होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या भागात कहर चालला होता. तो श्री रडत रडत सांगतोय जान्हवीला सांगणारा मी नव्हतो...
या वर किमान आश्चर्य दाखवणे अपेक्षीत होते ना...ती इंदुमती कुणीतरी मेल्यासारखा तोंडात पदर कोंबून रडत होती....
मी इमॅजिनल की दिग्दर्शक मागून कोकलतोय....अहो आश्चर्य दाखवा...आश्चर्य
मग बहुदा प्रसाद ओक आणि एका आईला ते ऐकू गेलं आणि त्यांनी अपेक्षीत भाव दाखवले...
इंदूवहिनी या सगळ्याच्या पलिकडे गेल्या असल्याने त्यांना काहीच फरक पडला नाही...

LOL

ती इंदुमती कुणीतरी मेल्यासारखा तोंडात पदर कोंबून रडत होती....
मी इमॅजिनल की दिग्दर्शक मागून कोकलतोय....अहो आश्चर्य दाखवा...आश्चर्य
मग बहुदा प्रसाद ओक आणि एका आईला ते ऐकू गेलं आणि त्यांनी अपेक्षीत भाव दाखवले...
इंदूवहिनी या सगळ्याच्या पलिकडे गेल्या असल्याने त्यांना काहीच फरक पडला नाही...>>>>:हाहा: जबरी! अरे फेसबुकावर परत पाठवा रे ही लिन्क. हे बेताल अभिनेते- अभिनेत्र्या किमान पुढे तरी प्रसन्गानुरुप अभिनय करतील.:फिदी:

तो पप्पु ( सरस्वतीचा होऊ पहाणारा नवरा) उर्फ डॉ. महीपाल उर्फ समीर चौघुले असा लालेलाल काड्यान्चा, खेळण्यातला वाटावा असा चष्मा का लावतो?

Rofl

appu kon? ....सरुला पहायला आलेला एक माणूस असतो तो....( मुलगा कसं म्हणणार ?)
>>>
ओह ओह!

अरे पण कोणीही सांगितलं तरी काय फरक पडतो? एवढा का कोकलतोय तो श्री म्हणे?

काही ही ह. रीया, अग तो श्री जानुचा नवरा नाहीये का? मग? आता हा नवीन धक्का तिला देऊन , तिच्या चेहेर्‍यावर्चे भाव, तिच्या मनीचे गुज त्याला वाचायचे, बघायचे होते. किती आटापिटा केला त्याने त्या करता.:फिदी:

त्या श्री बाळाने जानूला दाखवायला लग्नाची सीडी आणि अल्बम तयार ठेवला होता म्हणे. मग गेले दोन महिने झोपला होतास का रे? सीडी आणि अल्बमचे आत्ताच आठवले का? मग तुझा, तिचा आणि आमचा इतका वेळ कशाला घालवला?

काल २ मिनिट बघायला मिळाली तर त्यात कोणी एक माणून जान्हवीला सांगत होता कि तुम्ही मला ईमेल केली होती आणि त्यात तुमचं नाव 'सौ. जान्हवी श्रीरंग गोखले' असं लिहिलं होतं.. >>>> मी पण काल एवढेच बघितले. जान्हवीची स्मृती गेल्यापासुन मी बघणेच सोडुन दिले आहे पण माझी स्मृती अजुन शाबुत आहे असे मला वाटते. जान्हवीने लग्न झाल्यावर नाव बदललेच नाहिए, ती जान्हवी सहस्त्रबुद्धेच नाव लावते ना की मलाच काही आठवत नाहिए. Happy

अहो तो तुम्हाला आठवण करून देण्यास मदत करेल "जान्हवीने लग्न झाल्यावर नाव बदललेच नाहिए, ती जान्हवी सहस्त्रबुद्धेच नाव लावते ना की मलाच काही आठवत नाहिए" या बाबतीत!एवढेच!

हाईट आहे पण. ही जानू सोशल नाहीये का अजिब्बातच? तिला ओळखिचं अस कुणिच भेटत नाही जे सांगू शकतं के बाई तुझं लग्न झालं होतं इ? का फक्त ठरावि लोकच हिच्या ओळखिचे आहेत? की झाडून सर्वांना ताकिद दिली आहे? फाल्तू सिरियल. मी पहात नाहीच तशी ही.

