Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणत्या मुद्द्यावर परवा रितेश
कोणत्या मुद्द्यावर परवा रितेश म्हणाला की हा सिझन सगळ्यात हिट आहे... काल शेवटी बघायचं सोडुन दिलं.. कसले बोअर लोक आहेत...
पिकनिक ग्रुप टोटल फ्लॉप... खरंतर यावेळी व्हिलन गँग एवढी स्ट्राँग आहे की दुसर्या ग्रुप मधुन थोडं जरी कोणी धाडस दाखवलं आणी डोकं लावलं तरी सहज हिरो बनेल आणि ट्रॉफी जिंकुन घेइल... पण मठ्ठ लोकांच्या डोक्यात प्रकाश च पडत नाहिये.
मारामार्या टास्क पण यांना झेपणार नाहीत म्हणुन असले भातुकली टास्क दिले तरी ते पण जमेना.. इतके चार चार सिझन बघुन आलेले लोक... डायपर लपवायची युक्ती सुचली नाही मान्य.. पण दुसर्या फेरीत अरबाझ पॅडी ला डायपर घेण्यापासुन अडवत होता तेव्हा तरी डोक्यात प्रकाश पडायला पाहिजे ना की डायपर गायब होउ शकतात...मराठी बोलता येत नसेल तर मस्त मराठी अंगाई म्हणायची ना... गाणी म्हणायला मनाई नव्हती बहुतेक... मेघा आणि सई असायला हव्या होत्या.. मस्त डोकं लावलं असतं इथेपण...
निक्की ने काल केलेला राडा बघुन लोक हतबुद्ध होउन बघत बसले.. इतक्या लोकांचं सामान फेकलं तिनं... सगळ्यांनी मिळुन तिचं सामान फेकायचं ना.. कित्ती घाबरट आहेत राव....
सगळ्यांनी मिळुन तिचं सामान
सगळ्यांनी मिळुन तिचं सामान फेकायचं ना.. कित्ती घाबरट आहेत राव....
<<
कोणी प्रयत्न सुद्धा केला नाही कि तिला धरून बाजुला करावं, ती एकटी आणि हे इतके जण, नुसते बघत बसले !
ती सायको वाटते पण बिगबॉसला पण
ती सायको वाटते पण बिगबॉसला पण तेच हव आहे अस वाटतय..राडे ,आरडाओरडा आणि तमाशे
एकालाही तिच्यावर ओरडता येत नाही? इतके सगळे घाबरट आहेत? बहुधा सगळे स्वतःच्या इमेजला जपत असावे आपण बाहेर कसु दिसु याबद्दल..पण ठकासी असावे महा ठग हेच सुत्र आहे इथले..मला तो टास्क आरडाओरडा काही झेपला नाही त्यामुळे मी काही एपिसोड बघितलाच नाही.. त्यात एन्टरटेनिग काहिच नव्हत.
सायको नाही वाटत, मुद्दाम करते
सायको नाही वाटत, मुद्दाम करते. एक आठवडा निक्की तमाशा, दुसरा आठवडा जान्हवी तमाशा, तिसरा आता परत निक्की तमाशा.
एकटा पॅडी नडला. रुल्स ब्रेक केले निक्कीने, अंकिता बिग बॉस, रितेश बोलतील गृहीत धरून बसली, बिग बॉसने मस्त झापलं तिला. तरी बाहेर जाऊन काहीच बोलली नाही.
तो मूर्ख वैभव दुसरीकडे जाऊन लीडर होऊ शकला असता.
>>भातुकली टास्क
>>भातुकली टास्क
अगदीच बाळबोधपणे खेळली काल पिकनिक गॅंग!!
हे आवडले
त्या येड्या वैभवला डीपीचा टोन खटकला मग निक्की आणि जान्हवी काय टोन वापरतात तो नाही खटकत का? प्रेमात माणूस आंधळा होतो ऐकले होते पण बहिरा पण होतो बहुतेक!!
आणि तो डीपी पण लगेच माफी बिफी मागायला लागला.... अरे काय हे!!
