लेखक - गणेश पावले

यमक मात्रा जुळवून एक गझल लिहावी म्हणतो

Submitted by गणेश पावले on 15 January, 2015 - 07:11

जोडून शब्दास शब्द भाव मनातले लिहावे म्हणतो
यमक मात्रा जुळवून एक गझल लिहावी म्हणतो

खूप झाले हसे आता किवितेत तिला शोधावे म्हणतो
भास आभास खूप झाले जवळून तिला पहावी म्हणतो

डोळे भिडले होते कधीकाळी जवळ तिला घ्यावी म्हणतो
हृदयाचा ठोका चुकवून मिठीत तिला भरावी म्हणतो

लपंडाव मनाचा होता आता सत्यात खेळी खेळावी म्हणतो
राहता राहिले आयुष्य थोडे आता तरी पत्रिका जुळावी म्हणतो

खोडून सारे पाश आता माझीच तिला करावी म्हणतो
जोडून शब्दास शब्द एक गझल तिच्यावर लिहावी म्हणतो

कवी - गणेश पावले
१५/०१/२०१५

☼ युगायुगाच्या अंधकारातून प्रकाशाकडे घेवून जाणारी माता - राजमाता जिजाऊसाहेब. (लेखक - गणेश पावले)

Submitted by गणेश पावले on 8 January, 2015 - 02:12

येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिवछत्रपती

Submitted by गणेश पावले on 7 January, 2015 - 01:09

जन्मताच मातेने त्यांना शिकविले शौर्य
सळसळलं रक्त अंगी पाहून, सुलतानी क्रूर क्रौर्य
क्रोधाग्नी भडकला, वळल्या हाताच्या मुठी
येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती

बाटत होत्या आया बहिणी, विटली माय मराठी
हिंदुत्वाची आग विजली, अन दिवसाढवळ्या लुटी
गर्जला मराठा अशावेळी, जागल्या तलवारीच्या पाती
येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती

आक्रोश होता दाही दिशा, कुठे दुष्काळी सावट
पातशहांचे जुलूम वाढले, होते हिंदुत्वावर संकट
पेटली ठिणगी एक, फुलली अभिमानाने छाती
येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती

स्वराज्याचे तोरण बांधून, मावळा लढायास तयार

गगनगड एक सफर

Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 02:13

9.JPG

गगनगड हा इसवी सन.- १२०० च्या शतकात राजा भोज या राजाने बांधला. गगनगड निसर्गाचे एक अदभूतपूर्व लेणे लाभलेला आणि समुद्र सापाठीपासून ३००० फुट उंचीवर बांधलेला हा गगनगड अर्धा कोकण आपल्या नजरेत सहज काबीज करतो. त्यामुळेच या गडाची भुरळ पडली असावी ती आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांना. या गडाचा उल्लेख छ. शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठेच झालेला दिसून येत नाही. राजा भोज नंतर या गडावर बर्याच राजांनी राज्य केले. छ. शिवाजी महाराज या गडाचा उपयोग गोदामासाठी करायचे. त्याची साक्ष गडावर असणाऱ्या गुहाच देतात.

विषय: 

☼ अफजलखानाचा वध ☼ (लेखक - गणेश पावले)

Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 00:06

शालिवाहन शके १५७७ मध्ये पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यास जिंकून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजीला रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता.

Pages

Subscribe to RSS - लेखक - गणेश पावले