राज्य निवडणुकांचे निकाल भारत : लाइव्ह ट्रॅकर

Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26

आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.

साइटचे नियम पाळून चर्चा करु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20210504-161015_WhatsApp.jpg
९० जागेवर भाजप चे उमेदवार फक्त ३/४ हजार मतांनी पराभूत झालेले आहेत .
त्यामुळे जरी भाजप सत्ता स्थापन करू शकली नाही तरी जोरदार मुसंडी मारलेली आहे हे निश्चित !
त्या ९० पैकी ८० जरी जागा भाजप ने जिंकल्या असत्या ( ८० + निवडून आलेले ७७ ) तरी आत्ता चित्र वेगळे असते .
जर तर ने युद्ध जिंकता येत नसले तरी ममता ने ही लाट न ओळखता मुस्लिम तुष्टीकरण चालूच ठेवले , भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत असताना कारवाई न करता मूग गिळून गप्प बसली तर तृण मुल काँग्रेस ची सोनिया काँग्रेस होण्यास वेळ लागणार नाही .

वटवृक्ष, सॉरी टु से. सोनिया गांधी, ममता बाई च्या लेव्हलला कधी उतरत नाही हे आपले नशीब आहे. सोनिया गांधी खूप वेगळ्या आहेत. कोणाचे पर्सनल इंटरेस्ट काही का असेना, पण ममता सारखे राजकारण सोनिया गांधी कधीच करणार नाहीत याची मला १०० टक्के खात्री आहे. जे चांगले आहे त्याला मी नक्कीच चांगले म्हणेन. माझ्या आवडत्या पक्षाचा नाही म्हणून मनात डुक ठेऊन मला तसे वागता येणार नाही. हे मी तुम्हाला उद्देशुन नाही म्हणत आहे, कारण मी कितीही बिजेपी समर्थक असले तरी जिथे मोदी आणी अन्य बिजेपी वाल्यांचे चूकले तिथे नक्कीच बोलेन.

बाकी दंगा कोण करतय ते सांगायची गरज नाही. इथे व्हिडीओ अपलोड करता येत नाही, नाहीतर हिंंदुंनो आमच्या देशातुन चालते व्हा असे बंगाली भाषेतुन ओरडत लाखोच्या संख्येने रॅली कशी काढली जाते ते दिसले असते.

बाकी दंगा कोण करतय ते सांगायची गरज नाही. इथे व्हिडीओ अपलोड करता येत नाही, नाहीतर हिंंदुंनो आमच्या देशातुन चालते व्हा असे बंगाली भाषेतुन ओरडत लाखोच्या संख्येने रॅली कशी काढली जाते ते दिसले असते.>>>>>>>>>>
ते भारतीय मुस्लिम असण्याची शक्यता बिलकुल नाही !
त्यात बहुसंख्य रोहिंग्य आणि बांगलादेशी च असणार .
चार घास खायला मिळाले की भारत देशाची भूमी त्यांना
स्वतःच्या बापाची च वाटत असेल .

हिंदू 70 % आहेतच हो

का मुसलमान मुसलमान ओरडताय ?

लोकसभेला तर अभिमानाने भकले होते , मोदीजीनी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही , घाण गेली , आठवते का ?

आणि मग मुसलमान मत का देत नाहीत , म्हणून सोनिया अन ममताच्या नावाने बोंबलायचे

कमी मताधिक्याने जिंकलेल्या घ्या यादीत मला भाजपचेच २७ दिसले. तृणमूलचे ३७.
नंदिग्रामची जागा भाजपने किती अंतराने जिंकली?
आधी ममतांना विजयी घोषित केल्यिवर निवडणूक आयोगाला अचानक नवी ईव्हीएम मिळाली का?

लोकसभेला तर अभिमानाने भकले होते , मोदीजीनी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही , घाण गेली , आठवते का ?>>>>> द्यायला पाहीजे होते. पूर्वी सिकंदर बख्त होते. कोणीतरी अब्दुल म्हणून पण होते. पण हे वायपेयींच्या काळात होते. आता फक्त शहानवाज, मुख्तार अब्बास आणी अजून एक जण आहेत.

