नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी गुलमोहरची मागच्या आठवडयातली स्टोरी बघितली, स्टार कास्ट इंटरेस्टींग वाटली म्हणून. छान वेगळी स्टोरी होती.

कोण होतं मागच्या आठवड्यात. बामा मध्ये तो सूर्या डोक्यातच जातो, जिथेनतिथे शहाणपणा. त्या राधाला काय जबरदस्ती कुठेतरी घेऊन जातो, म्हणे रड पाहिजे तेवढं, आणि तीपण काय मिठ्या मारते त्याला. दादासाहेब काही झालं की त्या रघ्याच्या कानाखाली वाजवतात, स्वत:च्या मुलांना नाही मारत कधी. पार्शिअल असतं त्यांचं वागणं, उगाच नाही निशा, रघू आणि त्यांच्या वडिलांना त्यांचा राग येत. ती चंद्राची मुलगी काल सूनध्यान मध्ये आली होती, सायकलच्या प्रमोशनसाठी. चंद्रा तालीम चित्रपटात हिरो होता का, छान आहे त्याची पर्सनॅलीटी.

कोण होतं मागच्या आठवड्यात. >>>> शर्वरी लोहोकरे आणि गौरी नलावडे. मोठी जाऊ आणि छोटी जाउच्या सन्दर्भातील गोष्ट होती.

ती देवाशप्पथ मध्ये कुहू झालेली छोटी मालकिण मध्ये सुद्दा आहे का? अ़क्षर कोठारीची बहिण झालेली दाखवली आहे त्यात.

धन्स सूलू. मी बघितलं थोडंसं पण गौरीचा नवरा दाखवलेला अगदीच बच्चा वाटत होता त्यामुळे रस गेला बघण्यातला. छोटी मालकिण बघत नाही, त्या हिरवीणीचं प्रेम असतं ना एका शिक्षकावर त्याचं काय झालं, मारून टाकलं का त्याला.

बा मा मध्ये सुर्या गीता डोक्यात जातात. बाकीचे अभिनय चांगला करतात.

चंपा राधा की गीता, राधा गेली ना ग. बहीण होती ना. मी नाही विशेष बघत मला सुर्या गीता सीन फार बोअर होतात. अभिनय निशा, तिचा भाऊ, वहीनी, गीताचे बाबा आणि रविंद्र मंकणी उत्तम करतात. संग्राम साळवी नाही आवडत.

हो अंजू, लक्षात नाही आलं, राधाला मारून टाकलं. राधा निरागस होती, लाडावलेली पण माजोरडी नव्हती. चंद्राची बायको पण छान आहे, साधी. तिचाही अपमान केला होता सुजाताने, गरीब घरातली असते म्हणून.

तेच ना ती रघुची बायको मोठ्या तालेवार घरातून आलीय मग तिच्या माहेरच्यांनी, मुलाचं कर्तृत्व न बघता घराणं बघून मुलगी दिली का. ठणाणा करत असते सारखी.

सुजाताचे काम करणाऱ्या अभिनेत्रीने खूप छान काम केले आहे. अस्सल गडहिंग्लजी भाषा वगैरे Happy

फुलपाखरु टिपीकल झीच्या वळणावर गेलेली आहे.
झीच्या कनवाळू सुनांप्रमाणेच वागते वैदेही, त्या कुलदीप काकाला घरात ठेऊन घेतलं नंतर मानसला त्याने जीवे मारायचा प्रयत्न केल्यावर मग नशीबाने अक्कल आली. आता कुसुमात्या हिच्या बाळाच्या जीवावर उठलीये, मानसला, घरच्यांना वाट्टेल ते बोलते तरी बाबांनी तिला घराबाहेर काढलेलं असताना ह्या मॅडमनी तिला घरात ठेऊन घेतलं.
अगदी चमत्कार वगैरे झालेत दाखवून. Happy वैदेही नास्तीक होती. गणपती घरात आले आणि मानस चालत बाहेर आला. ते बघून ती आस्तीक झाली. उठसूठ गणपती ह्यांना मदत करत असतो. Uhoh
आता मानस खडखडीत बरा झालाय. Happy
मानसचं कॅरेक्टर चांगलं लिहिलंय असं वाटत होतं. पण एकंदर त्याच्या चेहऱ्यावरुन तो कायम प्रेमळ वगैरे वाटतो. कुलदीपकाकाशी पंगा घेऊन त्याला मारहाण करणं वगैरे झेपलं नाही.

सगळ्यात कहर तर हेमांगी कवीचं पात्र आहे. तीला वाटतं तिलाच दिवस गेलेत. आम्ही दोघीमध्ये धाकटी बदलली का. शिवानी रांगोळे अमेरिकेला गेली आहे, नाटकासाठी. बापमाणूसमधला बापमाणूस कुठे गायब झाला, सोडली का शिरेल मंकणींनी. चंद्राने तर कधीच सोडली, बाजीमध्ये आहे ना तो.

सध्या दोन बहिणी आणि मोठ्या बहिणीचा नवरा अशा तिघांच्या सिरियल्स एकाच channel वर zee युवा वर आहेत.

खुशबू तावडे, आम्ही दोघी.

खुशबूचा नवरा संग्राम साळवी, सूर राहूदे.

खुशबूची बहिण तितिक्षा तावडे, तू अशी जवळी रहा.

Lol

आम्ही दोघीमध्ये मीराचं लग्न शरद पोंक्षेशी कसं आणि कधी झालं. शरदची मुलगी लहानपणीची नकुशी आहे बहुतेक. आदित्यला चांगला ब्रेक मिळालाय बहुतेक कंपनीत, आधी नोकरी मिळायची मारामार होती. मीराची आणि आदित्यचं नातं वो सात दिन वळणाने जाणार.

'तू अशी जवळी रहा' या मालिकेत राजवीर खूप मोठा श्रीमंत उद्द्योजक दाखवलाय पण त्याच्या घरातले सोफे अगदीच मळलेले-काळवंडलेले आहेत.

झी युवा ची सिरिअल्स ची पहिली बॅच सोडली तर आता पार रया गेलीय चॅनेल ची. युवा च्या नावाखाली फक्त फॅमिली drama चालू आहे.

Pages