मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा खालील माहितीबद्दल धन्यवाद Happy

मिरे-भाइंदर : १९६० साली काशी-मिरें हे चेणे खाडीवर (वसई खाडीचा समुद्रापासून दूरचा भाग) वसलेले एक टुमदार गाव होते. मिरें/मिर्‍यें म्हणजे पाणथळ जागेतला उंच भाग. सगळी वस्ती आगरी/कोळी /सोमवंशी क्षत्रिय पाठारेंची होती. तिथे मांसबंदी असणे शक्यच नाही. कारण या लोकांच्या (आणि इतरही कित्येकांच्या) गौरी सणाला मटनाचा नैवेद्य असतो. मिरे-भाईंदर नगरपालिका गेल्या दहा-पंधरा वर्षांत अस्तित्वात आली आहे. त्यामुळे १९६० साली ही नगरपालिका कसलीच बंदी घालणे शक्य नाही.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5331746368140537002&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20150911&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=राजस्थाननंतर छत्तीसगडमध्येही मांस विक्रीवर बंदी
केंद्र सरकारला बहुतेक अजुन खबरच नाहीये की राज्य सरकार असले काही निर्णय घेतायत ते Wink

धाग्याचे नाव बदलून 'मांसविक्री बंदी' करणार का? ते 'मांसाहार विक्री बंदी' चमत्कारिक वाटतंय वाचायला Happy

मराठि माणुस हा मोठ्या संख्येने रोजगारासाठी जैन,गुजराती नि मारवाडी लोकांवर अवलंबुन असतो.आपले संसार चालवीण्यास उपयुक्त असणार्या ह्या समाजांप्रती त्यान्च्या उत्सवाप्रति आदर बाळगुन् चार आठ दिवसाच्या मासाहार बन्दिला हरकत नसावि.

भारत की 6 सबसे बड़ी गोश्त सप्लाई करने
वाली कम्पनियों में से 4 के मालिक ब्राम्हण हैं।
दुनिया का सबसे बड़ा "Beef meet exporter
country"ब्राज़ील है, उसके बाद India,Australia
,USA और UK.
का न० आता है।
4 बड़ी भारतीय कम्पनियां और उनका पता-
1-Al-kabeer Exports Pvt Ltd.
(Owner- Shree Shatish &
Atul Sabharwal) 92, jolly
makers/ chembur Mumbai
400021
2- Arabian Exports pvt Ltd.
(owner- Shree Sunil Kapoor)
Russion mentions, Overlies,
Mumbai 400001

3-M.K.R frozen food Exports pvt Ltd (Owner-
Shree Madan Abot)MG Road, Janpath
NEW DELHI 110001
4-P.M.L Industries pvt.Ltd
(Owner- shree A.S bindra)
S.C.O. 62-63Sector 3
4-A Chandigarh 160022

साभार-फेसबुक

गरिब मराठी माणुस हा आठवड्यातुन फारतर दोनवेळा मांसाहार करतो.संडेला चिकन एखाद्या बुधवारी किंवा शुक्रवारी मासे रोज आवड असली तरी तो मांसाहार करू शकत नाही.मग उगाच रोजगार देणार्यांना दुखावुन काय फायदा.कायमची मांसाहार बंदी तर होत नाहि आहे ना गोवंश बंदी सारखी.गोवंश खाणार्यांनी त्यांच्या पोटावर पाय आलाय तर दाद कोणाकडे मागायची.

पगारेजी आपल्याशी बहुतांशी सहमत आहे, तसा विचार करता मध्यमवर्गीय मराठी माणसे दोनदाच मांसाहार करतात. त्यातही ब्रॉयलरच्या कोंबड्या आणि फिश मध्ये पण काय तर बोंबील अन मांदेलीच खातात.
त्यामुळे तत्व बाजूला ठेवली तर व्यावहारीक द्रुष्ट्या हा मुद्दाही योग्य वाटतोय की का उगाच या समाजाशी पंगे घ्या. ते देखील मायबाप सरकार यांच्या पाठीशी असताना तर फिर्यादही कोणाकडे करायची हा प्रश्न.

असो, मी पडलो उच्चमध्यमवर्गीय मराठी माणूस म्हणून जोशमध्ये काढला धागा.

