आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कामाचं ठिकाण बोरिवली आहे तर माहेर विरार तरी दाखवायचं. डोंबिवली ते बोरीवली रोज म्हणजे टू मच. किती त्या अरुला सोशिक कराल ?
अमा मस्त लिहिता ,आज बघते आता संध्याकाळी.

१५ २० लाख मदत करायला अरू चा जुना परिचित (सायलेंट लव्हर) , अर्थातच श्रीमंत असलेला , एंट्री घेइल असे वाटते.

राजेश शृंगारपुरे येतोय का, एक फोटो बघितला youtube वर, या मालिकेचा. तो सोनी मराठी वर अहिल्या होळकरांच्या मालिकेत काम करायचा, प्रोमो बघितले होते, संपला की काय तो रोल.

खरे तर आपण तिचा संसार अलगद लाटला आहे तर थोडा तरी मनाचा मोठे पणा दाखवून तिच्या प्रयत्नांचे कौतूक करावे ही मॅचुरिटी तिच्यात नाही. कायम आपणच पुढे. आपणच बेस्ट नाहीतर लगेच इन्सेक्युअर अशी मानसिकता आहे ह्या पात्राची. >>>>>>>>> अगदी अगदी. अरुने तिला मी टू चळवळीत सपोर्ट केला हे ती सोयिस्करपणे विसरली. वर म्हणते बघा मी मेहताला कशी एकहाती थोबाडीत मारली, मी काहीही करु शकते. अग अरुने तुला हिम्मत दिली म्हणून तुला हे शक्य झाल. नाहीतरी आली होतीस गळके हातपाय घेरुन घरी.

१५ २० लाख मदत करायला अरू चा जुना परिचित (सायलेंट लव्हर) , अर्थातच श्रीमंत असलेला , एंट्री घेइल असे वाटते. >>>>>>> अस सुद्दा दाखवतील की लली अविनाशला मदत करते आणि ती सन्जनाची नवीन बॉसही असेल. फक्त तिने अरुला तिच्या मुलीला सून करुन घ्यायची अट नाही घातली म्हणजे मिळवली. अनघा पुन्हा लटकायची. अभीचा काही नेम नाही.

शुभ प्रभातः भाग ४७५:

एक कसलातरी शॉट आहे रोडचा मग यश व अरू स्कूटर वरून स्टेशन मध्ये येताहेत. तर अवीचा फोन येतो. १५ २० लाख कमी पडत आहेत. अवी ला भीती वा टते आहे जीव द्यायचा विचार करतो आहे. सु अरू उसासे न टाकता देवावर श्रद्धा function at() { [native code] } ठेवा म्हण्ते.
आत्महत्येचा विचार सोडा म्हणते. अंथरूण पाहून पाय पसरावे हे मला कळ ते म्हण ते. हे ह्या घडील बोलायचे म्हणजे बैल गेला अन झोपा केला झाले. काही तरी तारण ठेवयला जमले तर यश चा मित्र काही सोय करेल. अरू स्कूटर मागे वळवून घरी जाउ म्हण ते.

कट टू नव्या कांचन मेडचा इंटर व्यू. : हा विनोदी टाइप आहे. विमल ला बोलवतात. अन्या व संजनाचे जेवण कांचन बनव्णार आहे. विमलचे नखरे चालू आहेत. व नवी मेड व संजना सर्व बायका मिळून कल्ला करत आहेत. एकही बाई काहीच ऐकत नाही.

आता तिला ऑर्डर सोडून संजना तयार व्हायला जाते. तेव्ढ्यात इशा येते. व हे नाटक बघून वैतागते. आजी व संजना स्वयंपाकाची ऑर्डर देते.
वेग वेगळी. सगळ्या बाया कोणीच कोणाचे ऐकत नाही. विमल सुद्धा. आजी शिस्त ला वायचा मेसेज करत आहे. सुप्पर कॉमेडी.
हिडन मेसेजः बायका किती इमॅचुअर असतात. त्याम्ना संभाळून घ्यायला बाप्या हवच. अन्या समजावायचा प्रयत्न करतो पण हताश होउन रूम मध्ये जातो.

