(शेवटचे संपादन : १४/७/२०२०)
........................
जानेवारी २०२० पासून कोविड१९ चे पडघम वाजू लागले. लवकरच त्याचा जागतिक प्रसार झाला. मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या हजाराची महासाथ आल्याचे जाहीर केले. यास अनुसरून इथे (https://www.maayboli.com/node/73752) “हात, जंतू, पाणी आणि साबण" हा धागा काढला . त्यात मुख्यत्वे हातांच्या दैनंदिन स्वच्छतेवर भर होता. पुढे त्या धाग्यात कोविडवर अधिक चर्चा होत गेली. त्यातून आपल्यातील अनेकांनी खूप चांगले प्रश्न विचारले. त्या धाग्यावर हातांची स्वच्छता आणि आजाराची माहिती यांची बरीच सरमिसळ झाली आहे. म्हणून एक कल्पना मनात आली. त्या धाग्यात आणि मला अन्यत्र विचारलेल्या गेलेल्या या आजाराबद्दलच्या प्रश्नोत्तरांचे एक स्वतंत्र संकलन करावे. त्यासाठीच हा नवीन धागा काढत आहे. इथून पुढची कोविडची सर्व चर्चा इथे व्हावी, ही विनंती. एक प्रकारे हा धागा म्हणजे 'कोविडपर्वाचा' उत्तरार्ध असेल.
मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांतून असे जाणवले की या आजाराचे बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल. विविध प्रश्न शक्यतो प्रश्नकर्त्याच्या भाषेतच ठेवले आहेत.
नवीन वाचकांसाठी हे संकलन उपयुक्त ठरेल अशी आशा. सूचनांचे स्वागत !
........................................................
प्रश्न :
१. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का?
‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल:
१. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.)
२. विषाणूविरोधी औषधे
३. अॅन्टिबॉडीज
४. मूळ पेशींचे उपचार.
या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात.
पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही.
…………………………………………………………………………………………………………..
२. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ?
बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील.
यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती:
१. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे.
२. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत.
३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे.
४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही
………………………………………………………………………………………………………………………………………….
३. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ?
यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:
१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.
४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.
६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
………………………………………………………………………………………………………………………..
४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ?
या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो.
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो.
“ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही.
कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे:
१. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
२. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
५. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार :
गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती :
१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?
खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो:
*वय १८ ते ५५ दरम्यान.
*१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे.
*असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते.
*पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते.
२. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ?
वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
…………………………………………………………………………………………………………………………………………………
६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ?
या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो.
या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे.
याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत :
१. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो.
२. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.
३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात.
………………………………………………………………………………………………………………………………………..
७. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
होय, असे काही अभ्यास चालू आहेत.
१. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे.
२. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत.
३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते.
४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे.
५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………….
८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का?
प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
१. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार .
२. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात.
३. अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही.
४. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते.
हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………
९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ?
कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते.
त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत:
१. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश
२. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या
३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश.
.......................................................................
१०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे?
लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो.
कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू.
ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात.
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते.
.................................................................................................................................................
११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का?
ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे.
...................................................................................................
१२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?
याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. मारक (Neutralizing)
2. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.
........................................................................................................................
१३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ?
या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला.
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.
१३ ब
ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ?
२००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही........................................................................................................................................................
१४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ?
होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.
सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे.
.................................................................................................................................................................................
१५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ?
मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते.
..........................................................................................
१६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.
आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर:
१. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत.
२. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत.
३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.
...............................................................................................
१७.
हॅप्पी हायपोक्सिया हा काय प्रकार आहे ?
‘हॅपी हायपोक्सिआ’ हे भयानक चुकीचे टोपणनाव आहे. योग्य वैद्यकीय नाव ‘सायलेंट H’ असे आहे.
म्हणजे काय ते सांगतो.