आज माझ्या ग'फ्रेंडने मला विचारले हे मांसबंदी काय प्रकरण आहे..
हे देवा.. इथे मी धागे काढत एखादा विषय चर्चेला घेतो आणि तो आमच्याकडेच माहीत नसतो..

असो, तिला ही आज हे कळायचे कारण १०,००० जैनांचे उपोषण आणि मनसेची चिकन तंदूरी !

हे प्रकरण चिघळवण्यात नक्की कोणाचा फायदा आहे ?

फारेंड +१

अपेडाच्या साईटनुसार मुख्यत्वे बफेलो मीटच भारत निर्यात करतो.

http://apeda.gov.in/apedawebsite/six_head_product/animal.htm

थोडंस अजून शोधलंतर मिळालं की बीफच्या नावाखाली म्हशीचं मांस दिल जायचं!

अजून काही लिंक:

http://www.dnaindia.com/india/report-outraged-by-the-beef-ban-here-s-wha...

While answering to a news website, Riyaaz Amlani, head of National Restaurant Association of India, said that no restaurants that he knows of in Mumbai serves cow or bullock meat. What we eat in the guise of cow beef is actually Buffalo meat. He said, "We've been eating buffalo meat for a lot of time and we (restaurants) have been only serving buffalo meat."

However, dear readers, have some heart, your regular (cara)beef will continue to be on your plates Wink

रॉहू Rofl

गाय मीट आणि म्हैस मांस अशी चर्चा चालली आहे का?
गायीच्या पोटात ३३कोटी देव आणि म्हशीच्या पोटात राक्षस असतात का?

गायीच्या पोटात ३३कोटी देव आणि म्हशीच्या पोटात राक्षस असतात का?
>>
राक्षस कोंबड्याबकर्‍यांच्या पोटातही नसतो, प्रश्न श्रद्धेचा आहे.

ऋन्मेऽऽष,
बरोबर आहे तुझे .

गाय माता के अन्दर 33 करोड़ देवी देवता वास करते हैं
लेकिन उसके बावजूद कसाई गाय को आसानी से
काटकर बेच देता है और खाने वाले खा भी लेते होँगेँ
लेकिन शेर के अन्दर कोई देवी देवता वास नही करता
फिर भी किसी कसाई की हिम्मत नहीँ कि वो शेर
को काट सके....!!
समझ आया कुछ...???

ह्या बंदीच्या निमित्ताने काल मुंबईत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रायोजित 'चिकन बिर्याणी' चापायला जबरदस्त मजा आली.

मनसे संपेल आता लवकरच!
>>>
कदाचित हो, कदाचित नाही.
राज ठाकरे यांनी मार्केटींगच्या जिवावर पक्ष तगवला आहे.

समझ आया कुछ...???
>>
सकुरा, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे ना, बळी हा नेहमी दुर्बलांचाच जातो.
मग तुम्ही कितीही कायदे करा तो जातोच, हे त्याचे आधुनिक अ‍ॅडीशन.

अरे ऋन्मेऽऽष बाबा समजुन घे जरा...

जिच्या पोटात ३३ कोटी देव वास करतात तिला तु दुर्बल कसे म्हणु शकतो.

गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव.. निर्जीव खांबातून नृसिंह बाहेर येतो... आणी सजीव गाईतून कत्तलखान्यात नेली तरी 33 कोटी बाहेर येत नाहीत....
उभ्या जाळा त्या पंचागपोथ्या....!!!

इस्कटुन सांगितले.

सकुरा,

विश्वामित्राने सुरभि गाय बळजबरीने धरून नेली तेव्हा तिच्या पोटातून भयंकर सैन्य उत्पन्न झालं. हां पण वासिष्ठांसारखी साधना पाहिजे.

रच्याकने : दोनेक दिवसांपूर्वी एका विशिष्ट पंथाच्या पवित्र ठिकाणी यारी (कन्स्ट्रक्शन क्रेन) पडून शंभरेक जण चिरडून मेले. तिथे त्यांचं रक्षण करायला पवित्र देव आला नाही ते नवल म्हणायचं, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

माझ्या साठी दोन्ही सारखेच.

केदारनाथला पण..

म्हणुन निसर्ग सर्वश्रेष्ठ

Pages