चारोळी

रात्र

पहिल्या ओळीत दहा शब्दाची अट आहे म्हणून हे वाक्य लिहित आहे. नेमस्तक, कृपया नोंद घ्यावी अशी विनंती.

दिवसाचे फुल कोमेजून
रात्रीची कळी उमलली;
मिटली निजेची पाकळी
चांदण्यांचे मोहर दरवळती

ओढ

श्रावणातली हिरवी तिन्हीसांज
ऊन-पावसाचा खेळ विसरली
निरभ्र आकाशाला चांदण्यांची
फसवी ओढ देऊन गेली...

तळे...

कमळपत्रांनी झाकले तळे
त्यावर तृषार्त वैशाख ओघळे
माध्यान्हीचे उन्ह पिऊन
कमळकळी दव निथळे

अस लिहाव

लिहीणार्‍याने लिहीत जावे वाचणार्‍याने वाचत जावे.
अस लिहाव की जणू मनाच फूलपाखरू कागदावर उतरतय.
अस वाचाव की जणू कोणी शब्दांचे फूलच हूंगतय.
एक वेळ अशी येईल की फूल आणि फूलपाखरू एकच होउन जाईल.

खेळ मनाचा

कुठेच काही खरतर
नसत कमी
पण काहितरी हरवतय
वाटतय मनोमनी
आता ह्याला काय म्हणावे....
अवस्था केविलवाणि
सांगेल का मला
ह्याच ऊत्तर कुणि?

मी ही चारोळी पोस्ट केली आणि...याचं उत्तर मला जयाच्या एका कवितेत मीळालं....