आत रस्त्याचा कसला तरी शॉट आहे. अरू उसासे टाकत ऑफिसला पोहोचते. उशीर झाला म्हणून सोरी सॉरी करते आहे. भक्ती मॅम तिला चिल म्हणते. ती म्हणते इथे सर्व बायकाच आहेत व घरी काही प्रश्न येउ शकतात. ही बिचारी अरू च्या हाता त डोनर्स ची यादी असलेली फाइल ठेवते. उद्यापासून ऑडिट आहे ह्या हपिसात. ही नक्की डोनर कडे अवी साठी भीक मागणार.
आता अप्पा येतात व कांचन नावावरून परत घोटाळे. एक ग्लास पाणी म्हातार्‍याने मागितले आहे ते आजी कांचनला द्यायला सां ग ते. म्हातारा वैतागून मीच घेतो म्हणतो मग म्हातारी बूड हालवून आणू न देते.

आजो बा गंभीर झाले आहेत व विचार करत आहेत. बहुतेक डोंबिवलीच्या घरी अरूने त्यांना अवी च्या प्रश्नाची माहिती दिली असावी. काय रत्ने
निपजली आहेत. एकाने लफडे करून नवे पात्र घरीच आणले. दुसर्‍याने बायकोच्या नादाने कर्ज बाजारी पणा पदरात घेतला आहे. ( अवीने स्क्विड गेम खे ळावी!!१ व्याख्य्या व्किक्ख्हिई वुख्ह्हू)

प्रोमो: अरू ऑफिसातला काही एक सप्लाय व युसेज मधी ल डिस्क्रीप न्सी शोधते तर भक्तीमॅम तू आत्ता ह्यात पडू नको म्ह ण ते. म्हणजे आधीच काही तरी फ्रॉड चालू आहे. आता अरू इथली प्रकर णे निप्टून काढेल. है शाब्बास.

तिक डे मनू व मल्हार ह्यांनी लग्न केले मंदिरात.

function at() { [native code] }>>>हे काय असतं?????
अमा तुम्ही खूप छान सांगता रोज,सीरिअल नाही पाहत ही पण फक्त आणि फक्त तुमचे रोजचे review वाचायला उघडते हा धागा

तिक डे मनू व मल्हार ह्यांनी लग्न केले मंदिरात... गल्ली चुकली का नवीन पात्र आलेत. सिरियल बघत नाही फक्त रिव्ह्यु वाचतो त्यामुळे संदर्भ नाही लागला.

function at() { [native code] } >. जेव्हा मायबोलीवर भक्ती भावाने लिहतात तेव्हा त्याना हा प्रसाद मिळतो. Happy

एक कसलातरी शॉट आहे रोडचा >>>>>>>> कॉफसीलची अ‍ॅड करत आहेत होर्डिन्ग लावून. झीमवाल्यान्कडून प्रेरणा घेतली आहे.

आजो बा गंभीर झाले आहेत व विचार करत आहेत. बहुतेक डोंबिवलीच्या घरी अरूने त्यांना अवी च्या प्रश्नाची माहिती दिली असावी. >>>>>>>> हिने आजोबाने दिलेल घडयाळ तारण म्हणून ठेवल असेल.

ही नक्की डोनर कडे अवी साठी भीक मागणार. >>>>> तो डोनर नक्की हिच्या कॉलेजमधला तिचा क्रश असणार ' अनुपमा' सारख

अन्या व संजनाचे जेवण कांचन बनव्णार आहे. >>>>>>>>> संजनाचे एक पटल. तिला सतत ती आजी तिच्या स्वयमपाकावरुन बोलते, तिने कित्तीही जुळवून घ्यायचा प्रयन्त केला तरीही हि म्हातारी तिला दाद देत नाही. मग करणार काय ती शेवटी? एक अरु सोडल्यास आजकालची कुठलीही बाई कान्चनसारख्या सासूचा छळवाद सहन करणार नाही.

शुभ प्रभातः भाग ४७६

आजी आजोबा जेवत आहेत इशा त्यांना वाढत आहे व मग कॉलेज ला जाईल म्हणते. आजीचा जीव घाब रा होतो लगेच. ती अवि ला बोलावून घ्या म्हण ते. व आजोबांना त्याला फोन करायला सांगते. कंचन मोलकरीन अन्याला त्याचे जेवण देते व तो आजीकडे भाकरी उसळ पण घेतो. हे ती मेड बघून घेते. विमल लवकर गेलेली आहे.

कांचन मेड चा फोन कॉल चालू आहे पैसे कमवेन म्हणते. आ जी तिला मशीन मध्ये किती पाव्ड र घातलीस म्हणून पिडते. आजी खट पणा करत आहे व मेड ला त्रास देत आहे.

