नमस्कार. काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात कमी वेळेत प्रचंड मोठा पाऊस पडला. लोणावळ्यामध्ये तर पूर्ण पावसाळ्याइतका पाऊस दोन दिवसांमध्ये पडला. त्यामुळे लोणावळ्यात मोठा पूर आला आणि इंद्रायणी- पवना नद्यांनी लोणावळ्यापासून पिंपरी चिंचवड- आळंदीलाही तडाखा दिला. लोणावळ्यातले माझे मित्र श्रीरंगजींच्या परिसरात आठ फूट पाणी होतं. योगेश्वर सोसायटी, भांगरवाडीतलं त्यांचं तळमजल्यावरचं घर दोन दिवस अर्ध पाण्यात होतं. महापूरामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्याशिवाय लोणावळ्यातल्या हुडको भागातल्या वस्तीला महापूराचा मोठा फटका बसला. तिथे एनडीआरएफने बोटींमधून लोकांना वाचवलं.
पक्षी पळाले
चिवचिव संपले
कुठे हो गेले
होतोय विकास
रस्ते वाढले
मोठे जाहले
पुरात गेले
होतोय विकास
झाडे तोडली
घरे वाढली
ऊन काहिली
होतोय विकास
निसर्ग रडला
समतोल बिघडला
हाहाकार माजला
पण ... होतोय ना विकास
गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति।
नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरू।।
पाण्याला जीवन असं म्हणतात आणि भारतीय संस्कृतीमध्ये वाहत्या पाण्याचं फार महत्त्व आहे. भारतातच कशाला जगाच्या अनेक सुरुवातीच्या संस्कृती या मोठ्या नद्यांच्या काठी वसल्याचे पुरावे आहेत. तर या आजच्या गप्पांच्या भागात आपण जल परिसंस्थांपैकी नदीच्या परिसंस्थेविषयी केतकीकडून जाणून घेणार आहोत.
१२ जुलै २०११ ला पानशेतच्या पुराला ५० वर्षे पूर्ण झली खरी पण अजूनही तो १२ जुलैचा दिवस डोळ्यांसमोर दिसतो. पूर आला म्हणले की मला तो दिवस आठवतो आणि मी परत त्या पूरात वाहून जाते. आता माझी मुलेच म्हणतात, थांब आई मी पुढचे सांगतो... असो.
तर तेव्हा मी सहावीत शिकत होते. शाळाही जवळ होती. आमचे घर तसे नदीपासून फार जवळ नाही पण फार लांबही नाही. पावसाळ्यात पाण्याचा पूर बघायला जायला पुणेकर मंडळी धावत असत.