१. निरोगी माणसात ऑक्सिजनचे रक्तप्रमाण सुमारे ९५ mmHg इतके असते.
२. काही श्वसन आजारात ते कमी होऊ लागते. परंतु ते जेव्हा ६० पर्यंत खाली येते तेव्हाच रुग्णास जोराचा दम लागतो.
३. म्हणजेच ९५ ते ६० या टप्प्यात रुग्ण सायलेंट H अवस्थेत असतो.
४. या अवस्थेत रुग्णात दम लागलेला तर नसतोच, पण तो शांत आणि वरवर ‘सुखी’ (लक्षणविरहित )असतो. हा खरा विरोधाभास आहे.
५. मात्र असा रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत (decompensation) जाऊ शकतो, हा या अवस्थेतील गर्भित धोका आहे. म्हणून त्याला हॅपी म्हणणे चुकीचे आहे.
.................................................................................
१८. करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?
या संदर्भात काही मूलभूत माहिती:
विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये:
१. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो.
२. त्यामुळे त्यांचे जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात.
३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते.
४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा 'पाठलाग' करणे तुलनेने अवघड जाते.
५. म्हणून नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात.
...........................................................................
१९. करोना विषाणू हवेतून पसरतो काय?
यावर डॉ. सौम्या स्वामीनाथन ( वैज्ञानिक WHO) यांचे स्पष्टीकरण असे आलेले आहे:
१. हा विषाणू हवेतून पसरतो, पण अत्यंत मर्यादित वातावरणात.
२. मुख्यता हवेतून पसरणारे जे विषाणू (उदाहरणार्थ गोवर) असतात, त्या तुलनेत करोनाचे पसरणे बरेच कमी आहे.
३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.
४. जर तो वरील २ प्रमाणे मुख्यतः हवेतून पसरणारा असता, तर एव्हाना आपणा सर्वांनाच त्याचा संसर्ग झाला असता.
………
२०. वाफ घेणे व रोगप्रतिबंध
वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती:
कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे.
तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही.
त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.
.............................................................................
२१. इटोलीझुमॅब आणि रेमडेसीविर यात काय फरक असतो ?
१. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी)
२. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू.
हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते.
...............................................................................................................................
टाळेबंदी पूर्णपणे उठवून
टाळेबंदी पूर्णपणे उठवून जनजीवन पूर्ववत करावे का, हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. लोक जेवढे जास्त एकमेकांच्या संपर्कात येतील, तेवढी समूह प्रतिकारशक्ती लवकर निर्माण होईल.
यासंदर्भात देवी, कांजिण्या आणि रूबेला या आजारांच्या बाबतीत इतिहासात एक रोचक प्रकार घडलेला आहे. ते आजार मध्यम स्वरूपात झालेले रुग्ण आणि निरोगी लोक मुद्दाम एकत्र जमत. अशा संमेलनातून निरोगी व्यक्तीस तो संसर्ग होई आणि त्यातूनच त्याविरोधी प्र-शक्ती प्राप्त होई.
कांजिण्यासारख्या आजारात बहुतेक लोकांना एकदा तो झाला, की आयुष्यभर पुन्हा होत नसे. या तत्वास अनुसरून असे प्रयोग एकेकाळी झालेले आहेत. आता मुद्दा असा आहे, की असा प्रयोग सध्या कोविडसाठी करावा का ? वरवर मोह झाला तरी या प्रश्नाचे उत्तर सरळ नाही.
त्याचे कारण पुढच्या प्रतिसादात लिहितो……
कांजिण्याच्या धर्तीवर “कोविड
कांजिण्याच्या धर्तीवर “कोविड संमेलने” भरवणे इष्ट नाही कारण :
१. अशा संसर्गातून मिळालेली प्रतिकारशक्ती कितपत उपयुक्त आणि दीर्घकालीन असेल, याची शंका आहे.
