मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
बळीराजा
आत्महत्येचा विचार करणा-या बळीराजाला पत्र
शेती करण्यात अर्थ नाही...
पिढीजात आहे म्हणून धंदा करण्यात अर्थ नाही
शेतकरी बाप माझा, शेती करण्यात अर्थ नाही...
बाजारात भाव ठरवणाऱ्यांना एवढेच कळावे
अजून ह्यांना आता पिडण्यात अर्थ नाही...
ज्याच्या दावणीची जनावरं, बायकापोरं उपाशी
त्यास 'जगाचा पोशिंदा' म्हणण्यात अर्थ नाही...
चार-चौघात ज्याची माय निलाम होते
त्याला 'भुमीपुत्र' म्हणण्यात अर्थ नाही...
सदा परिस्थिती खेळे त्याच्या नशिबाशी
गुलामच तो,'बळीराजा' म्हणण्यात अर्थ नाही...
योजना सगळ्या फायलींत अन् कागदोपत्रीच
हत्याच ती, 'आत्महत्या' म्हणण्यात अर्थ नाही...
बळीराजा
बळीराजा
थेंब थेंब धरनीवर
पाणी मातीत नीतळे
ओला सुवास मातीचा
गार वाऱ्यात घुसळे
खोल मातीच्या कुशीत
आहे नीजल बियान
आणि थेंबाच्या स्पर्शाने
उठे डोळे चोळुन
आत अंकुरला बीज
घेई झेप आभाळाला
ओटी धान्याची भरुन
उभा राहील सुगीला
जन्म सार्थकी लागला
बळीराज्याच्या सेवेत
हाच एक राजा थोर
ज्याच्या मुठीत पोषण
बीज रोपाच्या रुपात
पाहे जगाचे वागणे
भोग धन्याचे भोगणे
ओल्या डोळ्यात तरारे