काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे बरयं...... बिहारी, युपी वाले मुंबईला आले तर त्यांनी मराठी वगैरे व्हायचे, मग मराठी तिकडे गेले तर मुंबईची मुलगी??

लग्नाच्या आधीच महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायच आणि खातरजमा करायचं राहुन गेल शिव , गौरीचं प्रेमाच्या नादात ; आणि आता बिच्चारे आपले मतभेद डिस्कस करताहेत !

मला वाटत ते त्यांना मुद्दामून दाखवायचं असेल . अजूनही यु पी बिहार मध्ये असच असेल आणि मुंबईची मुलगी येऊन हा बदल घडवते . ती स्वतःच्या स्वाभिमानाकरता नोकरी करते ( बरं शिक्षणाचा तरी काय उपयोग घरात बसून ) आणि तिच्या सासरचे सरतेशेवटी तीच नोकरी करण एक्सेप्ट करतात वगैरे वगैरे. कारण अजूनही या काळातही युपी -बिहार मधल्या जास्तीत जास्त घरात हे असं बाईला घरात दाबून ठेवत असतील ते मालिकेच्या निमित्ताने त्यांच्या समाजात बदल घडवायचा विचार असावा निर्मात्यांचा . कारण एक निर्माता गुप्ता आहेच

खरीखुरी गोष्ट सांगते आमच्या ऑफिसमधली . ऑफिस मध्ये एक मुलगी (बाई) होती बिहारची . तिच्या सासरच्या घरचा साड्यांचा बिझनेस होता. ( अजूनही आहे ) . तिचा नवरा त्याच बिझनेस मध्ये ( घरचे सगळेच पुरुष ) . तिला इथे मुंबईत गव्हर्मेंट ची नोकरी मिळाली आणि तिने ती स्वीकारली. आली तेव्हा डोक्यावरून पदर घेऊन ऑफिस मध्ये यायची. जवळ जवळ सहा महिने -वर्ष भर तरी ( अगदी गौरी सारखी डोक्यावरून पदर ) इथे गव्हर्मेन्ट क्वार्टर मध्ये राहिली. नवरा पाच सहा महिन्यांनी आला . तो रोज भांडायचा तिच्याशी त्याला तिथला घरचा बिझनेस सोडून बायकोकडे मुंबईला यावं लागलं म्हणून. नंतर सगळं छान झालं. वर्षातून एकदा बिहारला घरी जाऊन येतात. मोठ्ठ एकत्र कुटुंब . तिथे गेली कि कधी एकदा मुंबईत येतोय असं होत तिला . तिथे सगळं जून वातावरण आहे म्हणते . डोक्यावरुन पदर घ्यायचा . आल्यागेल्याच्या सारखं पाया पडायचं . जावा सगळ्या जेलसी करतात म्हणते. तुमचं बर आहे . मुंबईत स्वतंत्र . हि आत्ताच्या काळातली गोष्ट

आता गौरी पस्तावत असेल. ती शिवला म्हणत असेल की, तुझ्यावर प्रेम करुन पस्तावले मी. माझे बाबा विरोध करत होते तरी मी तुझ्याशी लग्न केल. मी तुला वेगळा समजत होते. तु पण इतर पुरुषान्सारखा निघालास. वै वै. गौरी रडत रडत म्हणत असेल, 'काहे दिया परदेस' Happy

दोन दिवसापूर्वीच्या भागात गौरीचा एक वाक्य होत - "घरातल्या मोठ्या माणसंच मन दुखवायचं नाहीय पण म्हणून स्वतःच हि मन मारता येत नाहीय" खूप आवडल, मनाला स्पर्शून गेलेल झी च्या इतर मालिकां प्रमाणे सूनने सतत इतरांसाठी त्याग करत रहाणं असं न दाखवता कधीतरी स्वतःचा विचार केला छान वाटलं

दोन दिवसापूर्वीच्या भागात गौरीचा एक वाक्य होत - "घरातल्या मोठ्या माणसंच मन दुखवायचं नाहीय पण म्हणून स्वतःच हि मन मारता येत नाहीय" खूप आवडल, मनाला स्पर्शून गेलेल झी च्या इतर मालिकां प्रमाणे सूनने सतत इतरांसाठी त्याग करत रहाणं असं न दाखवता कधीतरी स्वतःचा विचार केला छान वाटलं

>> +१००

इन्च भर तरी हालली का शिरेल? Uhoh
सध्या त्यांच्यात दुरावा येणार असल्याचं झी सारखं प्रोमोतून कळवतेय त्यामुळे झिट येते बघून बघून
एकदाचे जा म्हणावे दूर...