बिग बॉसने समज दिली तरी अंकिताचा सौजन्य सप्ताह चालूच आहे!!
सूरज तर नुसता बाळ रडतय बाळ रडतय इतकेच ओरडताना दिसला काल!!
निखिल त्याच्या टीशर्टवर लिहल्याप्र्माणे खरेच सुखी आत्मा आहे..... काडीचा प्रयत्न करत नाही या शोमध्ये टिकून राहण्यासाठी!!
यंदा "वासरात लंगडी गाय शहाणी"
यंदा "वासरात लंगडी गाय शहाणी" असे होतेय, एकतर सगळी वासरे किंवा सगळ्या गाई असेच दिसतेय. टास्क कोणालाच कळत नाहीये. कळले तर सगळे एकमेकांची कॉपी करतात. गेल्या सीझन्सच्या सर्रास कॉपी करणे सुरु आहे ते वेगळेच. बिग बॉसच्या प्रेमात पडणे, एकमेकांच्या प्रेमात पडणे, जिवाभावाची मैत्रीण वगैरे म्हणणे, अनेक वेळा नॉमिनेटे होऊन बाहेर न पडलेल्या जुन्या सदस्यांचे दाखले देणे, अरे काही तरी नवे करा.
विशेष म्हणजे अजून तरी असा एकही सदस्य भारी वाटला नाही ज्याला फिनाले मध्ये बघायला आवडेल. शोचा फॉरमॅट आहे म्हणून फिनाले घ्यावी लागेल आणि ५ लोकांना चालढकल करत फिनाले मध्ये न्यावे लागेल. कारण एलिमिनिएशन तर हे स्वतः म्यॅनेज करतात. यावेळी घनश्यामला ठेवायचे होते वाटते पण वोटिंग आले नसावे म्हणून एलिमिनेशन केले नाही आणि जुनेच पुढे चालू ठेवले. याचा अर्थ या आठवड्यात एलिमिनेशन टास्क होणार नाही. आठवड्याची सगळीच मजा घालवली. वर सांगतात या सीजनला सगळ्यात जास्त TRP आहे. काय वाट्टेल ते.
व्हिलन गँगशी नडणारा कुणीतरी
व्हिलन गँगशी नडणारा कुणीतरी आणावा.. अन रडुबाई असणार्याना बाहेरचा रस्ता दाखवावा.. काय त्या चौघांना डोक्यावर चडवलय त्या गपगुमान गृप ने.. अगदिच कंटाळवाणा आहे. बिग बॉस या वेळचा..
निकीच्या ग्रुप ची चूक नाहीच
निकीच्या ग्रुप ची चूक नाहीच आहे. ते व्यवस्थित खेळतायत, कन्टेन्ट देतायत. पिकनिक ग्रुप बावळट्ट आहेत. हा नियम पाळण्याचा, फेअर वगैरे असण्याचा गेम नाहीये हे कुणालाही कळत नाहीये. टास्क मधे एक आर्या जरा थोडे समजून खेळण्याचा प्रयत्न करते पण तिचे कुणी ऐकत नाही. कारण एरवी तीही बालिश पणा करते. अंकिता आधी सेन्सिबल वाटत होती पण आता तीही मठ्ठ वाटत आहे. पॅडी तरी खेळला काल. अभिजीत इमेज जपतो. वर्षा पण अग्रेसिव गेम मधे काही कामाची नाही. तिला पॅसिव अग्रेसिव बडबड जमते फक्त. लीड घेऊ शकत नाही. योगिता आणि निखिल आहेत की नाही तेही कळत नाही.
बिबॉ ला आता या लोकांना थपडा देऊन जागे करावे लागेल. सलग २-३ आठवडे त्यांना काहीही प्रिविलेजेस जिंकू देऊ नका. कॅप्टनशिप पण ग्रुप ए ला द्या. २-३ एलिमिनेशन्स पण होऊ देत त्यांच्यातलीच.