मुसलमान उमेदवार नाही तर मुसलमान मतपण नाही

लोकसभेला मोदी , राम , 3 तलाक , काश्मीर हे पिअर प्रेशर होते , म्हणून ते खपवून घेतले गेले

आता पोस्ट कोविड , हे प्रश्न तकलादू झाले आहेत

कंडूशेट, वैनी, तै यांची कमी अगदी कटाक्षाने जाणवते आहे.>>>>. किती त्रास करुन घ्याल. Proud मला कुठल्याच निवडणूकीत रस राहीलेला नाही. लांबच्या नात्यातले ५ जण करोनाने गेले. तिघे वयस्कर ( ७५+ ) होते तर दोघे ५५ ते ६० मधले. एकजणांना व्हेंट मिळाला नाही. हार्ट अ‍ॅटेकने गेले. Sad आमच्या डॉक ना पण करोना झाला. आता बरे आहेत. नात्यातले एक जोडपे पण अ‍ॅडमीट होते , आता बरे आहेत. जान है तो जहान है.

च्यायचा भुक्कड साला करोना, Angry स्वतः कधी मरेल एकदाचा काय माहीत. Angry

हीरा, अहो फिल्मी यांचा माझ्यासाठीचा प्रतीसाद कायम विकृतच असतो.

फिल्मी तुम्हाला उपहास कळत नाही.

डिजे, धन्यवाद. तुमच्या आमच्या सारखे जाऊ द्या हो. चक्क पेशंटच रस्त्याने फिरतांना दाखवले बातम्यांमध्ये. Sad

तुझे माझे करण्यात सर्व राजकारण्यांनी सीमा ओलांडल्या.

वटवृक्ष यांनी नेहमीप्रमाणे एक फेक फॉर्वर्ड चिकटवलेलं आहे.

यादीप्रमाणे करणदिघी तृणमूलने ५८ मतांनी जिंकला. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील निकालानुसार तृणमूल ११६५९४ भाजप ७९९६८

राजगंज भाजप जिंकलाय भाजप ७९७७५ तृणमूल ५९०२७
https://results.eci.gov.in/Result2021/ConstituencywiseS2535.htm?ac=35

नेहमीप्रमाणे यांचे अफवा प्रसार केंद्र निर्लज्जपणे सुरू आहे. इतके वेळा यांचं खोटं पकडलं जातं तरी काडीचीही लाज नाही.

पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराच्या तरी नक्की किती बातम्या खर्‍या आहेत?
हे ट्वीट पहा. प. बंगाल पोलिस म्हणताहेत फेक
त्याखाली एका भाजपायीने ५ फेब्रुवारीचा व्हिडियो आताचा म्हणून दिला आहे.

वरून येतंं तसंं डकवायचे. स्वतःची बुद्धी नाय वापरायची.
कसलं भारी ना. डोकं न वापरायचे ४० पैसे मिळतात.
आज दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला झापले म्हणे. शहामृगासारखी जमिनीत मान घातलेली सरकार आहे अशी उपमा दिली आहे. तस्मात, भक्तच नाही तर सरकार पण बुद्धी वापरत नाही. अब हम खऱ्या अर्थाने राम भरोसे है. तिकडे फेसबुक ट्विटर वर भक्त मंडळी अक्षरशः चवताळली आहे. चंद्रकांत पाटला सारखीच एकदम हमरीतुमरीवर येत आहेत. एकूणच पराभव पचवणं ह्या fascist लोकांना कधी जमलंच नाही.

https://www.businesstoday.in/current/economy-politics/oxygen-crisis-show-cause-why-contempt-action-should-not-be-taken-says-delhi-hc-to-centre/story/438257.html

च्यायचा भुक्कड साला करोना, Angry स्वतः कधी मरेल एकदाचा काय माहीत. Angry>>>
हा फक्त कोरोनाचा कहर नाहीय. केंद्रात बसलेल्या विदुषकांच्या अहंकारी वृत्ती मुळे, मी म्हणेन तेच खर ह्या वृत्ती मुळे, निर्माण झालेल्या अभूतपूर्व तुटावड्या चा फटका आहे.

Pages