२. असा संसर्ग झालेल्याने चौदा दिवस स्वतःहून विलगीकरण पाळायचे आहे. त्याची खात्री देता येत नाही.
३. अशाप्रकारे बाधित झालेल्या काही लोकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना हा आजार गंभीर होऊ शकतो.
४. अजून या रोगावर प्रभावी उपचार नाही.
>>>Dexamethasone आणि कोविड >>
>>>Dexamethasone आणि कोविड >>>>>
आता Dexamethasone पेशीत कसे काम करते ते बघू
<<<<< धन्यवाद डॉक्टर.
>>>It is life saving only in complicated case
For mild cases rather contra indicated
<<<<< हो हे वाचलेले म्हणूनच कुतूहल वाटलेले.
>>>२. असा संसर्ग झालेल्याने
>>>२. असा संसर्ग झालेल्याने चौदा दिवस स्वतःहून विलगीकरण पाळायचे आहे. त्याची खात्री देता येत नाही>>>>
Isn't it contra-indicative to the concept of building herd immunity through deliberate get togethers? Actually in populous country like India we won't need separate get-together as such.
>>>३. अशाप्रकारे बाधित झालेल्या काही लोकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना हा आजार गंभीर होऊ शकतो.<<<<<
हे जास्त महत्त्वाचे आहे. जरी सध्या मधुमेह, रक्तदाब असलेल्यांना जास्त धोका आहे असे म्हटले जात असले तरी पूर्णपणे धडधाकट असलेल्यांसाठीही हा आजार जिवघेणा झाला आहे. अमेरिकेतील एक ४० वर्षीय ऑपेरा अॅक्टर निक कॉर्डेरा गेली ३ महिने वेगवेगळ्या complications (blood clots, leg amputation, severe pneumonia) ह्यांच्याशी झुंझ्तो आहे.
कोविड सम्मेलने आधीच भरवून
कोविड सम्मेलने आधीच भरवून झालेली आहेत.
गेल्या महिन्यात मलाही झाला , 3 दिवस ताप व अंगदुखि , नंतर अचानक धाप लागली , आमच्याच सरकारी होस्पिटलात एडमिट झालो , एक्स रे त पेचेस आले , पन घशाचा स्वेब् निगेटिव्ह आला, दोन दिवस ऑक्सीजन , मग 3 दिवसात कमी झाले , डिस्चार्ज दिला, पन दोन मजले चढले की धाप जोरात लागायची , 6 वा मजला गाठल्यावर घरी 5 मिनिट बोलूहि शकत नवहतो
हळूहळू जेवण सुधारल्यावर सुधारले ,वजन 5 दिवसात 5 किलो घटले होते, 3 आठवड़े घरिच बसावे लागले.
डॉक्टर असल्याने ड्यूटी सुरु असल्याने मला कुठून इंफेक्शन आले है कधीच समजनार नाही , रोजची ओपीडी , बाजार गर्दी , दिवा घण्टा , तबलिघे , विमानातून येऊन गाँवभर फिरत बसलेले ... ही सगळी कोविड सम्मेलनेच आहेत,
एका नव्या संशोधनात रेड ज़ोन मध्ये 30 % नॉर्मल लोकात एंटीबॉडी दिसल्या आहेत , म्हणजे ह्याना इंफेक्शन होऊन ते निघुन ही गेले आहे, इपिडेमिक विझून जायला सिरों कन्वर्जन किमान 70 % लागते
ह्या एंटी बॉडी किती काळ संरक्षण देतील , हे अजुन माहित नाही, पण बहुदा लाइफ लांग असेल . कारण आपल्यात मेमरी सेलही अस्तिलच की.
------
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR). एक सर्वे कर रहा है. नाम है- सेरो सर्वे (sero-survey). इस सर्वे की आधी-अधूरी रिपोर्ट भी मीडिया में आ चुकी है, जिसमें कहा गया है कि देश की 15 से 30 फीसदी आबादी, जो हॉट स्पॉट और कंटेनमेंट ज़ोन में रह रही है, वो कोरोना वायरस से संक्रमित हो सकती है, या फिर संक्रमित होकर ठीक भी हो चुकी है.