बिबॉ ला आता या लोकांना थपडा
बिबॉ ला आता या लोकांना थपडा देऊन जागे करावे लागेल. सलग २-३ आठवडे त्यांना काहीही प्रिविलेजेस जिंकू देऊ नका. कॅप्टनशिप पण ग्रुप ए ला द्या. २-३ एलिमिनेशन्स पण होऊ देत त्यांच्यातलीच.
>> या बावळट लोकांना घंटा फरक पडणार नाही. एकमेकांच्या आठवणीत गळे काढतील आणि एकेक जातील बाहेर.
पॅडी काल एकदम बिचारा च वाटत
पॅडी काल एकदम बिचारा च वाटत होता
आत्ता तरी फक्तं आणि फक्तं टिम
आत्ता तरी फक्तं आणि फक्तं टिम ए मधले चौघे फक्तं बिबॉ गेम प्रमाणे खेळत आहेत , लोकांना आवडो ना आवडो, टॉप ४ तेच आहेत कन्टेन्ट आणि अॅक्टिव्ह पार्टिसेपेशन वर, बाकी सगळे माठ !
आज नाही बघितलं, रिपिट
आज नाही बघितलं, रिपिट टेलिकास्ट बघू का ? विचार करतेय.
आज नाही बघितलं, रिपिट
आज नाही बघितलं, रिपिट टेलिकास्ट बघू का ? विचार करतेय. +१२३
काल निकीने वर्षावर केलेली
काल निकीने वर्षावर केलेली पर्सनल कॉमेंट म्हणजे ती निकी किती चिप लेवलची होती हे कळते. वर्षाला तिने "आईपण होण्यासाठी आई व्हावे लागते" असे काहीतरी बोलली. नंतर निकीने सारवासारव केली की वर्षाला काहीतरी प्रॉब्लेम असल्याने ती आई बनू शकली नाही हे मला माहित नव्हते वगैरे वगैरे.
अरेरे, कित्ती वाईट हे.
अरेरे, कित्ती वाईट हे.
निक्की, जान्हवी दोघी खालच्या लेव्हलला जाणाऱ्या आहेत. मी कालचा एपिसोड नाहीच बघितला, कोणीतरी गोषवारा लिहा.
निकीला माहित नसेल का वर्षा वर
निकीला माहित नसेल का वर्षा वर त्या लेव्हलच्या कॉमेन्टचा काय परिणाम होईल विकेन्डला ? मुद्दाम बोलली आणि मग सॉरी चं नाटक !
वर्षाने इश्यु नाही केला या गोष्टीचा. , ती तिची डिग्नीटी क्लास मेन्टेन करून आहे अजुनही…इमॅजिन जान्हवी किंवा वर्षाला हे कोणी बोलले असत् तर किती महाभारत झालं असतं !
रितेशने चढवून ठेवलय तिला आणि जान्हवीला, कुठले मुद्दे बरोबर असतात यांचे ?
आधी रागवल्या सारखे करून मग म्हणायचे कि मुद्दे बरोबर पण भाषा वाईट
आर्या कधी बोलली काही जान्हवीच्या मुला बद्दल ? एडीटींग गंडलय का ?
बाकी हे टास्क अगदीच वेडेपणाच वाटलं, बाळाचे पाय उपटले , ओढाओढी केली ..यापेक्षा इन्सेन्सिटिव होण्या आधी थांबवलं बहुदा टास्क !
मला पॅडी आवडायला लागलाय सध्या, अॅक्टिव्ह झालाय आणि शालजोडीतले चांगले मारतोय !
वर्षा यांना मूल नसणे, बाळाचा
वर्षा यांना मूल नसणे, बाळाचा टास्क ठेवणे, निक्की ने किंवा ईतर कोणी या विषयावर वर्षांना कमेंट करणे, आणि मग भांडणं... हा सगळा बिबॉ चा चीप प्लॉट नसावा अशी इच्छा... तसं असेल तर बिबॉ ची टीम शो हिट होण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी आहे हे सिद्ध होतं.
वर्षांनी ग्रेसफुली रीअक्ट केलं त्यावर.... किंवा कदाचित त्यांना कसं रीअॅक्ट करावं कळलं नसेल. हा मुद्दा बिबॉ मधे अशा पद्धतीने निघेल अशी त्यांना पण अपेक्षा नसेल कदाचित...