बाय द वे रात्री ११ ला का रे दुरावा लागते त्यामुळे जुयेरेगात काय सुरू आहे ते कळत नाही.

जुयेरेगात काय सुरू आहे ते कळत नाही.>>> आदे-मेदे-माईचे सारखे सुस्कारे सोडणे चालूय. परवा की तेरवा तो फाटका चड्डी वाला आदित्य नगरकर तापाने फणफणला होता. आदे हॉस्पिटल मध्ये सतिशचा निरोप द्यायला गेला असताना, तो त्या फाच ला तिथे बेशुद्ध अवस्थेत पहातो. सिस्टर हाका मारत विचारते की याचे कुणी ओळखीचे आहे का, तर आदे ओळख देत नाही याचे त्याला स्वतःला वाईट वाटते मग तो घरी येऊन मेदेला सान्गतो.

दुसर्‍या एपि मध्ये दोघे दवाखान्यात जाऊन बघतात तर फाच नसतो, सिस्टर म्हणते, पैसे नाही म्हणून तो निघुन गेला. मग ते शोधायचा विचार करतात.

बाय द वे रात्री ११ ला का रे दुरावा लागते त्यामुळे जुयेरेगात काय सुरू आहे ते कळत नाही.<<<

कुठल्या वेळी कुठल्या शीर्षकाच्या मालिका लावायच्या ह्याचे बेसिक ज्ञानच नसते काहींना

आपण अतिशय सहजपणे, नैसर्गीकपणे, प्रत्यक्ष आयुष्यात लोक बोलतात तसे बोलत आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नांच्या अतिरेकापायी जान्हवी हे पात्र आता प्रत्येक शब्दानंतरच एक अर्ध्या क्षणाची गॅप घेऊन वाक्ये बोलत आहे. नुसतीच ही शैली कंटाळवाणी नाही तर त्यामागचा विचारही बदलण्याचे त्यांच्यापैकी कोणाला सुचत नाही आहे हे कल्पनादारिद्र्याचे लक्षण म्हणावे लागेल.

OMG

चार्र पोस्टी पाहून वाटलं इथे कुणी तरी आनंदाची बातमी (शिरेल संपण्याची लाश्ट डेट) वगैरे टाकलि की काय. पण हा छ्ळ इतक्या लौकर संपणार्‍यातला दिसत नाही.
तशी ही मी ही सिरियल पाहण्याचं बंद करून युगं झाली.

झी मराठीवर चालु असलेल्या सगळ्या मालिका बेकार आहेत. कोणती सर्वात रटाळ हे सांगणे कठीण आहे. जोपर्यंत नविन महा बेकार मालिका येत नाही तोपर्यंत आधीची बेकार मालिका झीवाले संपवत नाहित. Sad तिसरी गोष्ट संपल्यावर मी सुध्दा झी मराठी बघणे बंद केले.

काल त्या निलेश साबळे च्या कुठल्यातरी शो मधे..लीना भागवत, तीचा नवरा , ती जानी आणि शशांक केतकर आले होते...ती जान्हवी कसली भयाण हसत होती ..... कोणी तो एपी पाहीला असेल तर त्याला लक्षात येईल.... त्या मानाने लीना भागवत मस्त वाटली...अर्थात ती या क्षेत्रात फार वर्षा पासुन आहे.....आणि जानी अजुन नवीन असल्याने डोक्यात हवा भरलीये वगैरे वगैरे....

विनि.....अग मला ऑप्शन नाहीये ( सध्या काही दिवसांसाठी मी सासरी राहतेय ) ....साबा साबु आहारी गेलेत झी च्या...आणि जेवायला बसलेलो तेव्हाच नेमका हा एपी लागलेला... मग बघावाच लागला..... :रागः

नवीन नाटक येते आहे ... त्यासाठी आले होते लीना मन्गेश कदम आणि शशाक...
जानु येनार आहे हे कोनालाच माहित नव्हते ( ?) ...
मग श्री बाळ म्हनाले ... अरे .. तु इथे कशी ..... जानु - काहि हि हि हे तुझे ... Happy Happy

तीला बहुदा सान्गितले असावे .. तुला फक्त हसन्यासाठी इथे बोलावले आहे .. कारन काहि विचारले कि ति हसत हसत मग उत्तर देत होति... निलेश बिचारा वैतागला शेवटी ... Happy Happy

Pages