कंटेनमेंट ज़ोन का मतलब क्या?
जहां संक्रमित ज़्यादा हैं. पॉजिटिव केस, कॉन्टैक्ट ट्रेसिंग हिस्ट्री और जनसंख्या घनत्व के आधार पर इनकी पहचान की जाती है. इस आधार पर इसे बाकी इलाके से काट दिया जाता है और पाबंदियां लगा दी जाती हैं.
https://www.thelallantop.com/bherant/what-is-coronavirus-sero-survey-why...
Vt,Isn't it contra-indicative
Vt,
Isn't it contra-indicative to the concept of building herd immunity
अगदी अपेक्षित व चांगली शंका. याचे कारण सांगतो.
समजा, एखाद्या निरोगी तरुणाने अशा प्रकारे संसर्ग ‘मिळवला’. त्याला होणारा आजार सौम्य/ मध्यम राहील किंवा लक्षणरहित देखील. पण त्याला काही प्रमाणात स्वतःसाठी प्र-शक्ती मिळेल. (जी आता लस नसल्याकारणाने मिळू शकत नाही). तिचा उपयोग काही प्रमाणात काही काळ नक्की होईल.
आता समजा, त्याने त्याचा संसर्ग घरच्या किंवा अन्य वृद्धाला/ अन्य आजारवाल्या माणसाला दिला, तर या व्यक्तीस होणारा आजार गंभीर होऊ शकतो.
म्हणून ते विलगीकरण.
B C,
B C,
पूरक माहितीसाठी आभार !
तब्बेतीसाठी सदिच्छा .
ब्लॅक कॅट, शुभेच्छा!! लवकर
ब्लॅक कॅट, शुभेच्छा!! लवकर लवकर विश्रांती घेऊन ठणठणीत बरे व्हा
इथल्या(सोशल मीडियाच्या) कोणत्याही कमेंट डोक्यावर, कानावर, मनावर घेऊ नका.
(No subject)
रोचक माहिती! वाचतीये..
रोचक माहिती! वाचतीये..
जगात सर्वत्र आग्रहाने
जगात सर्वत्र आग्रहाने टाळेबंदी लागू केली गेली होती, तेव्हा स्वीडनने मात्र बरेचसे मुक्त धोरण स्वीकारले होते. त्यांचा दृष्टिकोन लवकरात लवकर समूह प्रतिकारशक्ती निर्माण करण्याकडे होता.
आज त्यांची परिस्थिती अशी आहे.
१. समूह प्रतिकारशक्तीची संपूर्ण देशाची सरासरी टक्केवारी फक्त ६ %
२. देशाच्या विविध भागात ५ ते २२ % पर्यंत फरक आहे.
‘कोविड- १९’ प्रसार:
‘कोविड- १९’ प्रसार: आकडय़ांच्या पलीकडे..
(https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-covid-19-spread-beyond-...)
एक चांगला लेख आहे.
रोचक लेख, उत्तम लेख आणि चर्चा
रोचक लेख, उत्तम लेख आणि चर्चा
वाचतेय
(No subject)
.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
साद,
दुव्याबद्दल धन्यवाद. तो लेख चांगला आहे.
कुमार१ यांचा उत्तम लेख
कुमार१ यांचा उत्तम लेख (नेहमीप्रमाणेच). साद यांनी दिलेल्या दुव्यातील लेख पण उत्तम.
