क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि मॅच सुद्धा तिसऱ्या दिवस पुढे जाणं कठीण वाटतंय.>>

३ बाद ३६

अडीच दिवस चालली तरी खूप!
तीनही बळी फिरकीचे

सर्वबाद १०९

किमान २०० तरी हव्या होत्या एवढी मागील दोन सामन्यांपेक्षा तर खराब खेळपट्टी नसावी. कांगारू कसे खेळतात त्यावरून समजेल.
मला वाटते ते आक्रमक खेळून जास्ती जास्त धावा पहिल्या डावात करण्याचा प्रयत्न करतील.

ह्या ५ दिवसातच दोन्ही कसोट्या उरकुन मंडळींना आयपीएलच्या तयारीला वेळ दिला पाहिजे बी सी सी आय ने....

कहनेको तो बहुत है, मगर हम कुछ नहीं कहते >> ह्या पिच च्या बाबतीमधे जरुर बोलू शकतो पण एकावरून जनरलाईज करू नका Wink

ऑसी आश्विन चा बराच अभ्यास करून आल्यासारखे खेळताहेत.
काल अपायार डिसिजन अन् drs कॉल्स बरेच गंडले

आज नीट घ्यायला हवेत.

इराणी कप मधे ईश्वरन अन् जयस्वाल मस्त खेळले.

पूर्वी इराणी नी नव्या मोसमाची नांदी व्हायची, गतविजेत्या रणजी संघाची शेष भारताविरुद्ध लढत. पण कोव्हिड नंतर गांडलेल्या टाईम टेबल अन् आयपीएल च्या स्लॉट अडजस्टमेंट मुळे रणजी फायनल अन् इराणी मधे फार अंतर रहात नाही. तसंच रणजी लीग पण उशिरा सुरू होतं.

आज नीट घ्यायला हवेत.>>

ही मॅच आता दात घश्यात गेल्यासारखी व्हायची लक्षणे आहेत!

कांगवा गेला

अय्यर नी शॉर्ट लेग ला मस्त कॅच घेतला

पहिल्या डावात कांगारूंकडे ८८ धावांची आघाडी, जी निर्णायक ठरू शकते.
कारण शेवटचे ६ बळी केवळ ११ धावांत गमावले.

दुसर्‍या डावात किमान ३०० करायला हव्या भारताने.

भाऊ म्हणाले तसा दिड दिवसाचा गणपती न होवो....

जर इतकी बॉलिंग धार्जिणी विकेट आहे, तर भारताने ४ बॉलर्स खेळवून एक एक्स्ट्रॉ बॅट्समन खेळवणं अधिक सेन्सिबल ठरलं असतं का?

उमेश भारतात सेकंड इनिंगला प्रचंड प्रभावी बॉलर आहे
>>
या सामन्यातही 5 ओव्हर मधे 3 काढले
लोअर ऑर्डर स्पिन चा अभ्यास करून आली अन् पेपर मधे उमेश आला...

राच्याकने,
काल कुठेतरी वाचलं, की ऑस्ट्रेलिया मधे आश्विन नी खेळलेल्या 10 टेस्ट मधे त्याचं average 41 आहे, आणि त्याच 10 टेस्ट मधे लायन चं average 42 आहे...

जेवढे ऑस्ट्रेलियाने पहिल्या ईनिंगला मारले तेवढेच आपण दुसऱ्या इनिंगला मारले तर त्यांना जिंकायला आपल्या पहिल्या ईनिंगईतके मारावे लागतील. जे चेस करताना सोपे नाही.

असे या आधी याच संघाशी आपण मुंबईत केले आहे.

एक इच्छा आहे, क्लासिक टेस्ट बॅटिंग बघायची.
उद्या संध्याकाळ किंवा परवा लंच च्या एक तास आधी पर्यंत तगडी बॅटिंग व्हावी, आणि पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात ऑसी बॅटिंग गळपटावी...

कोहली गेला
चुकीच्या वेळी पुल करायचा प्रयत्न आंगाशी आला (आधीच्याच बॉल ला 4 मिळाली असताना जास्त अग्रेसिव व्हायची गरज नव्हती)
बॅट्समन नी पेशंस दाखवायची गरज

- रोहित नी दोनदा मैदानात निरोप पाठवला
- पुजारानी लायनला पुढे सरसावत सिक्स मारली, पावेलियन मधे रोहित हसला
- लायनच्या पुढच्या ओव्हर मधे पुजारा आऊट

काय गरज होती सेट बॅट्समन ला डिस्टर्ब करायची????

भारतीय संघ मस्त आराम करून आला आहे तर ऑस्ट्रेलिया पूर्णपणे अभ्यास करून आले आहेत असे जाणवते. हा सामना तर गमावला आहे. निदान पुढच्या सामन्यात तरी योग्य खेळ करावा नाहीतर सिरीज बरोबरीत संपेल.

"लोअर ऑर्डर स्पिन चा अभ्यास करून आली अन् पेपर मधे उमेश आला" - उमेश सेकंड इनिंग ला प्रभावी बॉलर आहे, ह्यात 'टंग इन चीक' कोमेंट होती. दुसर्या दिवशीचं पीच चौथ्या-पाचव्या दिवशीचं वाटावं असं असल्यामुळे ते 'सेकंड इनिंग' म्हटलं होतं. Happy

Pages