भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज काय चाललंय ते बघा लोकहो

मतदारसंघाचा कोणता विकास केला ते सांगा? असा प्रश्न भाजपच्या प्रचारसभेत विद्यमान खासदार रामदास तडस व भाजप आमदार डॉ अनिल बोंडे यांना एका तरुणाकडून विचारण्यात आला. त्यानंतर या प्रचारसभेत गोंधळ उडाला. या गोंधळानंतरही नेत्यांनी आपली भाषणं सुरूच ठेवल्याचंही पाहायला मिळालं.

ज्या तरुणानं विकासाची अपेक्षा ठेऊन प्रश्न विचारला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे प्रशासनावर दडपशाहीचा आरोप करण्यात येत आहे.

इस्लामबद्दल अजूनही काही खोटारडेपणा होता. आणि तो दाखवून दिलाच पाहिजे. >> तो तेवढा तुम्ही दाखवा पण सुषमाताईंचा किंवा त्यांच्या पक्षाचा/ आताच्या सरकारचा खोटारडेपणा तुम्ही कधी दाखवणार नाही. डाटा बाय कन्विनियन्स.

मध्यप्रदेशमधे सत्तेत येऊन दोन महिने देखील उलटले नाहीत तोच कॉंग्रेसने त्यांच्या जुन्या सवयीप्रमाणे भ्रष्टाचार करणे सुरु देखील केले. आता मध्यप्रदेशमधील कमला सरकारवर आईटी डीपार्टमेंटच्या धाडी पडू लागल्यावर भाजपासरकार राजकीय सुड उगवत आहे असा कांगावा ह्या घोटाळेबाज व भ्रष्टाचारी कॉंग्रेसने सुरु केला आहे.

आताचे प्रतिसाद वाचल्यावर असे वाटु लागले आहे की हा धागा इस्लाम व गान्धीवर आहे. माझ्या प्रतिसादाला उत्तर न देता फक्त इस्लाम वाईट का चान्गला सुषमा स्वराज खोटे बोलल्या आणि का बोलल्या इथपर्यन्त हा धागा पोचला आहे. चालु द्या.

राहुल गांधी देवळात गेले, जानवे घातले तर हिंदूंच्या पोटात का दुखते समजले नाही- पोटात नाही दुखले ढोंगी पणाचा राग आला , स्वतः हिंदू नसताना फक्त मतांसाठी एवढी नाटक करायची गरज नाही , हिम्मत असेल तर स्वतः चा खरा धर्म सांगून दाखवावा पुराव्या सकट , खोटी जानव्ह घालून नाही ..

बाकी विषय भरकटत चाललंय चापलुसी मंडळी.

एखादा स्वतःला हिंदु म्हणत असेल आणि जानवे डकवत असेल तर माझ्या सारख्या हिंदु माणसाला उलट अभिमान वाटेल की बाबा याला आपला धर्म आवडला. मात्र काही लोकांच्या अंगी वंशपरंपरागत संकुचीत, कोती प्रवृत्ती अशी काही भिनलेली असते त्यामुळे त्यांना या प्रकाराने मिरच्या झोंबु शकतात. Proud

Rahul gandhi in wayanad
---

6260892116_3b731068da.jpg

Rahul gandhi in amethi
--

rahul_gandhi_pushkar_0.jpeg

ज्या तरुणानं विकासाची अपेक्षा ठेऊन प्रश्न विचारला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे प्रशासनावर दडपशाहीचा आरोप करण्यात येत आहे.-- ज्या लोकांनी संपूर्ण देश कारागृह बनवला होता ते लोक असे प्रश्न विचारतात तेंव्हा हसायला येत ..

माझ्या सारख्या हिंदु माणसाला उलट अभिमान वाटेल की बाबा याला आपला धर्म आवडला-जेंव्हा माहित आहे कि पुढचा खोटारडा आहे आणि फक्त मतांसाठी असा ढोंगी पण करतो तेंव्हा रागच येतो...

खरंच हिंदू साठी काही तरी करणार असाल तर उघड पाठिंबा द्यावा राम मंदिरासाठी , संसदे मध्ये private बिल घेऊन यावे, सामान नागरिक कायदा संमत करावा दोन्ही सभागृह मध्ये आणि मग मागावे मत हिंदूंचे ..नाही तरी ती खोटी जाणव्ही काढून वायनाड ला स्थलांतरित व्हवे कायमचे ..

प्रश्न विचारला म्हणून अटक झाली नसेल सभेत गोंधळ निर्माण झाला
म्हणून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अटक झाली असली पाहिजे .
गुन्हा नोंदवला नसेल .
बातमी पूर्ण नाही arthvat माहिती दिली आहे .