प्रोमो बघुन गवरी मुंबईमधे नोकरीसाठी जाणास असे वाटते. ती नक्की नोकरी कुठे करते Uhoh लग्नाची एवढी मोठ्ठी रजा. मग बनारसला बदली. तिथे जॉईन झाल्यावर परत लगेच १ महिन्याची रजा. आता परत मुंबईला बदली.

लग्नाची एवढी मोठ्ठी रजा. मग बनारसला बदली. तिथे जॉईन झाल्यावर परत लगेच १ महिन्याची रजा. आता परत मुंबईला बदली.--+१००
ही नक्की खाजगी इन्शुरन्स कं तच आहे नं? अगदी सरकारी नोकरीच्या अविर्भावात सगळं चाललय.

दोन दिवसापूर्वीच्या भागात गौरीचा एक वाक्य होत - "घरातल्या मोठ्या माणसंच मन दुखवायचं नाहीय पण म्हणून स्वतःच हि मन मारता येत नाहीय" खूप आवडल, मनाला स्पर्शून गेलेल झी च्या इतर मालिकां प्रमाणे सूनने सतत इतरांसाठी त्याग करत रहाणं असं न दाखवता कधीतरी स्वतःचा विचार केला छान वाटलं >>> रुपाली, तुम्ही हि सिरियल हया भागापासून बघायला सुरुवात केलेली आहे का?

गवरीच्या आईला एकतर बर्या साड्या नाहीत. आहेत त्या पण ती नुसत्या गुंडाळल्यासारख्या नेसते. किती अजागळ दिसते ति नेहमीच.

ते क्लियर केलं होत कि नाही ते माहित नाही पण गौरी च्या वडिलांना पण बहुदा वाटत असावं लग्न झाल्यावर सुद्धा ती आणि शिव मुंबईतच राहतील. ते मुंबईत राहणार नाहीत असं क्लियर झालं होत का ? का असंच त्यांना वाटत होत . आणि एकदम ती लग्न झाल्यावर बनारसला राहणार आहे हे समजल्यावर त्यांना धक्का बसला ? असं काही होत का ? प्रयेक भाग बघितला नाही म्हणून विचारते Happy

हो सृजा. त्यांना लग्नातच कळतं कि ते तिकडे राहाणार म्हणून. आधी शिव, गौरी आणि सर्वांनाच वाटत असतं कि ते मुंबईलाच राहाणार.
आणि मग हम्मा लग्नाच्या कोणत्यातरी विधीत अचानक शिवकडून वचन घेते कि ते दोघे बनारसलाच राहातील म्हणून.

लग्नातच त्यांना कळलं ते बनारस ला राहणार म्हणून ? मग बरोबर गौरीने नोकरीबद्दल शिव कडे क्लियर केलं नाही ते. कारण तिला वाटत होतंच आपण मुंबईतच राहू आणि मग नोकरीकरिता अडचण येणारच नाही Happy

काल शिव बोलताना म्हणाला की सरला भाभी पोस्ट ग्रॅज्युएट है.. और उर्मिला तो एम बी ए ! उनका तो कँपस सिलेक्शन भी हुआ था.... और आप क्या हो...सिर्फ...ग्रॅज्युएट? और फिर भी इतनी जिद क्यों....गौरीजी?

Happy

सरला भाभी पोस्ट ग्रॅज्युएट है.. और उर्मिला तो एम बी ए ! उनका तो कँपस सिलेक्शन भी हुआ था>>> तरी त्या घरीच बसल्यात. अरे ह्या लोकांना बहु घरीच बसायला आणि घरचं सांभाळायला हवी आहे तर कमी शिकलेली आणि जिला चालणार आहे फक्त घर सांभाळणे तशी करायचीना. कारण एखादिचे शिक्षण कमी असलं तरी तिला स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करायची इच्छा असू शकते.

मस्त ना. आधी पगार काढला. मग शिक्षण.>>>टिपिकल झाला की काय शिव. मग हे ऐकून गौरीने नाही का काही सुनावलं शिवला. आधी तर ती बसता उठता insult करायची त्याचा उगाचच कारण नसताना, मी पहिले काही महिने सिरीयल बघत होते तेव्हा.

Pages