मात्र त्यालेखातील मृत्यूची संख्या बरोबरच्या आसपास आहे याच्याशी असहमत. इटलीसारख्या प्रगत देशातही संस्थांनी दिलेले मृत्यूसंबंधीचे अहवालातील चूका हळूहळू लक्षात आल्या (उदा: एखादा दमा, सीओपीडी, इ श्वसनसंस्थेचा चिरकालीन आजार असेल तर मृत्यूचे कारण तो आजार लिहीले गेले. टेस्टचा रिपोर्ट आल्यावर लक्षात आले की मयत कोव्हिड पॉझिटीव्ह होता. अशा एक ना अनेक त्रुटी) व मृत्यूचा आकडा वाढत गेला. सध्या सगळे आजाराशी लढण्यात व्यस्त असल्याने आकडेवारीतील त्रुटी अजून भारतात उघडकीस आल्याच्या घटना ऐकीवात नाहीत.
आणखी एक शंका म्हणजे - हॉस्पिटल मधील डेथ सर्टीफिकेटची ही आकडेवारी नेहमी सरकारी जन्म मृत्यू नोंदणी ऑफीसशी ताळेबंद असते का/केली जाते का ?
सीमंतिनी,
सीमंतिनी,
धन्यवाद. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. भारतातील मृत्यूच्या एकंदरीत आकड्यांच्याबाबत काही तज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.
हा एक संदर्भ : https://science.thewire.in/health/india-covid-19-mortality-data-anomalies/
त्यांच्या मते दिल्ली, चेन्नई अशा ठिकाणी प्रत्यक्ष मृत्युदर अधिकृत आकडेवारी पेक्षा जास्त असू शकेल.
धन्यवाद. खेड्यातही संख्या
धन्यवाद. खेड्यातही संख्या जास्त असणार कारण एकूणच वैद्यकिय सुविधांचा अभाव, त्या वापरण्याबद्दल उदासीनता - 'जीवाला घोर लागला नि म्हतारा दोन दिवसात गेला, सोनं झालं' अशा पद्धतीची विचारसरणी, उपचारांसाठी पैशाचा अभाव इ.
साथ गेल्यावर काय त्या दुरूस्त्या करा...
ब्राझील, पाकिस्तानची आकडेवारी बघितली आणि भारतातील सरकारी आकडेवारी पाहिली की जरा बरं वाटतं एवढं मात्र खरं
आता मृत्यूचा विषय निघालाच आहे
आता मृत्यूचा विषय निघालाच आहे, तर मी परिसंवादात ऐकलेली काही रोचक माहिती देतो.
मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. या क्षेत्रातील तज्ञ त्याबाबत बोलत होते. ते म्हणाले, “मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. खरेखुरे मृत्यूचे कारण शवविच्छेदनातच स्पष्ट होते”. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते.
........
कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, असा पेच पडू शकतो.
आणखी एक शंका म्हणजे -
आणखी एक शंका म्हणजे - हॉस्पिटल मधील डेथ सर्टीफिकेटची ही आकडेवारी नेहमी सरकारी जन्म मृत्यू नोंदणी ऑफीसशी ताळेबंद असते का/केली जाते का ?
हो नक्कीच केली जाते .जन्म मृत्यू चे व्यवस्थित रेकॉर्ड हॉस्पिटल ला ठेवावे लागते.
आणि ठराविक मुदतीत ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाठवावेच लागते.
आणि भारतात प्रतेक बाबतीत मृत्यू चा दाखल लागतो त्या मुळे वारस जागरूक असतात नोंदी विषयी .
ते त्याचा पाठपुरावा करत असतात.
जे बेवारस आहेत त्यांचा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला तर त्यांची पण नोंद होते पण त्याचा पाठपुरावा केला जात नाही.
..
..
कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, असा पेच पडू शकतो.
असा प्रसंग तर अनेक वेळा येत असतो .
किडनी चा आजार असेल आणि मृत्यू मात्र अटॅक येवून झाला तर काय कारण देणार मृत्यू चे अटॅक हेच ना.
पण किडनी खराब असल्या मुळे अटॅक आला असे पूर्ण वाक्यात नक्कीच कारण दिले जात नसेल.