अनसीन अनदेखा मधे पण टीम बी गप्पा मारत असताना वर्षांना मुलंबाळं नाहीत अशी चर्चा झाली होती म्हणजे त्यांचीच तसं सांगितलं होतं बोलताना पण त्यांच्याकडे १०-१२ मांजरं आहेत असं पण सांगितलं होतं.. त्या मांजरं रेस्क्यु करतात असं म्हणाल्या होत्या.. तेव्हा अभिजीत च्या तोंडी वाक्य होतं की मग ती तुमची बाळं च आहेत की.. आवडलं होतं तेव्हा ते.
काल निक्क्की च्या वाक्या वर अंकिता बोलली तिला आणि मग रडायला लागली पण त्यापेक्षा जास्त राडे तिथे झालेले असु शकतात पण ते दाखवले नसावेत. निक्की च्या माफी मागण्याला अर्थच नाही आता कारण एकदा सोडलेला बाण परत येत नसतो..
आर्या जान्हवी च्या मुलाला कधी बोलली ? मी नाही पाहिलं.
ही बीबी करंन्सी अन्न मिळवण्यासाठी वापरली जाणार होती तर डोकं लावुन दोन्ही टीम ने खरतर एकमेकांचे पैसे वाचवायला हवे होते. सगळेच मुर्ख आहेत.. पैसे कमी करुन आपलंच नुकसान हे त्यांना कसं कळलं नाही.
नॉमिनेशन टास्क पण काल उरकुन घेतला.. आता आज कॅप्टन्सी टास्क तरी जरा बरा आणा म्हणावं.
खराब एपिसोड कसा असावा याचे
खराब एपिसोड कसा असावा याचे उदाहरण म्हणजे कालचा एपिसोड. बाळाची माया करणे, त्याला प्रेमाने भरवणे, त्याचे दुपटे बदलणे यात काही चूक झाली तर मार्क कमी करणे इत्यादी चांगले काही करता आले असते तर हे लोक मालवणी बोलू नका, जुने दुपटे घातले, पाण्यात नीट अंग ओले केले नाही यावर भांडत बसले. इतकेच काय तर त्या बाळाचे लचके तोडले (अक्षरशः त्यातील रुई बाहेर काढली). सोबतीला नेहमीप्रमाणे वैयक्तिक हल्ले केले, आईपण काढले किंवा रिअल लाईफ मधील बाळाची आठवण काढली. मी आधी लिहिले तसे कुठल्याही ग्रुपला गेम कळत नाहीये आणि मग एकाने केले ते सगळे करतात. आधी पॅडीला अडवले नंतर घनश्यामला. दोन्ही संयोजकांनी आधीच तह करायला हवा होता कि आपण एकमेकांचे कमीत कमी पॉईंट्स काढू कारण शेवटी जे जिंकतील त्यांची सुद्धा रक्कम कमी होणार होती. बरं केला टास्क मधेच बंद केला नाही तर याना टीम A कडेही काहीच करन्सी शिल्लक राहिली नसती.
पॉवर कार्ड मधेही BB टीमने निक्कीला वाचवले आणि घनश्यामला ठेवायचे आहे म्हणून रिप्लेस कार्ड दिलेच. रोजगार हमी योजनेतून आलेल्या पैकी निखिल आणि योगितातुन कोणाला घरी पाठवतात हेच काय ते बघायचे कारण गुलीगतचा सपोर्ट आणि आयडॉलचा ऑरा या दोघांपेक्षा मोठा आहे. रडू बाई योगिता काही गेल्या वेळची शिसु नाही जी भांडेल आणि केस करेल. त्यामुळे हमी योजनेतील निखिलची बाहेर जाण्यासाठी वर्णी लागू शकते. तसेही जो बाहेर जाण्याची विनंती करतो त्याला हे बाहेर पाठवत नाहीत.
आर्या कधी बोलली काही
आर्या कधी बोलली काही जान्हवीच्या मुला बद्दल? हो, नंतर आर्या पायही पडली.