पण हिंदू धर्म तर सगळ्यात हिंसक धर्म आहे असं काँग्रेस उमेदवार उर्मीलाताई मातोंडकर यांनी म्हटलं आहे .
आयसिस, अल कायदा, लष्कर ए तोयबा ,तालिबान, बोको हराम यापेक्षाही जास्त हिंसक हिंदू धर्म according to cogress candidate.
सो म्हणून राहुलने हिंदू धर्म त्यागलाही असेल आता.

खरंच हिंदू साठी काही तरी करणार असाल तर उघड पाठिंबा द्यावा राम मंदिरासाठी , संसदे मध्ये private बिल घेऊन यावे, सामान नागरिक कायदा संमत करावा दोन्ही सभागृह मध्ये आणि मग मागावे मत हिंदूंचे ..>> पोपटपंचीसाठी संसदे मध्ये private बिल, सामान नागरिक कायदा वगैरे ठीक आहे पण राममंदीराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबीत आहे तेव्हा ह्या फोकंदर्‍या काहीही कामाच्या नाहीत हे कोणीही सुजाण भारतीय नागरीक मान्य करेल.

नाही तरी ती खोटी जाणव्ही काढून वायनाड ला स्थलांतरित व्हवे कायमचे ..>> अजुनतरी देशात लोकशाही आहे. तेव्हा कोण दिल्लीतुन वायनाड ला जातकाका अहमादबादला हे काळच ठरवेल Wink

खऱ्या धर्माचा पुरावा 10 वी च्या स्कुल लिविंगमध्ये असतो,

त्यांनतर कुणी दुसरा धर्म स्वीकारला तर त्याचे जे धार्मिक विधी असतील त्याचे फोटो , धार्मिक सर्टिफिकेट व गेझेट वगैरे लागेल,

नुसताच धर्म आवडला , पण अजून धार्मिक विधी केले नाहीत , तर त्याला मित्र म्हणून मानायचे की नाही , हा तुमचा प्रश्न.

बाजीराव मस्तानी , कृष्णराव उर्फ समशेर प्रकरण अजून तसेच आहे असे दिसतेय

( आणि पेशव्यांचा ब्राह्मण वंश वाळला अन मस्तानीपुत्र समशेरचा वंश मात्र अजून हिरवागार आहे.

बाबराच्या पुढचे मोघलही बाप मुस्लिम व आई राजपूत असेच आहेत ना ?

स्वतः हिटलरची हाफ ब्लड होता. संघवाल्यांचा लाडका )

पेशव्यांचा ब्राह्मण वंश वाळला अन मस्तानीपुत्र समशेरचा वंश मात्र अजून हिरवागार आहे.>> अरे बापरे.. हे विसरलोच होतो की.. Biggrin

त्या उर्मिलाबानोने लग्नानंतर शांतताप्रिय Proud धर्म स्विकारल्याने तिला हिंदू धर्म हिंसक वाटणे साहजिकच आहे. आणि कॉंग्रेस प्रवेशासाठी मौलाना रा'फूल' गांधीची अटच आहे. जोपर्यंत हिंदू व हिंदूधर्माला, कॉंग्रेसमधे प्रवेश करण्यास ईच्छूक असणारा शिव्या घालत नाही तो पर्यंत कॉंग्रेसमधे त्या माणसाला प्रवेश दिलाच जात नाही.

अनिरुध्द.. on 8 April, 2019 - 20:09>>

फोटोशॉप कळत नाही की ऑर्गासम हाताबाहेर आहे Proud

पेशव्यांचा ब्राह्मण वंश वाळला अन मस्तानीपुत्र समशेरचा वंश मात्र अजून हिरवागार आहे-- अरे रे इतिहासात एवढेच लांब गेले का त्या च्या पण आधी जायचे ना ..म्हणजे जेंव्हा तुमचे मूळ सुद्धा हिंदू होते तो पर्यन्त..

खऱ्या धर्माचा पुरावा 10 वी च्या स्कुल लिविंगमध्ये असतो- तो तरी दाखवा ना , तुमच्या कडे असेल च राहुल गांधींचे सगळे दाखले..
ढोगीं आहे हे अश्या लोकांना इतिहासाने पण बेदखल केला होत आणि भविष्यत पण करतील.. राहुल गांधी नावाचा माणूस १० वर्ष संसदेत होता पण काहीही केला नाही ..त्याची लायकी आहे का देश चालवायची भाषा करतो , दुसऱ्याच्या चमच्याने दूध पिणारा ..आधी कर्तृत्व बघावा , जगाला दाखवा कि मी अमेठी मध्ये हा विकास केला ..आणि मग मत मागायची ...धर्म तर विषय खोल आहे त्यासाठी ..