नवीन नियमानुसार हॉस्पिटल डेथ
नवीन नियमानुसार हॉस्पिटल डेथ चे डेथ सर्टिफिकेट रिलॅटिव्ही ला देतच नाहीत
झेरॉक्स देतात,
ओरिजिनल बी एम सी म्हणजे वोर्ड ऑफिसात जाते व आठ दिवसांनी रिलॅटिव्ह तिकडून घेतो
मुंबईत असे आहे
जन्माचा आणि मृत्यू चा दाखल
जन्माचा आणि मृत्यू चा दाखल बीएमसी मध्येच मिळतो हॉस्पिटल देत नाही.
त्याचे कारणच जन्म ,मृत्यू ची नोंद सरकार दरबारी व्हावी हेच असावे.
मृत्यूचे कारण आणि दाखला :
वरील चर्चेसंदर्भात आजच ही बातमी :
'मृतदेहांची करोना चाचणी नाही '
https://www.loksatta.com/mumbai-news/no-corona-test-of-the-bodies-abn-97...
मृत्यूचे कारण आणि दाखला :
मृत्यूचे कारण आणि दाखला :
यात थेट , अप्रत्यक्ष कारण आणि इतर कारणे अशी व्यवस्थित वर्गवारी असते .
धन्यवाद. चांगली वर्गवारी आहे.
धन्यवाद. चांगली वर्गवारी आहे.
इतर देशातील गोळा झालेली माहिती भारतात लागू पडेलच असे नाही. उदा: प्रगत देशात असिस्टेड लिव्हींग्ज मध्ये साथ झपाट्याने पसरली. भारतात असिस्टेड लिव्हींग्ज अल्प असल्याने, बहुतेक वृद्ध घरातच असल्याने ती माहिती तशी निरूपयोगी ठरते. ह्या तपशीलवार भारतीय डेथ सर्टीफिकेटचा उपयोग पुढे आकडेवारीतून निष्कर्ष काढण्यासाठी नक्कीच होईल. भारतीय जनतेतील को-मॉर्बिडीटीज, रिस्क फॅक्टर्स, रूग्णातील रोगाचा प्रसार काल इ नीट समजतील.
https://www.abplive.com/news
https://www.abplive.com/news/india/ministry-of-ayush-asks-for-informatio...
बाबा रामदेव की कोरोना दवा पर आयुष मंत्रालय ने मांगी जानकारी, कहा- 'जब तक जांच न हो जाए विज्ञापन बंद करें'
आयुष मंत्रालय ने पतंजलि आयुर्वेद की ओर से दवा के दावों का विज्ञापन और प्रचार बंद करने को कहा है.
कोविड१९ या विषयावर काही
कोविड१९ या विषयावर काही चांगली पुस्तके निघालीत. त्यांची माहिती इथे दिलीय .
https://www.aksharnama.com/client/article_detail/4370
आज पतंजलिच्या कोविड औषधावर
आज पतंजलिच्या कोविड औषधावर चाचणी पूर्ण होईपर्यंत बंदी आणण्यात आली आहे. अशी जाहिताय केल्यावर केवळ ती थांबवण्याचे आदेश दिले आहेत. एवढीच शिक्षा योग्य आहे का?
किंबहुना ही शिक्षाच नाही. अशी जाहिरात केल्यास तुरुंगवास घडवला पाहिजे.
माझा एक बाळबोध प्रश्न. ते ऑर्थो...... या नावाखाली कोणतेही औषध अशा प्रकारे आयुष कडून तपासून सत्यापित केलेले असेते का? त्याची तर जाहिरात जावेद अख्तर पासून सगळे कराता ते!!!!
या नावाखाली कोणतेही औषध अशा
या नावाखाली कोणतेही औषध अशा प्रकारे आयुष कडून तपासून सत्यापित केलेले असेते का?
>>>>
याचे उत्तर आयुर्वेदिक तज्ञांनी द्यावे हे बरे.
Pages