प्रत्येक माणसां कडून काही तरी चूक होत असते,त्याच विषयाला हात घालून मी एक कविता लिहिली आहे.मी तुमच्यापुढे सादर करतो,पण आवडल्यास भरपूर दाद द्या हि विनंती आहे.
कवितेचे शीर्षक आहे *"चूक तर माझीच आहे"*
*चूक तर माझीच आहे*
जीवापाड प्रेम करण्याची
आयुष्यातून दूर गेल्यावरही
परतीची वाट बघण्याची
*चूक तर माझीच आहे*
घेतले वचन जन्मोजन्मी साथ राहण्याचे
एक जन्म पण न राहिलो साथ
उरले ते फक्त स्वप्न बघण्याचे
जिंकलेले सारे डाव हारून आलो
मी सुखाला माझ्या दूर सारुन आलो
चूक
==================================================
" आयला संत्या, किती वेळ लावतोस रे प्यायला . पटापट पी आणि चल. "
" गप् रे वाकड्या, पिऊ दे कि त्याला निवांत. आणि एवढ्या लवकर घरी जाऊन काय अंडी घालायची आहेत ? "
" अरे तसं नाही रे पण आता बारा वाजत आलेत आणि - "
" बारा तेरा मला काय माहित नाही. एवढा चकणा संपेपर्यंत थांब. फार फार तर अर्धा तास लागेल. मग साडे बारा वाजता निघूया आपण. "
वाकड्या काय बोलतो यावर ! तो बसला गप् चकणा खात.
आभाळात चंद्र,
क्षितिजावर लाली,
फुलांच्यात गुलाब
आणि ॠतुंमध्ये वसंत
खरच इतका महत्वाचा असतो का..
की त्यांच्याशिवाय बाकी सगळंच बिनमहत्वाचं ठरावं?
तशी जगत होतेच की मी माझी पोकळी घेवुन..
मग कोणत्या एका क्षणी हसता हसता डोळे भरुन आले..
सुर्यास्त पहाताना माझ्या नजरेतल्या भावनांचं प्रतिबिंब
तुझ्या नजरेत मला दिसलं..
आणि तुझ्या माझ्याही नकळत त्या मनातल्या पोकळीचे दरवाजे
उघडले मी तुझ्यासाठी...
तुला डोकावू दिलं माझ्या खोल आत..
आणि तसंच सामावुनही घेतलं त्यात..
खरं सांगु का,
तू येण्याआधी ती पोकळी इतकी भयानक खरंच नव्हती..
उलट तीच मला सोबत करत होती..
तिच्या भरुन रिकामं होण्याने,