. तिच्या वडीलान बरोबर बोलतानाही अश्या आशयाचे काही संवाद म्हणते.
जान्हवीने आपटेशी लग्न कराव म्हणून हळहळणार्या शशिकलाबाईला जान्हवी लग्नाबद्दलं नकार देते. (स्मृती गेल्यावर माणसांचे विचार पण बदलतात???)

श्री बाळ आता जास्त रडतं नाही.
------------------------------------------
पुढे,
देवळात आज्जीबाई आणि जान्हवी आमने-सामने.....

कालचा भाग पहिला बऱ्याच दिवसांनी …. पाहू शकले Happy … जान्हवी प्रथमच स्वतः च्या आई ला आपटे शी लग्न करणार नाही म्हणून ठामपणे सांगते हे चांगलं वाटलं… नाहीतर ह्या मालिकेत स्पष्ट बोलायची सवय नाही कुणाला Happy

२७ तारखेच्या महाएपिसोडमध्ये त्या अनिल आपटे आणि शशिकला सहस्त्रबुद्धे यांचे (एकदाचे) लग्न लावुन द्या. त्या मनिष आणि गीताचेसुध्दा लग्न लाऊन द्या. बेबीची काहीतरी सोय झाली आहे हे आम्ही गृहित धरूच! जानू आणि तिचे बाबा आणि पिंट्या यांना समस्त गोखले कुटुंबियांसह (श्री, सहा सासवा, दोन सासरे) एका खोलीत कोंडून ठेवा. त्या मंदबुद्धी जानूला तिच्या डोक्यात सगळ्यांनी काठी मारून तिची हरवलेली स्मृती परत आणायचा प्रयत्न करा. (अंदाज अपना अपना). तरीही तिला नाही आठवले तर तर फोटो अल्बम दाखवुन तिला समजवायचा प्रयत्न करा. बाबांचे पायाचे ऑपरेशन आणि पिंट्याची काहीतरी सोय करा.
काहिही करां, पण, संपवा एकदाची हि मालिका!
महाएपिसोड शेवटचा एपिसोड असु द्या!

आता ज्या प्रकारे जान्हवीला स्मृती येताना दाखवत आहेत ते जास्त धक्कादायक आणि धोकादायक वाटते!! डॉक्टर आणि प्रियजनांच्या उपस्थितीत controlled environment मध्ये पेशंटला अशी गोष्ट समजणे कधीही अशा प्रकारे रस्त्यात अनोळखी लोकांसमोर गोंधळून जाण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले असेल. टीवी, सिनेमा मध्ये डॉक्टर, पोलीस, वकील वगैरे सगळ्या professionals चा पुरता पपलू करून टाकतात.

रीच्या घरात रोज एकजण जान्हवीच्या विरहात झुरून-झुरून कपाळाला आट्या पाडून उदासपणे बसून राहतो, आणि बाकी उरलेल्यांपैकी काही जण त्याची समजूत घालत बसतात. >>> Lol

जाह्नवी ची याद्दाश्त परत येउ लागली आहे का? मग परत बघायला पाहिजे ही सिरीज. मात्र याद्दाश्त ८-१० एपिसोड्स मधे मजल दरमजल करत परत येणार आहे का?

एका अत्यंत सुमार भुक्कड फालतु मुलीला किती डोक्यावर चढवून ठेवले आहे सगळ्यांनी. जान्हवीला काढून टाकणार असतील अजून ६ आया आणल्या तरी मी ही सिरिअल बघायला तयार आहे.

वमंदबुद्धी जानूला तिच्या डोक्यात सगळ्यांनी काठी मारून तिची हरवलेली स्मृती परत आणायचा प्रयत्न करा. (अंदाज अपना अपना). तरीही तिला नाही आठवले तर तर फोटो अल्बम दाखवुन तिला समजवायचा प्रयत्न करा.व???>>>>> हे फार आवडलं. Proud

मी या मालिकेच्या जाहिरातीच बघते ती जाह्नवी कित्त्त्त्त्त्त्त्त्त्त्ती इरिटेटेंग टोनमध्ये बोलते.

मात्र याद्दाश्त ८-१० एपिसोड्स मधे मजल दरमजल करत परत येणार आहे का?>>

त्यात काही वादच नाही..एका एपिसोड मधे परत आली तर मालिका पुढे कशी जाणार?

>>>>>> मात्र याद्दाश्त ८-१० एपिसोड्स मधे मजल दरमजल करत परत येणार आहे का?>>
.
>>>त्यात काही वादच नाही..एका एपिसोड मधे परत आली तर मालिका पुढे कशी जाणार?
.
महा एपिसोड नाही आहे का याचा?

मला कपडे शिवायचा प्रसंग जरा आवडू लागला होता की ते नाकावरचे ब्लॅकहेड्स आले.... वेस्ट ऑफ टाईम!! अन्‌ किती ओरडत होते बेबी नि तिचा भाऊ!! शी!!

अशोक मामा कुठे गेलेत?<<<

हा बहुधा अवांतर प्रतिसादासारखा प्रतिसाद आहे. अश्या प्रतिसादामुळे काही धागे वाहिल्याची उदाहरणे नुकतीच होऊन गेली.

Pages