कट टू ओफीस यश चा फोन येतो व काम झाले आहे म्हणते. सु अरू यश ला अविला फोन करून चौकशी कर म्हणते.
हे घर चे आजीचा वात्र ट पणा संप ल्यावर

अगेन कट टू ऑफिस. अरू यश चा फॉलो अप घेत आहे उद्या तिला आश्रामात गाणे शिकवाय्ला जायचे आहे व त्यानंतर घरी. तेव्हा त्या पैसे वाल्या मित्राला भेटायचे ठरवते. अवि लोन प्रकरण धसास लावायचे आहे.

आजी विशाखाशी गॉसिप करत आहे. सं जना बाहेरून आली आहे. व मेडला हाक मारते आहे. ती लगेच पाणी व कॉफी द्यायची ऑर्ड र देते. अन्या पण तिचे स्वागत करतो. अन्या विमलचे जेवण जेवतो हे मेड लगेच सांगते सं जना अन्यावर भडकते मेड पण भडकते अरू फोन करते.
अन्या चौकशी करतो तर संजना डोळे वटारते.

आजी उद्या अरू ला घरी बोलवते आता ही आश्रमात गाणे शिकवणार मग यश ला घेउन भेट पैशासाठी मग घरी येउन आजीचे पाय चेपणार व्हेरी सुपर ह्युमन.

आजी मेडशी कट कट करते. व त्या संजनाला तिच्या कटकटी सांगते. पैसे वाया घालवायचे नाहीत. आम्ही जपून वापरत असो. संजना थकलेली आहे व वैतागते. आल्या आल्या भांडू नका म्हणून वर जाउन कॉफी वर पाठ वायला सांगते. अरू ला राहायचा आग्रह करू नका असे बजावते. एकदम इन्सेप्शन संगीत आहे.

आजी लगेच करवादते अन्यावर कारण तो इथे आहे.
कट टू ऑफिस अरु सहा साडेसहा परेन्त काम करत बसली आहे. ती कामातल्या डिस्क्रीपन्सी दाखवून देत आहे. ती जास्त वेळ थांबून काम पूर्ण करून जाईन म्हणते. ऑफिस बॉय तिच्या साठी बसतो.

आजी आजोबा फेर्‍या मारायला बोलवतात. आजी मेडच्या मागे मागे घर भर फिरून दमली आहे. ह्या कटक टी ला सर्व खरे तर वैतागले आहेत
आजी म्हणते अरू ला बोलावून घेतले आहे.

विमल ला बोलवून रात्रीच्या भाकर्‍या करायचा प्लॅन चालू आहे. अनघा अभी जोडी आली आहे. अनघा चौकश्या करत आहे. घट स्थापनेचे प्लॅन चालू आहेत. अनघा रात्रीच्या जेव णाची तयारी करायचे म्हणते. संजना येउन लगेच काहीतरी खवट बोलते.

प्रोमो: अरू घरी आली आहे संजना रूड बोलते लुड बूड करायची नाही म्हणते. अरू लगेच हार्ड अवतार घेउन माझी मुले इथे राहतात मी येइन. कधी पन रोकने की कोशिस मत करो असा दम भरते.

काल रस्त्यात असताना अविचा फोन आला तेव्हा करु म्हणाली, परत घरी जाऊ. ॉॉ ऑफिसात ही हे सांगितले. पण ती घरी आलेली दाखवलं नाही.
अविचल कर्ज प्रकरण तिने अप्पांना सांगून घर तारण ठेवायला तयार केलं असेल असं वाटतं. कारण यशाने तारण काय ठेवणार असं विचारलं होतं.

अप्पा घरी आल्यावर कांचन मेड लाख म्हणाले की तू दोन तासांत बदललीय - म्हणजे हे बोरिवली हून डोंबिवलीला जाऊन पाहुणचार घेऊन दोन तासांत परत घरी आले .

जाऊदेमरूदे. यांची स्कुटर उडणारी असावी.

किती वेळ लागतो: मुलुंड टू दादर मला ३५ मिनिटॅ लागतात. डोंबिवली टू दादर एक तास लागत असा वा. ट्रॅ क बदलायला सेंट्रल टू वेस्टर्न चालत गर्दीत जायचे त्याला २० मिनिटे तरी लागतील.

पुढे मला माहीत नाही.

अमा थॅकस फॉर अपडेट.
बोरेवली ते डोम्बिवली स्लो ट्रेन ने दिड तास आणि फास्ट ट्रेन ने सव्वा तास. यात टेन साठी वेटिंग टाईम , दादरला लागणारा ट्रान्सफर टाईम, ट्रेन स्टेशन पासुन ऑफीस्/घरी जायचा वेळ वेगळा.
पिक टाईम सोडला तर सेट्रल लाईन ला फास्ट ट्रेन खुप कमी असतात.