एडीटींग गंडलय का? य वेळा.
इरिना आणि वैभवचा स्विमिंग पूल सीन न दाखवल्याबद्दल निषेध
अगदी फ्रेमच्या एका कोपऱ्यात दोघांचे डोके पाण्याच्या वर दिसले जेव्हा अंकिता अरबाज आणि अभिजितने जिंकलेले ५०ह घेऊन गार्डन एरियात आली तेव्हा इरिना "पैसा" असे ओरडली आणि कदाचित आवाजामुळे कॅमेरा त्यांच्याकडे आणि अरबाज कडे वळला तेव्हा दिसले. पूर्ण सीन दाखवला असता तर उगाच इरिना वैभवची स्टोरी बळकट झाली असती 
बाळाचा एपिसोड असाच होणार होता
बाळाचा एपिसोड असाच होणार होता दुसरे काय अपेक्षित होते!
बुली आणि पैलवान असले की सगळि टास्क्स नुसती मोड तोड होते.
आर्या "ईशान बघ तुझी आई किती घाण खेळते" वगैरे म्हटलेले ऐकू आले नाही पण तिथे आरडाओरडा किती होता!! आर्या चांगले फाइट करते पण. त्या आई कमेन्ट च्या वेळी अंकिता बोलली. बाकिच्यांना इथे आपण ब्राउनी पॉइन्ट्स घ्यावे हे कळले नाही. जान्हवीला मात्र कळले बहुतेक ते. ती येऊन माफी मागून गेली, वर आणि निकीचा स्वभाव तसाच आहे वगैरे बोलून घेतले. ती कशीही असली तरी गेम बरोब्बर खेळत आहे.
पावर कार्ड च्या वेळी सगळ्यांचे अपापल्या टीम ला वाचवायचे निर्णय अपेक्षित च होते. वैभव च्या निर्णयावर निकी आणि जान्हवी खूष नाहीत असे आज एका क्लिप मधे दिसतेय. त्यांना आर्याला नॉमिनेट केलेल हवे होते.
कालचा भाग मध्येमध्ये पाहिला
कालचा भाग मध्येमध्ये पाहिला.कंटाळा यायला लागला आहे.
तो बावळट ग्रुप दिवसेंदिवस आणखी बावळट होत आहे आणि तो बुली ग्रुप दिवसेंदिवस आणखी माजोरडा होत आहे.हे असच चालू राहिल तर कठीण आहे एकंदरीत मराठी बिबॉसच.
टास्क पहिल्या सिझनमधल्या त्या बाहुली टास्क सारखख होता,किती मस्त खेळले होते,स्पेशली मेघा आणि सई.
हे काय,अगदीच वाट लावली.कुठल्याही टास्कमध्ये पर्सनल कमेंट्स करायच्याच अस ठरवूनच ठेवल आहे यांनी.
पुढारी, योगिता,दामले,एरिना यांना एकाच वेळी का नाही पाठवत.
निक्कीच्या जीवावर अख्खा सिझन कसा काढता येईल,मग जान्हवीला तयार केले आहे बिबॉसने. तिची आता तर कीव यायला लागली आहे,तिला कळत नसेल का की आपली इमेज फार वाईट होत आहे,निक्कीच काकही जात नाही पण हिला इथेच काम करायच आहे,मग शेवटी जशी इमेज बिल्डअप साठी शिवानी परत आली,तशीच ही अगदी गोगलगाय व्हायची.
त्या वैभव आणि एरिनाच्या लव्ह अँगलला काहीतरी अर्थ आहे का
बिबॉस तर अगदीच पुचाट वाटत आहे,काही दमच नाही आवाजात. आणि सिझनमध्ये पण.
नाहीतर परत राखीलाच पाठवून द्यायचे.
त्या खुर्ची सम्राट टास्कचा पण आता फार काही उपयोग होईल अस वाटत नाही.
योगिता बहचतेक जाईलच
दामले,अंकिता,डीपी फार काळ बसतील खुर्चीवर अस वाटत नाही.उसगावकर तर दूरच राहिली.तिला संचालकच
ठेवतील
राहता राहिले पँडी आणि अभिजित ,ते काय ती फाईट करतील.
