भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि 100 रुच्या वस्तूवर एकसाईज ड्युटी 200 रु लावली , तर भारतीय व्यापारी 300 रु खड्ड्यात घालतो, पाकिस्तानचा विक्रेता 100 रु च मिळवतो. त्याला ना नफा ना तोटा- कुठला व्यापारी असं धंदा करतो ..हि काँग्रेस style वाटत ..

excise ड्यूटी tya वस्तू ची किमत वाढावी आणि विक्री कमी होण्यासाठी लावली जाते

झाली का विक्री कमी ?- बातमी नीट वाचत जावा, आकडे हे जुलै २०१८ मधले आहेत , सध्याची परिस्थिती ची माहिती पाठवा तुमच्या माहितीदारांकडून ..

कशा महाग होतील आपल्या देशात होते त्याचे उत्पादन आणि ज्या होत नाहीत त्या वस्तू पाकिस्तान व्यतिरिक्त दुसऱ्या देशातून आयात करता येतील

कमी झाली , तरी जनतेला आता त्या वस्तू महाग दरात घ्याव्याच लागतील .- काय जबरदस्ती आहे का ? दुसरी कडून करेल भारत आयात, तुम्हाला का पाकिस्तान ची एवढी काळजी ..

कशा महाग होतील आपल्या देशात होते त्याचे उत्पादन
एकूण गरजेच्या २०% पेट्रोलजन्य पदार्थांचे उत्पादन देशातच होते,तरी कोणतेही सरकार ते उत्पादन इम्पोर्ट पॅरीटीने का विकते? पाकिस्तानातून महाग वस्तू घेणे बंद केले तर दुसरे देश त्या संधीचा फायदा घेतील, स्पर्धा नसल्याने ते दुय्यम दर्जाचा मालही अधिक दराने विकतील , नुकसान भारतीय ग्राहकांचेच होणार. जेव्हा ग्राहकाकडे अन्य पर्याय नसतो तेव्हा सरकार असो वा व्यापारी असो, दोघेही ग्राहकालाच लुटतात. आपणही उगाच सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतो.

पाकिस्तानकडून आपण जितकी आयात करतो, त्याच्या चौपट पाकला निर्यात करतो.

इथे कोणीतरी मल्ल्या आणि निरव मोदी ला पकडलं म्हणुन नाचताना दिसलं.
त्यांच्यासाठी सहाराश्री सुब्रतो राय आणि सत्यमचे रामलिंगम राजू किती काळ तु रुंगात होते/ आहेत ते बघा.

समान नागरी कायदा हव म्हणुन पिसारा फुलवुन नाचणार्‍यांनो, HUF देखिल रद्दबातल करावा लागेल हे ठऊक आहे का ??
बाकी उर्मिलाचे लग्न झाल्यावर तिचा धर्म बदलला हे वाचुन हसु आले नव्हते, पण पोस्टकर्त्याचे नाव पाहिले आणि खदाखदहसलो, अतिनिर्बुद्ध. माण्सकाडुन अशी पोस्ट येणार हा कयास खात्रीत बदलला ह पाहुन

नथुरामच्या काळापासून पाक नावडताच आहे ना ? मग व्यवहार आधीपासूनच बंद करायचे की ,
उगाच ते टेक्स वाढवायचे नाटक कशाला हवे ?

पाकिस्तान वर का प्रेम करावे हे जरा समजून सांगताकां .
आता पर्यन्त हजारो भारतीय लोकांचा jya देशांनी बळी घेतला tya देशावर तुमचे प्रेम कशासाठी

कुणी केले प्रेम ? माझा गुजरातमधून व्यवहारही नाही अन माझा पाकिस्तानी पार्टनरही नाही.

राजेश१८८, कोणी पाकिस्तानवर प्रेम केलं ते सांगा. इथले प्रतिसाद दाखवा.
मराठीत एक नाट्यछटा नावाचा प्रकार आहे.
समोर कोणीच नसतं. पण कोणीतरी आहे, असं समजून, तो असं असं म्हणाला असं धरून आपण बडबडत सुटायचं.
तुम्ही आणि तुमचं मित्रमंडळ तेच करताय.

