माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल खूप दिवसांनी माभैनबा पाहिली ,एक मला कळलं नाही कि गुरु चे आई बाबा राधिका ला सरप्राइज द्यायला येणार म्हणाले आणि निघाले पण त्यांना हे माहित होत कि ती आत्ता ऑफिस मध्ये असणारे आणि गुरु पण ऑफिस मधे मग ते घरात कसे जाणार होते?किल्ली शेजारी ठेवते का राधिका ??
कि गुरु घरी असणारे हे माहित असत अगोदर यांना ??

अंजली.. Happy इतका बारकाईनं विचार नाही करत केडी! तसाही तो तर असणारच होता ना ते येतील तेव्हा (पार्टीत)....सो त्यांना घरीच डायरेक्ट पाठविलं! Biggrin

पार्टी कशाची देत्येय शनाया? उगीच??

त्या शनायाला काय फक्त पार्टीज, shopping म्हणजेच आयुष्य वाटतं काय.

जाउदे गुरु खड्यात, त्या बनीला काय करायचं आहे, शनायाला त्याच्यापासून दूर करून.

बाय द वे बनी नाव मस्त आहे, आपल्याला आवडलं बच्चाने ठेवलेलं हे नाव.

बनी जेव्हा शनायाला बच्चा बच्चा म्हणतो मला जाम मज्जा येते. त्याचा टोन भारी असतो.
पण त्याचा जो प्रयत्न आहे शनायाला गुरू पासून अलग करण्याचा, आणि त्या नन्तर गुरू कसा झक मारत राधा कडे येइल हे जे तो आनन्द ला सांगत होता ते मला पटलं नाही. गुरूची अशी खोड मोडायला हवी की त्याला राधा किंवा बच्चा कुणीच मिळायला नको.
पण राधिका ऐन वेळी माती खाणार आणि त्याला पदरात घेणार.
तो केडी सांगत होता बच्चाला कि तु गुरूला सोड आणि बनहट्टी ला पकड त्याच्याकडे खूप पैसा आहे Uhoh
ह्या असल्या सिरियल पाहून समाजात नक्की काय मेसेज पसरतोय? Uhoh खास करून शनाया मेन्टॅलिटीच्या मुलिंमध्ये. Uhoh

ह्या असल्या सिरियल पाहून समाजात नक्की काय मेसेज पसरतोय? Uhoh खास करून शनाया मेन्टॅलिटीच्या मुलिंमध्ये. >>तश्या मुली मुळातच पैसा कमी पडायला लागला कि सोडून जातात. तसेही शनायाला गुरुशी लग्न करायचेच नव्हते. ती तसे त्याला सांगते पण तो सोडून जाईल म्हणून ईशा तिला सुचवतेकी तू लग्नाला तयार हो कारण राधाक्का सोडचिट्ठी देणार नाही आणि लग्न लरायची वेळच येणार नाही. मग तिला हवे तसे राहता येईल.

सध्या गोल गोल रिन्गण घालुन केड्या त्याच त्याच स्टेशनला येतोय, सगळ हॅन्गिन्ग ठेवायच, गुरु आणी राधिकाला एकत्र आणायचे १६० प्रय्त्न सगळ्यानी केले कि गुरुचे डोळे उघडतिल, राधा माउली त्याचे अपराध पोटात घालेल आणी आदर्श शेवट घडेल.

हो ना..... स्वयंसिद्धा मधे मुलाखत, लोन केस, प्रेझेंटेशन, ..बर्‍याच गोष्टी रिपीट होताहेत! केड्या ची कल्पना शक्ती काम करत नाही आता.
१६० प्रयत्नच का? व्हाय धिस स्पेसिफिक फिगर? Uhoh

त्या ऑरेंजेस भागात राधिकाला सम्या मेसेज करतो सासु सासरे आले म्हणून तेव्हा तिचे गुलाबीजे ज ज्याकेट आहे व
चिडून घरी येउन पाहते तेव्हा ग्रे कलरचे आहे बहुतेक. आणि सोडून जाताना उगीच मानभावी पणे पानवलकरांना विचारून तुम्ही बघाल ना कामाचे थँक्यू सर वगैरे म्हणून निघते. क्क्क्क्क्क्क्क्कित्ती ग बाई गुणाची.