वाईल्ड कार्ड एंट्री मस्ट आहे शो वाचवण्यासाठी.
या शोला 2.5 टीआरपी होता सुरुवातीला,आणि 15व्या प्लेसला आहे,म्हणजे शो हिट अशी कलर्सची समजूत असेल तर मग बोलायलाच नको.
राह
श्री सूरज चव्हाण उर्फ
श्री सूरज चव्हाण उर्फ गुलीगत
https://youtube.com/shorts/52f8zTxR6gE?si=Jnxm69ZB5U0FOn1i
SQ RQ ZQ
मी बघितला नाही कालचा भाग आणि
मी बघितला नाही कालचा भाग आणि आता परत ऑनलाईन जाऊन बघावासा वाटत नाही यातच सर्व काही आले
एक व्हिलन आणि एक व्हिक्टिम गॅंग हा यांचा दरवेळचा फॉर्म्युला आहे पण व्हिक्टिमबद्दल सहानभूती न वाटता त्यांची कीव यायला लागली तिथेच सीझन गंडायला लागला!!
डोकी घरी ठेऊन आल्यासारखे खेळतायत हे पिकनिकवाले त्यामुळे त्यांना सपोर्ट पण मिळत नाहिये फारसा!!
पहिल्या सिझनमधल्या त्या
पहिल्या सिझनमधल्या त्या बाहुली टास्क सारख होता,किती मस्त खेळले होते,स्पेशली मेघा आणि सई.
जे बात.
बाकी इमेजचा काही फरक पडत नसतो, सगळ्यांना माहिती असते की हे बिग बॉस मधील वागणे आहे.
पहिला सिझन खरच किती ऑरगॅनिक,
पहिला सिझन खरच किती ऑरगॅनिक, कित्ती भारी होता.. एक से एक टास्क्स, वादावादी !
त्यावेळी बिबॉ टिम पण नाही पाडायचे कॅप्टन्सी टास्क्सला, ज्याला ज्याचा सपोर्ट करायचाय ते त्या टिम मधे जायचे त्यामुळे बरेचदा ४ लोक वि. बाकी सगळे वळु ! मिळून बदडून काढायचे लिटरली !
मेघा, सई ,पुष्कर टास्क भारी करायचेच आणि ऑपोनन्ट टिम मधले व्हिलन पण किती अनफिल्टर्ड होते !
राजेश, रेशम, आस्ताद , सुशान्त ही इंडस्ट्रीतली मोठी नावं असून अजिबात इमेज कॉन्शस नवह्ते(किंवा बाहेर आपण इतके वाईट दिसतोय याची त्यांना कल्पना नव्हती.)
नळावरच्या टास्क नंतर ऋतुजा जखमी झाली ती गेलीच बाहेर !
मेघानेही स्पायसी फुड खायला घालून सुशान्तला हॉस्पिटलला पाठवले
त्या सिझनचा खुर्ची सम्राट आणि हुकुमशहा टास्क तर टॉक ऑफ्द टाऊन होता !
असा सिझन पुन्हा झालाच नाही.. त्या नंतर शिव ठाकरे , विशाल निकम चे सिझन चांगलेच होते पण सगळे प्रिपेअर करून यायला लागले सिझन २ नंतर !
काल बिबॉने सूरजचे बोलणे एडिट नाही केले “शेवटी आलोय, शेवटी जाणार, ट्रॉफी मीच नेणार, मग खंडोबाला जाणार“, अभिजीत म्हंटला “तूच ने“.
काहीतरी अनपेक्षित घडणार या सिझनला, कारण पब्लिकला कोणीच आवडत नाहीये, सूरज सिंपथीमुळे का होईना एकटाच पॉप्युलर दिसतोय !
मी आजही थोडा भागच बघितला.
मी आजही थोडा भागच बघितला. विकेंड वार बघेन.