आम्ही पाकिस्तानमध्ये कोणाच्या वाढदिवसाला , ते अनाहूत जात नाही. कोणाला शाल भेट देत नाही. पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छापण देत नाही.
पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या मागे उभी असलेल्या आय एस आयच्या अधिकाऱ्यांना इथे बोलावत नाही वा बिर्याणीही खिलवत नाही

आम्ही पाकिस्तानमध्ये कोणाच्या वाढदिवसाला , ते अनाहूत जात नाही. कोणाला शाल भेट देत नाही. पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छापण देत नाही.
पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या मागे उभी असलेल्यग आय एस आयच्या अधिकाऱ्यांना इथे बोलावत नाही वा बिर्याणीही खिलवत नाही
नवीन Submitted by भरत. on 9 April, 2019 - 13:30
<<

ह्यालाच डबल ढोलकी म्हणतात !
पंतप्रधान श्री मोदींनी पाकड्यांबरोबर चर्चेला सुरुवात केली की म्हणायचे वाढदिवसाला व बिर्याणी खायला मोदी पाकिस्तानात जातात व पाकड्यांवर क्षेपणास्त्र डागली कि व्हिवळायचे मोदी युद्धखोर आहेत म्हणून. हे कॉंग्रेसी भाट कधीच सुधारणार नाहित.

युद्धखोर, अन तुम्ही ?

मोठी युद्धे आम्ही काँग्रेसवाल्याणीच केली.

तुमच्या किरकोळ चकमकी , आम्ही कशाला तुम्हाला युद्धखोर म्हणू ?

मोठी युद्धे आम्ही काँग्रेसवाल्याणीच केली. >>>> अच्छा म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते सीमेवर लढायला जायचे. मला उगाचच वाटायचे की सैनिक सीमेवर लढतात म्हणून. आणि अहिंसेचे पुजारी असणारे काँग्रेसवाले युध्द्खोर आहेत हे नव्यानेच कळले.

समोर कोणीच नसतं. पण कोणीतरी आहे, असं समजून, तो असं असं म्हणाला असं धरून आपण बडबडत सुटायचं.>> हा मनोरुग्णातला लेटेस्ट प्रकार - नमोरुग्ण...!! Proud

अच्छा म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते सीमेवर लढायला जायचे. मला उगाचच वाटायचे की सैनिक सीमेवर लढतात म्हणून. >> ते लाठ्या-काठ्या घेतलेले हाप चड्डी गँगने आपले गुलबट मांसल दंड/मांड्या दाखवुन पाकिस्तानी सैन्याला पळवुन लावले का मग..? Proud

जवानांचे बलिदान लक्षात ठेवुन मतदान करा असे बरळुन झाले आज. ह्याच्या गृहखात्याच्या नाकर्तेपणामुळे पुलवामा मधे जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि हा म्हणतो त्यांनी बलिदान केलं?? फेकारडा!

नवीन Submitted by DJ. on 9 April, 2019 - 15:27

लाठ्या-काठ्यावाल्यांनी कधी म्हटलं की त्यांनी युध्द केली म्हणून. काळी मांजर म्हणतेय काँग्रेसवाल्यांनी मोठी युध्दे केली. आता काँग्रेसवाल्यांनी पाकिस्तानी सैनिकांना कसे काय पळवून लावले ते तेच सांगतील.

भाटांना ७२००० रु.चा पहिला हप्ता मिळाला का ?
नाहि रा'फूल' काल सांगत होता की, वाटायचे २८१ करोड रु. त्याने एमपीमधे कल्लू अंकलकडे ठेवले होते मात्र आयकर विभागाने ते जप्त केले म्हणून विचारतोय.

१९७७ च्या सालातल्या सो-कॉल्ड तुरुंगवासासाठी प्रति महिना १०००० ची दक्षिणा खाऊन बरंच मांदं चढलेलं दिसतंय..! Biggrin

इथल्या कॉंगी भाटांना मला एक प्रश्न विचारायचा आहे.
की तुमचा राहुल गांधी भारताबाहेर राहणार्‍या, गरिब भारतीयांना देखील वर्षाला ७२००० रु. फुकट देणार आहे का ?

बरं ते १९७७ च्या सालातल्या सो-कॉल्ड तुरुंगवासासाठी १०००० प्रति महिना दक्षिणा भारता बाहेर असलेल्या पोटावळ्यांना पण मिळते का हो..??

Pages