bee यांचे रंगीबेरंगी पान

कधी?

माझे हे डोळे
किती अतृप्त,
जसे हे आकाश
अथांग अन रिक्त

स्वप्नांची फुलपाखरे
कधी होतील मुक्त,
उघडता पापणी
सांडतील रंग फक्त?

- बी

स्वच्छ राजकारण

झाडांपासून घ्यायला हवेत
स्वच्छ राजकारणाचे धडे..

काही उंच, काही बुटके,
काही डेरेदार, काही निष्पर्ण,
काही डवरलेले, काही झडलेले,
दाटीवाटीने एकमेकात गुंफलेले
तरीही कधी वैर न करणारे...

मजबुत, भुईला घट्ट धरणारे,

अस्वच्छ राजकारण..

लाक्षागृहात शिजले तसे
खदखद शिजणारे,
पण पुर्णब्रम्ह नसून
संपूर्ण अमानुष असणारे

करपलेले अन्न बरे;
भ्रष्टाचाराचा दर्प पसरवून
नराधमांची भुक शमवणारे

अमर्याद सत्तेचे इंधन वापरून
विद्रोहाची भट्टी पेटवणारे,

सुस्ती..

घड्याळात बाराचे ठोके
दिवे अजून न विझलेले
निजल्या तरुच्या फांदीला
वटवाघूळ उलटे लटकलेले

हे शहर दाटीवाटीने भरलेले
चोवीस तास व्यस्त-व्यापलेले
सर्द दुलईतील झोप सोडून
कागदांच्या बोजानी वाकलेले

येईल हळूच जरा वेळानी

दुसरा आरसा

रात्रीच्या कभिन्न काळोखात
प्रकाशाचा आधार न घेता
तो खरं प्रतिबिंबं दाखवितो,
ते इतकं प्रखर असतं की
पापण्या झुकुनं जाव्यात

मग त्याला विन्मुख होऊन
पुन्हा सवयीच्या आरशात
मी माझं नखशिखांत रुप
न्याहाळत बसतो.. पण छे!

निरुत्तर

आपल्यातील आपण जेंव्हा पोटचा गोळा म्हणून
जन्म देणार्‍या आईसारखे नसतो,
पालनपोषण करणार्‍या बापासारखे नसतो,
नऊ मास एकाच उदरात वाढलेल्या
सख्ख्या भावंडांसारखेही नसतो,
सगे-सोयरे-प्रियजन ह्यांच्या पैकी

नेफ्रतीती

मी शाळेत असताना शाळेत होण्यार्‍या स्नेहसम्मेलनातील सांस्कृतीक कार्यक्रमात जमेल तितक्या स्पर्धामधे आणि कार्यक्रमात भाग घेण्याचा प्रयत्न करायचो.

अपवादानेच...

कधी कधी अपवादानेच
करडा वर्तमानकाळ
गुलाबी गुलाबी होतो..

'मग हे स्वप्नं तर नाही,
कदाचित संपलं तर नाही,
मधेच जर भंगून गेलं तर
आपण विंधणार तर नाही'

ह्याचचं सारं दु:ख होऊन
मिसळून जातो रोजचाच,
करडा करडा रंग..

-बी

वर्‍हाळ (वर्‍हाड)

कोकण संपून मुंबई आली
मुंबई संपून खांदेश आले
मराठवाडयाची सिमा स्पर्शून
वर्‍हाळ आले..वर्‍हाळ आले

कापसाच्या बोंडाचे
काळ्याभोर जमिनीचे
रणरणत्या उन्हाचे
पाण्याच्या दुर्भिक्षाचे
खंगलेल्या बळीराजाचे

आधुनिक व्यथा

ती कवा भाईर जात्ये
अन कवा घर्‍हात येत्ये
तिचा काई ठावठिकाना न्हाय
आयटीत नोकरी धरल्यापासून
घर्‍हात तिचे पाय न्हाय.

सट्व्या काम्पुटरच्या माग्ये
ती हात धुवून लागली हाय
नवरा गेला खडड्यात अन
लेकरा-बाळाकढंही लक्ष न्हाय.