गुलीगतचे असेच एक दोन रिल्स आले समोर, तो काय बोलतोय, गातोय, सांगतोय मला काहीही कळलं नाही त्यातलं. गाण्याचे, रील्सचे का त्याचे एवढे फॅन्स काय माहीती. सहानुभुती वोटस मिळणार हे बरोबर, समोरचा ग्रुप त्याला फालतू वगैरे म्हणतो. ट्रॉफीबद्द्ल त्याला कॉन्फीडन्स आहे, तोच नेईल. रील्स वगैरे मात्र जी एक दोन बघितली ती मला तरी आवडली नाहीत.
हो त्या सूरज चे बोलणे कळतच
हो त्या सूरज चे बोलणे कळतच नाही पटकन. त्याला र, ळ म्हणता येत नाही त्याच्याऐवजी ल म्हणतो
त्याचं बोलणं लक्ष देऊन गाळून डीकोड करत ऐकावं लागतं
तो मिळेल ते काम करतो . शेतीची कामं करतो , आणि मधे वेळ मिळाला आणि कोणी कॅमेरा धरायला मिळाला तर रील्स करतो. म्हणे "शनिवाल लैवाल शेजालच्या मुलींना सुट्टी असती तवा त्या फोन धलतात मग कलतो यकदम २-३ व्हिडो. "
कोणी तरी म्हटले त्याला ते उंच हेअर स्टाइल का नाही करत आता घरात ? तर म्हणे हितं माज्याकडं ते फुकायचं मशीन ( हेअर ड्रायर?) नाय ना.
असा नमुना आहे तो.
माल्केट मधी जाताना मी खातो पान
तू माझी काजोल मी तुजा गुलिगत शालुक खान
अशा छापाचे उखाणे असतात त्याच्या रील्स मधे
तरी त्याला पैसे भर्पुर मिळतात
तरी त्याला पैसे भर्पुर मिळतात अस वाचल, दिवसाला ३५००० ते ५०००० कमावतो अस त्यानेच साग्नितल (लोकसत्ता त्यामुळे विश्वासार्ह नाही)
माल्केट मधी जाताना मी खातो
माल्केट मधी जाताना मी खातो पान
तू माझी काजोल मी तुजा गुलिगत शालुक खान >>> थँक यु. हे मला पान सोडून काही लक्षात आलं नव्हतं.
त्याचं गुलीगत फेमस झाल्यावर त्याला दुकानाचं उद्घाटन वगैरे करायला ८०००० मिळायचे, डीमांडमधे होता पण मित्रांनी फसवलं असं सांगताना ऐकलं. नंतर फार विचारेना कोणी. इथेही त्याला सर्वात कमी पैसे मिळतात असं कोणीतरी अमक्याला इतके, तमक्याला इतके व्हिडीओ केलाय त्यात बघितलं. बाहेर पडल्यावर परत फेमस होईल.
टिम बी कसली युस्॑लेस आहे
टिम बी कसली युस्॑लेस आहे टास्क्स मधे

पॅडी आणि आर्या चांगले खेळत आहेत पण कोणीही टिम मेंबर्स साथ देत नाहीत त्यांना !
आर्याने समोरच्या टिमच्या हिटलिस्ट मधे येऊन , पंगा घेऊन फिनाले फिक्स केली आहे ऑल्मोस्ट , बाकी कोणीच अॅग्रेशन दाखवत नाहीये ३ आठवडे होत आले तरी ,!
एवढा मोठा चान्स मिळाला असताना कॅप्टन्सीच्या रेसमधून वैभव आणि एरीनाला का नाही बाहेर काढले ? पॅडीने का बाहेर जायचे ठतवले ? कशाला महानता दाखवत होते
निक्की आणि अरबाझ पूर्णपणे रुल करत होते ए टिमला , बाकी सगळे लेबर्स सारखे वागत होते !
तो वैभव किती अंगचटीला जातो सगळ्या मुलींच्या, निक्कीला मिठ्या मारायचा एक चान्स सोडत नाही, एरीना आहेच आणि आज जान्हवीच्या गळ्यात हात टाकून बसला होता, ती मॅरीड आहे इतकं सुद्धा भन नाही !
Pages