अरे बापरे.. हे विसरलोच होतो की.. Biggrin

( मराठयांच्याही गाद्या दत्तकच आहेत, मुसलमान घराणी मात्र टिकली.

नथुराम व त्याचे गुरुजी निर्वंश झाले, गांधीजींचे आज 4 पुत्र व 15 की 18 नात्वनडे आहेत म्हणे. )

खास तुमच्या माहितीसाठी,
नो वाद नो विवाद , विषय समाप्त

स्त्री अत्याचाराबाबत भाजपची मन की बात जाहीरनाम्यात छापून आली.
अर्थात कथुआ आणि उन्नाव प्रकरणी ती आधीच उघड झाली होती.
आता ऑफिशियल झालं, इतकंच.

धर्म , आणि जात ह्या दोन गोष्टी निवडणूक जिंकण्या साठी खूप महत्वाची भूमिका निभावत असतात .
प्रतेक पक्षाची ऐक व्यूहरचना आहेत .मुसलमान + बाकी अल्प संख्या असलेला समाज आणि sc , st ह्यांच्या मतावर निवडून येणारे पक्ष हिंदू वर टीका करतात पाकिस्तान वर प्रेम व्यक्त करतात .
आणि हिंदू धर्माची मते मिळवणारे पक्ष मुसलमान धर्मावर टिका करतात आणि पाकिस्तान ला जशास तसेच उत्तर द्यायची भाषा करतात हा निवडणूक फंडा आहे.
आणि ह्या मधून वेळ मिळला तर मग देशाचा विकास , बेरोजगारी , लोकसंख्या वाढ असल्या फालतू प्रश्नावर विचार व्यक्त करतात पण हे प्रश्न जास्त महत्वाचे नाहीत

प्रतेक पक्षाची ऐक व्यूहरचना आहेत .मुसलमान + बाकी अल्प संख्या असलेला समाज आणि sc , st ह्यांच्या मतावर निवडून येणारे पक्ष हिंदू वर टीका करतात पाकिस्तान वर प्रेम व्यक्त करतात .

हो ना , पाकचा संघ मुंबईत आला की तोडफोड होते, पण गुजरात बंदरातून पाकचे दळणवळण व्यापार कधीच बंद पडत नाही.

डोवालच्या मुलाचा पाकी पार्टनर म्हणजे अगदी कुंभमेळ्याचे बीछडे भाऊच.

अदानी पाकला वीज देणार होता ना ?

गुजरात बंदरातून पाकचे दळणवळण व्यापार कधीच बंद पडत नाही- पडला , तुम्ही अजून झोपलेलाच आहे, भारताने मोस्ट फेंवोर्ड नेशन चा दर्जा काढून घेतलाय, इम्पोर्ट ड्युटी प्रचंड वाढवलीय , पाकिस्तान ची अवस्था नेपाळ आणि मालदीव पेक्षाही खराब झालीय ..

पाकिस्तान नि किती ही हल्ले केले तरी त्यांच्या वर प्रेम केले पहिजे .त्यांच्या कलाकारांचे आपण स्वागत केले पहिजे . charch करून अतिरेकी लोकाना समजावले पहिजे .बांगला देशातून जे भारतात कायदेशीर मार्गे येत नाहीत तरी सुध्दा सर्व सुविधा दिल्या पाहिजेत ही मत आहेत ना काही राजकीय पक्षांची .
तया मागे काहीतरी राजकीय गणित असेल ना

गुजरात बंदरातून पाकचे दळणवळण व्यापार कधीच बंद पडत नाही- पडला ,

झाला बंद ? पाकिस्तानातून भारतात सिमेंट , खजूर सुके मेवा अन कांदा येतो म्हणे , काय थांबले ?

आणि 100 रुच्या वस्तूवर एकसाईज ड्युटी 200 रु लावली , तर भारतीय व्यापारी 300 रु खड्ड्यात घालतो, पाकिस्तानचा विक्रेता 100 रु च मिळवतो. त्याला ना नफा ना तोटा

भाजपात गुणवन्त लोक कमीच आहेत, अन गांधी घराणे अती गुणवान आहे,

म्हणून तर भाजपाच्या शिटात 2 जागा मनेका अन वरूण , गांधी घरण्याच्याच आहेत, 200 पैकी 2 म्हणजे 1 % , एकाच घराण्यातल्या 2 शिटा असलेले भाजपात अजून कोणते घराणे आहे ?

अबब !

Pages