बाय रोड तीन तास तर नक्कीच लागतिल. कधी गेलो नाही.

टिटवाळा, बदलापूर, इ. हून सुटणारी फास्ट ट्रेन घेतली तर डोंबिवली दादर ४२ मिनिटे.
कल्याणहून सुटणारी ने एक तास.
दादरहून विरार लोकलने बोरिवली ३० मिनिटे. बोरिवली लोकलने ४५.
दादर स्टेशन मरे ते परे दहा मिनिटे धरू

रस्त्याने ४८ किमी दाखवतोय. पाऊण ते एक तास.
पण हे फक्त गुगलवर असावं. प्रत्यक्षात अशक्य वाटतंय

ह्यात घरून चालत स्टेशन व स्टेशन वरून हपिसला चालत. हा वेळ पण अ‍ॅड करा. त्यात ही बाई निदान ४५ प्लस असेल. ऑपरेशन जालेले व हेवी पिशव्या धरून चालते. बस करते. तर बस चा वेटिन्ग टाइम व आटो करतच नाही. त्या पेक्षा त्या बंगल्यातच एक आउट हाउस विडोज रूम टाइप खोली बांधोन राहावे पूर्वी टाकलेल्या बायका राहात तसे. अन्याला जरा चेंज.

भरत.. Happy मरे ते परे... Happy
सरासरी आपण ५० मिनीटे धरु.. डोंबिवली दादर! मग मरे ते परे....१५ मिनीटे (फार गर्दी असते ! ), नंतर दादर बोरिवली से, ४० मिनीटे. दोन्ही ट्रेन्स साठी मिळून वेटींग टाईम १० मिनीटे , व घर ते स्टेशन आणि स्टेशन ते ऑफीस...१५ - १५ मिनीटे मिनिमम...!!
जवळपास अडीच - पावणेतीन तासांचा प्रवास एका वेळचा...!!!
अरु पुन्हा घरी ही जाणार आज...!!!
अमा...अन्याला चेंज मिळाला तर हवाच आहे! Lol

यश चालवतोयना मग काय असणार , असंही तो नेहमी हवेतच असतो. अरूचा मेक ओव्हर होणारे म्हणे , करा बाबानो लवकर आणि तिचा नवा हिरो कधी येणार?

या सगळ्या हिशेबात तुम्ही शीळफाट्याचं ट्राफीक घेतलं नाहीये. ते धरून बाय रोड २तास तरी लागतील. ( यश घोडबंदर ने गेला असेल असं समजून चालु)

अजिबात ट्रॅफिक नाही, रस्ते गुळगुळीत असतील तर दोन तासात आरामात स्कूटरने पोचता येईल बोरीवलीत. सिरियलवाले अर्ध्या तासात पण पोचतील, त्यांना कुठे वास्तवाशी काही देणं घेणं असतं.

मागे एका ऑफिस ऑफिस सिरियल मध्ये ती हिरविण सकाळी उठून बांद्रा ते विरार जायची ,तिथे सगळ्यांच जेवण म्हणजे सैपाक करून परत नऊ ला हापिसात हजर . ( लग्न झालेली जोडपी हापिसात चालणार नाहीत म्हणून ते लग्न लपवून ठेवतात अशी थीम होत. सु भा बॉस होता. )
तुपारे मध्ये ही सुभा रोज कर्जत हुन यायचा मुंबईला हापिसात.
ह्या सिरियल वाल्यांचं सगळंच गंडलेलं असतं त्यात हे ही.

कधी कधी अवी बंडलबाज वाटतो. का कुणास ठाऊक पण तो पैशासाठी इकडे आला असावा असं वाटतं. अन्या काही ऐकायचा नाही, म्हणून अरूबाईला गळ घातलेय. एवढे पैसे? १५-२० लाख? ते पण कमी पडतायत? म्हणजे टोटल कितीची होती? आणि एवढे पैसे घेऊन कसला बिझनेस केला?
आता अरू घर तारण ठेवायला काढते की काय?
अनुपमा मधले काही तुकडे घेतातच इथे म्हणजे अरूसाठी नवीन हिरो आणतीलच. बघू.

तुपारे मध्ये ही सुभा रोज कर्जत हुन यायचा मुंबईला हापिसात.>>> तो हेलिकॉप्टरमधून यायचा ना? अतिश्रीमंत महाराज.

Pages