नाना नानी वगैरे सर्व पब्लिक कायम कायम हिचे गुणगान करत अस्ते. ते डोक्यात जाते. आता सासू सासरे आले म्हणजे रोजची चिकचिक चालू होईल.

आणि आज्ञाधारक असल्याचा किती आव आणायचा तो, पान्व्ल्क्राना विचरोन जते घरी. घरत जन्यागोदर नननी किती वेल खल्ला नग्पुर करनच्या. आनि गेरी ला इतकी अक्क्ल कशी नही, कि जरी ह्यन्च्या पर्तिचं तिला (राधिकाला) कलल तरी त्याना ( आईबाबब्ना) नग्पूर वरून यायला खूप वेल लागेल, उगिच आरोप कराय्चा म्हन्जे काहिहि करय्चा का. एका सितित असते आईवदिल तर थिक होतं.

Happy दक्षिणा... अगं हो हो!! किती चिडशील? आणि गॅरी काय तिला असं म्हणाला की पार्टी होती म्हणून तूच बोलावून घेतलंस वगैरे ? काहीही!
पण तो गॅरी तिला घालून पाडून बोलण्याचा अभिनय छान करतो हं.... अगदी मनातून!!....म्हणजे समहाऊ ती निरुत्तर होते!
काहीही दाखवतात कुरडया काय, रस काय......................................!!

मी म्हंटल तसं खरंच राधिका किल्ली शेजारी ठेवते .. गुरूच्या बाबानी नानां कडूनच आणली चावी .. कालचा नाही पाहिलाय .. अर्थात आता डायरेक्ट २ आठवड्याने पाहिलं तरी चालेल मला वाटतंय .. तोपर्यंत यांचं दळण संपलेलं असेल गुरु कसा वाईट आणि राधिका कशी समजून घेते; शनाया कशी भैताड वगैरे शिवाय एक दोन एपिसोड आई बाबांना नवीन ऑफिस दाखवण्यात जाईल Lol

माझ्या गुणी शन्याला चांगले कपडेच कुणी घेत नाही गं बाई! सारखी ती गॅरीबाळाला म्हण्त असते की शॉपिंगला जाऊ, तरी बाळ ऐकत नाही. मग तिला बिचारीला कुणासमोरही कसे पण वावरावे लागते.

बाकी काल गुरुच्या आईच्या घशाखाली घास उतरत नव्हता जेव्हा गुरु बाळ भूक लागल्यावर बेंबीच्या देठापासुन बोंबलत असते पिझ्झ्या वाल्यावर. सीमा पाटिल मस्त अभिनय करतात.

भारती पाटील.

त्या मुख्य रोल बजावणार असतील शेवटी, माह्या मुलाला माफ कर ग सुने Wink

अन्जली Lol Rofl

आता राधिका मसाले बरोबर चितळेंच्या केचप ची पण अ‍ॅडव्हष्ट्राईल सुरू... काय काय घुसडणारेत देव जाणे या शिरेलित

या मालिकेतील एकमात्र चांगली गोष्ट म्हणजे राधिकासाठी सासू सासेरे यांचा सशक्त पाठिंबा दर्शविला आहे. हे अशक्य नाही पण आपल्या संस्कृतीत नक्कीच दुर्मिळ आहे.

Happy आणि ती अशी तिरकी का बसलीये?
श्रेयस चं लग्न झालं.....? पण आता तर नोकरी चं काही नक्की नाही ना? राधिका मसाले काय सॅलरी देतेय?

Pages